Maharashtra Live Blog Updates: अजितदादा सर्वांना पुरून उरतात म्हणून त्यांच्यावर आरोप केले : नरहरी झिरवाळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे (Parth Pawar Pune Land Scam) मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात...More
परभणी: इतके दिवस सर्व सुरळीत असताना ऐन निवडणुकीच्या काळात अजितदादांवर आरोप करण्यात आले आहेत. कारण अजितदादा सर्वांना पुरून उरतात. त्यामुळे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या काळातही अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या परिवारातील अजून काय काय गोष्टी काढल्या जातील. मात्र कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे लक्ष न देता स्थानिक मुद्द्यावरिल या सर्व निवडणुका जिंकाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी परभणीत केले आहे. परभणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत बोलताना झिरवाळ बोलले आहेत.
Nandurbar : नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरात परिसरात भीषण अपघात....
प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी चालकाच्या गाडीवर ताबा सुटल्याने भीषण अपघात....
या अपघातात चार जण जखमी तर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार ते पाच मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान....
शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या अपघात मुळे एकच खळबळ उडाली....
टॅक्सी चालक मध प्राशन करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती....
टॅक्सी चालकाला तात्काळ पोलिसांनी घेतले ताब्यात पुढील तपास सुरू असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू...
मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात दाखल..
आरोपी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड यांना अटक..
आरोपीमध्ये मनोज जरांगे यांचा जुना सहकारी कोपर्डी घटनेतील आरोपी मारहाण प्रकरणातील अमोल खुणे याला अटक..
कलम BNS 55 आणि 61 नुसार गुन्हा..
हत्तीचा कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
दिलेल्या ऑडिओ क्लिप ची पोलिसांकडून शहानिशा करण्याचे काम सुरू
पुण्यातील डोळस कुटुंबीयांच्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तीन जणांना ताब्यात
भोंदू बाबा दीपक खडके सह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेने केली ताब्यात
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली नाशिक मधून ताब्यात
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संकेतस्थळ गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने बेरोजगार तरुण महामंडळाच्या लाभापासून वंचीत आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील मंगलमूर्ती डाईंग कंपनीला सकाळी 9च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून, आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की पहिला व दुसरा मजला संपूर्णपणे भस्मसात झाले.
कंपनीत मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा असल्याने आगीने झपाट्याने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कंपनीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवताना पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे जवानांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एवढ्या मोठ्या एमआयडीसी परिसरातसुद्धा पाण्याची टंचाई असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करत आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर सुरु असलेल्या पैशाच्या उधळपट्टीला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी..
नागपूरच्या रविभवन येथील कोणत्याही मंत्र्यांच्या बंगल्यावर 35 लाखाच्या वर निधी खर्च करायचा नसल्याचे फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश ...
राज्य सरकार आर्थिक संकटात असतांना रविभवन येथील विधासभा अध्यक्षाच्या बंगल्यावर 1 कोटी 25 लाख, विधपरिषद सभापतींच्या बंगल्यावर 1 कोटी 10 लाख व कृषी मंत्री यांच्या बंगल्यावर 1 कोटी 10 लाखाचा निधी हा इंटेरिअर व डागडुजीवर खर्च करण्यात येत होता.
हि बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी काल सार्वजनिक बांधकाम विभागाची तातडीची बैठक बोलावली व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या बंगल्यावर जो 1 कोटी 25 लाखाचा निधी खर्च करावा लागणार होता ते काम आता 35 लाखाच्या आता पूर्ण करावे लागणार आहे.
साकोलीचे भाजपचे माजी आमदार बाळा काशीवार यांची भाजपात घरवापशी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात भाजपात पुन:र्प्रवेश प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत बाळा काशीवार यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत, भाजपच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला. त्यामुळं भाजपनं बाळा काशिवार यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निष्काशीत करण्यात आलं होतं. बाळा कशीवाऱ्यांच्या घरबापशीनं आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाची ताकद वाढणार आहे.
पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचा आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. शीतल आणि तिचे पती सागर सुर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली, यातून तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती. पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेतील या घोटाळ्याप्रकरणी सागरला सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि इडी कडून अटक झाली होती. शीतलने मात्र अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यामुळं शितलने केवळ जमीन व्यवहार प्रकरणात नव्हे तर कर्ज प्रकरणात ही फसवणूक केल्याचं समोर आलंय.
मुंढवा जमीन प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल. तहसीलदार सुर्यकांत येवले, दिग्वीजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या विरोधात पहाटे पुण्यातील खडकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बोटेनीकल गार्डन ची जमीन अमेडा कंपनीला देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप. प्रांत अधिकार्यांनी तक्रार दीलाय.
Nanded Crime : दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी वरात काढलीय. नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. सद्दाम हुसेन या मुलाचे आरोपींने अपहरण करत त्याला जळगाव जिल्ह्यात नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी चोपडा इथून आरोपीला अटक केली. त्यानंतर या आरोपींना नांदेडमध्ये आणण्यात आले. यावेळी आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना वाहनात बिघाड झाल्याने आरोपींना रस्त्यावरून चालत नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितलंय. मात्र पोलिसांनी आरोपीची काढलेली ही धिंड पाहून सर्वसामान्य नागरिकांनी या कृतीचे स्वागत केलय.
नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गावात बिबट्याचातरुणावर हल्ला
बिबटया च्या हल्लात सुदाम जुंदरे या तरुणाचा मृत्यू
छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळला तरुणांचा मृतदेह..
बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत..
वनविभागाने बिबट्याला पकडण्याची मागणी
वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल
वडाळा येथील गृहप्रकल्पात १०० कोटींचा घोटाळा,बांधकाम व्यावसायिक 'स्काय३१' सह इतरांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) वडाळा येथील ‘स्काय ३१’ या गृहनिर्माण प्रकल्पात तब्बल १०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकासह इतरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील ६२ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अनिल द्रोन यांनी केलेल्या तक्रारीच्या प्राथमिक चौकशीनंतर बुधवारी हा गुन्हा नोंदवण्यात आला
तक्रारीनुसार, बांधकाम व्यावसायिक सुब्बारामन आनंद विलयनूर, त्यांची पत्नी उमा सुब्बारामन, बी. पी. गंगार कन्स्ट्रक्शन्स आणि इतरांनी २०१८ पासून वडाळा (पश्चिम) येथील ‘स्काय ३१’ या गृहप्रकल्पासाठी १०२ नागरिकांकडून तब्बल १०० कोटी गोळा केले. प्रत्येक गुंतवणूकदाराला फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
परंतु, पैसे गोळा केल्यानंतर आरोपींनी तो निधी प्रकल्पासाठी न वापरता स्वतःच्या आणि इतरांच्या बँक खात्यांमध्ये वळवला, असा आरोप आहे.
तसेच तपासात आरोपींनी एका फ्लॅटची विक्री दोन वेगवेगळ्या व्यक्तींना करून दोघांकडूनही पैसे घेतले आणि त्यांची फसवणूक केली.
EOW ने या प्रकरणात फसवणूक आणि विश्वासघात (क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट) या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, झालेला व्यवहार आणि संबंधित कंपन्यांचा सहभाग तपासला जात आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर वसुलीची अट रद्द
मुख्यमंत्र्याच्या सूचनेनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय
ग्रामविकास विभागाने वेतनासाठी 90 टक्के कर वसुलीची ठेवली होती अट
ही अट 60 टक्क्यांपर्यंत शिथिल करण्याचा होता प्रस्ताव
मात्र अट रद्द करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा अट रद्द करण्याचा निर्णय
ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय जारी
मागच्या दोन दिवसात नागपूर पारा हा 17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे.
त्यामुळे या हंगामातील थंडीला आज पासून नागपूर मध्ये सुरवात झाल्याचं पाहायला मिळत आहे ...
ज्याला आपण गुलाबी थंडी म्हणतो त्या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर सकाळच्या वेळी बाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे.
सोनेगाव विमानतळ परिसरात सकाळचा व्यायाम करणाऱ्यांची संख्या हि नेहमी पेक्षा जास्त दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले
सँडहर्स्ट रोड दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू घोषित
तर दोघींची परिस्थिती चिंताजनक...
यामध्ये 45 वर्षीय ऋषिकेश नाईक आणि हैली मोहमाया या 19 वर्षीय महिलेचा देखील मृत्यू
सध्या हैली आणि ऋषिकेश नाईक यांचा मृतदेह जे जे हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे
शवविच्छेदन प्रक्रियेला अद्याप सुरुवात नाही
तर 22 वर्षीय कैफ चौघाले हा तरुण आणि 45 वर्षीय खुशबू या महिलेची प्रकृती गंभीर आहे
Parbhani : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौरा करत आहेत आज ते परभणीतील पिंगळी गावात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे शिवाय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही उद्धव ठाकरे घेणार आहेत.उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची धास्ती सरकारने घेतली आहे.संभाजीनगरला मोर्चा काढला तेंव्हा पैकेज जाहीर केले आणि आता हा दौरा सुरू झाला की शेतकऱ्यांना रबी साठी लागणारी मदत ही मंजूर केली आहे.शेतकऱ्यांना आशा फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे.भाजप हे दगाबाजच आहे त्यामुळे त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू असल्याचे परभणीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटलय
Kolhapur News : पुणे - बेंगलोर महामार्गावरील कोल्हापुरात प्रवेश करतेवेळी उभारण्यात आलेली स्वागत कमान काल मध्यरात्री उतरवण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळच ही भव्य कमान 27 वर्षांपूर्वी उभी केली होती. मात्र या कमानीची अनेक ठिकाणी पडझड सुरू झाली होती. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे कमानीचा एखादा भाग प्रवाशांच्या अंगावर पडून अपघात होऊ नये, यामुळे ही कमान उतरवून या ठिकाणी नवीन भव्य कमान उभारण्यात येणार आहे. काल रात्री 11 ते पहाटे चार वाजेपर्यंत महापालिकेच्या वतीने ही कमान उतरवण्यात आली.
वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये थंडी जाणवू लागल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे..नाशिकच्या ग्रामीण भागात हुडहुडी वाढू लागली असून या थंडीपासून बचाव करण्याकरिता गरम व उबदार कपडे परिधान करायला सुरुवात केली आहे..तर जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहे..वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शेतीपिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असून वाढत्या थंडीचा फायदा हा कांदा, गहू, हरभरा या पिकांना होईल असे चित्र दिसत आहे..
भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांच्यासह अन्य दहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल......
विक्रांत जाधव सध्या शिवसेनेचा उद्धव गटाचा जिल्हाप्रमुख.
पार्थ पवारांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी हात झटकले...प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचीही स्पष्टोक्ती, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अजित पवारांचं वक्तव्य
पुण्यातील भूखंड खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या व्यावसायिक भागीदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल, मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप, FIR मध्ये पार्थ पवारांचं मात्र नाव नाही
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: अजितदादा सर्वांना पुरून उरतात म्हणून त्यांच्यावर आरोप केले : नरहरी झिरवाळ