Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: हिंदीची सक्ती करून दाखवाच असं आव्हान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीरारोडमधल्या सभेतून दिलं आहे. दुकानंच नाही तर शाळाही बंद करण्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला....More
नागपूर गांजा तस्करी
नागपूर मध्ये पुष्पा स्टाईल गांजाच्या तस्करीचा प्रकार पुढे आला आहे..
ट्रकच्या फ्लोवरच्या खाली स्वतंत्र कप्पे करून १०६ किलो २८ लाख किमतीचा गांजा उडीसा राज्यातून नागपूर मध्ये आणला जात होता.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर- हैदरबाद मार्गावर सापळा रचण्यात आला.
चालक ताजमोहमद शेख व क्लीनर रामलखन गुप्ता याला ताब्यात घेतले. सुरवाती आरोपी पोलिसांना सहकार्य करत नव्हते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता गांजा तस्करीचा नवीन फंडा बघून पोलिस देखील चरकारवून गेले.
या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली असून आरोपीचा आंतरजीय टोळीचा संबंध पुढे आल्याने या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे
बाईट- संदीप बुवा, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा
धाराशिव:
प्रताप सरनाईक ऑन ठाकरे
......
ठाकरे परिवाराकडे मुंबईची पंचवीस वर्षापासून सत्ता, राज्यात अडीच वर्ष सत्ता असताना त्यांनी काही केलं नाही
मराठी परिवाराला मुंबईतून बाहेर करण्याचे कटकारस्थान त्यांच्याच अनुयायांनी केलं
प्रताप सरनाईकांचा मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे परिवारावर हल्लाबोल
हिंदी लादण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी मराठी जनावर केला, त्यामुळे त्यांचे टीका निरर्थक आहे
मी लिहिलेलं पत्र वस्तुस्थितीला धरून आहे, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी काय केलं हेच
मी पत्रात लिहिलं
प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेला लिहिलेल्या पत्रावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सरनाईकांचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे कौटुंबिक मुलाखत
सगळं काही ठरवून विचारलं जातं
काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे सगळं ठरलेलं असतं त्यामुळे त्यावर न बोललेलं बरं
आमचं महायुतीचं सरकार दगड असो धोंडे असो ते जनतेचे काम करत राहणार
उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीत निवडणूक आयोगाला शेंदूर फासलेला धोंड्या म्हटल्या बाबत प्रताप सरनाईकांना विचारलं असता मुलाखतीवर टीका
हरित धाराशिव उपक्रमासाठी धाराशिव येथे आले असता प्रताप सरनाईक यांचा संवाद
अँकर
छत्रपती संभाजीनगर येथे भोंदू बाबा विकृत मानसिकतेतून अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता ही बातमी एबीपी माझा ने प्रसारित केल्यानंतर त्या भोंदू बाबा वर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम करत असतो आजही समाजामधली मानसिकता बदलत नाही हे मोठे दुर्दैव आहे एकीकडे आपण चांद्रयान यशस्वी झाल्याचं आनंद साजरा केला याचा अभिमान आहेच दुसरीकडे मात्र कठोर कायदा असून सुद्धा अनेक वेळा अशा विकृत मानसिकतेला आपण बळी पडत असु मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे अशा पद्धतीने कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल विकृतीच्या माध्यमातून असं वागत असेल तर त्यांच्यावरती नक्कीच कार्यवाही केली जाईल
एक महिना झाला पाऊस झाला गायब...पाण्याअभावी सोयाबीनची लागवड व्यर्थ... 13 एकर वरील सोयाबीन वर शेतकऱ्यांने फिरवला रोटावेटर..
पावसाअभावी सोयाबीनची योग्य वाढ न झाल्याने सोयाबीनवर फिरविले रोटर...लातूर तालुक्यातील हिसोरी येथील शेतकऱ्यावर ओढवले दुबार पेरणीचे संकट..
लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरिपात जवळपास चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केलीय.. मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने सध्या पिके कोमेजून जात आहेत... लातूर तालुक्यातील हिसोरी येथील राजगोपाल तापडिया या शेतकऱ्याच्या सोयाबीनची पावसाअभावी योग्य वाढ झाली नाही..... या शेतकऱ्याने हिसोरी गावच्या शिवारातील आपल्या १३ एकर शेतात गेल्या महिन्यात सोयाबीनची लागवड केली होती... योग्य वाढ न झाल्याने त्यांनी या सोयाबीनवर रोटर फिरविले आहे... पावसाअभावी सोयाबीनची योग्य वाढ न झाल्याने आता आपल्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आल्याची माहिती या शेतकऱ्याने दिलीय. रोटर फिरवल्यानंतर शेतात सोयाबीनची दुबार पेरणी करण्यास त्यांनी सुरुवात केली असून, काही भागात पेरणी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
Anchor - शासकीय नोकरी मिळण्यासाठी एका बापाने स्वतःच्या मुलीला विकल्याच्या प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. पतीने घरातून काढून दिलेल्या आईला 8 वर्षांनंतर बाब कळाली. एन जी ओ ने या प्रकरणात निराधार असलेल्या महिलेला मदत केली. अखेर आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करताहेत.
Vo - शासकीय नोकरीसाठी बापाने आपल्या पोटच्या मुलीला विकल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. नांदेडमधील सुरेखा ह्या महिलेचा 2009 साली गजानन वांजरखेडे याच्याशी विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. दरम्यान 2011 साली वांजरखेडे यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याने गजानन वांजरखेडे यांना अनुकंपा तत्वावर 2018 मध्ये हिंगोली येथिल दुय्यम उनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती. नोकरीसाठी तिसऱ्या आपत्याची अडचण येईल म्हणून एक मुलगी दुसऱ्याला देण्याचा विचार होता. या विषयावरून दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी सुरेखा हिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. तिन्ही मुले पतिकडेच होती. सुरेखा यांनी लोकांच्या घरी धुनी भांडी करून गुजरान केली. आपल्या शुभांगी नावाच्या मुलीला पतीने एका नातेवाईकाला दिल्याची माहिती काही महिन्यापूर्वी सुरेखा यांना समजली. कुठलाही आधार नसणाऱ्या सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्या नंतर त्यांना निराधार महिलांना मदत करणाऱ्या एन जी ओ बद्दल माहिती मिळाली. एन जी ओ च्या टीमने ज्यांच्याकडे मुलगी आहे तिथे संपर्क केला. त्या गावातून मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव दुसऱ्या व्यक्तीचे आढळले. मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव वेगळे होते. एन जी ओ कडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप महिलेने केलाय. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवन्यात यावे आणि पती विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये. पोलीसानी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरनाचा तपास करताहेत.
गल्लीबोळात होणाऱ्या भांडणांना विधिमंडळातील कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचे जाहीर अभिनंदन
बीडच्या परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने लावलेल्या बॅनरची चर्चा
Ac - गल्लीबोळात, चौकात आणि रस्त्यावर होणाऱ्या भांडणांना विधिमंडळात नेऊन त्याला कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचे जाहीर अभिनंदन अशा आशयाचे फलक परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात लावण्यात आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या या बॅनरची चर्चा होत आहे.
दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ आवारात आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळ परिसरातच जोरदार राडा झाला होता.यानंतर लावण्यात आलेला हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे.
भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या कारधा येथील छोटा पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकीसह दोघे वैनगंगा नदीत कोसळले. हा थरारक प्रसंग तिथं असलेले वैनगंगा तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांनी बघितलं. अनिल लांबट आणि प्रशांत कारेमोरे यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून या दोघांनाही लाईफ जॅकेट आणि दोरखंडाच्या माध्यमातून वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रातून बाहेर काढले. सुखराम फसाटे (५५) आणि जितू सपाटे (४५) असं वैनगंगा नदीत दुचाकीसह पडलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही भंडारा जिल्हा दूध संघाचे कर्मचारी असून कारधा येथून ते भंडाऱ्याच्या दिशेनं जात असताना ही घटना घडली.
माढ्याच्या अरण गावातून अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची दगडाने ठेचून हत्या...
कार्तिक बळीराम खंडागळे असं हत्या झालेल्या मुलाच नाव....
15 जुलै रोजी कार्तिक खंडागळे याच शाळेच्या मैदानावरून केले होते अपहरण...
चार दिवसा नंतर कार्तिक खंडागळेचा कालव्यात आज मृतदेह आढळून आला..
हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही...
टेंभुर्णी पोलिस घटनास्थळी दाखल...
Beed News : महादेव मुंडे प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून आता माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.आता या प्रकरणातील आरोपींना एसपीनी तात्काळ अटक करावे अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलीय.या प्रकरणात जे न्याय करणारे ते मुख्यमंत्रीच करणार आहेत.या प्रकरणात मी वारंवार परळी पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांचे सीडीआर मागत असल्याचा पुनरुच्चार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय.
चंदेरी दुनियेतील हिंदी फिल्म सिनेतारका संगीता बिजलानी यांच्या पवना धरणाच्या बँक वॉटर ला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊस मध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम, व टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 7 हजार रुपये किंमतीचा टीव्ही चोरला आहे. या घटनेबाबत मोहम्मद अझहर उद्दीन यांचे पीए मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोहम्मद अजहर उद्दीन यांची पत्नी व अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या मालकीचा तो फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या पाठीमागून चोरट्यांनी प्रवेश करत ग्रील उचकटून आत प्रवेश केला व 57 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे पुढील तपास करत आहेत...
चंदेरी दुनियेतील हिंदी फिल्म सिनेतारका संगीता बिजलानी यांच्या पवना धरणाच्या बँक वॉटर ला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊस मध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम, व टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 7 हजार रुपये किंमतीचा टीव्ही चोरला आहे. या घटनेबाबत मोहम्मद अझहर उद्दीन यांचे पीए मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोहम्मद अजहर उद्दीन यांची पत्नी व अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या मालकीचा तो फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या पाठीमागून चोरट्यांनी प्रवेश करत ग्रील उचकटून आत प्रवेश केला व 57 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे पुढील तपास करत आहेत...
देवस्थान समितीच्या वेबसाईटवर अंबाबाई मंदिराबाबत चुकीची माहिती
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांची पत्रकाद्वारे कबुली
चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती असल्याबाबत आजच देवस्थान समितीला माहिती मिळाली आहे
माहिती अपलोड करणाऱ्याचा शोध घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करणार आहोत
वेबसाईटचं नूतनीकरण सुरू असून लवकरच योग्य आणि अधिकृत माहिती वेबसाईटवर टाकली जाईल
देवस्थान समिती सचिवांचा खुलासा
- मध्य भारतातील सर्वात मोठ्या कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची होणार ‘एसआयटी’ची चौकशी
- बाजार समितीमधील संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी
- नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत, तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सदस्य, संभाजीनगर विभागीय सहनिबंधक सदस्य सचिव म्हणून एसआयटीवर नियुक्त
- एसआयटीने 30 दिवसांच्या आत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश
- कळमना बाजार समितीवर कॅाग्रेस नेते सुनिल केदार गटाची सत्ता आहे
- विधानसभेत भाजप आमदार प्रविण दटके, आशिष देशमुख आणि कृष्णा खोपडे यांनी मागणी केल्यानंतर एसआयटीची घोषणा
Beed News : बीड जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कैद्याजवळ 100 ग्रॅम गांजा आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.. कैद्याने एका बॉलमधून गांजा आणल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह अन्य आरोपी देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी कारागृहात कैद्यामध्ये मारहाणीच्या घटना देखील घडल्या होत्या.. आता तर थेट गांजा आढळून आल्यानं कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाला आहे.
परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलीय परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर तसेच भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे यांची मुंबईमध्ये वरपुडकर यांनी भेट घेतली आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना उधाण आले आहे मागच्या अनेक दिवसांपासून यासंदर्भामध्ये चर्चा सुरू होत्या बावनकुळे यांची भेट घेतल्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते सध्या रुग्णालयात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र भाजपच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी वरपुडकर यांच्या प्रवेशाच्या बातमीला दुजोरा दिला आहे..
काल जी समिती नेमली त्यात काहीही अर्थ बोध होत नाही... त्यामुळे 24 तारखेला राज्यात चक्काजाम होईलच...
या समितीमध्ये कोण आहे, नेमकी कर्जमाफी साठी आहे की उपाययोजना साठी आहे. हेच कळत नाही. फक्त थाथुर माथूर उत्तर आहे तयामुळे महाराष्ट्रभर चक्काजाम होणार..
जोपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही, तारीख सांगितल्या जात तोपर्यंत आमचं आंदोलन ठाम राहणार
दिव्यांगांचं मानधन वाढवलं त्याबद्दल सरकारचं आभार पण तेही फार कमी वाढवलेलं आहे..
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून गोवंशाचे जतन संवर्धन करण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या गोशाळेतील एक धक्कादायक सीसी टीव्ही व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे . या गोशाळेतील मंदिर समितीच्या कर्मचार्यांनी गाईच्या वासराचे एका भांड्यात तोंड घातल्याचे दिसत आहे. वासरू दूध पित नाही म्हणून त्याला आपल्या मांडीत दाबून अन् मान धरून भांड्यात तोंड घातले आहे. यानंतर काही वेळेत आई समोरच त्या वासराने प्राण सोडल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे.
राज्यात हिंदू विचारांचे सरकार असताना व गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतच गोवंश हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मंदिर प्रशासनाकडून समोर आली नसून हा प्रकार 23 एप्रिल रोजी घडला असल्याचे समजते . आता अशा पद्धतीने या गाईच्या वासराबाबत घडलेला धक्कादायक प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
Crime News : भिवंडीत १७ फेब्रुवारी कारवाई साठी गेलेल्या पॉलिसी पथकावर धक्काबुक्की करीत दगडफेक करणाऱ्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह त्याच्या आठ साथीदारांना १७ जुलै रोजी तब्बल पाच महिन्यांनी नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.उमेश गायकवाड ,सचिन साठे,ओम वाघमारे,शुभम परुळेकर,आशिष सरवदे,गौरव उके,परमेश्वर गायकवाड,आशिष मिश्रा उर्फ भैय्या अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील वऱ्हाळ देवी नगर येथील एका पोक्सो कायदयांतर्गत दाखल होत असलेल्या गुन्हयातील आरोपीबाबत माहिती घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार व पोलिस कर्मचारी सुनील शिंदे व अब्दुल तडवी हे पोलिस वाहनासह रात्री अकरा वाजता गेले होते.
त्यावेळी उमेश महेंद्र गायकवाड व त्याच्या २५ ते ३० साथीदारांनी पोलिस पथकास शिवीगाळ करत,धक्काबुक्की करत दगडफेक करुन गंभीर दुखापत करीत पोलीस वाहनाची काच फोडली होती.या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी उमेश गायकवाड व त्याच्या १४ साथीदारां विरोधात दाखल गुन्ह्यात आठ जण फरार होते.या आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
भंडारा: मागील ७० वर्षांपासून शेतीला जाण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या मुलानं अडविला. यातून वाद निर्माण होऊन शेतकरी पुत्राला बेदम मारहाण केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा देव्हाडी गावात घडली. याप्रकरणी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्यामराव पाटील आणि त्यांचा मुलगा रविंद्र पाटील यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असताना आणि ज्यांनी हा मार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला त्यांची या रस्त्यावर शेती नाही, हे विशेष. हेतुपुरस्सर रस्ता अडविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल होत आहे.
देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या जेलरोड येथील घरी चोरी
घरातील मोलकरणीने कपाटातून चोरले एक लाख रुपये
नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल, मोलकरणीला अटक..
याच मोलकरणीने वेळोवेळी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड
सरोज अहिरे यांच्या कुटुंबियांनी पाळत ठेवल्याने लक्ष्यात आला चोरीचा प्रकार
सरोज अहिरे विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनात असताना मोलकरीण ने केला हातसाफ
रत्नागिरी :
दापोली मधील बुरोंडी गावातील पूल वाहून गेल्यामुळे करजगाव आणि बुरोंडी या गावांचा संपर्क तुटला.
अर्धवट पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय. वळसा मारून पर्यायी मार्गाचा करावा लागत आहे वापर.
पूल वाहून गेल्यामुळे गावाला पाणी टंचाईची समस्या.
दापोली मधील बुरोंडी गावातली घटना.
मुसळधार पावसात वाहून गेला होता पूल.
राज्याचा जन्मदर कमी झाला असून ही चिंताजनक बाब आहे. जन्मदर कमी होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे लग्नाळू मुलांना मुली न मिळणे. बेरोजगारीमुळे मुलांची लग्न होत नाही आणि त्यामुळे अशा लग्नाळू मुलांना शासनाने 11 लाख रुपये आर्थिक मदत करून मुलांची लग्न लावून द्यावीत अशी अजब मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.
- प्रोबेशनवर असलेल्या अधिपरिचारिका संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार
- राज्य सरकारच्या वैद्यकीय संचनालायचा इशारा
- परिचरिकांच्या राज्यव्यापी संप सुरू असताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जारी केलं पत्र
- सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी आणि इतर मागण्या संदर्भात शासकीय रुग्णालयातील परिचरिकांचा 18 जुलै पासून बेमुदत संप सुरू आहे
- या संपात प्रोबेशनवर (परिविक्षा) असलेल्या अधिपरिचरिका सहभागी झाल्या आहेत
- शासन नियमानुसार अधिपरिचारिका पदाकरिता 2 वर्षांचा परिविक्षा (प्रोबेशन) कालावधी लागू राहतो
- त्यामुळे ज्या प्रोबेशनवर असलेल्या परिचारिका या संपात सहभागी असल्याचे निदर्शनास येणार त्यांची सेवा विना चौकशी समाप्त करण्याचा इशारा देण्यात आलाय
Beed Crime : बीडमध्ये मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करत, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कायम सुरू आहे. बहिरवाडी परिसरात एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होतोय. आकाश माने या तरुणाला फरार आरोपींकडून मारहाण करण्यात आली. मारहाणीचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.. परंतु काही केल्या बीड मधील मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये.. पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. मात्र सतत काही ना काही कारणास्तव मारहाण होणे आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करणे हा ट्रेंड बनल्याचे दिसून येतंय..
उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी आठ वाजता प्रसारित होणार, राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चा, मनपा निवडणूक, लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंचं भाष्य
अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील नामदेव बळीराम दहीकर (35) याने भावाशी वाद करत प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी नामदेव दहीकर यास परतवाडा पोलिस तपासा करीता घटनास्थळी गेले असता नामदेव पोलिसांना चकमा देत फरार झाला.
वृक्ष लागवड मोहीम म्हटल की जुन्या खड्ड्यात नवी झाडे. हा कित्ता आपल्याला पहायला मिळतो. अनेक योजना राबवल्या जातात मात्र झाडे कुठे जातात हे कळत नाही. धाराशिवमध्ये आज चोवीस तासात पंधरा लाख झाडे लावली जाणार आहेत. मियावाकी पद्धतीने घणवृक्ष लागवड केली जाणार आहे. मात्र त्यासाठी भेंडी, सदाफुली, गुलाब, तुती, शेवगा ही झाडेही निवडण्यात आलीत. त्यामुळे वृक्ष लागवड मोहीम चर्चेत आलीय. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून मोहीम राबवली जातेय. त्यामुळे एका दिवसातील वृक्ष लागवडीचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठीची ही धडपड सुरू आहे का हा प्रश्न आहे. जैवविविधतेसाठी हे वृक्ष लावले जात असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कुरथडी येथे सरस्वती इंटरनॅशनल स्कूल आहे हे शाळेला लागूनच या विद्यार्थ्यांचे वस्तीग्रह आहे आदिवासी विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये शासनाच्या वतीने मोफत राहणे आणि खाजगी शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण दिले जातं या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि हॉस्टेलच्या बदल्यात संबंधित संस्था आदिवासी विभागाकडून करोडो रुपयांचे देयके मंजूर करून घेत असते परंतु याच शाळेतील 70 विद्यार्थ्यांना आता खरूजेची लागण झाली आहे यामुळे लहान लहान मुले चांगलेच हैराण झाले आहेत सातत्याने अंग खाजत असल्याने मुलांचे शाळेतही मन लागत नाही या मुलांना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...