- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: 'कर्जमाफीत कटकारस्थान झाल्यास कोणालाही सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या...More
रायगड : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, अलिबाग, मुरूड आणि रोहा परिसरात मुसळधार सरींना सुरुवात झाली आहे. हिवाळ्याच्या उंबरठ्यावर पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेला हा अवकाळी पाऊस भातपिकांवर मोठं संकट बनला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पावसामुळे खराब होण्याची शक्यता वाढली असून, शेतकरी राजा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. रायगडकरांची अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा तारांबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज छत्रपती संभाजी नगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या कुंभमेळ्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यावर देखील भार पडणार आहे. त्या संदर्भात चर्चा झाली असून शासनाला 9700 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन सरकारने कर्जमाफीची फसवी तारीख जाहीर केलीये. सरकार शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चेष्टा करतंय, असं म्हणत शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हेनी संताप व्यक्त केला. विधानसभेपुर्वी सत्तेत येण्यासाठी या सरकारने कर्जमाफीचं आमिष दाखवलं होतं. आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतरची म्हणजे 30 जून 2026 ही तारीख कर्जमाफी जाहीर करण्यासाठी निवडली आहे. त्यामुळं सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चेष्टा करणार, फसवणूक करणार हे उघड आहे. असं म्हणत कोल्हेनी सरकारवर सडकून टीका केली.
शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे, तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्याला शेंगदाण्याची चव माहित नाही, तो जर काजूची (चव) सांगत असेल तर त्याला काय करणार,' अशा शब्दात बच्चू कडू यांनी टीकाकारांना उत्तर दिले. ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले, मात्र अंमलबजावणीत काही गडबड झाल्यास कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कठीण आर्थिक परिस्थितीतही मार्ग काढल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ३१ मार्च २०२६ पर्यंत थकबाकीदार होणाऱ्या चालू वर्षाच्या कर्जदारालाही या निर्णयाचा फायदा होईल, असे म्हणत त्यांनी कर्जमाफीच्या तारखेचे समर्थन केले आहे.
पवई किडनॅपिंग केस प्रकरणी जखमी आजी सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद
शिवसेना आमदार मुरजी पटेल यांचा माध्यमातून जखमी आजी सोबत थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधले संवाद
आजीने धाडस दाखवल्यामुळे सर्व 17 मुले सुखरूप वाचले होते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आजीचा कौतुक करण्यात आला
त्यासोबत आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा आश्वासन जखमी आजी यांच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले
यावेळी 17 पैकी एक लहान मुलगी अडकली होती त्यांच्याशी आणि त्याची सोबत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधले संवाद
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पोलिसांनी जे धडा शिकवला त्याचा कौतुक केले....
मनोज जरांगे पाटील पुणे सत्र न्यायालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केले होते, या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे
याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम १५६(३) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता
याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले आहेत
याच प्रकरणाची सुनावणी होते आहे
अंबरनाथ पश्चिमेत धक्कादायक घटना
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून बेदम मारहाण
अंबरनाथ पश्चिम परिसरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला शेजाऱ्यांनी हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादातून ही मारहाणीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी ABP माझा ला फोनद्वारे संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे.
अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसून संबंधित आरोपींना नोटीस देऊन शांतता भंग करू नये आशा सूचना दिल्या आहेत
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मुल मार्गावर केसलाघाट येथे एक वाघिण रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं होतं. वाघिणीच्या या हल्ल्यात एक दुचाकीस्वार जखमी झाल्याचं तर एक दुचाकी चालक अगदी थोडक्यात बचावल्याचं समोर आलं होतं. हल्ले करणारी ही वाघीण "के मार्क" याच भागातील रहिवासी आहे. वाघीण अचानक अशा प्रकारे आक्रमक का झाली याबाबत अजूनही स्पष्ट कारण कळू शकलेले नाही मात्र वाघिणीच्या या हल्ल्यावर तात्पुरता प्रतिबंध बसावा म्हणून वन विभागाने या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याचे काम सुरू केलं आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांच्या २ हजार बनावट चलनी नोटा ( ५०० रुपयांच्या नोटा ) जप्त केल्या आहेत.ही कारवाई हॉटेल ए-वन सागर समोर, मुंबई आग्रा महामार्गावर करण्यात आली..या प्रकरणी मध्यप्रदेशच्या बुरहानपूर येथील दोन आरोपी नाजिर अक्रम अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अन्सारी यांना पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे.या दोघांकडून दोन मोबाईल फोनसह एकूण ₹10.20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला..यातील मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे काम तो करत असल्याचे सांगण्यात येते..नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीर संधू, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली..दरम्यान, होवू घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा पकडण्यात आल्याने खळबळ उडाली असून या बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता असून कनेक्शन कुठे जाते असण्याची शक्यता वर्तविली जात आहे..भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180, 3(5) प्रमाणे मालेगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
धाराशिव – सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत धाराशिव जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकरी बाधित झाले, मात्र आतापर्यंत फक्त 90 हजार शेतकऱ्यांनाच अनुदान मिळालं आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी 223 कोटींचं अनुदान प्राप्त झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या दोन लाख 30 हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अनुदान वितरित केलं जाणार आहे.
बीड जिल्ह्यात आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा असे निर्देश छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना दिले आहेत. वीरेंद्र मिश्रा यांनी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रण प्रणालीचा पोलीस अधीक्षक कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. यादरम्यान मिश्र यांनी पोलीस दलाला थेट आणि कडक कारवाईचे हे निर्देश दिले आहेत.
या बैठकीत मालमत्ते विरोधातील गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे विशेषतः चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. पोलीस उपाधीक्षकांनी अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाईंचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. दरम्यान आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाईचे सक्त निर्देश यावेळी दिले गेलेत.
एरवी दुष्काळवाडा, टँकरवाडा म्हणणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसानं भरभरून दिले आहे. त्यामुळे मराठवाड्याची दुष्काळ वाढ असलेली ओळख यंदा बदलली आहे. मराठवाड्यातल्या सर्व जलाशयात यंदा 100% जलसाठा आहे. मराठवाड्यातील अकरा मोठी धर नाही ओसंडून वाहत आहेत..
मराठवाड्यातल्या 11 मोठ्या धरणात किती टक्के जलसाठा आहे यावर एक नजर टाकूया
जायकवाडी 100 टक्के
निम्न दुधना 100 टक्के
येलदरी 100 टक्के
सिद्धेश्वर 97 टक्के
माजलगाव 100 टक्के
मांजरा 100 टक्के
पैनगंगा 100 टक्के
मानार 100 टक्के
निम्न तोरणा 100 टक्के
विष्णुपुरी 100 टक्के
सीना कोळेगाव 100 टक्के
कृषी अर्थतज्ञ व शेतकरी नेते विजय जावंधिया यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र...
राज्य सरकारने दुष्काळजन्य परिस्थिती घोषित केल्याने, दुष्काळाच्या काळात नियमानुसार बँकांना कर्जवसुली करता येत नाही.
या नियमाचा आधार घेत राज्य सरकारने बँकांना त्वरित आदेश देऊन थकीत कर्ज कर्जदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जमाफी चा अप्रत्येक्ष लाभ मिळेल ....
काल शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी बद्दल निर्णय घेण्याची घोषणा केली आहे....
मात्र या कालावधीत शेतकऱ्यांना आवश्यकता भासल्यास त्यांच्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने राज्य सरकारने कर्ज वाटपाचे आदेश काढावे अशी मागणी या पत्रात म्हणाले
रत्नाकर गुट्टेंच्या एकला चलोच्या नाऱ्यानंतर गंगाखेड मध्ये भाजपचा ही स्वबळाचा नारा
आमदारांनी स्वबळाची घोषणा आधीच केल्याने आपले काम सोपे झाले
युद्धात सर्व माफ असते निवडणुकीत गंगाखेडला सर्व मदत मी स्वतः करणार
गंगाखेड मधील स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा एक हाती झेंडा फडकवणार-पालकमंत्र्यांनी केली घोषणा
परभणीच्या गंगाखेड विधानसभेतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती वगळून एकला चलोचा नारा रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे दिला यानंतर आता भाजपचे गंगाखेड मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत स्वबळाचा नारा दिलाय..गंगाखेड नगर पालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा एक हाती झेंडा फडवण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.महत्वाचे म्हणजे युध्दात सर्व माफ असते त्यांनी आधीच स्वबळाची घोषणा केल्याने आपले काम सोपे झाले निवडणुकीत जे काही लागेल ते मी स्वतः देईल असे आश्वासन ही मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांन दिल्याने गुट्टे यांच्या समोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे..ज्यामुळे निवडणुकी पूर्वीच परभणी जिल्ह्यातील महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे..
सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून होणार सुरुवात...
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी झुंबड.....
सोयाबीनच्या शासकीय नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा,
काल रात्रीपासूनच शेतकरी रांगेत उभे...
सोयाबीनचा शासकीय दर हा प्रति क्विंटल 5 हजार 328 रुपये दर असून सध्या खाजगी बाजारात मात्र शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 3200 ते 4000 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची शासकीय खरेदी कडे धाव......
लोटे एमआयडीसीतून रासायनिक पाणी सोडण्यावरून कोतवली भागातील शेताकऱ्यांमध्ये संताप..महिन्याभारत रासायनिक पाणी सोडण्याचा चौथा प्रकार
MIDC मधील दूषित पाणी नाल्यासह थेट नदीपात्रात सोडल्याने कोतवली मधील सोनपात्रा नदीच्या पाण्याचा रंग लालेलाल. ग्रामस्थ आक्रमक
सतत घडणाऱ्या प्रकाराने स्थानिकांमध्ये असंतोष, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत आठ उद्योगांची तपासणी करत पाण्याचे नमुने घेतले ताब्यात.
रासायनिक पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई न झाल्यास संघर्ष समिती तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत : संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे यांचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा
कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जेली फिश आलेत.वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे,समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे आलेत. जेली फिशना लायन्स मेन असं म्हटलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे, गणपतीपुळे, माडबन,सागरीनाटे, आंबोळगड, गावखडी, भाट्ये, आरेवारे, मालगुंड अशा किनाऱ्यांवर जेलीफिश दिसून येत आहेत. किनारी भागात जेलीफिशचा प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांनी तसेच फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी देखील काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आलेले आहे.
सरकारकडे आमदारांना खुश करण्यासाठी पैसा आहे मात्र शेतकऱ्यांसाठी नाही
आचारसंहिते पूर्वी परभणीत कांग्रेस काढणार कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी मोर्चा
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस एकहाती सत्ता मिळवणार- जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी
पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे,मात्र सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही ना कर्जमाफी केलीय ना अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे.सरकार आमदारांना खुश करण्यासाठी पैसे देतय मात्र शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत कांग्रेस परभणीत कर्जमाफी आणि नुकसान भरपाई साठी आचार संहिते आधी मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी दिली आहे तसेच काँग्रेस पक्ष हा कधीही जातीवादी भाजप बरोबर तडजोड करणार नाही भाजप विरोधात लढा उभारणारा पक्ष आहे त्यामुळे आपण कांग्रेस प्रवेश केला आणि येत्या काळातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस एक हाती सत्ता मिळवणार असल्याचा विश्वास परभणी काँग्रेस चे नूतन जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केला आहे.जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला यानंतर ये माध्यमांशी बोलत होते..
अहमदपूर तालुक्यातील शेनकुड येथे मन्याड नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना एक कार नदीत वाहून गेली. कारमध्ये काजळहिप्परगा येथील चालक आणि विद्यार्थी असे दोघेजण होते. पाण्याचा अंदाज न आल्याने कार नदीच्या प्रवाहात अडकली. यावेळी टाकळगावचे तरुण गजानन नागरगोजे आणि अशोक नागरगोजे यांनी धाडस दाखवत पाण्यात उडी घेतली आणि दोघांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून स्थानिकांनी या तरुणांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
2018 च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने उद्धव ठाकरे यांना पाठवली तिसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस
ठाकरे यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याबाबत दाखल केलेले अर्जावर प्रतिसाद न दिल्याने पाठवली गेली नोटीस
कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे एन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या चौकशी आयोगाने ठाकरे यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये ठाकरे यांना 2020 मध्ये शरद पवार यांनी सादर केलेल्या कागदपत्रे आयोगासमोर ठेवावी अशी मागणी केली होती
आंबेडकरांच्या मते,पवार यांनी ठाकरे यांना दिलेल्या कागदपत्रांमध्ये काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंध असल्याचा उल्लेख केला होता
आयोगाने 12 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबर दोन वेळा ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली मात्र त्याला अजून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही
पुण्यातील चार टोळ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर
पुण्यातील चार टोळ्यांभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट
गुन्हेगारी उद्दात्तीकरणाच्या रील बनविणाऱ्यांची लवकरच शाळा भरवणार
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
कुख्यात नीलेश घायवळ, गजा मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण यांच्या टोळीचा समावेश
आर्थिक व्यवहार थांबविणे, आत्तापर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करणे, बेनामी संपत्तीची माहिती आणि या मध्ये मनी लॉड्रिंगच्या प्रकाराची चौकशी करणार
काहींचा मनी लॉड्रिंगचा प्रकार समोर आल्यानं आल्याने इडीकडे पाठपुरावा करणार
पुण्यातील चार टोळ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर
पुण्यातील चार टोळ्यांभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट
गुन्हेगारी उद्दात्तीकरणाच्या रील बनविणाऱ्यांची लवकरच शाळा भरवणार
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
कुख्यात नीलेश घायवळ, गजा मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण यांच्या टोळीचा समावेश
आर्थिक व्यवहार थांबविणे, आत्तापर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करणे, बेनामी संपत्तीची माहिती आणि या मध्ये मनी लॉड्रिंगच्या प्रकाराची चौकशी करणार
काहींचा मनी लॉड्रिंगचा प्रकार समोर आल्यानं आल्याने इडीकडे पाठपुरावा करणार
पुण्यातील चार टोळ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर
पुण्यातील चार टोळ्यांभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट
गुन्हेगारी उद्दात्तीकरणाच्या रील बनविणाऱ्यांची लवकरच शाळा भरवणार
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
कुख्यात नीलेश घायवळ, गजा मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण यांच्या टोळीचा समावेश
आर्थिक व्यवहार थांबविणे, आत्तापर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करणे, बेनामी संपत्तीची माहिती आणि या मध्ये मनी लॉड्रिंगच्या प्रकाराची चौकशी करणार
काहींचा मनी लॉड्रिंगचा प्रकार समोर आल्यानं आल्याने इडीकडे पाठपुरावा करणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कुंभमेळा विकास विकास कामाचे होणार भूमिपूजन
पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुंभमेळा कामांना होणार सुरवात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी कुंभमेळाच्या कामांना सुरवात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
राम काल पथ, रिंगरोड, यासह नाशिक त्रंबकेश्वर च्या विकास कामाचे भूमिपूजन केले जाणार
कुंभमेळाच्या कामासाठी राज्य सरकारने 7 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानं कोणत्या कोणत्या कामाचे भूमिपूजन करता येणार याचा अभ्यास करून मुख्यमंत्री कार्यालयाला यादी पाठवली जाणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत सामना कार्यालयात आज बैठक होणार आहे. ही बैठक उद्याच्या मोर्चा संबंधी आहे. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचा उद्याच्या मोर्चात सामील होणार की नाही याबद्दल निर्णय कळवतील.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे
पहाटेपासून पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण असून सकाळी साडेसहा वाजेपासून जोरदार पाऊस सुरू आहे
पश्चिम उपनगर अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली या सर्व परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे
शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे बनावट नोटांचे रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दापाश केला आहे. गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोट्यामध्ये पोलिसांनी 68 हजार 400 रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या रॅकेट मधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओंकार तोवार, रमेश पाटील आणि साहिल मुल्लाणी असे या तिघांचे नाव आहे... याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नोटा प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इचलकरंजी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य हस्तगत केले आहे. जयसिंगपूर उपविभागीय पोलीस तसेच जयसिंगपूर पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या तरुणांच्याकडून बनावट नोटा प्रकरणी चौकशी सुरू असून या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे.
धाराशिव येथील पूरग्रस्तांना प्रताप सरनाईकांकडून देशी वंशाच्या गीर गाईचे वाटप केले जाणार
प्रताप सरनाईक यांच्या टीम कडून गुजरातमधून गीर गाईंची खरेदी , 28 नोव्हेंबरला वाटप केले जाणार
महापुरात ज्या शेतकऱ्याचं गोधन वाहून गेलं मृत्यू झाला त्या शेतकऱ्यांना दिली जाणार भेट
महापुरात नुकसान मृत्यू शेतकऱ्यांना 101 गाईचं वाटप करण्याची प्रताप सरनाईक यांची घोषणा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार वाटप
वसई : वसईच्या आनंद नगर परिसरात चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे असलेल्या सिद्धी स्टेशनरी या दुकानात दोन अज्ञात तरुणांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास चोरी केली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे तरुण खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले. दुकानदार ग्राहकांसाठी सामान देण्यात व्यस्त असताना, त्यापैकी एकाने ड्रॉवर उघडून त्यातील रोख रकमेची बॅग उचलली. या बॅगेत अंदाजे ₹९४,००० इतकी रोकड होती. चोरी करून हे दोघे आरोपी क्षणात पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेजवरून दिसते की, चोरट्यांना दुकानाची माहिती आधीपासून असावी. त्यांनी थेट रोख रक्कम ठेवलेल्या ड्रॉवरलाच लक्ष्य केले आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केली. या घटनेची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहेत.
रोहित आर्याचा मृतदेह जे जे रुग्णालयात रवाना. त्याने काल पवईत 17 जणांना ओलीस ठेवले होते. मुंबई पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता.
आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक
लहुजी शक्ती सेनेकडून मुंबई ते नागपूर 1260 किलोमीटर पदयात्रेच आयोजन
राज्यभरातून मातंग समाज बांधव एकत्र येत नागपुरात हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर धडकणार
महाराष्ट्रातील 15 जिल्हे आणि 1260 किलोमीटरच अंतरपार करत मोर्चा नागपूर अधिवेशनावर धडकणार
अहिल्यानगरच्या सोनाई येथील मातंग समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणी बाबत तात्काळ कारवाईची मागणी
तसेच मातंग समाजाच्या आरक्षणासाठी उपवर्गीकरण करण्याची मागणी
दोन नोव्हेंबर पासून चेंबूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून होणार पदयात्रेला सुरुवात, धाराशिव येथून पदयात्रीची जोरदार तयारी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने मुंबई पोलिसांकडून आज रन फाॅर युनिटीचं आयोजन
मुंबईत ठिकठिकाणी पोलिस स्थानकांतर्गत रन फाॅर युनिटीचं आयोजन
ज्येष्ठ नागरिकांसोबतच युवा वर्ग देखील सहभागी होत रन फाॅर युनिटीत धाव घेणार
एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, अभिनेते किशोर कदम आणि संदीप कुलकर्णी, आमदार मुरजी पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार
रन फाॅर युनिटीला थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवला जाणार
हिंगोली जिल्ह्याच्या तुपा गावाच्या शिवारामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे या पावसामुळे सोयाबीन नंतर आता कापूस या पिकाचं अतोनात नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला कापसाचे पीक हा पाऊस हिरावताना आपल्याला पाहायला मिळते शेतामधून पावसाचं पाणी वाहते त्यामुळे झाडाचा कापूस आपोआप जमिनीवर आणि या पाण्यामध्ये गळून पडतोय त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण झालेले आहेत भिजलेला कापूस पूर्णपणे बोडा म्हणून खाली पडत असल्याने कापसाची वेचणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी समोर आहे तर संपूर्ण जिल्ह्याभरात हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 59 जागांवर महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी हा फॉर्म्युला सर्वांसमोर ठेवला होता. मात्र या फॉर्मुलाची खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खालापूर येथील एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांना चिमटे काढले होते. त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी याला प्रत्युत्तर दिलंय.आम्ही कोणाची चिंता करत नाही.. शिवाय आम्हाला आता कोणाची चिंता करण्याची गरज नाही. आम्ही आता आमच्या बंधनातून मुक्त झालोय त्यामुळे आम्ही आमच्या कामाला लागलो असून रवी मुंढे यांच्या पक्ष प्रवेशावरून आमच्या विजयाची नांदी दिसून येत असल्याच सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गृहसंपर्क अभियानाला निवडणुकीचा फटका. संघ स्वयंसेवक आणि संघ परिवारातील व्यक्तींनी घरोघरी जात संघकार्याची माहिती द्यावी, गैरसमज दूर करावेत आणि संघाच्या कार्यासंदर्भात अवगत करण्यासाठी उपक्रमाची रचना. कोकण प्रांतात २३ नोव्हेंबरपासून ते १५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक घरी जाण्याचे लक्ष्यही निश्चित . मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवला जाणार नाही
भाजपला मतदान करा असे कुठेही न म्हणता विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन संघाकडून करत महायुतीच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळातच संघाचे गृहसंपर्क अभियान सुरु होणार असल्याने त्या आढून अप्रत्यक्ष भाजप-महायुतीचा प्रचार केला जाईल असं बोललं जात होतं. शताब्दी वर्षातच संघावर भाजपचा प्रचार केल्याची टीकाही विरोधकांकडून झाली असती. अशात, ही संधी विरोधकांना न देण्याची काळजी संघानं घेतली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अभियानासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे
गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला. भाजप आमदार प्रवीण तायडेंचा पुन्हा बच्चू कडू यांच्यावर खळबळजनक आरोप. समाजसेवेचा बुरखा पांघरून 72 एकर परिसरात खंडणीच्या पैशातून उभारलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा, प्रवीण तायडेंची मागणी.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: 'कर्जमाफीत कटकारस्थान झाल्यास कोणालाही सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा