- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: साताऱ्यामध्ये आयुष्य संपवलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशीरा अंत्यसंस्कार
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: मिरारोड येथील काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डाचकूल पाडा येथे दोन गटात झालेल्या वादानंतर काल सायंकाळी एआयएमआयएम चे नेते वारीस पठाण यांनी डीसीपी राहूल चव्हाण यांची भेट घेवून,...More
गोरेगाव पूर्वेत रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार पिता-पुत्र यांना आरे पोलिसांकडून 12 तासाच्या आत अटक
अटक आरोपी पिता-पुत्र कडून चोरीला गेलेल्या शंभर टक्के मालमत्ता हस्तगत
काही दिवस पूर्वी गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॉयल पाम्स मध्ये असलेल्या बंगल्याच्या हॉलची काच तोडून या आरोपीकडून 36 लाख रुपयाची मालमत्ता चोरी केली होती
याप्रकरणी आरे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करून परिसरात असलेल्या 35 सीसीटीव्ही कॅमेरा चेक करून दोन आरोपींना अटक केली आहे
अटक दोन्ही आरोपी हे पिता पुत्र असून त्यांचे नाव नियामतुल्ला आयुब खान वय 38 वर्ष, शाहिद नियामतुल्ला खान वय 19 वर्ष आहे.
अटक आरोपीकडून चोरीला गेलेल्या शंभर टक्के मालमत्ता आरे पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे,
तसेच हे सराईत आरोपी असून मुंबई शहरात आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे यामध्ये अजून कोण साथीदार आहेत का या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस करत आहे....
माढ्यातील हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णन यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला आहे.
या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात पंडित वसंत गोरे (रा. अंतरगाव, ता. भूम, जि. धाराशिव) या आरोपीविरुद्ध बलात्कारासह अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
दिवाळी सुट्टी करिता मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणवासीय कोकणात दाखल होतात. दिवाळीच्या शेवटच्या वीकेंडला सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा लोंढा कोकणाच्या दिशेने निघालाय मात्र या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करण्याची वेळ आलीय. माणगाव इंदापूर परिसरात कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून अनेक वाहने या वाहतूक कोंडीत अडकलीत. त्यामुळे माणगाव ते कळमजे या परिसरात 2 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत
अचानक आलेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे बाजार समिती भिजले सोयाबीनचे पोते
शेतकरी व व्यापारांचे झाले नुकसान
काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच गोंधळ उडाला, खुल्या मैदानात ठेवलेले हजारो क्विंटल सोयाबीनचे पोते पावसात भिजल्याने शेतकरी व व्यापारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला, दिवाळीमुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये वाढल्याने सोयाबीनचा लिलाव हा खुल्या मैदानात करावा लागला त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने सोयाबीनचे संपूर्ण पोते भिजल्याने शेतकर्यांचे व व्यापाऱ्याने नुकसान झाले आहे..
बीड: आरोपींना अटक करून काही होणार नाही; त्यांना फाशीची शिक्षा व्हावी मयत महिला डॉक्टरच्या कुटूंबाची मागणी
प्रशांत बनकर या आरोपीला अटक झाली मात्र अटक करून काही होणार नाही. दुसरा आरोपी बदने याला अटक करून चारशीट फाईल करावे.. आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल..
आत्महत्या केल्याचं समजतात मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि हातावरील सुसाईड नोट पाहिली. त्यानंतर फॉरेन्सिक एक्सपर्टची आम्ही मागणी केली..
आमची जेमतेम परिस्थिती परंतु सर्वांच्या प्रयत्नाने आम्ही तिला मेडिकल ऑफिसर बनवले..
फलटणच्या राजकारणी लोकांचा तिच्यावर दबाव होता.
पीएम रिपोर्ट बनविण्यासाठी तिच्यावर दबाव होता. याबाबत तिने खुलासा केला तक्रारी दिल्या.. मात्र त्याच निरासन झालं नाही..
धुमाळ नावाचा वैद्यकीय अधिकारी तिला वारंवार टॉर्चर करत होता. सुट्टी देखील देत नव्हता.
त्याने आम्हाला सहकार्य केलं नाही. पोलिसांना देखील सहकार्य केलं नाही.
यातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी लेकराला न्याय मिळाला पाहिजे..
खासदारांच्या पीए कढून देखील तिच्यावर दबाव होता.
खासदारांचे दोन पीए आहेत मात्र ते कोण माहीत नाही..
यात केवळ आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी असं होत असेल तर इतर मुलींनी कसं काय करावं असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला.
जालना : जालना येथे एका 25 वर्षीय तरुणाची मध्यरात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉड ने मारहाण करून हत्या केली, मध्यरात्री जुना वाद पुढे करून या आरोपीने मयत विकास लोंढे याला गाठून मारहाण केली, या मारहाणीनंतर जखमी विकास लोंढे याला उपचारासाठी संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता आज सकाळी उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला , मयत तरुणाने आरोपींचे नाव घेतली आहेत...
दोन दिवसापूर्वीच एका उद्योजकावरती हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती त्यानंतर ही घटना घडल्याने पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचा आव्हान उभाल राहिलय.
जालना : जालना येथे एका 25 वर्षीय तरुणाची मध्यरात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉड ने मारहाण करून हत्या केली, मध्यरात्री जुना वाद पुढे करून या आरोपीने मयत विकास लोंढे याला गाठून मारहाण केली, या मारहाणीनंतर जखमी विकास लोंढे याला उपचारासाठी संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता आज सकाळी उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला , मयत तरुणाने आरोपींचे नाव घेतली आहेत...
दोन दिवसापूर्वीच एका उद्योजकावरती हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती त्यानंतर ही घटना घडल्याने पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचा आव्हान उभाल राहिलय.
नागपूर शहरात तसेच जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू आहे.. त्यामुळे परतीचा पाऊस ही नागपुरात आपली दमदार उपस्थितीत दर्शवतो आहे.. आज सकाळपासूनच नागपुरात ढगाळ वातावरण आहे... हवामान विभागाने विदर्भात पुढील 48 तास पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे..
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने कडून महायुतीला डिवचणारे बॅनर..
ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून बॅनरबाजी..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात महायुती मधील युती च्या वक्तव्यचा बॅनर वर उल्लेख..
तर ठाणे खासदार नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीतील नगरसेवक यांना विरोध न करता फोडत असल्याचे उल्लेख..
बॅनर वर राहुल गांधी, शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, केदार दिघे, अविनाश जाधव व विक्रांत चव्हाण यांचा फोटो
सातारा जिल्ह्यात पहिला ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने पहिला हप्ता 3 हजारांचा जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडली आहे. कारखान्याच्या 52 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी मंत्री शंभूराज देसाई आणि चेअरमन यशराज देसाई यांनी माहिती दिली आहे. ज्येष्ठ 11 सभासदांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदा ऊसाला दर जाहीर करण्यात लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. धाराशिव मध्ये भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आज मेळावा होणार आहे. आगामी निवडणुका स्वतंत्र लढाव्या हा सूर राष्ट्रवादीच्या एका गटाकडून पाहायला मिळतोय त्यामुळे आज भरणे याबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागले. तर दुसरीकडे महापुराच्या आपत्तीनंतर कृषिमंत्री जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत काय भूमिका मांडणार याकडेही लक्ष लागला आहे. धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
भंडारा ते तुमसर या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जाऊन प्रवास करावा लागतो. रात्रीच्या सुमारास तुमसर आगाराची बस भंडाराकडून तुमसरच्या दिशेनं प्रवाशांना घेऊन या खड्डेमय महामार्गावरून जात असताना वरठी येथे खड्डा चुकविण्याच्या नादात भरधाव बसचा समोरील चाकाचा एक्सल तुटला आणि धावत्या बसचा चाख निखळला. भरधाव बस असंतुलित झाली. मात्र, चालकांनं प्रसंगावधान राखत बस सुरक्षित थांबवली. त्यामुळं या बसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे 20 प्रवाशांचा जीव वाचला
भंडारा ते तुमसर या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जाऊन प्रवास करावा लागतो. रात्रीच्या सुमारास तुमसर आगाराची बस भंडाराकडून तुमसरच्या दिशेनं प्रवाशांना घेऊन या खड्डेमय महामार्गावरून जात असताना वरठी येथे खड्डा चुकविण्याच्या नादात भरधाव बसचा समोरील चाकाचा एक्सल तुटला आणि धावत्या बसचा चाख निखळला. भरधाव बस असंतुलित झाली. मात्र, चालकांनं प्रसंगावधान राखत बस सुरक्षित थांबवली. त्यामुळं या बसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे 20 प्रवाशांचा जीव वाचला
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरपूर तालुक्यातील लोंढेरे शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केले जात आहे. पुन्हा पुन्हा बिबट्या दिसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे तात्काळ या बिबट्याचा जेरबंद करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आले आहे..
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरपूर तालुक्यातील लोंढेरे शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केले जात आहे. पुन्हा पुन्हा बिबट्या दिसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे तात्काळ या बिबट्याचा जेरबंद करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आले आहे..
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळीच्या चार दिवसात तब्बल आठ लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं. भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवस भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे. तसेच गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळीच्या चार दिवसात तब्बल आठ लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं. भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवस भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे. तसेच गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळीच्या चार दिवसात तब्बल आठ लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं. भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवस भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे. तसेच गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद करण्यात आले आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरपूर तालुक्यातील लोंढेरे शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केले जात आहे. पुन्हा पुन्हा बिबट्या दिसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे तात्काळ या बिबट्याचा जेरबंद करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आले आहे
समृद्धी महामार्गावर रात्री सभा तीनच्या दरम्यान एका मालवाहू टेम्पोला आग लागली. समृद्धी महामार्गावरील लासुर इंटरचेंज 17 जवळ ही आग लागली आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवानं कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचं समोर आलं आहे.
कोल्हापूरच्या कागलमध्ये गहिनीनाथ उरुसात जॉइंट व्हील पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची मध्यरात्री सुटका झालीय... उरुसाच्या निमित्ताने दरवर्षी याठिकाणी मोठे मोठे पाळणे येतात....यावर्षी आलेल्या जॉईंट व्हील पाळण्यात 18 नागरिक बसले होते...हा पाळणा 80 फूट वर जाऊन गोलाकार फिरत असतो... मात्र काल रात्री हा पाळणा वर गेल्यानंतर अडकला....यामध्ये 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता...पाळणा चालकाने एक तासभर पाळणा खाली घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही... वर अडकलेल्या नागरिकांना खालून त्यांचे नातेवाईक धीर देत होते...शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या गाडीने एक एक नागरिक खाली घेतला... त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळीच्या चार दिवसात तब्बल आठ लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं. भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवस भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे. तसेच गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद करण्यात आले आहेत.
- राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का
- रामदास पाटील सुमठाणकर यांचा राजीनामा
- अजित पवार गटात कार्याअध्येक्ष रामदास सुमठाणकर यांच्याकडे होती दिव्यांग सेलची जवाबदारी
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिक विनोद राऊत (वय 52 वर्ष) यांचा मोर्शी येथील तालुका फळरोप वाटिका येरला विभागाच्या जागेवर गुरुवारी रात्री मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.. प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाली असल्याचं उघड झालं आहे.. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नावं धनराज वानखडे असून आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली.. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, मृतक विनोद राऊत यांच्या डोक्यावर पायावर लोखंडी सळाखीने मारहाण केल्याच्या खुणा आढळल्या आहेत, बेदम मारहाण करून विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली आहे
बीड: महिला डॉक्टरवर मूळ गावी अंत्यसंस्कार
बीड मधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे केली होती आत्महत्या
अखेर आठ तासानंतर डॉक्टर महिलेच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले
आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर लायब्ररी परिसरात काल रात्री बिबट्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. मुंबई आयआयटीमधे पुन्हा एकदा बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी पाऊस
संध्याकाळपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचायला सुरुवात
शहरातील अवंती नगर, पूर्व भाग, नई जिंदगी, आसरा, जुळे सोलापूर, तुळजापूर रोड या भागात नागरी वस्तीत पाणी साचायला सुरुवात
महिन्याभरापूर्वी सोलापूर शहरात अश्याच पद्धतीने पाऊस झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते
त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूर शहरात मुसळधार पावसाने नागरिकांची दैना झाली
मिरारोड येथील काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डाचकूल पाडा येथे दोन गटात झालेल्या वादानंतर काल सायंकाळी एआयएमआयएम चे नेते वारीस पठाण यांनी डीसीपी राहूल चव्हाण यांची भेट घेवून, एका गटावरच पोलीस कारवाई करत असल्यावर आक्षेप घेत दुस-या गटावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मला भारताच्या संविधानावर विश्वास असून, पोलीसांनी योग्य तपास करण्याची मागणी केली आहे.
काशिगाव येथील डाचकूल पाडा येथे दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी ऑटो रिक्षाच्या वॉशिंग आणि पार्किंग वरुन वाद झाला होता. त्यात ३० ते ३५ ऑटो रिक्षा फोडण्यात आल्या होत्या, दोन गटातील तणाव वाढला होता. काही दिवसापूर्वी भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी ही भेट दिली होती. त्यानंतर काल सायंकाळी उशीरा एआयएमआयएम चे नेते वारीस पठाण यांनी डीसीपी राहूल चव्हाण यांच्याशी त्यांच्या मिरा रोडच्या कार्यालयात भेट घेतली.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: साताऱ्यामध्ये आयुष्य संपवलेल्या महिला डॉक्टरवर बीडमध्ये रात्री उशीरा अंत्यसंस्कार