- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking News: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाच्या सरी; पुढील तीन तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. मात्र माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार...More
रायगड: येथे पावसाचा जोर वाढला असून आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर राहण्याच्या हालचाली सुरू करत आहे. दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली असून या पावसात महाड तालुक्यातील ढालकाठी धबधबा देखील चांगलाच प्रवाहित झालाय. पावसाळ्यात या धबधब्यावर मोठी गर्दी होत असते मात्र मागील आठवडाभर कमी झालेला पावसामुळे या धबधब्याच्या प्रवाह कमी झाला होता. मात्र, आज सुरू झालेल्या पावसामुळे हा धबधबा पुन्हा फेसाळलेल्या स्वरूपात कोसळताना पहायला मिळतोय.
अजित पवार- विजय घाडगे भेटीपूर्वी पोलीस बंदोबस्तात वाढ
अजित पवारांच्या भेटीसाठी विजय घाडगे पुण्यात दाखल
भेटीसाठी दोन्ही बाजूंनी अटी- शर्ती ठेवल्याची चर्चा
विजय घाडगे सर्व कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या भेटीला येण्याची शक्यता
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्हीआयपी सर्किट हाऊस बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
परळीतील रस्ता रोको आंदोलन स्थगित, सकाळी 11 वाजल्यापासून पावसात सुरू होते रास्ता रोको आंदोलन
बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आंदोलकांशी फोनवरून चर्चा केली
आंदोलकाच्या मागणी बाबतचे पत्र पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना देण्यात आल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात येत आहे
Mumbai News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे स्वयंचलित 19 दरवाजे उघडले गेले असून धरणातून 20, 995 क्युसेसने पाण्याचा विसर्ग तानसा नदीत पत्रात केला जात आहे. धरणाला एकूण स्वयंचलित 38 दरवाजे असून त्यापैकी 19 दरवाजे उघडले गेले आहेत. शहापूरमध्ये रात्रीपासून संतधर पाऊस चालू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर अजून दरवाजे उघडले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही
सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं विधान
एकामानाने राहणाऱ्या गावाच प्रतीक म्हणजे हे दारापूर आहे...
मी ठरवलं आहे की रिटायर नंतर कुठलंही शासकीय पोष्ट स्वीकारनार नाही..
आणि जास्तीत जास्त वेळ मी दारापूर आणि अमरावती, नागपूर मध्ये घालवणार..
सरन्यायाधीशांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा...
भूषण गवई आपल्या मूळगावी दानापुरात
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मूळगावी लहानपणाची आठवण जागृत ठेवत गावातील जुन्या घरी भेट दिली तसंच गावातील विकंदर महाराज, राजे बुवा महाराज, हनुमान मंदिरांमध्ये भेटी देऊन दर्शन घेतले...
भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच त्यांचे मूळ गावात आगमन झाल्याने संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.. तर सरन्यायाधीश यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली..
गावातील शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेसमोर उभे राहून सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्वागत केले.. यावेळी भारत माता की जय अशा घोषणाबाजी सुद्धा विद्यार्थ्यांनी दिल्या होत्या...
नाशिक शहरामध्ये पंधरा दिवसानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली असून आज हवामान खात्याने नाशिकला मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा दिला आहे. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागात देखील पाऊस सुरू असून अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. आज नाशिक शहरात पावसाची संतततार सुरू झाल्याने वातावरणात देखील काहीसा गारवा पसरला आहे.
जालन्याचे काँग्रेस चे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर..
भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याची चर्चा,
विधानसभा निवडणुकीत पराभवा नंतर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृत्वा विरोधात उघड भूमिका घेतली होती..
आता नव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांनी आपल्या शेरो शायरी मधून भाजप प्रविशाचे संकेत देत , आता माघार नाही लवकरच पेढे भेटणार म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत.
रनिंग आमदार असताना फर्स्ट लॉटमध्ये मला तिकीट दिले नाही , तो उशीर केला त्यामुळे रिझल्ट निगेटिव्ह झाला,
शिवाय फक्त तिकीट दिले, नेत्यांची सभा दिली नाही आणि राजकारणामध्ये द्यावं लागतं, करावे लागत ते दिलं नाही
फक्त तिकीट दिले बाकी काही नाही
फक्त तिकीट दिले आणि वाऱ्यावर सोडले..
कब का टूथ चुका था मैं, बस बिखरना है मुझे...
तुम्हारे हजारो साल से मेरी खामोशी सही, न जाने कितने राजो को पर्दा रखती है ...
मुंबईत मागील तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहिसर नदीची पाणी पातळी मध्ये मोठी वाढ झाली आहे
बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधून वाहत असलेली दहिसर नदीची पाणी पातळी मध्ये वाढ झाल्यामुळे नदीमध्ये जाण्यापासून पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे
या जोरदार पावसाच्या फटका संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मध्ये असलेल्या प्राण्यांना देखील होत आहे
दहिसर नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधून तुलसी तलावाची जुडलेली आहे, तुलसी तलावांमधून दहिसर नदीमध्ये मगर येण्याची शक्यता आहे,
त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून या नदीची पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे पर्यटकांना नदीमध्ये जाण्यापासून मनाई करण्यात आली आहे
नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्ह्यांची नोंद होत असून नाशिक पोलिसांकडून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. शहरातील विविध पोलीस ठाण्यातून तब्बल 166 गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यात सोबत अमली पदार्थ पथक आणि गुन्हे शोध पथकाने देखील कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. नाशिक शहर पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सराईतांच्या घरांची झडती देखील असून इतर ठिकाणी देखील पोलिसांचे पथक शहरात गंभीर गुन्ह्यातील टवाळखोरांच्या मागावर असणार आहेत अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली.
ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी...
ठाणे ते मुंबईच्या दिशेने आणि मुंबई ते ठाण्याच्या दिशेने दोन्ही महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका वाहनधारकांना बसत आहे ..
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहे...
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज जिल्हा दौऱ्यावर आहे माणिकराव कोकाटे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहे त्या हॉटेल बाहेर सकाळपासूनच विरोधक या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करीत आहे.. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्याम सनेर आणि माणिकराव कोकाटे यांचे समर्थक देखील आता हॉटेल बाहेर मोठ्या गर्दी करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली....त्यामुळे संपूर्ण हॉटेल परिसराला पोलीस छावणीच स्वरूप आला आहे.. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी सांगितले की विरोधक फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी स्टंटबाजी करीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलले आहे..
मुंबईत मागील तीन ते चार दिवसापासून सुरू असलेला मुसळाधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचा मोठा साम्राज पसरला आहे
पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव जवळ दोन ते अडीच फुटांचा मोठा प्रमाणात खड्ड्यांच्या साम्राज पसरला आहे
वांद्रे कडून बोरिवलीच्या दिशेने जाणारा मार्गावर गोरेगाव जवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच्या साम्राज पसरल्यामुळे या खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे
सोबत दोन ते अडीच फूट खड्डे असल्यामुळे पाऊस सुरू आहे या पावसामध्ये खड्ड्यात पाणी भरला आहे त्यामुळे दोन चाकी असेल किंवा तीन चाकी वाहनांचा चाका यात जाऊन मोठा अपघात होऊन वाहन चालकांना जीव जाण्याची देखील शक्यता आहे
Mumbai Rain : मुंबईमध्ये सकाळपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शहराच्या विविध भागांना बसू लागला आहे. हवामान विभागाने वर्तवलेला ऑरेंज अलर्ट कुठेतरी खरा ठरत असल्याचं चित्र आहे. विशेषतः अंधेरी परिसरात पावसाने कहर केला आहे.
अंधेरी सबवेने अक्षरशः नदीचं रूप धारण केलं आहे. वरच्या भागातून आलेलं मोठ्या प्रमाणातलं पाणी थेट सबवेमध्ये शिरलं असून संपूर्ण सबवे पाण्याखाली गेलेलं आहे. परिणामी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येत आहेत.
यामुळे अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्रंबकेश्वर दर्शनाचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक
त्रंबकेश्वर पोलिसांनी केली अटक
दर्शन घेणाऱ्या भाविकांना बनावट पास देऊन केली जात होती फसवणूक
श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई
त्रंबकेश्वर देवस्थान चा बनावट पास तयार करून भाविकांची होत होती लूट
यात देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी सहभागी आहेत का या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू
हवामान खात्याने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, आणि सकाळपासूनच त्याच प्रमाणे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका आता थेट मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर बसत आहे.
संपूर्ण पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून तीव्र ट्रॅफिक जाम निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
ब्रिजवरून येणारे पाणी थेट सर्व्हिस रोडवर जमा होत असल्यामुळे दोन्हीही ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिकांना ऑफिस ला पोहोचण्यासाठी तासनतास रस्त्यावर थांबावं लागत आहे.
हवामान खात्याने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता, आणि सकाळपासूनच त्याच प्रमाणे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका आता थेट मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर बसत आहे.
संपूर्ण पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून तीव्र ट्रॅफिक जाम निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
ब्रिजवरून येणारे पाणी थेट सर्व्हिस रोडवर जमा होत असल्यामुळे दोन्हीही ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिकांना ऑफिस ला पोहोचण्यासाठी तासनतास रस्त्यावर थांबावं लागत आहे.
बार्शी शहरात जागेच्या वादातून दोन गटात तुफान राडा
बार्शीतील पांडे चौक येथील घटना
जागेच्या वादातून पोलिसांसमोरच दोन गटात राडा
जागेच्या मालकांनी धोकादायक इमारत पाडल्यामुळे ताबा असलेल्या भाडेकरू आणि जागा मालक यांच्यात हा राडा झाला
मागील 60 ते 70 वर्षांपासून या जागेत भाडेकरू व्यवसाय करत होते मात्र ही इमारत धोकादायक झाल्याने पाडण्यात आली
पोलीस बंदोबस्तात ही पूर्ण इमारत पाडण्यात आली
त्यामुळे जागेचे मालक आणि भाडेकरू यांच्यात ही वादावादी झाली
ज्याचे पर्यवसन नंतर हाणामारीत झाले
Weather Update: तळकोकणाला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाच्या अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३१ मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात ५७ मी.मी. पावसाची नोंद झालीय. जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे आतापर्यंत एक मध्यम आणि २० लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर भात शेतीची ९० टक्के काम पूर्ण झाली आहेत.
मागील काही दिवसातील मंत्र्यांसंदर्भात आलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी
कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल!
काही निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा काहीही केलं तर चालतं अशी भावना मंत्र्यांच्या मनात निर्माण होईल
मुख्यमंत्र्यांकडून मित्र पक्षांना आपली नाराजी कळवल्याची सूत्रांची माहिती
विश्वसनीय सूत्रांची माहिती
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ
माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचे आश्वासन
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले.
अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या एँड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या
महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर
व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात. सन 2005 पासून ही शाळा चालवली जाते. सुमारे 300 विद्यार्थी इथे मराठी शिकत आहेत.
अमेरिकेत अशा 50 हून अधिक शाळा या मराठीच्या असून काही सेवा भाव ठेवून इथली मराठी माणसे या शाळा चालवत आहेत.
अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकवणे, परिक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले.
दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला दिले आहे.
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ
माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचे आश्वासन
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले.
अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या एँड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या
महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर
व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात. सन 2005 पासून ही शाळा चालवली जाते. सुमारे 300 विद्यार्थी इथे मराठी शिकत आहेत.
अमेरिकेत अशा 50 हून अधिक शाळा या मराठीच्या असून काही सेवा भाव ठेवून इथली मराठी माणसे या शाळा चालवत आहेत.
अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकवणे, परिक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले.
दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला दिले आहे.
भंडाऱ्याच्या साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी ९ जुलैला त्यांच्या रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आईसोबत आलेल्या या मुलीवर डॉक्टरनं सोनोग्राफी कक्षात हे कृत्य केल्याची तक्रार साकोली पोलिसात दाखल करताचं डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आता १६ दिवसांपासून हे डॉक्टर फरार असून पोलिसांनीही त्यांना शोधण्यासाठी लूक आउट नोटीस बजावला आहे. डॉक्टर देवेश अग्रवाल याला पळून जाण्यास मदत करणारे त्याचे दोन्ही भाऊ डॉ. भरत अग्रवाल व जितेश अग्रवाल यांनाही पोलिसांनी आरोपी बनविले असून ते ही फरार झाले आहेत. यापूर्वी पोलिसांनी डॉक्टर देवेश अग्रवाल यांचे बँक खाते गोठवले असून पासपोर्ट आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याचा अहवाल शासनाकडं पाठवला आहे.
ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात...
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता...
सकलाय भागात पाणी साचायला सुरुवात...
ठाणे महानगरपालिकेचे टीम अलर्ट मोडवर...
पुणे मेट्रोचा 'वन पुणे विद्यार्थी पास' आता मोफत
पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत.
पुणे मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे.
पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० पेक्ष्या जास्त आहे.या प्रवासी संख्येमध्ये एक मोठा वाटा विद्यार्थी समूहाचा आहे.
शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लवकरच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रो एक खास भेट घेऊन आली आहे.
२५ जुलै २०२५ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत,पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'वन पुणे विद्यार्थी पास कार्ड' (KYC)' पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
११८ रुपयांना (रु १०० + रु १८ - GST) मिळणारे विद्यार्थी पास कार्ड आता या कालावधीत पूर्णपणे मोफत मिळणार आहे.पण हे कार्ड घेताना सोबत किमान २०० रुपयांचा टॉप-अप करणे अनिवार्य असणार आहे.
या २०० रुपयांचा कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे २०० रुपये टॉप-अप मिळणार असून त्यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
या विशेष उपक्रमात 'विद्यार्थी पास कार्ड' घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान दररोज सर्व प्रवासावर ३० % सवलत उपलब्ध असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक समाविष्ट आणि सहाय्यक वातावरण निर्माण होईल.
सोशल माध्यमावर पोस्ट करत जातीय तेढ निर्माण केल्या प्रकरणात बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कासलेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 1 जुलैची अंतिम यादी गृहीत धरली जाणार आहे ..
विधानसभा निवडणुकीच्या 8 महिन्या नंतर नागपूर जिल्ह्यात 79 हजार 982 नवीन मतदारांची वाढ झली आहे
यात सर्वाधिक मतदार उत्तर नागपूर विधानसभेत 14 हजार 671 मतदारांची नोंद झाली तर सर्वात कमी उमरेड विधासभेत 339 मतदारांची वाढ झाली.
नवीन मतदार वाढीवरून काँग्रेसने विधानसभा निवडणूकीत पारदर्शकतेला घेऊन प्रश्न उपस्थित केले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदार वाढी नंतर काँग्रेस काय भूमिका घेते हे बघणे म्हत्वाचे आहे.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी आज रेड अलर्ट नागपूर वेधशाळेचा इशारा नागपूर आणि वर्ध्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी.
तुळजाभवानी देवीच्या भक्तांना आजपासून चितळे बंधूंचा लाडुप्रसाद
मंदिर संस्थान कडून प्रसाद सेवा आजपासून सुरू होणार
प्रसाद सेवेचा मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार
तुळजाभवानी देवीच्या भक्तांना अनेक दिवसांपासून होती प्रसाद सेवेची प्रतीक्षा
भाविकांची प्रतिक्षा संपली असून आजपासून लाडू प्रसाद मिळणार
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना खुंटेवाडी इथं शेतकऱ्यांचा विरोध
जमिनीची मोजणी न करताच परत फिरण्याची नामुष्की
पाच गावातील जमिनीची मोजणी करण्याचा होता नियोजन , शेतकरी विरोधामुळे प्रक्रिया रद्द
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न
मात्र जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
चेन्नई सुरत महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्गाचे खुंटेवाडी येथे होणार इंटरसेक्शन
इंटरसेक्शनला कमीत कमी जागेत काम करण्याचा प्रशासनाचा शब्द, मात्र शेतकऱ्यांचा जमीन देण्याला विरोध
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सिआयडी मार्फत करण्यात यावा यासाठी आज परळी - अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून सकाळी 11 वा.रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात महादेव मुंडे कुटुंबीय देखील रस्त्यावर उतरणार आहे.ऑक्टोबर 2023 साली महादेव मुंडे यांचा तहसील समोरील मैदानात निर्घुनपणे खून करण्यात आला होता.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाच्या सरी; पुढील तीन तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता