- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live: रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; रेड अलर्ट जारी, सहा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.
पार्श्वभूमी
Raigad Rain: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर...More
रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात 98.01 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे.या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा, नागोठणे, पाली,म्हसळा,महाड मधील भागाला बसला. काही भागांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल होत तर मुंबई गोवा महामार्गासहित इतर राज्य मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प पडली होती. सहा तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली होती.जिल्ह्यातील प्रामुख्याने पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सुध्दा धोका पातळीपर्यंत पोहचल्या आहेत त्यामुळे आता जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या काही तासात पुन्हा हा जोर वाढला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
Anc - पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्यावर घोडेगाव शहरानजीक खासगी प्रवासी बस व मोटारसायक मध्ये झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल वरील तीन युवकांचा जाग्यावरच मृत्यू झाला आहे.
Vo - उत्तर प्रदेश पासिंगची खासगी प्रवासी बस ही भीमाशंकर च्या दिशेने जात होती तर मोटारसायकल घोडेगाव वरून मंचरच्या दिशेने जात असताना घोडेगाव शहरानजीक असणाऱ्या पळसटीका फाट्यावर बस व मोटार सायकल ची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बसने मोटर सायकलला काही अंतर फरफटत नेले असून मोटार सायकल चा अक्षरशा चेंदामेंदा झालाय. या भीषण अपघातात मोटार सायकल वरून प्रवास करणारे आंबेगाव तालुक्याच्या कोळवाडी गावातील अथर्व खमसे, गणेश असवले, भारत वाजे या तीन युवकांचा जाग्यावरच मृत्यू झालाय.
रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले, आदिवासी विकास भवनच्या बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात...
आंदोलन आक्रमक झाल्यामुळे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस सुरक्षित बाहेर काढत आहे
अँकर:
महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचे गेल्या सात दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास भवनच्या बाहेर बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. सात दिवसांपासून आंदोलन आदिवासी विकास भवनाच्या बाहेर आंदोलनाला बसले आहे संबंधित अधिकारी आंदोलकांशी चर्चा करत नाही त्यामुळे आज आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ बाचाबाची झाली आणि त्यामुळे पोलिसांना देखील सौम्यबळाचा वापर करावा लागला. आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी आंदोलक प्रयत्न करत आहे. आदिवासी विकास भवनाच्या परिसरात पोलिसांनी बॅरिगेटिंग केली असून बॅरिगेटिंगवर चढून आंदोलक कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे आदिवासी विकास भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस सुरक्षित कार्यालयाच्या बाहेर काढत आहे
Kolh breaking
इटालियन कंपनी प्राडाचे शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये दाखल
महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासोबत होणार बैठक
कोल्हापुरी चप्पलच्या मुद्द्यावरून राज्यात उडाला होता गोंधळ
कोल्हापुरातील कारागिरांचे करार करण्यास प्राडा दाखवली सकारात्मकता
चार व्यक्तींच्या शिष्टमंडळात कंपनीचे एक संचालक, एक मॅनेजर आणि दोन सल्लागार यांचा समावेश
जलसंपदा विभागाचे पंप स्टोरेज क्षेत्रात मोठे करार
एकूण 31,955 कोटींचे करार
6 हजार 450 मेगावॉट वीजनिर्मितीचे करार
15 हजार रोजगार निर्माण होणार
ग्रीनको MH01 IREP लि. : 2 हजार मेगावॉट, 9 हजार 600 कोटींची गुंतवणूक, 6 हजार रोजगार (छत्रपती संभाजीनगर)
ऋत्विक कोल्हापूर PSP लि. : 1 हजार 200 मेगावॉट, 7 हजार 405 कोटींची गुंतवणूक, 2 हजार 600 रोजगार (कोल्हापूर)
अदानी हायड्रो एनर्जी : 1 हजार 500 मेगावॉट, 8 हजार 250 कोटींची गुंतवणूक, 4 हजार 800 रोजगार (अमरावती)
वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा लि.: 1 हजार 700 मेगावॉट, 6 हजार 700 कोटींची गुंतवणूक, 1 हजार 600 रोजगार (रत्नागिरी)
पंप स्टोरेज क्षेत्रात आतापर्यंत एकूण 20 सस्थांशी 50 करार.
यातून 68,815 मेगावॉट वीजनिर्मिती होणार
आतापर्यंत एकूण 3,42,684 कोटींची गुंतवणूक
यातून 1,11,490 रोजगार निर्मिती होणार
जलसंपदा विभागाचे पंप स्टोरेज क्षेत्रात मोठे करार
एकूण 31,955 कोटींचे करार
6 हजार 450 मेगावॉट वीजनिर्मितीचे करार
15 हजार रोजगार निर्माण होणार
ग्रीनको MH01 IREP लि. : 2 हजार मेगावॉट, 9 हजार 600 कोटींची गुंतवणूक, 6 हजार रोजगार (छत्रपती संभाजीनगर)
ऋत्विक कोल्हापूर PSP लि. : 1 हजार 200 मेगावॉट, 7 हजार 405 कोटींची गुंतवणूक, 2 हजार 600 रोजगार (कोल्हापूर)
अदानी हायड्रो एनर्जी : 1 हजार 500 मेगावॉट, 8 हजार 250 कोटींची गुंतवणूक, 4 हजार 800 रोजगार (अमरावती)
वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा लि.: 1 हजार 700 मेगावॉट, 6 हजार 700 कोटींची गुंतवणूक, 1 हजार 600 रोजगार (रत्नागिरी)
पंप स्टोरेज क्षेत्रात आतापर्यंत एकूण 20 सस्थांशी 50 करार.
यातून 68,815 मेगावॉट वीजनिर्मिती होणार
आतापर्यंत एकूण 3,42,684 कोटींची गुंतवणूक
यातून 1,11,490 रोजगार निर्मिती होणार
बीड:मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा झालेल्या नारायणगडावर आर्थिक गैरव्यवहार..! महंत शिवाजी महाराजांचा ट्रस्टवरच्या दोन पदाधिकाऱ्यांवर थेट आरोप...!
Anc:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडावर भव्य स्वरूपात पार पडला होता. त्यानंतर नारायण गडाची राज्यात चर्चा झाली. आता याच नारायण गडावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय..
ट्रस्टचे पदाधिकारी बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महाराजांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी केली. मला प्रचंड नाहक त्रास दिला. मी अस्वस्थ झालो होतो. दोन दोन दिवस या तणावात असताना मी जेवण देखील केले नाही. गडावर पंचवीस कोटीच्या विकास कामाचा आराखडा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधी दिवंगत नेते विनायक मेटे यांनी आणला होता. आणि याचेच टेंडर आम्हाला द्या. म्हणून या दोन पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यांना टेंडर मिळालं नाही म्हणून यास दोन पदाधिकाऱ्यांनी गडाची बदनामी करत कोर्टात चुकीची माहिती दिली. असा आरोप देखील महंत शिवाजी महाराजांनी केला आहे.
बाईट: महंत शिवाजीमहाराज, नारायणगड
दरम्यान या संपूर्ण गंभीर आरोपावर ट्रस्टचे सदस्य बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. या उलट महंत शिवाजी महाराजांनी ते टेंडर कोणाला दिले याचे सर्व पुरावे व्हिडिओ ऑडिओ यासह आम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा ट्रस्टीचे सदस्य बळीराम गवते यांनी केला आहे.
बाईट: बळीराम गवते - आरोप झालेले सदस्य
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण गडावरच आता जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यानंतर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. आता या गैर व्यवहार प्रकरणात नेमकी काय चौकशी होईल याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे..
प्रकाश माहजन टिटी
एक्सकलुसिव्ह.
पक्षाच्या निष्कर्षामध्ये प्रवक्त्यांना बोलावलं नाही.
इतर प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे इतर पदांची जबाबदारी असेल माझ्याकडे नाही त्यामुळे मला निमंत्रण आलं नाही पक्षाचा निर्णय आहे कुणाला बोलवा व कुणाला नाही
हा माझ्यासाठी दुर्दैवी क्षण आहे काय बोलणार
घरच्या लोकांसमोर तोंड राहिला नाही. ठीक आहे मला फार काही बोलायचं नाही..
मी इतर कुणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान आणि गर्व वाटेल असंच काम मी केलं. प्रवक्ता म्हणून केल. भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता
मी ठरवलंय मी देव बदलणार नाही देवानं बोलवल्याशिवाय जाणार नाही.
मी कुणावर नाराज नाही आपलं नशीब आपलं भांडण नशीब अशी असेल तर हार होते
दोन भावाचे एकही प्रकरणाचा वक्तव्य पक्ष श्रेष्ठ नसेल त्याची माफी मी नेत्याकडे मागितली आहे
राणे ज्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही
माझ्या परिवाराला धमक्याचे फोन येत होते. परिवार अस्वस्थ होता. एक तर मी नारायण राणेंची माफी मागावी किंवा त्याच्याविरुद्ध लढावं मी दुसऱ्या पर्यायाला निवडलं.
परंतू मला पक्षातल्या कोणीही जेष्ठ व्यक्तीने जाहीर बाजू मांडली नाही.
खूप वाईट वाटलं पण मी तेही विसरून कुटुंब एकत्र यावं ही भूमिका घेतली.
दोन भाऊ एकत्र आले ना माझा फायदा काय आणि नुकसान काय भाऊ नसण्याचं काय दुःख आहे हे मला माहीत होतं ते एकत्र यावी ही मी भावना बोलून दाखवली चुकली असेल *पण पक्षात दिवाळी आणि माझ्या घरात आणणार आहे
माझं बोलणं माझं मीडियातला वावर ना मला त्रासदायक ठरलं
मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे आम्ही ती कोई बात...
माझी आता भावना झाली आता बस झालं आपल्याला घरातच ताण नाही तर इतर काय मिळणार
अशा पद्धतीने पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडाने पक्षाची बाजू मांडून(डोळ्यात पाणी रडले)
फेसबुक वर प्रतिक्रिया येतात याला पक्षातच किंमत नाही कुठला करायत्री आहे प्रवक्त्याला बोलावलं नाही.
नसलेल्या आरोप माझ्यावर टाकले जातात .मी गेल्या तीन चार दिवस अस्वस्थ आहे.
नागपूरमध्ये १६ वर्षीय ख्वाहिश नागरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली 'मला माफ करा आई-बाबा, मी हे सहन करू शकणार नाही.. असे सुसाईड नोट मध्ये लिहून केली आत्महत्या...
अँकर- नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. ज्याने संपूर्ण नागपूरला हादरवून टाकले आहे. ही बातमी लाखो पालकांसाठी एक कटू सत्य आहे जे त्यांच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या मुलांवर लादतात. १६ वर्षीय ख्वाहिश देवराम नागरे या विद्यार्थ्याने काल आपले जीवन संपवले. ख्वाहिशने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी, ख्वाहिशने तिच्या पालकांसाठी एक भावनिक आणि हृदयस्पर्शी सुसाईड नोट सोडली. ही नोंद प्रत्येक पालकांसाठी एक इशारा आहे ज्यांना वाटते की त्यांची मुले सर्व प्रकारच्या दबावांना तोंड देऊ शकतात. खाईश ने चिठ्ठीत लिहिले , "सॉरी आई-बाबा, मी हे करू शकणार नाही... मी दीड आठवड्यापासून विचार करत होतो की मी हे करू शकणार नाही... माफ करा... आणि मला सर्व काही वेळेवर दिल्याबद्दल धन्यवाद... मी तुला खूप प्रेम करते आई-बाबा... पण तेवढे पुरे झाले... मी आता ते करू शकत नाही... तुमची शेवटची भेट घ्यायची इच्छा होती मात्र भेटता येणार नाही, दीदी ची काळजी घ्या बाय..." खाईश ला नुकतेच त्याच्या पालकांनी नीट च्या तयारीसाठी बालाघाट वरून नागपूरला पाठवले होते. तो हिलटॉप भागातील हॉस्टेलवाला या वसतिगृहत राहायला होता. या घटनेने नंतर पोलिसांनी देखील पालकांना आपल्या पाल्यावर जबाबदारीचे ओझे न टाकण्याचे अवाहन केले
रायगड पाऊस अपडेट
सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने महाड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले त्यामुळे महाड तालुक्यात सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे ही नदी आता दुथडी भरून वाहू लागल्यामुळे महाड तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.2021 मध्ये याच सावित्री नदीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण महाड शहराला घेराव घातला होता. त्यामुळे सतर्क म्हणून महाड करांना सावधानतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सावित्री नदीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याने ज्या पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या नद्या आहेत त्या आंबा, कुंडलिका आणि सावित्री नदी या धोका पातळीपर्यंत पोहचल्या आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सध्या पावसाने उघडीप घेतली असली तरी पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे पाहुयात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची ७ वर्षांची कारकीर्द
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष
२०१८ साली पक्षाच्या प्रगतीच्या काळात अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली
पदभार हाती घेताच सर्वात आधी महाराष्ट्राचा दौरा केला. राज्यभरात पक्षाची परिस्थिती काय आहे याची माहिती घेतली. विविध कार्यक्रम देऊन संघटनेला कार्यरत ठेवण्याचे काम या कालखंडात केले.
२०१८ च्या शेवटापर्यंत परिस्थिती प्रचंड बदलेली होती. अनेक जण पक्ष सोडून जात होते. २०१९ च्या तोंडावर लोकसभा निवडणुका लागल्या होत्या. या परिस्थितीत आम्ही हार मानली नाही. लढत राहिले, नवे लोक पक्षाशी जोडत राहिले.
डॉ. अमोल कोल्हे सारखे नेते पक्षात आणण्यात यश मिळाले
२०१९ लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ४ जागा निवडून आल्या. बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर… हे अपयश पचवून पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागले…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवस्वराज्य यात्रा - १ काढली, शिवनेरीला नतमस्तक होऊन काढलेल्या या यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.
पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती
पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला.. शिव स्वराज्य यात्रा स्थगित करून लोकांच्या मदतीला धावले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना निर्देश होते की जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता प्रत्येकाच्या मदतीला धावा, परिस्थिती सावरण्याची जबाबदारी ही आपली आहे.
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले…तब्बल ५४ जागा निवडून आल्या…
शरद पवार यांच्या किमयेने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत परतले. महाविकास आघाडीत जलसंपदा मंत्री म्हणून काम केले.
सत्तेत आलो म्हणून शांत बसले नाही तर विविध उपक्रम राबविले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय
२०२० साली राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा ऑनलाइन उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांना थेट पवार साहेबांशी जोडून दिले. जवळपास ८ लाख कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय नोंदवला.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा
२०२१ साली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात गेले. चांद्यापासून बांद्यापर्यंत गेले. भाषणे न करता तेथील पदाधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
एक तास राष्ट्रवादी साठी
२०२२ साली परिवार संवाद यात्रेची सांगता सभा कोल्हापूरच्या तपोवन मैदानात पार पडली, त्या सभेला संकल्प सभा नाव देण्यात आले. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंबर एकचा पक्ष बनवण्याचा संकल्प केला. त्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी महापुरुषांच्या विचारांसाठी हा उपक्रम हाती घेतला..
शेतकरी आक्रोश मोर्चा
राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण ठिकठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चे काढले.
निष्ठावंत संवाद दौरा
२०२३ साली पक्ष फुटला. त्यावेळी पवारांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत संवाद दौरा काढण्यात आला.
टू द पॉईंट
पक्षात जी फुट निर्माण झाली ती सांगण्यासाठी ‘टू द पॉईंट’ ही पॉडकास्ट सिरीज सुरू केली. डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शरद पवार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आणि लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडली.
लोकसभेत १० पैकी ८ जागा मिळवून घवघवीत यश मिळवले
स्वाभिमान सभा
लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रत्येक भागात स्वाभिमान सभा घेतली. बीड, येवला, जळगाव ठिकठिकाणी या सभा घेत पक्षाने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली.
‘विजय निश्चय दौरा’ आखला
या दौऱ्याच्या माध्यमातून कोणता लोकसभा मतदारसंघ आपण लढवला पाहिजे, उमेदवार कोण असू शकतो, आपले सैन्य खाली किती तयार आहेत? काय काय सुधारणा आमदारांनी व तेथील उमेदवारांनी केली पाहिजे याची चाचपणी केली आणि त्यानुसार व्युहरचना आखली.
विधानसभा निवडणुकीचा पराभव
सोलापूर ब्रेकिंग
--
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात आरोपीवर कठोर करावाई करण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर विमानतळ येथे आले असता संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम कदम आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
दरम्यान या प्रकरणात दोन्ही सभागृहात चर्चा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उत्तर दिलेत
या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई होईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आश्वासन
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधनाचे काम पूर्ण करण्यासाठी २६ कोटी रुपये लवकरच देऊ
सोबतच, कॅबिनेट दर्जा आणि संशोधन केंद्राच्या कार्यालयासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेऊ
अधिवेशन संपण्याआधी आम्ही हा विषय निकालात काढू
मंत्री भरत गोगावले यांच्याकडून लक्ष्यवेधी दरम्यान आश्वासन
Raigad Fort : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ले रायगडच्या पायऱ्या मार्गाने होणारा प्रवेश पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे,पावसाळी ऋतूमध्ये दरडी कोसळण्याची, आणि या पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून घेण्यात आला आहे.
नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फाहिम खानला जमीन मिळाल्यानंतर तो आज कारागृहातून बाहेर येणार आहे.
बाहेर येताच त्याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले...
प्रतिबंधात्मक कारवाई साठी ताब्यात ताब्यात घेतले असून नंतर सोडून दिले जाणार असल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवार नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला होता.
चंद्रपूर : शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त संचालक रवींद्र शिंदे यांचा लवकरच भाजपात प्रवेश... भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार त्यांचा मुंबईत प्रवेश, रवींद्र शिंदे यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता, रवींद्र शिंदे आतापर्यंत चार वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून आले आहेत निवडून, बँकेच्या राजकारणात किंगमेकर अशी त्यांची आहे ओळख, विशेष म्हणजे यावेळी मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 21 पैकी 9 भाजप समर्थक संचालक आले आहेत निवडून, काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संचालक आले आहेत निवडून, रवींद्र शिंदे यांच्याकडे स्वतःचे 4 ते 5 संचालक असल्याने भाजप त्यांना अध्यक्ष पद देऊन बँकेवर पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष बसवणार, भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या खेळीने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पहिल्यांदाच फडकणार भाजपचा झेंडा
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड शाईफेक आणि हल्ला प्रकरणी गुन्ह्यात आणखी तीन आरोपी वाढले
रवींद्र उर्फ लल्या लेंगरे, अक्षय चव्हाण, अनिल माने हे तिघांचा देखील आरोपी म्हणून गुन्ह्यात समावेश
धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी रवींद्र उर्फ लल्या लेंगरे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखलं असून तो परोलवर तुरुंगाबाहेर असल्याची माहिती
त्यामुळे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्लाप्रकरणतील एकूण आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली
यातील दोन आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे हे दोघे अटकेत असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
उर्वरित 8 आरोपी फरार असून सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून त्यांचा शोध सुरूय दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची देखील शक्यता
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात महत्त्वाची घडामोड
अल्पवयीन आरोपीविरुद्ध प्रौढ म्हणून खटला चालवण्यास न्यायालयाचा नकार
पुण्यातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध प्रौढ म्हणून खटला चालवण्याची परवानगी मागणारा अर्ज बाल न्यायालयात सादर केला होता.
मात्र, या अर्जाला आज बाल न्यायालयाने नकार दिला अर्ज फेटाळला आहे
त्यामुळे आता संबंधित अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल करता येणार नाही.
या निर्णयामुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली असून, त्यांना उशिरा धावणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वाहतूक व्यवस्थेवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी घोषणांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी
मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
सोबतच, वाऱ्यांचा देखील वेग अधिक राहण्याचा इशारा
ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी
तिन्ही जिल्ह्यात काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता
पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी
नवी मुंबईत पावसाला जोरदार सुरवात
सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाचा वेग वाढला
वाशी , ऐरोली , सीबीडी भागात पावसाचा जोर
मुसळधार पावूस लागून राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
- प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपी दिपक काटे याला कोर्टात आणलं
- थोड्याच वेळात कोर्टात सुनावणीला होणार सुरुवात
- अक्कलकोट तालुका प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम एम कल्याणकर यांच्या कोर्टात हजर केले जाणार
- सरकारी पक्षातर्फे श्रीमती. आर आर कांबळे बाजू मांडणार
- दिपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं
सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार सुरू झालीय. चांदोली धरण परिसरात देखील पावसाचा पून्हा जोर वाढला आहे. तसेच जिल्ह्यात सर्वदृर उसंत घेतलेल्या पावसाचे पुन्हा संततधार सुरू झालीय. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये कालपासून पावसाचे संततधार चालू झाले आहे. या भागात 24 तासात 53 मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे.
Parbhani News : परभणी शहरांमध्ये मोकाट कुत्र्याचा अक्षरशः हैदोस पाहायला मिळत आहे ठीक ठिकाणी हे मोकाट कुत्रे रस्ता फिरताना दिसत आहेत दुसरीकडे शहरातील नागराज कॉर्नर परिसर आणि गोल घुमट परिसरात मोकाट कुत्र्यानी एका महिलेला चांगलाच चावा घेतला आहे तर ह्यात एका लहान मुलावर ही कुत्र्यानी हल्ला करत हाताला आणि कानाला चावा घेतला आहे या दोघांना ही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.परभणी शहरात मोकाट कुत्र्याची सख्या वाढली आहे मात्र या कडे महानगर पालिका जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे का ? असा सवाल नागरिकांना पडला आहे याच दुर्लक्षा मुळे हे मोकाट कुत्रे नागरिकाच्या जीवावर उठले आहेत तर या घटने नंतर नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे तरी लवकरात लवकर नगरपालिकाने मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीकाठच्या नीरा शहरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आगमन आज सकाळी नऊ वाजता झाले. तत्पूर्वी नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना परतीचा स्नान घालण्यात आलं. माऊली माऊलीचा गजर करत वरूनराजाच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आलं. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते. माऊलींच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापुढे आणि रथा मागे चालणाऱ्या वारकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणी माऊलींच्या पादुका नेऊन त्यांना स्पर्श दर्शन देण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी या वारकऱ्यांना या स्पर्श दर्शनाचा लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे वारकऱ्यांनी माऊलींचा रथ अडवला होता. मात्र यावर्षी कोणताही वाद-विवाद तंटा न होता वारकऱ्यांना माऊलींचा स्पर्श दर्शन मिळाले आणि वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.यानंतर हा पालखी सोहळा विसाव्यासाठी निरा येथील विठ्ठल मंदिरात विसावला आहे.
Mumbai Rain: सकाळपासून सुरू असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला देखील मोठा फटका बसलाय. मुंबई गोवा महामार्गाजवळील नागोठणे कोलाड खांब परिसरात खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने याचा वाहतूक कोंडीवरमोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. या परिसरात वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्यात त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mumbai Rain: मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली कडून वांद्रे च्या दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रुज विलेपार्ला अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
अर्धा ते एक तासाच्या प्रवास मात्र वाहन चालकांना या वाहतूक कोंडीमुळे दीड ते दोन तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे.
वाहतूक कोंडी सोडवायचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
विधानसभेत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून खडाजंगी
समितीत भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदारांचा आरोप
समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची केली मागणी
आमदार प्रविण दटके व कृष्णा खोपडे यांची मागणी
पणन मंत्री जयकुमार रावल यांकडून कारवाई करण्याचे आश्वासन
सीएसएमटी स्थानकाजवळ डबल डेकर बसला आग
सीएसएमटीकडून मंत्रालयाकडे जात असलेल्या डबल डेकर बसला आग
आग लागताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
प्रवासी घाबरुन खाली उतरले
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून लगेच घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून या घटनेमुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती
पुण्यात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण
पुण्यातील तळजाई टेकडीवर पोलीस भरतीची मैदानी सराव करत होते विद्यार्थी
विद्यार्थ्यांमध्ये मुलां व मुलींचा समावेश
सराव करत असताना दहा ते बारा गाव गुंडांनी केली मारहाण
काही मुलांना मारहाण करत तुमची लायकी नाही पोलीस होण्याची असं म्हणत मारहाण करण्यात आली
पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोलीस भरतीचे शिक्षक व मुले- मुली सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील काही गावांमध्ये रोज मजुरी करणाऱ्या मजुरांचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडून त्यात तीन महिन्यांत शेकडो कोटींची उलाढाल झाली आहे. या प्रकरणात बँकेचे अधिकारी व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असून हा पैसा सट्टा बाजारातील असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक भाजप आमदार राजू तोडसाम यांनी केला आहे. याप्रकरणी आता विधिमंडळात आवाज उठवल्या जाणार असल्याचेही राजू तोडसाम यांनी सांगितले. पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झालेली ही उलाढाल काळा पैसा पांढरा करण्यासाठी झाल्याचा त्यांचा आरोप आहे.दरम्यान याप्रकरणी मयूर चव्हाण आणि मनोहर राठोड यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
पुण्यातील 'बघतोय रिक्षावाला' संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सांगवीत अडवलं…
मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी जाण्यासाठी निघाले होते
मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार होते.
ई-बाइक टॅक्सीला दिलेली परवानगी, रिक्षा आणि टॅक्सीसाठी मीटरनुसार दर लागू करूनही कंपन्यांकडून ते अॅपवर प्रदर्शित केले जात नसल्यामुळे प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होतात. त्यामुळे अॅपंमध्ये ते दर लागू करा , या मागणी साठी मुंबईत जाण्यासाठी निघाले मात्र त्यांना पोलिसांनी सांगवी येथे अडवलं आहे. राज्य सरकारने ई-बाइक टॅक्सीला परवानगी दिल्यामुळे रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने ई-बाइक टॅक्सीला दिलेली परवानगी रद्द करावी. रिक्षा व टॅक्सीसाठी ॲप आधारित सेवा देणाऱ्या कंपन्या दर अॅपवर स्पष्टपणे दाखवत नाहीत. यामुळे प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे. यापूर्वी कंपन्यांना अनेकदा निवेदन दिले, मात्र कंपन्यांनी दखल न घेतल्याने आता परिवहन विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
पुण्यातील जांभुळकर चौकात लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर पहाटे दरोडा..
विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरात घुसून दरोडेखोराने 40 तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख रक्कम पळवली..
पहाटे अडीच ते तीन च्या सुमारास जांभुळकर चौकात असलेल्या कौशल्या बंगल्यात हा दरोडा पडला.
विंग कमांडर वीरेंद्र कुमार हे आपल्या कौशल्या बंगल्यात झोपले असताना दोन अज्ञात इसम घरात घुसले थेट बेडरूम मध्ये घुसून विंग कमांडर यांच्या तोंडावर हात ठेवला आणि त्यांना उठवले दोन्ही चोरट्याने सोने कुठे अशी विचारणा केली आणि जरा सुद्धा हलू नका असा त्याला दम दिला त्यांच्या हातामध्ये हातोडी हेक्सा ब्लेड टाईप चे रॉड होते..
कमांडर ची झटपट करत चोरट्याने कपाटाची चावी मागितली आणि कपाटात असलेले तब्बल 40 तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये पळवल..
लष्कराच्या विंग कमांडर वरतीच दरोडा पडल्याने शहरात खळबळ..
वर्धा: वर्ध्याच्या आर्वी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात विविध झाडावर बसणाऱ्या पोपटांचा अचानक मृत्यू झालाय. झाडावरील पोपटाचा अचानक एका मागून एक खाली पडत मृत्यू झाला. अचानक पन्नासहून अधिक पोपटांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केल्या जात आहे. फवारणीनंतर खाल्लेल्या अन्नातून पोपटाना विषबाधा झाल्याची बाब समोर आली आहे. आर्वी वन विभागाने याची नोंद घेतली आहेय.
मतदार याद्या भगवत गीता समजून काम करा - एकनाथ शिंदे
शिवसेनेची निवडणूक सज्जता मोहिम निवडणूकांसाठी विशेष मोबाईल ॲप्लिकेशन तयार
पुढील आठवड्यापासून शिवसेनेची जिल्हानिहाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिरं होणार
बोगस मतदार शोधण्यासाठी राबवली जाणार मोहीम
लोकसभेला अनेक बोगस मतदार घुसविल्याचा आणि शिवसेनेचे हक्काचे मतदार वगळल्याचा फटका शिवसेनेला बसला होता.
त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि विजयाची स्ट्रॅटर्जी ठरविण्यासाठी शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग.
भंडारा : घराच्या अंगणात खेड्यात असलेल्या बालिकेवर मुंगसानं हल्ला करून तिला जखमी केलं. बालिकेला चावा घेऊन जखमी केल्याची बाब लक्षात येतात आजी आणि काकूनं तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता या मुंगसानं त्यांच्यावरही हल्ला करून त्यांनाही जखमी केलं. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगावं ईथं काल सायंकाळी घडली. ऋत्वी राऊत असं दोन वर्षीय बालिकेसह मीना राऊत (६०) आणि ममता राऊत असं जखमींचं नावं आहे. या तिघींवर कुडेगावं येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहे. मागील आठवड्यातही याच गावातील दोघांना मुंगसानं हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती.
बहुचर्चित टेस्टला गाडीचं आज भारतात पदार्पण
मॉडेल वाय इलेक्ट्रिक एसयूव्हीच आज ग्रंड ओपनिंग
टेस्लाच्या वांद्रे कुर्ला संकुलातील पहिल्या शोरुममधून होणार मॉडेल Y लाँच
वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्समधील टेस्टला एक्सपीरियंस सेंटरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही वेळातच होणार उद्घाटन
मॉडेल व्हायची दोन व्हेरिएंट लॉन्च होणार असून त्यातील RWD व्हेरिएंटची फुल चार्जवर रेंज 574 किलोमीटर असेल तर अवघ्या ५.४ सेकंदात ही गाडी ० ते ९६ किलोमीटर प्रति तास वेग पकडण्याची क्षमता ठेवते
AWD व्हेरिएंटची रेंज ५२६ किलोमीटर असून शून्यापासून 96 किलोमीटर प्रति तास वेग गाठण्यासाठी मॉडेल व्हायला अवघे ४.६ सेकंद लागतील
दोन्ही गाड्यांचा उच्चतम वेग तब्बल 200 किलोमीटर प्रति तास असेल
शांघायच्या गिगा फॅक्टरीत टेस्ला मॉडेल Y च उत्पादन करण्यात आलं आहे
Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारनंतर काहीसा सरींवरती सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपासून जोरदार कोसळतोय. अर्थात या पावसाचा जनजीवनावरती कोणताही मोठा परिणाम अद्याप तरी झालेला नाही. पण एकंदरीत वातावरण, हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज पाहता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून पावसाचा कमी झालेले प्रमाण यामुळे भात शेती उत्पादक शेतकरी काहीसा चिंतेत होता. पण कालपासून पुन्हा एकदा पाऊस कोसळु लागला आहे.
Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारनंतर काहीसा सरींवरती सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपासून जोरदार कोसळतोय. अर्थात या पावसाचा जनजीवनावरती कोणताही मोठा परिणाम अद्याप तरी झालेला नाही. पण एकंदरीत वातावरण, हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज पाहता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून पावसाचा कमी झालेले प्रमाण यामुळे भात शेती उत्पादक शेतकरी काहीसा चिंतेत होता. पण कालपासून पुन्हा एकदा पाऊस कोसळु लागला आहे.
भंडारा: हॉस्पिटल, बँक आणि वर्दळीच्या ठिकाणावरील नागरिकांची नजर चुकवून एक नव्हे तर, तब्बल १९ दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भंडारा पोलिसांनी केली अटक असून फरार असलेल्या अन्य एकाचा शोध पोलीस घेत आहेत. सोनू ऊके आणि नितीन खोब्रागडे असं पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं आहे. तर, प्रवीण कंगाले असं फरार असलेल्या आरोपीचा आता पोलीस शोध घेत आहे. या सर्व दुचाकी भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणा हद्दीसह नागपूर जिल्ह्यातून चोरल्याची कबुली दोघांनी पोलीसांना दिली.
- प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणाऱ्या आरोपींवर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला
- आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक करण्यात आली
- बीएनएस कलम 118 हे कलम वाढवण्यात आले
- आरोपींना अक्कलकोट कोर्टामध्ये हजर करण्यात येणार
- घातक शस्त्र किंवा वस्तुने एखाद्यास गंभीर दुखापत केल्याचे कलम वाढवण्यात आले
- अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्याच्या 7 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
- यापूर्वी बी एन एस. कलम 115(2), 189(2),191(2),190, 324(4) या कलमांन्वये गुन्हा दाखल होता त्यानंतर आता कलम 118 हे कलम वाढवण्यात आलेय
’स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला पाहिजे’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र
तुमच्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची पाच कामे सांगा - फडणवीस
’स्थानिक समित्यांचे वाटप करण्याचा सर्व अधिकार तुम्हाला’
महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद मी स्वतः देणार, मुख्यमंत्र्यांचे बैठकीत वक्तव्य
तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना स्पष्ट
वर्षावरील बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांना सूचना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघ दक्ष
भाजप प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावली बैठक
मुंबई, विदर्भ, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही प्रमुख आमदार बैठकीसाठी उपस्थित
थोड्याच वेळात भाजप प्रदेश कार्यालयात होणार बैठकीला सुरुवात
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह संघातील काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित
Bhandara : अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिला भेटायला भंडाऱ्यात बोलविल्यानंतर स्वतःच्या घरी नेत तरुणानं तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सदर तरुणानं अल्पवयीन मुलीला भंडारा बस स्थानकावर सोडून तो तिथून निघून गेला. पीडित मुलगी घरी गेल्यानंतर सर्व हकीकत आईला सांगितली. याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरिफ मेश्राम (२१) असं आरोपीचं नाव असून तो भंडारा तालुक्यातील कवडसी या गावातील रहिवासी आहे. तर, पीडिता ही पवनी तालुक्यातील आहे. घटनेचा पुढील तपास अड्याळ पोलीस करीत आहे.
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात 40 लाख वृक्ष लागवड होणार आहे. त्यामध्ये 19 जुलै रोजी 24 तासात 15 लाखाहून जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. केंद्र सरकारची एक पेड मा के नाम, तसेच राज्य सरकारच माझी वसुंधरा अभियान आणि हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून ही रेकॉर्डब्रेक वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील 294 ठिकाणी घनवन पद्धतीने ही वृक्ष लागवड केली जाणार आहे. क्यू आर कोडच्या माध्यमातून त्याची नोंद देखील होणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबतची माहिती दिली.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस
- शिबिरासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालच इगतपुरी मध्ये झाले आहेत दाखल
- या शिबिरासाठी राज्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती
विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, नोव्हेंबर डिसेंबर पर्यत चित्र स्पष्ट होईल त्यांनतर युती संदर्भात बघू असे सूतोवाच राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पामध्ये केल्यानं शिबिराकडे लक्ष
- राज ठाकरे आज नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू असलेल्या युतीच्या चर्चासंदर्भात राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष
Palghar Crime : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात दरोडेखोरांना दरोड्याचा प्रयत्न करण्या आधीच अटक करण्यात पालघरच्या मनोर पोलिसांना यश आल आहे . मनोर पोलीस ठाणे हद्दीतील नानिवली येथील प्रसाद विजय पाटील यांच्या राहत्या घरावर या आरोपींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असून घर मालकांनी आरडाओरड केल्यानंतर या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला . मात्र यावेळी हे सर्व दरोडेखोर घरा शेजारी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले असून या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आल आहे . या प्रकरणात सातही दरोडेखोरांना चारोटी येथील एका हॉटेल वरून अटक करण्यात आला असून त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणार साहित्य तसच मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत . हे दरोडेखोर डहाणूच्या कासा सह परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे .
Raigad Rain : रायगड जिल्ह्याला आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. आज सकाळपासून रायगड मधील अलिबाग मुरूड पेण रोहा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवडा भरापासून पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आज पावसाने काहीशी हजेरी
बीएचएमएस होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी उपचार करण्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. स्थगितीनंतर बीएचएमएस डॉक्टर आक्रमक झाले असून तात्काळ स्थगिती उठवावी अन्यथा उद्यापासून आझाद मैदानात राज्यभरातील लाखो डॉक्टर आंदोलनाला बसतील असा इशारा दिला. आंदोलना दरम्यान काही कमी जास्त झाले तर मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र सरकारची जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला. ग्रामीण भागात प्राथमिक अवस्थेत करत असलेले उपचार आय एम ए संघटनेच्या सांगण्यावरून सरकारने स्थगित केले. मग आयएमएस संघटनेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथी डॉक्टर कसे चालतात असा सवाल डॉक्टरांनी केला.
मुंबई प्रमाणेच उपराजधानी नागपुरात ही धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर काढण्याची कारवाई केली जात आहे.. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त भोंगे व लाऊडस्पीकर पोलिसांकडून काढण्यात आले असून आज आणि उद्या असे दोन दिवस ही कारवाई पुन्हा केली जाणार आहे... पोलिसांनी काढलेल्या ठिकाणी पुन्हा भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावल्यास फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही नागपूर पोलिसांकडून दिला जात आहे.
पावसाळा आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अन्नधान्याची उचल व वाटप करताना पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी तसेच शेतकरी व शेतमजूर वर्गाला होणाऱ्या अडचणी लक्षात घेता तीन महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना एकाच वेळी वाटप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील १५ कोटी ३६ लाख ६ हजार ९६९ लाभार्थ्यांनी आतापर्यंत एकत्रित तीन महिन्यात धान्याची उचल केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त धान्य दुकानांतून पात्र शिधापत्रिकाधारकांना विनामूल्य धान्य दिलं जातं. पावसाळ्यात अडचण निर्माण होऊन अन्न धान्य पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन अंतोदय आणि प्राध्यान्य कुटुंबाला जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य वाटप एकाचवेळी केलं जात आहे.पावसाळ्याच्या दिवसात रेशन मिळवण्यात होणारी गैरसोय या माध्यमातून टाळता येणार आहे. तीन महिन्याचं एकत्रित धान्य वितरणात भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून गोंदिया जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर आहे.
# राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबांना (AAY) दरमहा ३५ किलो धान्य मिळते.
# पावसाळ्याच्या दिवसात, विशेषतः दुर्गम भागांमध्ये रेशन मिळवण्यात अडचणी येतात.
# या अडचणींवर मात करण्यासाठी, सरकारने जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे रेशन एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतला आहे.
# लोकांना पावसाळ्यात धान्य मिळवण्यासाठी त्रास होणार नाही आणि त्यांची अन्नसुरक्षा सुनिश्चित होईल.
# या निर्णयामुळे, विशेषतः ज्या कुटुंबांना पावसाळ्यात रेशन दुकानांपर्यंत पोहोचणे शक्य नाही, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हा कार्डधारक धान्य उचल टक्केवारी
गोंदिया २५६०७६ २५३१२१ ९८.८४
भंडारा २५२२०३ २४८५५० ९८.५५
धुळे ३२३०५६ ३१५१४३ ९७.५५
सातारा ४२८०८० ४१६२३८ ९७.२३
नागपूर DSO ४६१४३३ ४४५०८३ ९६.४५
गडचिरोली २२४५७६ २१५२७६ ९५.८५
नागपूर FDO ४२४२३७ ४०६२४६ ९५.७५
चंद्रपूर ४३५२८७ ४१६२५० ९५.६२
सांगली ४३५२५ ४१०१०६ ९५.२५
नंदुरबार २९३४३० २७९२१४ ९५.१५
वर्धा २९७८८४ २८३२७६ ९५.०९
नाशिक ८९६६०९ ८४८१०१ ९४.५८
सोलापूर DSO ४२६३३० ४०३१८८ ९४.५७
जळगाव ६५८६१० ६२२०४६ ९४.४४
पालघर ४२७२१० ४०२२५५ ९४.१५
पुणे DSO ६३७२८४ ५९९७०१ ९४.०१
अहमदनगर ७२५६०४ ६८२१९७ ९४.०१
ठाणे १६३०४३ १५२९१६ ९३.७८
पुणे FDO ३६८४२९ ३४०२२१ ९२.३४
सिंधुदुर्ग १७२०३३ १५८३५२ ९२.०४
वाशीम २७२२६२ २४९०२८ ९१.४६
ठाणे FDO ६९६२०२ ६३६०५३ ९१.३६
अकोला ३५६१२९ ३१६०७० ८८.७५
रायगड ४५६०२८ ४०२६६५ ८८.२९
रत्नागिरी २८२२०८ २४८०७३ ८७.०९
अंधेरी DSO २१०४९८ १८१७६९ ८६.३५
यवतमाळ ६०८९३५ ५२३०३३ ८५.८९
छ. संभाजीनगर ५९१२६५ ५०४२१६ ८५.२७
जालना ३७९६८२ ३२१११६ ८४.५७
कोल्हापूर ५९१३०३ ४९५७५२ ८३.८४
बुलढाणा ५१६८९३ ४२९९०१ ८३.१७
वडाळा DSO ४७११९० ३८५६९३ ८१.८५
परेल SDO १५७२६६ १२८६५८ ८१.०८
कांदिवली SDO २५९००८ २११६३१ ८१.०७
नांदेड ६१८२२० ४९९३९९ ८०.७८
सोलापूर FDO १२७२९९ १०२२३० ८०.०३
परभणी ३३४६९५ २६६५८० ७९.६४
अमरावती ५७९३३२ ४५५९९६ ७८.७१
हिंगोली २२४३१२ १७२७५२ ७७.०१
धाराशिव ३१४२२० २४१९४९ ७६.९९
लातूर ४४७७३४ ३३७८१४ ७५.४४
---------------------------------------------------
एकूण १७३१५६७० १५३६६९६९ ८८.७४
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर काही प्रमाणात झालेल्या पावसाच्या भरवशावर 79 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत परंतु मागील काही दिवसापासून पावसाने उसंत घेतली आहे जुलै महिना अर्धा संपला तरीही मात्र जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे हिंगोली जिल्ह्यात पेरणी झालेली पिकं आता पावसाची वाट पाहू लागली आहेत पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेल्या शेतीला भेगा पडले आहेत हिंगोली जिल्ह्यांमध्ये साधारण 79 टक्के इतकी पेरणी झाली असून पेरणी केलेले शेतकरी आता पाऊस पडत नसल्याने चिंतेत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे तर पावसा अभावी साधारण 21% क्षेत्रावरील पेरण्या अपूर्ण आहेत
लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर झाली. त्यात नांदेड जिल्ह्यात २ तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूरला प्रत्येकी १ गटाची भर पडली आहे. मराठवाड्यात ६ गट वाढल्याने गणांची संख्यादेखील १२ ने वाढली आहे. बीडला १ गट, २ गणांची भर : बीड जिल्ह्यात केज तालुक्यात येवता हा नवा गट तयार झाला. येवता आणि दहिफळ वडमाऊली हे २ पंचायत समिती गण वाढले आहेत. या बदलामुळे आता जिल्हा परिषदेत ६१ तर पंचायत समितीमध्ये १२२ सदस्य निवडून जाणार आहेत.
जालन्यात हेलस नवा गट : जालना जिल्ह्यात हेलस हा नवा गट तयार झाला आहे. आता जिल्हा परिषदेच्या ५७ गटांमध्ये आणि ११४ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होणार आहे.
लातूरला १ गट वाढला : लातूरला जिल्हा परिषद गटांची संख्या एकने वाढली असून, दोन गण वाढणार आहेत. त्यामुळे जि.प. सदस्यांची संख्या आता ५९ होईल. पंचायत समितीच्या ११८
धाराशिव
गट आणि गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच आहे. जिल्ह्यात ५५ गट आणि ११० गणांची संख्या प्रारूप रचनेत कायम ठेवण्यात आली आहे.
परभणीत संख्या जुनीच परभणीत ३७ गट तयार करण्यात आले असून गट क्र. १ ते १० जिंतूर, ११ ते २० हे परभणी तालुक्यात पाडण्यात आलेले आहेत. गट आणि गणांची संख्या पूर्वीइतकीच आहे.
हिंगोलीत ५२ गटांचे प्रारूप जाहीर हिंगोली जिल्ह्यातील ५२ जि.प.गटांचे तर पंचायत समितीच्या १०४ गणांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आले आहे.
नांदेड: नांदेड मधील धनेगाव व अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा गट वाढला आहे. तसेच याच तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन गण वाढले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत ६३ गट होते. मात्र या निवडणुकीत २ गट व ४ गण वाढले आहेत. नांदेड व अर्धापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची भर पडणार आहे.
संभाजीनगर :
संभाजीनगर जिल्ह्यात अंभई हा नवा गट तयार झाला आहे. त्यात अंभईव केळगाव असे दोन गण असतील.
ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त. तब्बल 62.6 कोटी रुपयांच कोकेन जप्त. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (डीआरआय) मोठी कारवाई. दोहावरून आलेल्या महिलेला गोपनीय माहितीच्या आधारावर घेण्यात आल होत ताब्यात. तिच्या सामना तपासणी केली असता कोकेनने भरलेल्या ३०० कॅप्सुल सापडल्या. ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटच्या खोक्यात लपवून सुरू होती कोकेनची तस्करी. महिलेकडून तब्बल ६.२६१ किलो कोकेन जप्त
आयकर खात्याच्या नागपूर विभागांतर्गत अंतर्गत नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह अन्य ठिकाणी छापे . टॅक्स रिटर्नमध्ये म्हणजे आयटीआर मध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी करणारे लोक, चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिसनर्स यांच्याविरोधात करण्यात आली. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या नावाने न देणग्या स्वीकारून करचोरीच्या ही संशयावरून हे छापे मारले गेले. यात छत्रपती संभाजीनगर येथील सीए फर्मचा समावेश आहे. या फर्मची १६ तास चौकशी करण्यात आली. देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम ८० जी अन्वये ३०० कोटींचा कर चुकवल्याचा संशयावरून ही तपासणी सुरू झाली आहे. संभाजीनगर शहरातील N2 भागात राहणाऱ्या सीएची चौकशी
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live: रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; रेड अलर्ट जारी, सहा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर