Maharashtra Breaking News: कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी; तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट
Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. तर अंतिम मंजुरी देवेंद्र फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. तर रायगडसह...More
बीड : अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावरील पाटोदा येथे भरधाव एसटी बसने दुचाकी स्वाराला धडक दिली. या घटनेत पती-पत्नी जागीच ठार झाले. बाळू वाईकर आणि लता वाईकर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी गावचे रहिवासी आहेत. आठवडे बाजारासाठी पाटोदा येथे ते येत असताना ग्रामीण रुग्णालयासमोर एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात बस खाली आल्यानं या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसामुळे किल्ल्याचा बुरुज ढासळला. बाळापुरच्या ऐतिहासिक किल्ल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. सध्या बाळापूरच्या किल्ल्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय असे तीन कार्यालयं आहेत. बुरुज ढासळताना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुरातत्व विभागाने किल्ल्याची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे बुरुज ढासळल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अनेक धाब्यांवर लावलेल्या गुजराती भाषेतील पाट्यांवर आज मनसेने थेट कारवाई केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या आदेशानुसार, मनसे सैनिकांनी या गुजराती पाट्या हटवून टाकल्या.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठोस इशारा देत सांगितले की, “ही महाराष्ट्राची भूमी आहे, येथे सर्वप्रथम मराठीचा सन्मान झाला पाहिजे. गुजराती भाषेतील फलक आणि पाट्या जर हटवल्या नाहीत, तर आम्ही स्वतः कारवाई करू.”
बाईट - प्रशांत खांबे (मनसे पादाधिकारी)
महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर अनेक ठिकाणी गुजराती भाषेतील फलक झळकत होते. स्थानिक मराठी जनतेकडून याविरोधात संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा मुद्दा हाताळला. मनसेने यापुढेही अशा पाट्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून, स्थानिक प्रशासनानेही याची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या
परभणी जिल्ह्यात ७ ठिकाणी चक्काजाम आंदोलन
आंदोलनामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प
परभणीत आंदोलकांनी पत्ते खेळून केला निषेध
शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्या शेतमालाला हमीभाव द्या या मागण्यासठी इतर मागण्यासाठी राज्यभरामध्ये बच्चू कडू च्या प्रहार कडून पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला परभणीत मोठा प्रतिसाद मिळाला आहे परभणी जिल्ह्यातील सात ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रहार स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस सीपीआयसह इतर विविध संघटना मोठ्या संख्येने शेतकरी ही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते सरकारकडून तात्काळ कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे परभणी मध्ये तर चक्क आंदोलकांनी आंदोलनाच्या ठिकाणी पत्ते खेळून सरकारचा निषेध केलाय परभणीतील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक जवळपास एक ते दोन तास ठप्प झाली होती.
परळी-बीड महामार्गावर प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन; महामार्गावर पत्त्यांचा डाव मांडत कृषीमंत्र्यांचा निषेध
Anc: बीड-परळी महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले जात आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी अशी प्रमुख मागणी या दरम्यान करण्यात आली. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत महामार्गावरच पत्त्यांचा डाव मांडण्यात आला.
बाईट: प्रहार संघटना कार्यकर्ते
सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ राज्यभरात वेगवेगळ्या संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत आज साताऱ्यातील पोवई नाका येथे उबाठा गटाने माणिकराव कोकाटे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला रमी खेळाच्या पत्त्याची पाने जोडून निषेध व्यक्त केला पोवई नाका येथील मुख्य चौकात उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको देखील केला यावेळी शहरातील काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर यापुढील काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे
मनसे नेते अविनाश जाधव ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अल्टिमेटम दिला होता
घोडबंदर गायमुख या ठिकाणी खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही अधिकारी यांना खड्ड्यात घालू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता
आज गायमुख घोडबंदर परिसरातील रस्त्याची पाहणी ठाणे पालिका आणि सार्वजनिक बांधकाम प्रशासन करणार आहे....
यावेळी मनसे आणि प्रशासना बरोबर रस्त्यावरून खडा जंगी पाहायला मिळणार आहे.
मनसेच्या वतीने गायमुख परिसरातील खड्डे मीटर टेप ने मोजताना
अविनाश जाधव खड्ड्यात उतरून मोजमाप करत आहे
जित दादा माझं काय चुकलं... विजय घाडगे यांचा सवाल... मुंबईला जाऊन दादांनाच विचारणार... विजय घाडगे मुंबईकडे रवाना
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना रविवारी झालेल्या मारहाणीनंतर अनेक घटना घडामोडी घडल्या... आज त्यात नवीन वळण आले आहे.. सुरज चव्हाण याने माझ्यावर प्राण घातक हल्ला केला.. पोलिसाचा जावई असल्यासारखा तो येतो काय आणि जमानत घेऊन जातो काय... सगळेच वाईट आहे.. विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्री यबाबत कारवाई होत नाही.. मात्र सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन देणाऱ्या माझ्यासारख्या शेतकरी कार्यकर्त्यावर प्राण घातक हाल्ला होतो.. हे योग्य नाही.. यामुळे मी आत थेट मुंबईकडे निघालो आहे.. अजितदादा पवार यांनाच मी याबाबत जाब विचारणार..असे म्हणत विजयकुमार घाडगे यांनी हॉस्पिटल मधून थेट ॲम्बुलन्स मध्ये बसत मुंबई कडचा प्रवास सुरू केला आहे...
विजयकुमार घाडगे यांना रविवारी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन दिल्याकारणाने मारहान झाली होती.. याप्रकरणी सुरज चव्हाण यांच्यासह ११ लोकांवर गुन्हा दाखल झाला होता... यातील नऊ लोकांना ताब्यात घेत कारवाई करून सोडून देण्यात आलं.. अवघ्या दोन तासांमध्ये ही लोक बाहेर पडली.. यामुळे छावा संघटनेतील कार्यकर्ते संतप्त झाले.. मारहाण झाल्यापासून आजतागायत छावा चे कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्ता उतरून आंदोलन करत होते... लातूर शहर बंदच आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे औसा उदगीर अहमदपूर रेनापुर निलंगा या ठिकाणी ही बंद आणि आंदोलन झाली.. मराठवाड्यातील अनेक शहरात त्याचे पडसाद उमटले होते..
विजयकुमार घाडगे यांनी सातत्याने माझ्यावर अन्याय झाला आहे... मी निवेदन दिल तर मला मारहाण झाली... निवेदन देताना प्रत्येक पत्ते फक्त टेबलवर टाकले होते.. मला जबर मारहाण झाली प्राण घातक हल्ला झाला.. मात्र विधिमंडळात आसंवेदनशील असलेले कृषिमंत्री कोकाटे हे मोबाईलवर पत्ते खेळताना दिसत आहेत.. त्यांचा राजीनामा मागितला म्हणून मला मारहाण झाली.. याचा जाब मी त्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांनाच विचारणार आहे... मी शिवीगाळ केली वाईट वागलो असं बोललं जात आहे.. सुनील तटकरे हे दादाला भेटतांना समोर यावेत.. मी काय वाईट वागलो ते त्यांनी तिथे सांगावं... संपूर्ण जिल्ह्याचा मीडिया तिथे त्यावेळी हजर होता.. या सगळ्या गोष्टीचा जाब मी दादांनाच मुंबईला जाऊन विचारणार आहे.. असं म्हणत विजयकुमार घाडगे हे मुंबईकडे निघाले आहेत...
अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते... उपचाराची सर्व साधने काढत त्यांनी स्वीट ॲम्बुलन्स मध्ये बसून मुंबईकडे प्रयाण केला आहे.. यावेळी मराठवाड्यातील अनेक भागातील आलेले पदाधिकारी त्याच्या सोबत निघाले आहेत...
दत्ता भरणे मंत्री
अल्पसंख्याक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अनेक अडचणी आहेत.
कर्ज वाटप, कर्ज वसुली
अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या धर्तीवर निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या मुलांना फायदा होईल
बोगसपना दूर व्हावी. अनेक गोष्टी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गैरव्यवहार केला अस म्हणता येणार. नाही
कर्ज वाटप करताना अनियमितता झाली असेल पण पुढे ते होऊ नये म्हणून आजची बैठक झाली.
ऑन कंत्राटदार आत्महत्या
दुःख दायक बातमी आहे. पण आत्महत्या का केली याच कारण समोर आलं नाही.
विजय वडेट्टीवर byte
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिकाला भाव मिळत नाही,पीकविमा मिळत नाही सरकारची मदत मिळत नव्हती शेतकरी आत्महत्या करत आहे
आता ही वेळ कंत्राटदारावर आली आहे
सांगलीच्या जलजीवन मिशनचा कंत्राटदार काम केले पण गेले सहा महिने सरकारने बिल थकवले म्हणून त्याने जीव दिला
सत्तेवर येण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करून ठेवले आहे
सार्वजनिक बांधकाम विभागात बिल थकवली आहे, राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे
कंत्राटदारांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे
नाशिक ब्रेकिंग
नाशिकच्या पंचवटी परिसरात काल मध्यरात्री झाला होता दोन गटात तुफान राडा...
वर्चस्वच्या वादातून दोन गट आले होते समोरासमोर...
परिसरात दोन्ही गटाकडून तुफान दगड फेक करून हवेत गोळीबार...
संपूर्ण घटना cctv कॅमेरेत कैद...
पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
सोलापूर ब्रेकिंग :
सोलापुरात प्रहार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे रास्ता रोको आंदोलन
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाकणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन
रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग,शेतमजूर, मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नासाठी प्रहारच राज्यभरात चक्का जाम आंदोलन सुरूय
सोलापुरातील प्रहाराच्या या आंदोलनात रयत क्रांती संघटना आणि संभाजी ब्रिगेड देखील सहभागी
आंदोलकांनी सोलापूर - पुणे महामार्ग रोखून धरल्यामुळे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या
रोहित पवार PRESS
ऑन हर्षल पाटील आत्महत्या
काल आपण ऐकलं की हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली
जलजीवन मिशन अंतर्गत ते काम करत होते
अनेक कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले होते
१.५० कोटी रुपये सरकारकडे त्यांचे स्थगित होते
हर्षल पाटील यांना ५ वर्षाची मुलगी आहे मोठं कुटुंब आहे
अशा ३५ वर्षाच्या युवकाने काम सरकारकडून घेतल
सुरुवातीला पैसे वेळेवर देण्यात आले
अधिकारी पैसे नाहीत अस सांगायचे
आज राज्यात 90 हजार कोटी रुपये थकीत आहेत
हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत
सरकार पैसे देत नाही
छोटी कॉन्ट्रॅक्टर यात दुर्दैवाने अडकले आहेत
आम्ही सरकारकडे सातत्याने मागणी करत आहोत की हे पैसे लवकर द्या
लाडकी बहीण योजना घाईगडबडीने आणली निवडणूक जिंकणं हेच मनामध्ये होतं
अनेक कॉन्टॅक्टची दिशाभूल सरकारने केली
१ लाख कॉन्ट्रॅक्टर राज्यात आहेत
निवडणुकीच्या आधी केवळ कामे देण्यात आली
आता केवळ मोठया कॉन्ट्रॅक्टरला कामे दिली जात आहेत
या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिला पाहिजे
हर्षल पाटील याची आत्महत्या नसून हा खून आहे सरकारने हर्षल पाटील यांचा खून केला
सरकारला विनंती सगळे पैसे देऊन टाका
नाहीतर सरकारवर गुन्हा दाखल करावा लागेल
ऑन सांगली जिल्हा परिषद खुलासा
हे डायरेक्ट काम हर्षल पाटील याला दिलं नसेल
सब कॉन्ट्रॅक्टर ते होते अस दिसत आहे
१६ हजार कोटी रुपये जलजीवन मिशनचे थकले आहेत
केंद्र सरकारकडून अतिरिक्त पैसे देण्यात येणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केल आहे
तीन मोठे एकत्रित बसतात मोठे मोठे प्रोजेक्ट मंजूर करतात शक्ती मार्गाची काही गरज आहे का आता
मलीदे खायच काम हे सरकार करत आहे
सरकार वेड झाल आहे
मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात हे पैसे घातले जात आहेत
Amravati Breaking
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहारचं चक्काजाम
नांदगाव टोल नाक्याजवळ बच्चू कडूच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन
यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक थांबली
आज राज्यभरात प्रहारचं चक्काजाम आंदोलन...
शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज चक्काजाम आंदोलन...
यवतमाळ
दारव्हा ते कारंजा मार्गावर प्रहारचे शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन सुरू
दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथे दारव्हा ते कारंजा मार्गावर चक्का जाम आंदोलन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात प्रहारच्या वतीने चक्का जाम आंदोलनाची दिलीये हाक
दारव्हा ते कारंजा मार्ग शेतकऱ्यांनी धरला रोखून,रस्त्यावर संपूर्ण वाहतुक ठप्प
दारव्हा तालुक्यातील भांडेगाव इथे कारंजा मार्ग धरला रोखून,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
धाराशिव : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी आज धाराशिव मध्ये सोलापूर-धुळे महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या आंदोलनामुळे सोलापूर धुळे महामार्गावर वहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.
नाशिक : प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार संघटनेच्या वतीने आज चक्काजाम आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटू लागले आहेत. नाशिकच्या मालेगाव येथील टेहेरे चौफुली येथे प्रहार संघटनेने आक्रमक होत चक्काजाम आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहेरे चौफुली येथे रास्ता-रोको आंदोलन करत रस्त्यावर झोपून घेतले. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. अपंग बांधवांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी तहसीदारांना निवेदन देण्यात आले.
नाशिक : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील आडगाव नाक्यावर, मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान प्रहार कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्त्यांच्या खेळासंदर्भातील व्हायरल व्हिडीओ आणि फोटो असलेले बॅनर झळकावले. वादग्रस्त विधानांमुळे आधीच चर्चेत असलेल्या कोकाटेंविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. “शेतकऱ्यांची कर्जमाफी करा”, “सातबारा कोरा करा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाशिम : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे विविध जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प शंभर टक्के भरला असून, यामुळे परिसरातील १५ गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
पुणे : समता परिषदेचे अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे आज पुण्यात भिडे वाड्याला भेट देणार आहेत. क्रांतीज्योती फुले स्मारकाचं काम सुरु असल्याने भुजबळ कामाची पाहणी करणार आहेत. तसेच भिडे वाड्याच्या बांधकामाची देखील छगन भुजबळ पाहणी करणार आहेत.
बीड : वर्गात जाताना धक्का लागला माफी ही मागितली. मात्र, किरकोळ कारणावरुन नववीच्या विद्यार्थ्याचा इगो हर्ट झाला. यातून त्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याला मारण्यासाठी गल्लीतील 10 ते 15 मित्रांना बोलावून घेतले. संबंधितांनी फायटर आणि रॉडने विद्यार्थ्याला मारहाण केली. यावेळी मारहाण होत असलेल्या मुलाचा चुलत भाऊ त्याला वाचवण्यासाठी आल्यावर संशयितांनी त्याचेही डोके फोडले. मारहाण झालेले दोघे वाचण्यासाठी शिक्षकांच्या स्टाफ रुममध्ये पळाले. मात्र टोळक्याने तिथेही जाऊन धुडगूस घातला. बीडच्या एका विद्यालयात हा प्रकार घडला आहे. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले असून याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भंडारा : गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस पडत आहे. तर, दुसरीकडं धापेवाडा बॅरेज आणि संजय सरोवरमधून सोडण्यात येत असलेलं पाणी वैनगंगा नदीत पोहोचल्यानं वैनगंगा नदी आता दुथडी भरून वाहू लागल्यानं गोसेखुर्द धरण्याचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 21 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहेत. 33 पैकी 21 दरवाजे उघडले असून त्यातून आता 84 हजार 542 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्यानं पाऊस पडत असल्यानं धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात येईल, असा इशारा धरण प्रशासनानं दिला आहे.
धाराशिव : शेती-माती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळतेय. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. ऊस आणि द्राक्ष बागेनंतर आता मराठवाड्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसाठी देखील एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सोयाबीन साठीचा एआय तंत्रज्ञानाचा देशातला पहिला प्रयोग धाराशिवच्या उपळा गावात केला जातोय. उपळा गावामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे वेदर स्टेशन बसवण्यात आला आहे. या वेदर स्टेशनच्या चहू बाजूला असलेल्या 20 किलोमीटर परिघातील शेतीच्या नियोजनासाठी या स्टेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जात आहे. वेदर स्टेशन प्रत्येक तासाला वातावरणातील बदलाची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाला पाठवत आणि कृषी विद्यापीठातील तज्ञ नोंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन कसे करायचं हे थेट मोबाईलवर सांगतात. वेदर स्टेशनच्या जोडीला सॉईल सेन्सरचाही वापर तंत्रज्ञानाच्या पायलेट प्रोजेक्टमध्ये केला जातोय. उपळा गावातील वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये 10 शेतकऱ्यांच्या शेतात असे सॉईल सेन्सर बसवले आहेत.
धाराशिव : शेती-माती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळतेय. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. ऊस आणि द्राक्ष बागेनंतर आता मराठवाड्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसाठी देखील एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सोयाबीन साठीचा एआय तंत्रज्ञानाचा देशातला पहिला प्रयोग धाराशिवच्या उपळा गावात केला जातोय. उपळा गावामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे वेदर स्टेशन बसवण्यात आला आहे. या वेदर स्टेशनच्या चहू बाजूला असलेल्या 20 किलोमीटर परिघातील शेतीच्या नियोजनासाठी या स्टेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जात आहे. वेदर स्टेशन प्रत्येक तासाला वातावरणातील बदलाची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाला पाठवत आणि कृषी विद्यापीठातील तज्ञ नोंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन कसे करायचं हे थेट मोबाईलवर सांगतात. वेदर स्टेशनच्या जोडीला सॉईल सेन्सरचाही वापर तंत्रज्ञानाच्या पायलेट प्रोजेक्टमध्ये केला जातोय. उपळा गावातील वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये 10 शेतकऱ्यांच्या शेतात असे सॉईल सेन्सर बसवले आहेत.
धाराशिव : शेती-माती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला आता तंत्रज्ञानाची जोड मिळतेय. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. ऊस आणि द्राक्ष बागेनंतर आता मराठवाड्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसाठी देखील एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सोयाबीन साठीचा एआय तंत्रज्ञानाचा देशातला पहिला प्रयोग धाराशिवच्या उपळा गावात केला जातोय. उपळा गावामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे वेदर स्टेशन बसवण्यात आला आहे. या वेदर स्टेशनच्या चहू बाजूला असलेल्या 20 किलोमीटर परिघातील शेतीच्या नियोजनासाठी या स्टेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जात आहे. वेदर स्टेशन प्रत्येक तासाला वातावरणातील बदलाची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाला पाठवत आणि कृषी विद्यापीठातील तज्ञ नोंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन कसे करायचं हे थेट मोबाईलवर सांगतात. वेदर स्टेशनच्या जोडीला सॉईल सेन्सरचाही वापर तंत्रज्ञानाच्या पायलेट प्रोजेक्टमध्ये केला जातोय. उपळा गावातील वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये 10 शेतकऱ्यांच्या शेतात असे सॉईल सेन्सर बसवले आहेत.
सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर आठ दिवसांपूर्वी भुईंज परिसरात कार अडवून 20 लाखांची रक्कम चोरी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी संयुक्तपणे कारवाई करून केरळमधील सात जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 20 लाख रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने, असा 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर सहा संशयित अद्याप पसार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे. पण सध्या मात्र पावसाला विश्रांती घेतलीय. बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला. अर्थात कोसळणारा पाऊस हा सरींवर बरसात होता. मध्यरात्री देखील काही मुसळधार सरी बरसल्या. पण त्यानंतर मात्र पावसाने उघडीत घेतली आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात किंवा दर्या खोऱ्यांमध्ये असलेल्या भागांमध्ये पावसाचा जोर तुलनेने जास्त आहे. पावसानं सध्या उसंत घेतली असली तरी वातावरण मात्र पावसाला पूरक आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आजचा दिवस हा मुसळधार पावसाचा असणार आहे.
सातबारा कोरा कोरा या मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे..
नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे ही प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते..
मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे..
काल रात्री उशिरा नागपूर जिल्ह्यातील प्रहार चे पदाधिकारी रजनीकांत आतकरी यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले...
यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट बच्चू कडू यांना फोन लावून पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली...
यावेळी बच्चू कडू यांनीही कारवाई करायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत त्यांची कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले..
मुंबई अहमदाबाद हायवेवर प्रहार संघटनेचे आज चक्काजाम आंदोलन
महामार्गाच्या लगतं असलेल्या एका चहाच्या दुकानात अनियंत्रित ट्रॅक्टर शिरल्यानं झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले होते. त्यातील लक्ष्मण हलमारे (३०) यांच्यावर भंडाऱ्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात तुमसर तालुक्यातील देव्हाडी परिसरात १३ जुलैला घडला होता. मृतकाची पत्नी पाच महिन्याची गर्भवती असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आजपासून धुळ जळगाव नंदुरबारच्या दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची पुढील दोन दिवस तरी प्रत्यक्ष भेट होणार नाही
आज दुपारी 3 वाजता माणिकराव कोकाटे धुळेकडे रवाना होऊन धुळे शहरात मुककमी राहणार
शुक्रवारी धुळे, जळगाव मधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावून कोकाटे नंदुरबार मुककमी जाणार
ऑनलाइन पत्ते खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं कोकाटे वादात
बुधावरी मुबंई दौरा रद्द झाल्यानं कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट टळली
धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे आठ कोटी सोळा लाख थकवले
थकित ऊस बिलाचा प्रश्न घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील साखर आयुक्तांकडे
सात दिवसात उसाची थकीत बिले मिळाली नाही तर साखर आयुक्तलयात आमरण उपोषणाचा इशारा
तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यात एकूण आठ कोटी 16 लाख थकीत असल्याच साखर आयुक्त यांना दिलेल्या पत्रात रणजीत पाटलांकडून माहिती
माळेगाव येथील अतिक्रमण धारकांचा पोलिस आणि वनविभागाच्या पथकावर हल्ला प्रकरणी मोताळा पोलिसात गुन्हा दाखल.
अद्याप एकाही आरोपीला अटक नाही.
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात अद्यापही परिसरात तणावाचं वातावरण.
पोलीस व वनविभागाचे अठरा कर्मचारी जखमी .जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले, मात्र सध्या पावसाच्या अधून मधून सरी कोसळत आहेत.
-दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूय. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर दक्षिण सोलापुरातल्या वडजी परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तुफान पावसामुळे गावाचा रस्ता अक्षरशः वाहून गेलाय. गावातल्या खलाटे वस्ती, चेंडके वस्ती, भालेकर वस्ती, चिवरे वस्ती येथुन वडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जवळपास 25 ते 30 विद्यार्थी दररोज ये जा करीत असतात. पण रस्ता वाहून गेल्याने पावसाच्या पाण्यातुन शाळेतील लहान विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यानिकेत विद्यालयात एक धक्कादायक आर्थिक घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठात ठेकेदार पद्धतीने कार्यरत असलेल्या एका लिपिकाने या विद्यापीठातील १२८ विद्यार्थ्यांची फसवणूक करून तब्बल १६ लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार केल्याचं उघड झालं आहे.
महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये हत्येचा अमानुषपणा समोर...१६ वार केल्याचं स्पष्ट...हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगाही सहभागी, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा आरोप...
लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सरकारनं थांबवली...स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर अर्जांची छाननी होणार
एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार...तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती
रायगडसह संपूर्ण कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी, तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News: कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी; तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट