Maharashtra Live blog: सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल; प्रकरणाचा सीआयडी करणार तपास
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडी आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. पुण्यातील यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण जमावबंदी लागू
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडी आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. पुण्यातील यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण जमावबंदी लागू.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणात केतन कदम...More
अकोल्यात 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं मोठ रॅकेट?. पाचशे रुपयांच्या नोटा मोजतांना आणि सुकण्यासाठी वाळू घातलेल्या नोटांचा एक फोटो समोर आलाय. हा फोटो 'ABP माझा'च्या हाती लागलाय.. 3 ते 4 व्यक्ती एका घरामध्ये या पाचशे रुपयांच्या नोटा मोजत असल्याचे फोटोत दिसत आहे. तर काही नोटा टोपल्यामध्ये वाळू घातलेल्या आहेत.. या सर्व नोटा बनावट असल्याची शक्यता आहे. दरम्यान, हा फोटो कधीचा आणि कुठला आहे? हे कळू शकले नाहीय.. मात्र हा फोटो अकोल्यातीलच असल्याचे बोलल्या जातंये. पोलिसांचे काही पथक त्यांच्या मागावर आहे.
दरम्यान, नुकतेच मागील महिन्यात अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातल्या एका महिलेने दुकादाराला 500 रुपयांच्या बनावट नोटा देत गंडवलं होतंये. त्यामुळ अकोल्याच्या मार्केटमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा रंगु लागलीय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर मोठं चर्चेत आहे.. या बनवाट नोटा बहुतांश 500 अथवा 100 रुपयांच्या असतायेत.. या हुबेहुब बनवण्यात आलेल्या नोटांमुळे अनेकदा नागरिकांना गंडवल्या जातंय.. त्यामुळे नोटा तपासुनच स्विकाराव्यात असे आवाहन करण्यात आलेय.
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल; अज्ञात व्यक्तीनं विरोधात
अज्ञात व्यक्तीनं विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञात व्यक्तीं विरोधात करण्यात आला खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणाचा तपास ही आता सीआयडी करणार
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल; अज्ञात व्यक्तीनं विरोधात
अज्ञात व्यक्तीनं विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञात व्यक्तीं विरोधात करण्यात आला खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणाचा तपास ही आता सीआयडी करणार
बीड: अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या एका तरुणाला मेसेज आला. तर कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर संबंधित तरुणाला देण्यात आली. भयभीत झालेल्या तरुणाने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात एटीएसने तरुणाची चौकशी केलीय. संशयिताने पाकिस्तानातील लोकेशन देखील तरुणाला पाठवले. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देऊ आणि मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असा मेसेज तरुणाला करण्यात आला. दरम्यान या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तीन वर्ष चिमुकलीची सावत्र आईने गळा दाबून केली हत्या, मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील धक्कादायक घटना
जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून सावत्र आईने मुलीची हत्या केल्याचा आरोप
कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे
तर याप्रकरणी सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नागेश कोकणे हे आपली दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली कीर्ती आणि आकृती यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथे भाड्याने राहत होते.
गेल्या काही काळापासून सावत्र आई तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती.
जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यांसारख्या सामान्य कारणांवरून ती मुलींना अमानुष मारहाण करत होती.
शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हाच राग अनावर झाल्याने तेजस्विनीने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्ष चिमुकलीची सावत्र आईने गळा दाबून केली हत्या, मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील धक्कादायक घटना
जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून सावत्र आईने मुलीची हत्या केल्याचा आरोप
कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे
तर याप्रकरणी सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नागेश कोकणे हे आपली दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली कीर्ती आणि आकृती यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथे भाड्याने राहत होते.
गेल्या काही काळापासून सावत्र आई तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती.
जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यांसारख्या सामान्य कारणांवरून ती मुलींना अमानुष मारहाण करत होती.
शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हाच राग अनावर झाल्याने तेजस्विनीने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार बैठक
- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत
साधू महंताचे अमृत स्नान गोदावरी नदी होणार असल्याने नदी प्रदूषण मुक्त करण्याची साधू महंत आणि पर्यावरण प्रेमीची मागणी
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे एसटीपी प्लांटसह गोदावरी नदीची पाहणी करणार
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेणार
- आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा सरकार पुढे आहे आव्हान
- पंकजा मुंडे थोड्याच वेळात त्रंबकेश्वर ला जाणार आहेत त्रंबकेश्वर च्या दर्शनानंतर कुशावर्त तीर्थ आणि इतर भागाची पाहणी करणार
भयमुक्त गणेशोत्सवाची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून ग्वाही पण भयमुक्त पुणे कधी ?
वाहन तोडफोडीची धक्कादायक आकडेवारी समोर
पुण्यात वाहनतोडफोडीच्या दीड वर्षात १२४ घटना
पुण्यातील विविध भागात रात्रीच्या वेळी वाहनतोडफोडीच्या घटनेने पुणेकर हैराण
वाहन तोडफोड, कोयता गँग, हल्ले आणि दहशत पसरवणाऱ्यांमध्ये ३५ टक्के अल्पवयीन मुलांचा समावेश
कोंढवा, सहकार नगर, विश्रांतवाडी, सिंहगड रोड हे वाहन तोडफोडीचे हॉटस्पॉट
शहरात वाहन तोडफोडीच्या दीड वर्षात तब्बल १२४ घटना घडल्या असून, त्यामध्ये गेल्या वर्षी (२०२४) ८९ घटना घडलेल्या आहेत. त्यातील ८१ गुन्हे उघड असून, २५५ आरोपी आहेत. तर अल्पवयीन ८७ मुलांचा सहभाग होता. तर चालू वर्षात ३५ घटनांत ८२ आरोपीपैकी ५० मुले अल्पवयीन आहेत.
पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड
गाड्या तोडफोड सत्र थांबेना
टोळक्याकडून गाड्या फोडून दहशत वाजवण्याचा प्रकार.
सिंहगड रोडवरील हिंगण्यातील खोराड वस्ती भागात गाड्या तोडफोडीवी घडली घटना
15 ते 20 तरुणांच्या टोळक्याने परिसरात गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
रात्री सव्वा आठ साडे आठच्या सुमारास म्हसोबा मंदिर परिसराकडून आलेल्या तरुणांच्या हातात कोयते तसेच रोड (लोखंडी गज) होते. त्यांनी वरच्या भागातील गाड्या फोडण्यास सुरुवात केली. सोबतच परिसरातील नागरिकांना धमकाविले. .
८ ते १० दुचाकी, रिक्षाचे केले नुकसान केले.यापूर्वी देखील या भागात अशा तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. मध्यंतरी कोयता गॅंगने दहशत माजविण्याचा प्रकार घडला होता दोन गटात होणाऱ्या भांडणांमध्ये स्थानिक नागरिकांना नाहक त्रास
पोलिसांकडून कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ठोस कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
परभणीतील ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर हे काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झाले मात्र ते भाजपवासी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणावर चढाओढ पाहायला मिळत आहे पक्षातील दहा ते पंधरा नेते या पदासाठी इच्छुक असून जिल्हाध्यक्ष निवडत असताना नाराजी होऊ नये म्हणून पक्षाकडून निरीक्षक म्हणून पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे आज परभणीत दाखल होणार असून पक्षाचा आढावा घेणार आहेत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष पदा संदर्भामध्ये ते पक्षाकडे अहवाल देणार आहेत त्यांनतर जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे.महत्वाचे म्हणजे वरपूडकर यांनी दोन वेळेला काँग्रेस सोबत गद्दारी केली तरी काँग्रेसला मात्र कुठलाही परिणाम झाला नसल्याची टीका काँग्रेस नेते करू लागले आहेत
हे नेते आहेत इच्छुक
तुकाराम रेंगे पाटील
सुरेशदादा देशमुख
सिद्धार्थ हत्तिअंबीरे
रविराज देशमुख
भगवान वाघमारे
बाळासाहेब देशमुख
बाळासाहेब रेंगे
अतिक उर रेहमान
परभणी: ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या परभणीतच महावितरणचा कंपनीचा भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे.दोन वर्षांपुर्वी वीज कनेक्शन काढून ही निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला नियमित वीज बिल दिले जात आहे याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.परभणी शहरातील गणेश नगर भागात राहणारे निवृत्त पोलीस अशोक पवार यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या नावाने असलेले वीज कनेक्शन कट केले होते मात्र तरीही त्यांना दर महिन्याला बिल देण्याचे काम महावितरण कंपनीकडून सुरू आहे याबाबत त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला असुन त्यांना वीज कनेक्शन नसताना त्यांना २८ हजारांचे बिल देण्यात आले आहे त्यामुळे पवार हैराण झाले असून ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी केलीय.
Beed : बीड जिल्हा कारागृहात ज्या कैयद्याकडे मोबाईल आढळून आला होता. त्या कैद्याची लातूर कारागृहात रवानगी करण्यात आलीय. तर एका रबरी बॉल मध्ये गांजा आढळून आलेल्या कैद्याची शिवाजीनगर पोलिसांकडून कोठडीत चौकशी सुरू आहे.
बीडच्या जिल्हा कारागृहात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह इतर साथीदार आहेत. कराड जेलमध्ये असल्यापासून बीड जिल्हा कारागृह सतत चर्चेत आहे. अशातच कारागृहातील अधिकारी देखील वादग्रस्त ठरले. त्यामुळे कारागृह अधीक्षकांची बदली देखील झाली.
रफिक खुर्शीद सय्यद या कैद्याकडे बीड जिल्हा कारागृहात मोबाईल आढळून आला. या मोबाईल वरून अनेक चर्चांना उधान आले. या मोबाईलचे सीडीआर काढण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी देखील केली होती. दरम्यान आता मोबाईल आढळून आलेला कैदी लातूरला पाठवला गेलाय. तर या कैद्याकडील मोबाईल ताब्यात घेतला असून लॅब मध्ये याची पडताळणी होत असल्याचं पोलिसांनी सांगितले
जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचे वाटप
मुंबई पालिकेकडून दहा हजार लिटरचा पुरवठा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना मिळावी यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना मोफत शाडू माती, 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर मंडपासाठी जागा अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत
त्यात आता पर्यावरणपूरक रंगांचीही समावेश असेल. मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंगाचा पुरवला जाईल
त्यात सहा रंगांचा समावेश असेल. एकूण ७ हजार ८०० लीटर रंग व ३ हजार लिटर 'इको प्रायमर' पुरविण्यात येईल...
महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत
मुंबईत शाडू मातीच्या मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी पालिकेने मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरवली आहे.
आजवर मूर्तिकारांना ९५२ टन माती पुरविण्यात आली आहे. शिवाय ९९७ मूर्तिकारांना मंडपासाठी जागाही देण्यात आली आहे.
मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग विशेषतः रासायनिक रंग हे पर्यावरणासाठी घातक शकतात.
त्यामुळे विसर्जना वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असते.
त्यामुळे मूर्तिकारांना शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे
Nashik : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत.या नद्यांमध्ये आलेल्या पूर पाण्यामुळे गिरणा धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असून, धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे..या पूर पाण्यामुळे गिरणा धरणात सध्या सुमारे ६४.६१ टक्के साठा भरला असून, हा साठा आगामी काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.नाशिक जिल्ह्याच्या काही टंचाईग्रस्त गावांसह, मालेगाव व परिसरातील कृषी क्षेत्राला या वाढत्या पाणीसाठ्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे..
कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातमधील अंबानींच्या वनतारा प्राणी कल्याण प्रकल्पात केल्याचा वारकरी साहित्य परिषदेकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आलाय. कोर्ट किंवा कुणीही असल तरी जनमानसाची कदर ही करावीच लागते असे म्हणत महादेवी हत्तीला जर पुन्हा नांदणी मठात पाठवले नाही तर वारकरी संप्रदायाच्या वतीने उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरावर दिंडी घेऊन जाणार असल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी जाहीर केलेय. कायदा बाजूला ठेऊन आणि जनमानसाची कदर ठेऊन हत्ती मठाकडे परत देण्यात यावा अशी विनंती मुकेश अंबानीना आमच्या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येईल असेही विठ्ठल म्हणालेत.
बीड: अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटल. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले..
शिरूर तालुक्यातील एक तरुण सोशल मीडियाचा वापरकर्ता आहे. सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेज द्वारे सांगितले.
दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनुसार संशयीतावर गुन्हा दाखल असून हा नेमका काय प्रकार हे तपासानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं.
बीड: अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटल. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले..
शिरूर तालुक्यातील एक तरुण सोशल मीडियाचा वापरकर्ता आहे. सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेज द्वारे सांगितले.
दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनुसार संशयीतावर गुन्हा दाखल असून हा नेमका काय प्रकार हे तपासानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं.
बीड: अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटल. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले..
शिरूर तालुक्यातील एक तरुण सोशल मीडियाचा वापरकर्ता आहे. सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेज द्वारे सांगितले.
दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनुसार संशयीतावर गुन्हा दाखल असून हा नेमका काय प्रकार हे तपासानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं.
- राज्यात खाजगी बाजार समितींना देण्यात आलेले वनटाईम परवान्याबाबत पुर्नविचार सुरु
- ज्या खाजगी बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधा आणि सोई उपलब्ध असतील त्यांचेच परवाने नुतनीकरण होणार
- दांगट समितीचा अहवालाचा आढावा घेणार
- येत्या काही दिवसात विपणन क्षेत्रात अमुलाग्र बदल दिसणार
- राज्यातील 305 पैकी शंभर बाजार समित्या सोडल्या तर बाकींच्या बाजारसमित्यां मध्ये मुलभूत सुविधांचा अभाव
- याच अनुशंगाने आतराष्ट्रीय अथवा बाह्य फंडीग उभारून त्यांच्याच मुलभूत सुविधा उभारणाऱयावर भर
- एक तालुका एक बाजार समिती धोरण असणार
- कोकणात मासेमारीसाठी सर्व सोईयुक्त बाजार समिती स्थापनार
- हजार ते बाराशे एकरवर विमानतळ, रेल्वे आणि पोर्ट या सर्व सुविधांचा समावेश या आंतराष्ट्रीय बाजार समिती स्थापनार
- पिंकाना सोर्टींग, स्टोरेज, पॅकींग, ग्रेडींग आणि मार्केटींग यावर काम सुरु
- डोंगरी नागपुर आणि भिंवडी जवळ अशी दोन शंभर एकर मध्ये अग्रोलॉजीस्टीक पार्क निर्माण करु
- लाडक्या बहिण योजणे संदर्भात महायुतीच सरकार कटीबद्ध ,
- लाडक्या बहिणांना लाभ मिळणारच
- आताच्या निवडणूकीत दिलेले सर्व आश्वासन 2029 पर्यत च्या विधानसभा निवडणूकीपर्यत पुर्ण करणार
- लाडक्या बहिण योजनेबद्दल विरोधक करत असलेले आरोप योग्य नाही
Mithi River Scam : अंमलबजावणी संचालनालयने (ED) मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चौकशीचा भाग म्हणून केलेल्या शोध मोहिमेदरम्यान पाच कंत्राटदार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) अभियंत्यांची बँकेतील डिमॅट खाती गोठवली आहेत.
अॅक्युट डिझाइन, कैलास कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या पाच कंत्राटदारांनी बनावट कागदपत्रे सादर केली आहेत.
या कागदपत्रांमध्ये गाळ डंपिंग साइट्सशी संबंधित नऊ बनावट MOU समाविष्ट आहेत. हे कागदपत्रे कथितपणे गाळ वाहतूक आणि डंपिंग कामासाठी आलेला खर्च दाखवून पालिकेकडून वसूल करण्यात आलेले आहे. पण प्रत्यक्षात गाळ काढलाही गेला नाही किंवा तो वाहतूक करून कुठे टाकलेलाही नसल्याचे तपासात ED च्या समोर
दरम्यान पाचही कंत्राटदारांनी बनावट वजनकाटे पावत्या आणि खोट्या लॉग शीट सादर केल्या आहेत. ज्या बीएमसी अधिकाऱ्यांनी पडताळणी न करता ही बिलं आणि लाॅगशीट स्विकारल्याचा आरोप आहे. SWD विभागाने २०१३ ते २०२१ दरम्यान कामाच्या मोबदल्यात या बनावट पावत्या व लाॅगशीट घेऊन ४५.५ कोटी रुपयांचे देयके मंजूर केली असल्याची माहिती ED च्या सूत्रांनी दिली आहेत.
नंदुरबार: राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची लागवड दहा हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर झाले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत 2018 हेक्टर मिरचीचे क्षेत्र वाढले आहे मिरचीच्या हंगामाच्या सुरुवातीला मिरचीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होतो मिरची 85 रुपये प्रति किलोने व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात होती मात्र आज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीचे दर कमी झाले असून मिरचीला 45 रुपये प्रतिकिलो चा भाव मिळत आहे मिरचीचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादन सुरू झाल्यानंतर मिरचीच्या दर पाडले जात असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे तर बाजार समिती त शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात तसेच नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने मिरचीचे दर कमी झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे
दौंड तालुक्यातील यवतमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. जमाबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केले. तर ज्यांनी काल दगडफेक केली जाळपोळ केली त्यांना पोलीस आयडेंटिफाय करून ताब्यात घेत आहेत
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान हे बनावट ॲप प्रकरणावरून राज्यभर गाजत आहे. बनावट ॲपच्या माध्यमातून करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याबाबत गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र, हे एकट्या- दुकट्याचे काम नसून यात अनेक आरोपींची भर पडू शकते... तसेच केवळ फसवणूक आणि आयटी ऍक्ट पुरता हा विषय मर्यादित राहणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलीये... सोबतच यात अनेक आरोपी असल्याने ही संघटित गुन्हेगारी होते , त्यामुळे या प्रकरणात मकोका देखील लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आ.धस यांनी म्हंटलंय...शनिशिंगणापूर देवस्थान मधील प्रसादाच्या बर्फीची वाहतूक करणारा कर्मचारी करोडपती असल्याची चर्चा आहे... त्यामुळे हा घोटाळा किती मोठा असेल याचा अंदाज येतो असं धस म्हणाले...घोटाळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कुणी "आका" आहे असं वाटतं का? असे पत्रकारांनी विचारले असता, मी कोणत्याही "आका" बद्दल बोलणार नाही तुम्हीच शोध पत्रकारिता करून "आका" शोधुन काढावा असं धस यांनी म्हंटलंय...तर एकीकडे शनिशिंगणापूरमध्ये घरांनाच काय तर बँकेला देखील दरवाजे नाहीत , कारण या गावात चोरी होत नाही अशी आख्यायिका आहे...मात्र अशा पद्धतीने करोडो रुपयांचा घोटाळा होणे म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच आहे, त्यामुळे या प्रकरणात दरोड्याचेही कलम लागले पाहिजे असं धस म्हणाले.
नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने नागपूर मध्ये २ लाख ८६ हजार २३६ घरांचे सर्वेक्षण केले. त्यात १२ हजार २१ घरांमध्ये डासांची उत्पत्ती होणार लारवा आढळला. पालिकेकडून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया नियंत्रणांसाठी उपायोजनाकेली जात असतांना नागरिकांनी पण जागृत राहण्याचे सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिला. कारण नागरिकांच्या दुर्लक्षामुळे पण डेंगूचा धोका उद्भवत असल्याचे एक कारण पुढे आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
रायगड जिल्ह्यात आज महायुतीत पक्षप्रवेशांचा रंगणार सामना
मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे करणार राष्ट्रवादी प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ यांची राहणार उपस्थिती
माणगाव नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक देखील करणार राष्ट्रवादीत प्रवेश
समृद्धी महामार्ग तयार करताना महामार्गावरील व लगतच्या शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन न केल्याचा फटका महामार्गलगतच्या शेतीला बसत आहे. मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक हे पावसाने विश्रांती घेऊन आठवडाभरानंतरही पाण्याखाली आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबून असतं आणि पीक पाण्याखाली असते. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बीबी टोल प्लाजा जवळील शेतकऱ्याचे तर पीक पूर्णपणे पाण्याखाली आहे त्यामुळे हे पीक सडण्याची व कुजण्याची भीती आता निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्ग प्रशासनाने एकतर पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन करावे अन्यथा शेतीचे नुकसान भरून द्यावे अशी मागणी आता शेतकरी करत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसामुळे उखडलेल्या रस्त्यांची आज स्वतः पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांची कान उघाडणी देखील केली. चंद्रपूर -मुल, चंद्रपूर -बामणी आणि चंद्रपूर- जाम या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. देखभाल कालावधी पूर्ण होण्याच्या आधी हे सर्व रस्ते कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याच्या कडा भरल्या नसल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली. वाईट रस्त्यांच्या कारणामुळे झालेल्या अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या पीडितांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठीच्या स्वाक्षरी मोहिमेला २ लाखांहून अधिक जणांचा पाठिंबा तर नांदणी मठाच्या माठाधिपतींची वनतारा प्रशासनाशी सकारात्मक चर्चा...
ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार, नागपुरात सोहळ्याचं आयोजन, नवनियुक्त क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहणार.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार, शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या वर्धापनदिन सोहळ्याचं दोघांनाही निमंत्रण.
आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधील परिस्थिती नियंत्रणात, गावात जमावबंदी लागू, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून यवतमधल्या परिस्थितीचा आढावा, तर कुणीही कायदा हातात घेऊ नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन
दादर कबूतरखाना परिसरात मुंबई महापालिकेचे पथक तोडक कारवाईसाठी रात्रीच्या सुमारास दाखल झाले. मात्र स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केला, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केतन कदम आणि जय जोशी यांच्याविरुद्ध ७,००० पानांचे एक मोठे आरोपपत्र न्यायालयात सादर केले असून या गैरव्यवहार प्रकरणात ६५.५४ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १६ ते १७ जणांचे जबाब नोंदवलेले आहेत. यात निविदांमध्ये फेरफार करून आरोपींनी ९ कोटी रुपयांपैकी ४.५ कोटी स्वत:कडे ठेवल्याचा आरोप आहे
तसेच कदम आणि जोशी यांनी मध्यस्थ म्हणून काम केले असून पूर्व-निवडलेल्या कंपन्यांनाच गाळ काढण्याचे कंत्राट मिळावे, यासाठी खासगी कंपन्यांचे संचालक आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आरोपपत्रातून करण्यात आला आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल; प्रकरणाचा सीआयडी करणार तपास