- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडणार? अजित पवारांचे संकेत, म्हणाले..
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog: सुनील तटकरे यांच्या भाजप पक्ष प्रवेश आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींवर हल्लाबोल केलाय....More
भिवंडी: शहरात पाणी पुरवठा करणारा व एकमेव प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळख असलेल्या वऱ्हाळ तलाव परिसरातील अस्वच्छता तसेच पाण्यात निर्माल्य टाकल्याने होत असलेल्या जल प्रदूषणामुळे खा बाळ्या मामा यांनी तलावाच्या प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वऱ्हाळ तलावाच्या दुरावस्थेमुळे व जल प्रदूषणामुळे स्थानिक दुर्गंधी मुळे त्रस्त झाले आहेत.या तलावाच्या स्वच्छतेसाठींपलिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक युवक यांनी पुढाकार घेत हर संडे दो घंटे हा उपक्रम सुरू केला.ज्यामध्ये शेकडो युवक युवती यांनी तलावातील घाण काढण्यास सुरवात केली.
या माध्यमातून शेकडो किलो कचरा काढण्यात आला आहे. सहा रविवारी हा उपक्रम सुरू ठेवल्याने रविवारी सातव्या उपक्रमावेळी खा बाळ्या मामा यांनी कामतघर स्व.गोपीनाथ काटेकर क्रीडांगण येथे भेट देऊन युवकांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. तलावाच्या स्वच्छतेची व संरक्षणाची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे. पण त्याकडे अनेक वेळा तक्रारी करून ही दुर्लक्ष केले गेले आहे. पण आता या तलावाच्या पुनरुत्थान व सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी केंद्र सरकारकडून ५६ कोटी रुपये मंजूर होत आहेत. त्यासाठी मी स्वतः एक वर्ष पाठपुरावा केला आहे. यासोबत आयुक्तांची भेट घेऊन पालिका प्रशासन या तलावासाठी नक्की काय उपाययोजना करीत आहे याची माहिती घेणार आहे अशी प्रतिक्रिया खा सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.
स्मृती मानधनाच्या विवाह ठिकाणी रुग्णवाहिका दाखल
अचानकपणे रुग्णवाहिका दाखल झाल्याने खळबळ
लग्न समारंभाच्या ठिकाणाहून एकाला उपचारासाठी घेऊन गेले
मेडिकल इमर्जन्सी असल्याचं आले सांगण्यात
मात्र नेमका काय प्रकार घडला याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
साताऱ्यातील पिलानी (खालची) या गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे..शेतात बैल चरायला घेऊन गेला असता बैलावर बिबट्याने प्राणघातक हल्ल्या केला आहे.. यामधे बैलाला गंभीर दुखापत झाली आहे.. बिबट्याच्या आणि बैलाच्या झटापटीमध्ये बैलाचे एक शिंग तुटले आहे.. बैलाला गंभीर तुपात होऊन मोठा रक्तस्त्राव झाला..त्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात काम करण्यासाठी मजूर येत नसल्याने शेतीची कामे रखडले आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.. आसनगाव मधील अनेक ठिकाणी ही बिबट्याने पाळीव कुत्रेवर हल्ला केला आहे.. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वनविभाग आणि प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळेल असा दावा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केला आहे. सावे हे नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बिलोली इथे भाजपचा उमेदवार नाही यावर आम्ही युतीसाठी गाफील राहिल्याचे मान्य केले तर लोहा नगर परिषदेत एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्यावर सारवासारव केलीय. निवडून येण्याच्या गुणवत्तेवर आम्ही उमेदवारी दिल्याचा दावा त्यांनी केलाय.
संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक ( TET )पात्रता आज परीक्षा सुरू आहे पण या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून मुरगुड पोलीस या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत. आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक समाविष्ट झालेले आहेत अनेक केंद्रावरती ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग असून हे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. काल सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत असून अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीड: बीड मध्ये नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची जोरदार लगबग सुरू आहे. मतदारसंघात विविध प्रचार कार्यक्रमांदरम्यान होत असलेले उमेदवारांचे सत्कार अधिक आकर्षक करण्याची स्पर्धा दिसत आहे. फुलांच्या दुकानांमध्ये नोटांच्या हारांची विशेष मागणी वाढली आहे. बीड शहरातील मुख्य बाजारपेठेत एका फुल विक्रेत्याकडे ५० रुपये, २०० आणि ५०० रुपयांच्या रेप्लिका नोटांपासून बनवलेल्या हारांचे आकर्षक प्रदर्शन पाहायला मिळाले. रंगीत नोटांच्या गुच्छांनी सजवलेले हे हार उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये 'लक्षणीय ठरावे' म्हणून हारांना हे रूप देण्यात आले आहे.
पारंपरिक फुलांच्या हारांपेक्षा लक्ष वेधून घेणारे हे नोटांचे हार प्रचारात 'स्टाईल स्टेटमेंट' बनले आहे. निवडणूक प्रचार दिवसेंदिवस रंगात येत असताना अशा अनोख्या वस्तूंना बाजारपेठेत अचानक उठाव मिळत असल्याचे चित्र सध्या बीड शहरात दिसत आहे.
नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आता प्रशासनाकडून मुंबई आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील कामे टप्प्याटप्प्याने सुरू होत असताना राणीनगर बोगद्याच्या विस्तारीकरणानंतर इंदिरानगर बोगदाचे काम प्रशासनाने हाती घेतलय. मात्र काम सुरू होताच मुंबई नाका द्वारका चौक या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे तर नागरिकांना तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. स्थानिक नागरिकांकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला उड्डाण पुलावरून तर पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला द्वारका किंवा पाथर्डी मार्गे वळवल्यास मुंबई नाका द्वारका पाथर्डी फाटा इंदिरानगर परिसरात होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल आणि नाशिककरांना वाहतूक कोंडीचा फटका बसणार नाही असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
नवले पूल अपघातानंतर आरटीओ ॲक्शन मोडवर
खेड शिवापूर टोल नाक्यावर जड वाहनांच्या चालकांची २४ तास शारीरिक तपासणी
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर टोलनाकाजवळ दोन भरारी पथकाची नियुक्ती
वाहनचालकाच्या डोळ्याची, मद्यप्राशन केले की नाही, याची तपासणी होणार आहे. पूर्ण बॉडी चेकअपदेखील केले जाणार
वाहनाची तपासणी केली जाणार. ही तपासणी २४ तास सुरू राहणार आहे
जडवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन केले जाणार आहे
मोटार वाहन निरीक्षक खेड शिवापूर येथे थांबून चालकांना पुढे असणाऱ्या अपघातप्रवण भागाविषयी माहिती देणार आहेत
दारू पिऊन घरी आलेल्या वडिलांचा मुलासोबत वाद झाला. मुलाने वडिलांना बेदम मारहाण करत त्यांचा खून केला. ही माहिती कुणाला कळू नये यासाठी वडिलांचा मृतदेह घरातच पुरला. मात्र १० दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने या घटनेचे बिंब फुटलं. ही खळबळीच्या घटना पैठण तालुक्यातील कडेठाण येथे उघडकीस आली आहे.कल्याण बापूराव काळे वय ५८ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राम कल्याण काळे असे आरोपी मुलाचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.
पार्टी करून आलेल्या तरुणाचा पुण्यातील नारायण पेठेमध्ये धिंगाणा
"मी पोलिसाचा मुलगा" आहे म्हणत तरुणाने केला रस्त्यावर धिंगाणा
एका चार चाकी ने अपंग व्यक्तीला धडक दिली आणि या चारचाकी मधील तरुणाने घातला गोंधळ
पोलिसांनी कारचालक तसेच कार मधील तरुण-
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर गेल्या अनेक वर्षांत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.आता त्यात आणखी एक गंभीर आरोपाची भर पडलीय बँकेचे माजी चेअरमन परवेज कोकणी आणि दोन अधिकाऱ्यांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 15 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.आशिष बनकर याने दिलेल्या तक्रारीनुसार २०१६ ते २०२५ या दरम्यान परवेज कोकणी, बँक अधिकारी भास्कर शंकर बोराडे आणि स्वीय सहाय्यक मोबीन सलीम मिर्झा यांनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने १५ लाख रुपये घेतले. त्याला जिल्हा बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते.बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याची दिशाभूल केल्याचेही तक्रारीत म्हणले आहेत.नोकरीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळल्याच्या या गुन्ह्यामुळे बँकेच्या प्रतिमेवर आणखी डाग पडलाय या प्रकारामुळे जिल्हा बँक आणि संचालकांबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असून पुढील पोलीस तपास महत्त्वाचा ठरणार आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी अधिकची माहिती दिली आहे.
गद्दारांना आता माफी नाही असा इशारा सुनील तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला धक्का देत शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या म्हसळा नगरपंचायत मधील नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक यांना दिलाय. म्हसळा येथील शिंदे सेनेचे तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. यावेळी ते बोलत होतें. कोण कोणाचा आसरा घेण्यासाठी गेला असला तरी यापुढे त्यांना कदापी माफी नाही अस म्हणत त्यांनी साथ सोडलेल्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे इशाराच दिला. त्यांच्यावर पक्षातर्फे कायदेशीर कारवाई सुद्धा करणार असल्याच त्यांनी सांगितल.
गद्दारांना आता माफी नाही असा इशारा सुनील तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला धक्का देत शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या म्हसळा नगरपंचायत मधील नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक यांना दिलाय. म्हसळा येथील शिंदे सेनेचे तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. यावेळी ते बोलत होतें. कोण कोणाचा आसरा घेण्यासाठी गेला असला तरी यापुढे त्यांना कदापी माफी नाही अस म्हणत त्यांनी साथ सोडलेल्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे इशाराच दिला. त्यांच्यावर पक्षातर्फे कायदेशीर कारवाई सुद्धा करणार असल्याच त्यांनी सांगितल.
तासगाव नगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संजय काकांची स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र आली आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत तासगावात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेला सुजात आंबेडकर आणि संजय काका पाटील यांनी संबोधित केले. संजय काकांची लोकप्रियता पाहूनच वंचितने त्यांच्या स्वाभिमानी आघाडी सोबत आघाडी केली असून संजय काका यांच्या मदतीमुळे तासगावात वंचित आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. संजयकाकांची तयारी असेल तर यापुढेही वंचित स्वाभिमानी आघाडीला सोबत घेऊन निवडणुका लढवू अशी प्रतिक्रिया सुजात आंबेडकर यांनी तासगाव येथे दिली. तर यापुढेही वंचित सोबत राहू अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांनी ही माहिती दिल्याचे अजित पवारांनी सांगितलं. कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते असं अजित पवार म्हणाले. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणूक विविध कारणामुळे लांबणीवर पडली. जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार यासाठी अनेक इच्छुक वेटिंग वर आहेत. मात्र पुन्हा एकदा निवडणूक लांबणीवर पडणअयाची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. उमेदवारी छाननी आणि मागं घेण्याचं दिवस संपला असून आता अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांना त्यांचं हक्काचं निवडणूक चिन्ह पक्षाचं असल्यानं त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे. मात्र, अपक्ष उमेदवारी ज्यांनी सादर केली अशांना 26 नोव्हेंबरला निवडणुकीचं चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी बॅनर, बिल्ले अणि अन्य साहित्य तयार करण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे सर्व साहित्य अपक्ष उमेदवारांच्या हातात मिळाल्यानंतर त्यांचा प्रचार सुरू होईल. परंतु त्यानंतर त्यांच्या हातात प्रचारासाठी केवळ दोन ते तीन दिवस शिल्लक राहणार आहे. अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळण्याच्या आधीच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार संपण्याच्या मार्गावर राहणार आहे. त्यामुळं अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ मिळणार नाही. हा अपक्ष उमेदवारांवर अन्यायकारक असून अपक्ष उमेदवारांना जोपर्यंत निवडणूक चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत पक्षाच्या उमेदवारांनी आता सुरू केलेला प्रचार थांबवावा, अशी मागणी भंडाऱ्याचे अपक्ष उमेदवार सुरेश कोडगले यांनी केली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारी जमिनी लाटणाऱ्या माफियांकडे लक्ष द्या! वाळू चोर, मुरुम माफियांकडे लक्ष द्या! तलाठी कार्यालय, तहसील पासून मंत्रालयातल्या आपल्या कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीकडे लक्ष द्या! आपण राज्याचे महसूलमंत्री असून कोण कोणाकडे पहात आहेत याकडेच पहात बसला आहात आणि अजित पवारांचे चिरंजीव हजारो कोटींच्या सरकारी जमिनी नावावर करून घेत आहेत. जरा तिकडे लक्ष द्या नाही तर महसूल मंत्रीपद ही कोणीतरी नावावर करून घेईल.
एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
चोरी करणाऱ्या बिलाल चौधरीला केली अटक
विठ्ठलवाडी उल्हासनगर येथून अटक केल्याची माहिती
घरफोडीच्या एका गुन्ह्यात बिलाल चौधरीला अटक केली असता खडसेंच्या घरी चोरी केल्याचा चौकशीत उलगडा
खेड तालुक्यातील निमगाव येथील भोंडवेवस्तीत शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला
शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला
बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी
जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु
यश गणेश भोंडवे असे बिबट्याने हल्ला केलेल्या शाळकरी मुलाचे नाव
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केलीय. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशपाक बळोरगी आणि तालुकाअध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत यंदा भाजप-शिंदे सेना - काँग्रेस अशी तिरंगी लढत होतेय. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर अक्कलकोटमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसलाय. मात्र तरीही काँग्रेसने या निवडणुकीत भाजप-शिवसेनेसमोर आव्हान देतं निवडणुकीत जोरदार प्रचार सुरु केलाय.
सुनील तटकरे यांच्या भाजप पक्ष प्रवेश आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींवर हल्लाबोल केलाय. महेंद्र दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीच उरले नाही त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा त्यांनी आरोप केलाय. त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येत असून ते चिटर आमदार आहेत.सुनील तटकरे यांचे सर्व पक्षांशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे काय पक्ष प्रवेश केला असे नाही. ते सुनील तटकरे यांच्याबद्दल वेगळा भ्रम निर्माण करत आहेत, असे म्हणत त्यांनी आमदार दळवींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलंय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडणार? अजित पवारांचे संकेत, म्हणाले..