Maharashtra Live Updates: धाराशिवच्या पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून मोठी फसवणूक; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लेटेस्ट अपडेटस जाणून घेण्यासाठी क्लिक करा. आज राज्यातील पावसाची स्थिती कशी असणार?
पार्श्वभूमी
फ्लॉवरच्या पिकावर शेतकऱ्याकडून रोटावेटर.सततच्या पावसामुळे पीक गेल वाया, ट्रॅक्टरने जमिनीत गाडण्याची वेळ. पावसामुळे खर्च वाढला, पीकही गेले वाया, बाजारभाव नसल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान. शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. मात्र...More
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या कथित चिथावणीखोर वक्तव्याच्या विरोधात उल्हासनगरात ख्रिस्ती समाज आक्रमक झाला आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केलेल्या अपमानकारक वक्तव्यावरून पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ख्रिस्ती समाजाने आज उल्हासनगर येथील पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा नेला.
उल्हासनगर शहरातील विविध चर्च संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी “गोड बोलून गळा कटणार नाही”, “धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिकरित्या दिलेली विधाने ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहेत. ही विधाने समाजात तेढ निर्माण करणारी व द्वेष पसरवणारी आहेत. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी मोर्चात सहभागी प्रतिनिधींशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. यावर योग्य कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
.
कल्याण पश्चिमला शॉर्टसर्किटमुळे घराला आग
गुलजार टांगे वाले चाळीत एका घराला आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली नसून घर जळून खाक
कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवांनी हटणास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले
नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये ट्रकच्या धडकेत बालिकेचा मृत्यू झालाय. सिद्धी लुंगसे असे विद्यार्थिनीचे नाव असून सायकलवर शाळेत जातांना विद्यार्थिनीला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने चिरडले. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केले. संशयित वाहनचालकांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला. निफाड संभाजीनगर रोडवर रोजच भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने नागरिकांना जीव मुढीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आहेत.
चंद्रपूर : भद्रावती नगर परिषदेवर 49 लाखांसाठी जप्तीची नामुष्की आली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील साहित्य आणि बोलेरो वाहन कोर्टाच्या बेलीफ मार्फत करण्यात आले जप्त, नगर परिषदेकडून 8 वर्षे थकलेल्या भाडे थकबाकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तब्बल 49 लाख रुपयांच्या थकबाकीच्या अनुषंगाने नगर परिषदेमधील साहित्य कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. संजय गुंडावार यांच्या मालकीची जागा नगर परिषदेकडून भाडेतत्त्वावर भाजी मार्केटसाठी घेतली होती. दरमहा 66 हजार रुपये भाडे ठरविण्यात आले होते. मात्र, मागील आठ वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे भाडे भद्रावती नगर परिषदेकडून भरण्यात आले नाही. संबंधित भाडे आणि व्याज मिळून थकबाकी रक्कम वसुलीसाठी गुंडावार यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आज नगर परिषद कार्यालयात जप्तीची कारवाई राबविण्यात आली. या कारवाईत मुख्याधिकारी यांच्या केबिनमधील सर्व साहित्य, खुर्च्या, संगणक तसेच नगर परिषदेकडे असलेले एक बोलेरो वाहन देखील जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे नगर परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जना संदर्भात अजूनही तोडगा नाही
राज्य सरकारने हायकोर्टाकडे मागितला वेळ, याबाबत अहवाल सादर करण्यासाठी हायकोर्टाने दिले 21 जुलै पर्यंत राज्य सरकारला मदत
पुढील सुनावणी 24 जुलैला
यंदाच्या गणेशोत्सवात पीओपीच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.
यावर अद्याप तोडगा निघालेला नाही, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारला किमान तीन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडं केली आहे
यावर याचिकाकर्त्यांनीही आक्षेप न घेता सहमती दिल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला याबाबत अहवाल सादर करण्यासाठी 21 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.
या प्रकरणावरील सुनावणी 24 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. आगामी गणेशोत्सव जवळ अवघ्या 57 दिवसांवर आल्याचं ध्यानात ठेवत राज्य सरकारनं लवकर निर्णय घ्यावा, अशी सूचना सोमवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आरोधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील पारा गावात पवनचक्की कंपनीकडून शेतकऱ्यांना दिलेली चेक बँकेत वटले नाही. 12 ते 15 शेतकऱ्यांचे जवळपास 45 लाख किमतीचे चेक बाउन्स झालेत. त्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. सिरेंटिका कंपनीचे टॉवर शेतकऱ्यांच्या शेतात उभारले गेले. मात्र कंपनीच्या ठेकेदारांकडून मोबदला म्हणून दिलेली चेक वाटले नाहीत. त्याबाबत ठेकेदारांशी संपर्क साधायचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यावर ते फोनही घेत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. आपली फसवणूक झाली असून आपल्याला न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली.
बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर मध्ये धक्कादायक घटना,
दोन वर्षाचा मुलाचा हात मेट्रोमध्ये अडकला,
मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी पाहून तात्काळ मेट्रोच्या गेट उघडला,
मेट्रो कर्मचाऱ्याचा सतर्कतेमुळे मोठा अनर्थ तडला आहे,
मेट्रोचे दार उघडल्यामुळे दोन वर्षाच्या मुलगा पुन्हा मेट्रोचा आत गेला,
संपूर्ण घटना बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर असल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद...
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची पवनचक्कीविरोधात प्रचंड घोषणाबाजी
तांदुळवाडी येथील पवनचक्की बाधित शेतकरी कुटुंबातील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
सहा दिवसांपासून वाशी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आमरण उपोषण
पवनचक्की कंपन्यांच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा आरोप करत उपोषण
सहा शेतकऱ्यांची तब्येत खालवली मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल नाही
त्यामुळे संतप्त महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
पवनचक्कींच्या ठेकेदारांकडून होणाऱ्या अन्याय दूर करत न्यायाची मागणी
आमदार संदीप क्षीरसागर यांचे काही फोटो हे ज्यांच्यावर लैंगिक शोषण आरोप झाले आहेत त्याच्या सोबत आहे. मुळात त्याचे फोटो हे केवळ संदीप क्षीरसागर नाही तर सगळ्या जिल्ह्यातील नेत्यांसोबत आहेत त्यामुळे त्या सगळ्यांना आरोपी करणार का?
वाल्मिक कराड आणि त्याच्या सोबत्याना बीड कारागृहात ठेऊ नका असं मी वारंवार सांगतो आहे मात्र अद्याप हे झालेल नाही. जेल मधील काही अधिकारी त्याला मदत करत आहेत त्यांची नावे मी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी
बीड डीपीडिसी बाबत तक्रार करून देखील त्याठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराची अद्याप चौकशी झालेली नाही. मी सतत पाठपुरावा करत आहे. आम्हाला पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षा आहे
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणात मोहन उगले यांची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी त्यांना सॉफ्ट टारगेट केलं जात असल्याचा आरोप खुद्द आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत केला. ज्या महिलेनं ही तक्रार केली, ती कधीही मोहन उगलेला भेटलेली नाही, ना त्यांच्यात फोनवर संवाद झालेला आहे. मग विनयभंग कसा आणि कुठे झाला? पोलिसांनी आधी शहानिशा करून गुन्हा दाखल करायला हवा होता.जर मोहन उगले दोषी ठरले तर पक्षातून हकालपट्टी करु, पण जर आरोप खोटे ठरले, तर अशा महिलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.पोलिसांनी सामान्य महिलांच्या तक्रारींवर कारवाईसाठी दहा-दहा दिवस लावले जातात, पण प्रतिष्ठित नगरसेवकांवर काही तासांत गुन्हा दाखल होतो, ही दुजाभावाची वागणूक का? असा सवालही भोईर यांनी केला.याशिवाय, या प्रकरणाची माहिती लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचंही आमदार विश्वनाथ भोईर त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटलं तसेच एका अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील घटना
पंढरपूर कडे जाताना वाटेत चहासाठी थांबले त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले
दोन जणांनी कोयता गळ्याला लावला आणि त्यांना लुटले आणि नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर केला बलात्कार
दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत
वर्ध्यात कृषी विभाग व शासनाच्या बियाणे धोरणाच्या विरोधात कृषी व्यवसायीकानी बंद पुकारला आहेय. वर्धा जिल्ह्यात अनधिकृत एच टी बी टी बियाणे मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे अधिकृत असलेल्या कृषी व्यवसायिकांच्या बियाणे विक्रीत कमालीची घट झाली आहे. अनधिकृत बियाणे व औषधी विक्री विरोधात करण्यात आलेली कृषी विभागाची भरारी पथके देखील अपयशी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे बाराशे कृषी व्यवसायीकांनी बंद पुकारत आज बाजारातील आपली कृषी सेवा केंद्रे बंद ठेवली आहे. अनधिकृत बियाणे विक्री थांबवू शकत नसेल तर एच टी बी टी बियाणे विक्रीची महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे अपयश लपविण्यासाठी गेल्या महिन्यात कृषी सेवा केंद्राची तपासणी केली गेली असल्याचा आरोप होत आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या प्रारंभापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी १२ विधान भवनात येणार आहेत.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १२:४५ वाजता आझाद मैदानात जनसुरक्षा विधेयका विरोधातील मोर्चात सहभागी होणार आहेत.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक बंगल्यावर भेट घेणार आहेत.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले विधानसभा अध्यक्षांचे स्वागत
गणेश मूर्ती देत विधानसभा अध्यक्षांचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून सन्मान
Buldhana News : मोताळा येथील सायकलीक एनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या सौर ऊर्जा प्रकल्प कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नगर पंचायतीची परवानगी मिळवून व्यवसाय सुरू केल्याप्रकरणी नगराध्यक्षासह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तब्बल एका महिन्यानंतर बोराखेडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.. मागील महिन्यात मोताळा नगर पंचायतीच्या वतीने पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानुसार चौकशीत ओटू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड व सायकलीक एनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी नगर पंचायतीकडून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता, बनावट नाहरकत प्रमाणपत्र तसेच ठरावाचे दस्तऐवज ई- मेलद्वारे सादर करून प्लांट चे काम सुरू केल्याचे उघड झाले होते.
या बनावट दस्तऐवजांवर नगर पंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या तसेच शिक्क्यांचा वापर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.. त्यामुळे नगर पंचायतीचा सुमारे १० लाख रुपयांचा महसूल बुडविला गेला, असे स्पष्ट झाले... या प्रकरणात आणखी काहींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.. याप्रकरणी पोलिसानी मोताळा नगर पंचायत चे स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख, महेश सहाणे, शांताराम लोखंडे, नगराध्यक्ष माधुरी देशमुख, तसेच लिपिक सुनील मिरकुटे यांनी संगनमत करून शासनाची आणि नगर पंचायतीची फसवणूक केली असून या पाच जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकारामुळ स्थानिक प्रशासन व नगर पंचायत कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कुख्यात दहशतवादी साकिब नाचनवर पडघा बोरवली हद्दीतील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार मुस्लिम रीतीरीवाजाने करण्यात आले . सर्वप्रथम जनाजे नमाज अदा करण्यात आली व त्यानंतर यांचा वर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांना त्यांच्या आईच्या कबरीच्या बाजूला दफन करण्यात आला आहे . यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते तब्बल 400 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
नाशिक शहरातील बिडी कामगार परिसरातील तीन अल्पवयीन मुलं काल पोहण्यासाठी एका बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावामध्ये गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्यातील दलदलीत अडकल्याने या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काल दुपारपासून बेपत्ता असलेल्या तिघां अल्पवयीन मुलांचा शोध सुरू होता. विशेष म्हणजे या तिघांचेही नाव साई असून यात साई गरड, साई उगले आणि साई मोहिते असे या तिघा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांचे नावे आहेत. आज सकाळी कृत्रिम तलावाच्या शेजारी या मुलांचे कपडे आढळून आले आणि तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून या तिघांचा शोध घेतला गेला. मुलांचा शोध लागल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला होता. तिघांचेही मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिकच्या आडगाव पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
जन्मदात्या बापानेच कुऱ्हाडीचे घाव घालत केला पोटच्या मुलीचा खून
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील शेळगाव येथील हादरवणारी घटना
मुलीचा खून करून मृतदेह 24 तास घरातच ठेवला
ज्ञानेश्वर महादेव जाधव याने पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीला संपवलं
मुलगी सतत आजारी पडत असल्याने व ती सायकल वरून पडल्याने रागाच्या भरात कुराडीचे घाव घालून खून
दारूच्या नशेत नऊ वर्षाच्या गौरीची जन्मदात्याकडून निर्घृण हत्या
धाराशिवच्या आंबी पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीला बेड्या
मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोकस्थंभ गायब
यापूर्वीच्या अधिवेशनाच्या पासेसवर अशोकस्थंभ असायचा
काहीदिवसापूर्वी आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर राजभवन येथे कार्यक्रम पार पडला होता
या कार्यक्रमाच्या बॅनरवरही अशोकस्थंभ हटवून सेंगाॅल वापरण्यात आला होता
यावरून विरोधकांकडून सत्ताधार्यांवर टिका करण्यात आली होती
- नाशिकच्या बिडी कामगार येथील तीन अल्पवयीन मुल कृत्रिम तलावात बुडाले ...
- बांधकाम साईटवर तयार केलेल्या तलावात पोहण्यासाठी गेल्याने पाण्यात बुडाल्याची माहिती...
- काल दुपारपासून तिघे होते बेपत्ता, कृत्रिम तलावाच्या काठावर कपडे आढळून आल्याने लागला शोध
- तलावातून तिघांचे मृतदेह काढण्याचे काम सुरू, अग्निशामक दलाच्या जवानांकडून होते शोध कार्य सुरू...
- आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू...
पावसाळी अधिवेशन ही विरोधी पक्ष नेत्याविनाच?
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही विरोधीपक्ष नेते निवडीची झाली होती चर्चा
सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेते पदासाठी दाखवली होती अनुकुलता
निवडीचा प्रस्ताव अद्याप ही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन
या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेते निवड होणार का? याकडे असेल लक्ष
खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शाह यांचा फ़ोन आल्याची सूत्रांची माहिती
Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा दोडामार्ग मार्गावरील पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झाले आहेत. बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात तब्बल १०० फूट फुकेरी बसला फरफटत नेले. फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड हे प्रत्येक हिंदुस्थानीचं प्रेरणास्थान आहे. मात्र या ऐतिहासिक गडाचं महसुली आणि ग्रामपंचायत नाव 'छत्र निजामपूर' असल्यानं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'निजाम' या परकियाच्या नावाने रायगडाच्या पवित्र परिसराची ओळख होणं हा इतिहासाचा अपमान असल्याचं ते म्हणाले. वाघेरी, रायगडवाडी, हिरकणीसारख्या ऐतिहासिक गावांची ओळख असतानाही महसुली नोंदी 'छत्र निजामपूर'मध्ये कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे नाव हटवून ग्रामपंचायतीचं नाव 'रायगडवाडी' करण्याची मागणी त्यांनी केली असून, आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ते हा मुद्दा अधिकृतरित्या उपस्थित करणार आहेत. आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Bhandara: खाकी वर्दीतील पोलिसांना बघितल्यावर भल्याभल्या गुन्हेगारांची बोबळी वळते....मात्र, या खाकी वर्दीच्या मागंही माणुसकी आणि सामाजिक दायित्व निभावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी असतात...याचा प्रत्यय भंडारा पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमावरून बघायला मिळतोय. भंडारा पोलिसांनी पोलिसिंग सोबतचं एमपीएससी, यूपीएससी, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती प्रक्रियेच्या परीक्षांची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रकल्प दिशा सुरू केला आहे. पोलीस विभागानं प्रकल्प दिशा नावाचं स्वतःचं youtube चॅनल सुरू केलं आहे. भंडारा पोलीस मुख्यालय आणि अधिनस्त जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे क्लासेस नं करता घरी बसून मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
भंडारा पोलिसांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता असा उपक्रम सुरू केलाय, बहुदा पोलिसांकडून सुरू केलेला राज्यातील हा पहिलाचं उपक्रम असावा. या उपक्रमांतर्गत १ हजार विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचा संकल्प भंडारा पोलिसांनी केला. प्रत्येक पोलीस ठाण्यातून परीक्षा पास करणाऱ्या पहिल्या ५० आणि जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मोफत प्रशिक्षण वर्गासाठी निवड केली जाणार आहे. आठवड्यातून एकदा मी कसा घडलो ? या विशेष सत्राच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमासाठी भंडाराचं नव्हे तर, विदर्भातील सुमारे ३५०० विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून प्रत्यक्ष २७०० विद्यार्थ्यांनी चाचणी परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसवर होणारा अनाठाई खर्च भंडारा पोलिसांच्या माध्यमातून वाचणार आहे. समाज सुधारण्याच्या प्रयत्नासोबतचं भंडारा पोलिस आता भावी अधिकारीही घडविणारं आहे, याचं विद्यार्थ्यांनी तोंड भरून कौतुक केलं.
शरद पवारांची साथ सोडून उद्या माजी आमदार विजय भांबळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विजय भांबळे यांनी नुकतीच भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती
नवाब मलिक यांच्या प्रयत्नातून विजय भांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर
उद्या मुंबईत महिला विकास महामंडळाच्या कार्यालयात पक्ष प्रवेशाचे आयोजन
प्रवेशाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार
नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानच्या जामिनावर आज सुनावणी
- नागपूरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या विरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे..
- सत्र न्यायालयात फहीम खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुर्ण झाली असून आज फहीम खानच्या जामिनावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे..
- विशेष म्हणजे फहीम खान सह ८० जणांचे जामीन अर्ज आहे..
- फहीम खान वर वॉट्सअप वरून मॅसेज आणि व्हिडिओ पाठविल्याने दंगल भडकवल्याचा आरोप आहे..
- उद्धव ठाकरे यांनी मराठी मराठी म्हणत मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घात केला.
- त्रिसूत्रीत तीन भाषा जाहीर कराव्या असा माशेलकर समितीचा अहवाल होता.
- माशेलकर समितीचा अहवाल रद्द करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
- आपलं पाप लपवण्यासाठी उद्धव ठाकरे हा सगळा प्रयत्न करत होते, पाप झाकण्याचा जर प्रयत्न असेल तर एक चित्रपट उबाठावर निघू शकतो
- नरेंद्र जाधव यांची समिती अभ्यास करेल आणि कुठल्या वर्षापासून हिंदी भाषा शिकविली जाऊ शकते यासंदर्भात अहवाल देईल.. हा अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतला आहे.
- महाराष्ट्रातील मुलांना समोर जायचं असेल तर जास्त भाषा त्यांना आल्या पाहिजे.
- मुंबईमध्ये नेत्यांच्या मुलाना फ्रेंच, इंग्रजी शिकवतात, आमच्या ग्रामीण भागातील मुलांना मराठी सोबत इंग्रजी का शिकवु नये?? हिंदी का शिकू नये?? त्यांना समोर का जाता येऊ नये??
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय रद्द केला त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे..
- पक्ष वाढीसाठी विजय सभा, अस्तित्व टिकवण्यासाठी विजय सभा उद्धव ठाकरे यांना घ्यावीच लागेल.
- स्वतःचं पाप झाकण्यासाठी खटाटोप करावे लागते. यावर चित्रपट काढायला काय हरकत आहे असा टोलाही खासदार बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
- उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपातत करणार प्रवेश
- धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे करणार भाजपात प्रवेश
- 1 जुलै रोजी दोन्ही माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती
रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यपदीच्या पद्ग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने प्रवेशक रण्याची तयारी
- अपूर्व हिरे शिक्षक मतदार संघाचे होते आमदार
- 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून लढवली होती निवडणूक
- सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचे मात्र केले स्वागत
- सुधाकर बडगुजर याना शह देण्यासाठी अपूर्व हिरे यांचा पक्षात प्रवेशाची चर्चा
- कुणाला पाटील धुळ्याती काँगेसचे माजी आमदार
- कुणाला पाटील याच्या एंट्री ने धुळ्यात भजाप ची ताकद आणखी वाढणार
नंदुरबार:- जिल्ह्यात होणाऱ्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. तापी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने प्रकाशा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग सुरू. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग. नदीपात्रात मासेमारी किंवा इतर कारणासाठी कुणी जाऊ नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तरुणांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून या कुटुंबाला मारहाण झाली असून महाराणीसह टोळक्याने घरातील साहित्याची देखील तोडफोड केली. दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भंडाऱ्यात रात्रीपासून सर्वदूर रिमझिम पाऊस सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं भातपिकाच्या लागवडीसाठी शेतकरी सरसावला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी अगोदरच बी - बियाणे आणि खतांची खरेदी करून ठेवली आहे. जून महिना अखेर भंडारा जिल्ह्यात ७९.९ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागानं केली असून भंडारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं याची माहिती प्रसारित केली आहे.
शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आज मुंबईत होणार आहे… नरीमन पॉइंट येतील महिला विकास मंडळाच्या सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. राजकीय पक्षांच्या संसदीय कार्य प्रणालीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पाच वर्षातून एकदा आयोजित करावी लागते.
या बैठकीत त्या पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी पक्षांतर्गत मतदान प्रक्रिया करून निवडले जातात… त्यामुळे आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे
तसेच शिवसेना पक्षातील इतर महत्वाच्या पदांसाठी देखील आज महत्वाची घोषणा होऊ शकते. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या राष्ट्रिय कार्यकारिणी बैठकीत काय निर्णय होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय
ठाकरे गटाच्या उपनेत्याची शेतकऱ्याला मारहाण
ऊसाचे थकीत बिळाची मागणी केल्याने केली मारहाण
सचिन घायाळ असे मारहाण करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपनेत्याचे नाव
राहुल कांबळे असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव
शेतकऱ्याला घरी बोलावून सचिन घायाळांनी केली मारहाण
घायाळांसह चौघांकडून मारहाण केल्याचा आरोप
पैठण पोलिसांत सचिन घायाळांसह चौघांवर गुन्हा दाखल
मारहाण करतानाच व्हिडीओ देखील व्हायरल
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: धाराशिवच्या पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून मोठी फसवणूक; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार