- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका, अन् साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका : राज ठाकरे
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: इथे येऊन कोण म्हणते तिजोरी आमच्याकडे आहे तर कोण म्हणते चावी आमच्याकडे आहे .. पण बँकच आमच्याकडे आहे मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार अशी फटकेबाजी...More
बीड : येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका क्षेत्रांमध्ये एकूण ४५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने पाहणी करून या केंद्रांची माहिती घेतली आहे.
बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे अंबाजोगाई नगरपालिका क्षेत्रात असून त्यांची संख्या १७ आहे. त्या खालोखाल माजलगावमध्ये ११ आणि परळीतही ११ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित झाली आहेत. बीड शहर पालिकेसाठी सहा केंद्रे संवेदनशील आहेत.
विशेष म्हणजे, धारूर आणि गेवराई नगरपालिका क्षेत्रांमध्ये शांततापूर्ण वातावरणामुळे एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व ४५ संवेदनशील केंद्रांवर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली आहे.
सहा नगरपालिकेसाठी ४३४ मतदान केंद्र
जिल्ह्यात ४३४ मतदान केंद्रे आहेत. यात बीड १७९, परळी ८८, अंबाजोगाई ६९, माजलगाव ४५, गेवराई ३१ आणि धारूरमधील २२ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
सिनेअभिनेता सयाजी शिंदे हे तपोवनात दाखल होण्याआधी मोठ्या संख्येने नाशिककर विद्यार्थी तपोवनात एकवटले आहेत
तपोवन वाचवण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत
-महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार ही टोळी आहे.
-सरकारी तिजोरी लुटायची... आपल्या बगलबच्च्यांना कंत्राट द्यायची...प्रचंड भ्रष्टाचार करायचा... जितक्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करता येईल, तितका करायचा...याची स्पर्धा लागलीय.
-या स्पर्धेत आघाडीवर एकनाथ शिंदे, अजित दादा पवार, देवेंद्र फडणवीस आहेत, हे तिघेही टोळी प्रमुख आहेत. यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणणं, म्हणजे -या पदाची आजपर्यंतची जी लिगसी आहे, त्याचा अपमान वाटावा, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे.
-डोंबिवलीत यांचे कार्यकर्ते आपापसात कोयत्याने मारामारी करतायेत. कणकवलीत यांच्याच मित्र पक्षातील एक माजी खासदार एका कार्यकर्त्याच्या घरी धाळ टाकतो. आणि बेडरुमपर्यंत पोहचतो.
-भंडाऱ्यातही एकनाथ शिंदे यांचे लाडके आमदार नरेंद्र भोंडेकर...आणि देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार परिणय फुके हमरीतुमरीवर आलेत. सरकारी -कामांमध्ये कसा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला याची तक्रार करत आहेत.
-जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्रासाठी दलित वस्तीचा निधी वळविल्याची तक्रार परिणय फुकेंनी करून या संपूर्ण कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी आणि कामाला स्थगिती देण्याचे पत्र परिणय फुकेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
नाशिक तपोवन साधुग्राम वृक्षतोड प्रकरण
अभिनेता सयाजी शिंदें करणार साधुग्राम परिसरातील झाडांची पहाणी
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी तपोवनात उभारले जाणार साधुग्राम
साधुग्राम उभारण्यासाठी वृक्ष तोड करण्यासाठी केला जात आहे पर्यावरण प्रेमींचा विरोध
याच पार्श्वभूमीवर सयाजी शिंदें वृक्षांची पहाणी करून आपली भूमिका स्पष्ट करणार
माझ्या डी एन ए मध्ये आजपर्यंत साधी एफ आय आर पण नाही आणि तुमचा जर सातबारा काढला तर तुमच्यावर झालेले गुन्हे त्या गुन्ह्याची नोंद ही इंडियन पिनल कोड मध्ये जे काही गुन्हेगारासाठी कलम आहेत ते सर्व कलम लागलेला कोण प्रतिनिधी आहे हे कर्जतकर यांना माहीत आहे असा रोष खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर व्यक्त केला.तुम्हाला डी एन चा साधा फुलफॉर्म सुद्धा माहीत नाही.राजकारणामध्ये टीका टिपणी जरूर करा परंतु ती टीकाटिपणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार नक्की असला पाहिजे,मंत्री आदिती तटकरे ज्यावेळेस पालकमंत्री म्हणून ठरविल्या गेल्या त्या वेळेस अतिशय असलाग्य शब्दात एका भगिनीला एका छोट्या लेकीला आमदार थोरवे यांनी शब्दप्रयोग केला हा शब्दप्रयोग त्यांच्या सभ्यतेला सोडाच शिव शाहू फुले आंबेडकरांच्या असलेल्या सामाजिक क्षमते च्या परिसराला देखील अतिशय लांचनास्पद आहे. अस म्हणत त्यांनी आमदार थोरवेंचा समाचार घेतला.
- डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरण...
- पीडितेला न्याय मिळावा यासाठी डोंगराळे ग्रामस्थ व पीडितेचे कुटुंबीय करणार आजपासून आमरण उपोषण..
- आज सकाळी ११ वाजेला डोंगराळे गावात होणार आमरण उपोषणाला सुरुवात...
- या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी... व आरोपीला तत्काळ फाशी द्यावी...अशी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांची मागणी..
आठवडा भर थंडी गायब झाल्यानंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन झाले आहे.काल १३ अंशावर असलेले तापमान आज थेट ८.०६ अंशावर आल्याने पुन्हा एकदा गारठा वाढलाय..सर्वत्र कडाक्याची थंडी पडलीय..अचानक गारवा वाढल्याने विविध आज बळावण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामीण भागात धुके ही पडले आहे..एकूणच काय पुन्हा एकदा परभणीकरांवर शेकोट्या पेटवण्याची वेळ आली आहे..
पूर्व विदर्भात भाजपाला काँग्रेस पेक्षा शिवसेना शिंदे गटाकडून कडवे आव्हान ...
मतांच्या विभागणीमुळे भाजपची वाढली डोकेदुखी ...
इतिहासात पहिल्यांदा शिंदेच्या शिवसेनेने पूर्व विदर्भात सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उतरवले...
त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेने भाजपचे समीरकरण बिघडवली आहे.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत सुरू असलेली कारवाई थांबवण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने फेटाळली
बेल्जियममध्ये अटकेत असल्याने फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्यांतर्गत सुरू असलेली कारवाई थांबवण्याची होती चोक्सीची मागणी
चोक्सीच्या पासत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आल्याच सांगत अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या याचिकेला विरोध केला होता
चोक्सी देशात परत येऊ इच्छित नसल्याने तो कारवाईला आव्हान देत असल्याचा होता ईडीचा युक्तिवाद
आठवडा भर थंडी गायब झाल्यानंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन झाले आहे.काल १३ अंशावर असलेले तापमान आज थेट ८.०६ अंशावर आल्याने पुन्हा एकदा गारठा वाढलाय..सर्वत्र कडाक्याची थंडी पडलीय..अचानक गारवा वाढल्याने विविध आज बळावण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामीण भागात धुके ही पडले आहे..एकूणच काय पुन्हा एकदा परभणीकरांवर शेकोट्या पेटवण्याची वेळ आली आहे.
पूर्व विदर्भात भाजपाला काँग्रेसपेक्षा शिवसेना शिंदे गटाकडून कडवे आव्हान ...
मतांच्या विभागणीमुळे भाजपची वाढली डोकेदुखी ...
इतिहासात पहिल्यांदा शिंदेच्या शिवसेनेने पूर्व विदर्भात सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उतरवले...
त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेने भाजपचे समीरकरण बिघडवली आहे.
दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचा विकास खुंटला अस वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. निधीतून जिल्ह्याचा विकास साधायचा ऐवजी भावनिक आव्हान केलं जातं. अतिवृष्टीतील कामाचे रिल्स तुमच्या मोबाईल मध्ये सोडले जातात, तर दुसरा समाजमाध्यमांवर स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेतो. अशी टीका अनेक संदर्भ देत प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर केली. उमरगा इथ शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
काटोलमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अर्चना राहुल देशमुख यांचा प्रचार करणार नाही.. ते योग्य उमेदवार नाही असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी एका प्रकारे त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचे विरोधात रणशिंग फुंकले आहे.. जे बळजबरीने डोक्यावर बसले आहे, त्यांचा प्रचार मी करणार नाही.. मी फक्त खऱ्या सहकाऱ्यांचा आणि योग्य उमेदवारांचा प्रचार करेल अशी भूमिका सलील देशमुख यांनी घेतली आहे.. सलील देशमुख यांनी काल नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचे प्रचार केले त्यानंतर एबीपी माझा ने सलील देशमुख यांना ते काटोल मध्ये आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शेकापच्या उमेदवाराचा प्रचार का करत नाही असा प्रश्न विचारला.. तेव्हा सलील देशमुख यांनी ते फक्त खऱ्या सहकाऱ्यांचा आणि योग्य उमेदवारांचा प्रचार करतील असे उत्तर दिले.. सध्या तब्येत चांगली नाही, म्हणून सहा महिने राजकारणापासून बाजूला झालो आहे.. सहा महिन्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा काम करेल असे ही सलील देशमुख म्हणाले.. 24 तासात अनेक तास आराम केल्यानंतर औषध घेतल्यानंतर एक दोन तास योग्य आणि मनाला पटणाऱ्या उमेदवारांचा प्रचार करत आहे असे सूचक उत्तर देशमुख यांनी दिले..
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघातील जामखेड नगरपरिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा निमोणकरांसह अकरा नगरसेवक पदाचे उमेदवार दिले आहे...राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षासमोर महायुतीतील शिवसेना आणि भाजपाचेही आव्हान असणार आहे...दरम्यान राष्ट्रवादी SP चे आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दोघांच्या राजकीय वादात जामखेडचा विकास खुंटालाय...आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार असून आम्हाला दोन्ही मातब्बर नेत्यांचे कोणतेही आव्हान वाटत नाही कारण त्यांच्यापेक्षाही मातब्बर नेते अजित पवार आहेत असं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी म्हंटलंय...लोकांना वाटतंय की अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि आम्ही तळागाळापर्यंत पक्ष वाढवत अजित दादांना मुख्यमंत्री बनवू असंही सोनवणे म्हणाल्या...तर जामखेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला भाजपची बी टीम संबोधलं जातंय ते चुकीचं असून आम्ही कुणाचीही बी टीम होण्याचे कारण नाही , आमचा स्वतंत्र मोठा पक्ष आहे असं सोनवणे म्हणाल्या.
नाशिकच्या तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील वृक्ष तोडीचा वाद चिघळलेला असतानाच महापालिका प्रशासन नव्या वादात सापडले आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी ppp अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र,, बँकबेट हॉल, रेस्टॉरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33 वर्षासाठी इथली जागा खाजगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप केला जात आहे.
यामुळे गोंधळात आणखी भर पडली असून पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत. दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्यामुळे कुंभमेळा व्यतिरिक्त या जागेचा उपयोग व्हावा यासाठी MICE हब अर्थात मिटिंग, इंसेंटीव्हीज, कॉन्फरन्स एकझीबिशन सेंटर सुरू करण्यात बाबत चे टेंडर काढण्यात आले आहे. कुंभमेळा च्या आधीच हे टेंडर कढल्यानं महापालिकाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, त्यामुळे महापालिकेचे नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार करून, कुंभमेळाच्या जागेची देखभाल राहील, इथे कोणतेही पक्के बांधकाम होणार, कुंभमेळा काळात पुन्हा जागा महापालिका च्या ताब्यात येईल असा खुलासा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केला आहे, तसेच साधुग्राम च्या जागेवरील वृक्ष न तोडता नेहरू नगर, गांधी नगर, मेरी च्या वसाहतीत साधूच्या निवासाची व्यवस्था करा अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत असल्याने, कुंभमेळा काळात देशभरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती मनीषा खत्री यांनी सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बंडू काका बच्छाव यांना भाजप पक्षात प्रवेश केला. याबद्दल बोलताना महाजन म्हणाले की, गेली अनेक दिवसांपासून हा विषय सुरू होता. बंडू काका बच्छाव यांचा प्रवेश भाजपमध्ये करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती आणि बंडू काकांची इच्छा होती. आज तो शुभ दिवस असे मी म्हणेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या प्रभाग आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी पूर्ण
मंगळवारी मुंबई उच्च न्यायालय देणार फैसला
ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने आगामी निवडणुकांपासून नव्याने रोटेशन पद्धतीने आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता
मात्र जुन्याच रोटेशन पद्धतीने आरक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यभरातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आल्या होत्या
१९९७ पासून साल २०१७ पर्यंत झालेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या संवर्गांसाठी रोटेशन पद्धतीनुसार आरक्षण देण्यात आले होते
रोटेशन पद्धतीनुसार ह्या जागांना पूर्वीच्या निवडणुकीमध्ये आरक्षण मिळाले होते त्यांना वगळून इतर जागांना यंदा आरक्षण द्यायचे अपेक्षित होते
मात्र यंदा नव्याने रोटेशन पद्धत लागू करण्यात आल्याने यापूर्वी ज्या जागा आरक्षित होत्या त्याच पुन्हा आरक्षित झाल्याने रोटेशन पद्धतीच्या आरक्षणाच उल्लंघन झाल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आल आहे
दरम्यान प्रथमदर्शनी हे आरक्षण लागू करण्यास हरकत नसल्याच मत गुरवारच्या सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले होत
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील बँकेतून १११ कोटी लाटण्याचे प्रकरण
पालघर पोलिसांकडून पैसे लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश पडवळ याला ठाणे शहरातून रात्री १२.३० वाजता पालघर गुन्हे शाखेच्या वतीने अटक
निलेश पडवळ विक्रमगड नगरपंचायतीचा नगराध्यक्ष
पालघर गुन्हे शाखेकडून संबंधित प्रकरणी आणखी तपास करण्याच काम सुरू
इथे येऊन कोण म्हणते तिजोरी आमच्याकडे आहे तर कोण म्हणते चावी आमच्याकडे आहे .. पण बँकच आमच्याकडे आहे मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार अशी फटकेबाजी करीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती मधील मित्रपक्षांच्या नेत्यांनाच टोलेबाजी केली . मुख्यमंत्री म्हणजे सरकार असते मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते असे सांगत ज्यातील प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्याच्या सहीने मंजूर होत असतो कदाचित हे विसरलीत लोक असा टोलाही मित्रपक्षांना लगावला. २ तारखेला मतदान आहे, पैसा कुणाचं पणं घ्या काही फरक पडत नाही.सगळ्याचे पैसै घ्या पण मत देताना देवा भाऊचे पंधराशे रुपये लक्षात ठेवा .. असे आवाहन सोलापूरचे पालक मंत्री जयकुमार गोरे यांनी कुर्डूवाडी येथील सभेत केले. यावेळी त्यांनी तुफानी टोलेबाजी केली.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका, अन् साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका : राज ठाकरे