- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या राजकीय युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलंय. मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची सूत्रांची...More
वाघाच्या हल्ल्यात दोन वृद्ध महिला ठार
गडचिरोली : सरपण गोळा करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या दोन महिलांना वेगवेगळ्या दिवशी वाघाने ठार केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील देऊळगाव बुट्टी येथे उघडकीस आली आहे. मुक्ताबाई नेवारे आणि अनुसया जिंदर वाघ अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. मुक्ताबाई नेवारे या बुधवारी सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता वाघाने त्यांना ठार केले. तर अनुसया जिंदर वाघ या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अशातच गडचिरोली- आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीलगत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला, तर परिसरातच मुक्ताबाई नेवारे या सुद्धा मृतावस्थेत आढळल्या. वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला.
जळगावच्या जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध..
जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत साधना महाजन या नगराध्यक्ष मधून बिनविरोध विजय झाल्या आहेत..
नगराध्यक्ष पदासाठीच्या विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी आज माघार घेतल्याने साधना महाजन बिनविरोध झाल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या साधना महाजन बिनविरोध विजयी झाल्या आहेत..
नगराध्यक्ष बिनविरोध होणारी जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील पहिली नगरपालिका आहे
लोकल मधली झुंडशाही ,मराठी हिंदि वाद
एका तरुणाच्या जीवावर बेतला
डोंबिवली ते ठाणे लोकल मध्ये मराठी–हिंदी’
वादातून मराठी विद्यार्थ्याला मारहाण,तणावातून
विद्यार्थ्याची आत्महत्या
मराठी बोलता येत नाही का ? मराठी बोलायची लाज वाटते का ? असे बोलत चार ते पाच तरुणांनी केली मराठी विद्यार्थ्यांला होती मारहाण
मानसिक तणावातून १९ वर्षीय मराठी विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवलं
Anchor :- लोकल ट्रेन मध्ये चढताना हिंदीत बोलला त्यावरून तुला मराठी बोलता येत नाही का ? यावरून वाद झाला .काही तरुणांनी लोकल प्रवासात झालेल्या वादातून १९ वर्षीय विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का ?मराठी बोलण्याची लाज वाटते का ? असे बोलत यावरून मारहाण केली .डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली .झालेल्या मारहाणीमुळे हा विद्यार्थी मानसिक तणावात होता .याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याण मध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली .अर्णव खैरे असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णव चे वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत .दरम्यान लोकल मधली झुंडशाही ,मराठी हिंदि वाद कोणत्या टोकाला पोहचला हेच या घटनेवरून दिसून येत आहे .पोलिसांनी अर्णव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णव च्या कुटुंबीयांनी केली आहे
वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार कल्याण पूर्व तिसगाव नाका येथील सहजिवन रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता. मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजकडे निघाला होता. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने गर्दीत अर्णव याने हिंदीत थोडा आगे हो असे बोलला . इतक्यात आजुबाजुच्या चार ते पाच जणांच्या टोळयांनी तु मराठी बोलात येत नाही का ? अशी विचारणा करत तु मराठी बोलण्याची लाज वाटते का असे म्हणत त्याला ठोशांनी बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने मुलुंडला गेला. त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले पण मानसिक तणावामुळे कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरात परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून आपली आपबीती व्यक्त केली. सायंकाळी सातच्या सुमारास वडील घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला रात्री ९:०५ वा. मृत घोषित केले यानंतर अर्णव याच्या वडिलांनी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी जवाब नोंदवला असून पोलिसांनी नोंद करत वडिलांच्या जबाबानुसार तपास सुरू केला आहे मात्र या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणी मराठी तरुण आहेत की मराठी याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे मनसे नेहमी मराठी माणसाच्या पाठी उभी आहे जर या घटनेत मराठी माणस असतील तर त्यांना पाठीशी घातल्या जाणार नाही
पक्षांतर्गत कारवाईच्या इशारानंतर खेडमध्ये वैभव खेडेकर यांची नरमाईची भूमिका...
महायुती जाहीर झाल्यानंतरही पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या वैभव खेडेकर यांचा यु टर्न.
भाजपला कमी जागा दिल्यामुळे खेडमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी.
रत्नागिरीतील महायुतीच्या मेळाव्याच्या नंतर वैभव खेडेकर यांची अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू.
योगेश कदम विरुद्ध वैभव खेडेकर यांच्या शित युद्धात योगेश कदम पुन्हा ठरले वरचढ...
अर्ज मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख असताना वैभव खेडेकर आजच घेणार माघार.
हिंगोली
slug - भाजपचा उमेदवार शिवसेनेने पळवला
हिंगोलीत नागसेवक पदाच्या उमेदवारांची ऐनवेळी माघार भाजपला मोठा धक्का
अँकर
राज्यात एकीकडे रवींद्र चव्हाण हे शिवसेनेच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असताना हिंगोली नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे नगरसेवक पदाचे अधिकृत असलेल्या उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावत शिवसेनेत प्रवेश दिला आहे
हिंगोली नगरपालिका मधील 16 ब मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले भास्कर बांगर यांनी उमेदवारी मागे घ्यायला एक दिवस शिल्लक असताना आज स्वतःची उमेदवारी घेतली आहे संतोष बांगर यांच्या हस्ते त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून भास्कर बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना पाठिंबा दिला आहे यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जातोय
अमरावती
यंशोमती ठाकूर ऑन मुख्यमंत्री मामेभाऊ बिनविरोध
भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे...
देवेंद्र फडणवीस याठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहे..
मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करत आहे. उमेदवाराना धमक्या दिल्या, पैसे दिले...
यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील..
ज्या हिशोबाने सविधानाची तोडफोड करत आहे. ते योग्य नाही...
भाजपमध्ये ओरिजनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहे... कलोती यांचा पराभव झाला असता नाचक्की झाली असती म्हणून दमदाटी केली..
उद्धव ठाकरे
मागील तीन चार वर्ष महापालिकेचा बाप कोण आहे हेच कळत नाहीये, नुसती लुटालूट सुरु आहे
२०१० साली वर्चूयल क्लास रूम सुरु केल्या... पालकांना लाज वाटतं होती आपले मुलं महापालिका शाळेत जातात म्हणून... मग आदित्य ने CBSE सुरु केलं... मग महापलिका शाळेत ऍडमिशन साठी रांगा लागायला लागल्या
आपण शाळेचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारला
महापालिका आपल्या कडे होती तेंव्हा आपण शिक्षणाचा दर्जा सुधारवला
रघुनाथ माशेळकर यांनी एका उपक्रमाचा उदघाटन केलं..ते मोठी माणसे... त्यांना वेळ मिळायाला पाहिजे... मग त्यांना फोन लावला
त्यांनी सांगितलं तुम्ही वेळ आणि स्थळ सांगा
मराठवाडा दौरा मी केला शेतकऱ्यांशी संवाद साधला
अतिवृष्टी झाल्यानंतर त्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांना धीर दिला
एक शेतकरी महिला बोलली मुलीला शिक्षण मोफत आहे म्हणतात पण तसा नाहीये सांगितलं...
आपण शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे
आम्हाला पक्ष फोडायचा, खासदार आमदार फोडायचे टिकूजीरावांना खुर्ची पाहिजे... दुनिया गेली उडत
रेवडी दिल्यानंतर आपण नको ती माणसे निवडणूक देतो... आपण तांदूळ मधून खडे निवडायचे कीं खड्यातून तांदूळ हे तुम्ही ठरवलं पाहिजे
अखेर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध
चिखलदरा नगर पालिकेच्या निवडणुकीत होते आल्हाद कलोती निवडणुकीच्या रिंगणात
चिखलदरा नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 ब मधून नगरसेवक साठी उमेदवारी दाखल केली होती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगर परिषदेतून नगरसेवक पदाकारिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
पहिल्यांदाच निवडणूक लढवीणाऱ्या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..
मात्र आज आल्हाद कलोती बिनविरोध झाले... त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने बिनविरोध
भाजपकडून संतोष साळुंखे यांची माघार
Anchor.... रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग नगरपालिकेत शेखपचे प्रशांत नाईक यांची नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.प्रशांत नाईक हे प्रभाग क्रमांक 2 ब मधून उभे होते मात्र त्यांच्यासमोर भाजप कडून उभे असलेल्या संतोष सहदेव साळुंखे यांनी अचानक माघार घेतल्याने प्रशांत नाईक यांना प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रशांत नाईक यांनी याअगोदर सुद्धा नगरसेवक म्हणून अलिबाग नगरपालिकेत 5 टर्म आणि नगराध्यक्ष पद हे 2 टर्म भूषविले आहे.
सांगली-:
दिल्लीत आत्महत्या केलेल्या शौर्य प्रदीप पाटीलवर अंत्यसंस्कार
शौर्य प्रदीप पाटीलची सुसाईड नोट समोर
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरमध्ये
शौर्यवर अंत्यसंस्कार
दहावीत शिकणाऱ्या शौर्यने
शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून क.मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरून खाली रस्त्यावर उडी मारुन केली आत्महत्या...
हर्षवर्धन सपकाळ ऑन मुख्यमंत्री मामेभाऊ बिनविरोध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ चिखलदरा नगरपरिषद मधून अविरोध विजय झाल्या नतंर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक...
मत चोरी करत होते आता उमेदवार चोरीचा हा दुसरा भाग आहे..
हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका..
जो माणूस तिथे राहत नाही.. त्याचं नाव मतदार यादीत टाकलं जातं.. हे मुख्यमंत्र्यांचे अशोभनीय काम आहे.. याचा धिक्कार करतो, याचा निषेध करतो..
मुख्यमंत्र्याचे एक मामेभाऊ धर्मदाय आयुक्त आहे तों जैन बोर्डिंग सारखी जमीन विकतो..
दुसऱ्या मामे भावाला नगरसेवक बनवून चिखलदरा मधील जमिनी खरेदी करण्या करता नगरसेवक केल जात..
मुख्यमंत्र्याचे हे गुंडशाही आहे ते आता आम्ही खपून घेणार नाही,.
उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जातात.. अपहरण केल्या जात आहे, आमिष दाखवलं जात आहे.. दडपशाही केले जात आहे...
यामध्ये आर्थिक देवाणघेणार दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या - हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा आरोप
मुख्य आका चिखलदरा प्रकरणाचा देवेंद्र फडणवीस आहेत...
रायगड : जिल्ह्यातल्या अलिबाग नगरपालिकेत शेखपचे प्रशांत नाईक यांची नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत नाईक हे प्रभाग क्रमांक 2 ब मधून उभे होते. मात्र त्यांच्यासमोर भाजपकडून उभे असलेल्या संतोष सहदेव साळुंखे यांनी अचानक माघार घेतल्याने प्रशांत नाईक यांना प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रशांत नाईक यांनी याअगोदर सुद्धा नगरसेवक म्हणून अलिबाग नगरपालिकेत 5 टर्म आणि नगराध्यक्षपद हे 2 टर्म भूषविले आहे.
पुणे: बालेवाडीत हिट ऍण्ड रनची घटना घडलीये. या अपघातात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. तर पाच वर्षीय भाऊ आणि आजोबा जखमी झालेत. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झालाय. अनुराग चांदमारे असं मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव होतं. तर पाच वर्षीय भाऊ अभिनव चांदमारे आणि आजोबा बंडू वावळकर यांच्यावर उपचार सुरुयेत. बुधवारी घडलेल्या अपघात प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय. बावधन पोलीस फरार चालकाचा शोध घेतायेत.
- संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार..
- भक्ष्याच्या शोधात बिबट्या थेट घराच्या अंगणात.
- राजापूर शिवारातील ताजने मळा येथे बिबट्याचा मुक्त संचार.
- दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याने दोन कोंबड्या केल्या फस्त.
- आज पहाटे पुन्हा भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
- परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण.
महाविकास आघाडीसोबत महायुतीतही मुंबईत फूट पडण्याची शक्यता
राष्ट्रवादी कांग्रेसकडून नवाब मलिकांना मुंबई पालिकेची जबाबदारी दिल्यानंतर भाजपचा विरोध
नवाब मलिकांकडे मुंबईचे नेतृत्व असल्यास मान्य नाही
नवाब मलिकांवरील आरोप गंभीर, अशात कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठ पातळींवर देखील बोलून दाखवल्याचे शेलार यांचे वक्तव्य
बुलेटवरून आलेल्या तिघांनी एका तरुणावर चाकूने सपासप वार करून हत्या...
अमरावती शहरातील विलासनगरातील संविधान चौकात काल रात्रीची घटना...
यश रवींद्र पाटणकर (वय 24) असे मृताचे नाव आहे..
प्रथमदर्शनी ही खुनाची घटना जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे...
यशच्या छातीवर आणि पोटावर वार करून मारेकऱ्यांनी पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले..
यश पाटणकर हा घरी गिट्टी चढविण्याचे काम करीत होता. त्यावेळी संविधान चौकात एका बुलेटहून आलेल्या तिघांनी यश याला आवाज दिला. तो घराबाहेर येताच तिघांनी त्याला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर चाकूने हल्ला करून तिघेही मारेकरी पसार झाले..
आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितले...
परभणी: जिंतूर तालुक्यातील भोगाव ते इटोली मार्गावर कमलजाई देवी मंदिर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. काल रात्री इटोली गावचे सरपंच या मार्गावरून जात असताना त्यांना हा बिबट्या दिसला आहे. त्यामुळे इटोली भोगाव आदी गावांच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिसरात तातडीने आवश्यक खबरदारीची पावले उचलण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच या भागातील नागरिकांनी सावध रहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शिवारात दिनांक 18 नोहेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान कोळपेवाडी–माहेगाव देशमुख रस्त्यावर चालू दुचाकीवर चाललेल्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला होता त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.. वनविभागाने गांभीर्य लक्षात घेता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला होता आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय..
पुणे: राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांना तब्बल १० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांच्याबद्दल एक पोस्ट करत त्यांच्या विरोधात मारहाणीचे आरोप केले होते. नंतर त्यांनी व्हिडिओ चुकून पोस्ट झाल्याचे सांगितले, पण पुन्हा युटर्न घेत पाटील यांनी जबरदस्तीने माफीचा व्हिडिओ शूट करवून घेतल्याचा दावा केला. मारहाणीच्या दिवशी त्या बीडमध्ये होत्या, त्यामुळे आरोप खोटे असल्याचे रुपाली पाटील यांनी आधीच स्पष्ट केले होते. आता त्यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा
मुंबईच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून मोठं पाऊल
मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ
४०० चौरस फुटावरून ६०० चौरस फुटापर्यंत नोंदणी फी माफ
घराचे बांधकाम क्षेत्र २०० चौरस फूट वाढूनही नोंदणी फी होणार माफ
महसूल विभागाचे परिपत्रक जारी
बीड: माजलगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या उमेदवारीमुळे अंतर्गत नाराजी पसरल्याची चर्चा आहे. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी असताना माजलगावचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची सून मेहरीना शिफा बिलाल चाऊस यांना उमेदवारी देण्यात आली तर स्वतः सहाल चाऊस यांनी प्रभाग क्रमांक 8 मधून तर त्यांचे लहान बंधू अबू तालेब चाऊस यांना प्रभाग 2 मधून नगरसेवकपदाची उमेदवारी देण्यात आलीये. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना उमेदवारी दिल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडी पाहता माजलगावातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्ष नेतृत्व असलेल्या मोहन जगताप यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
नाशिक: मोरे मळा परिसरात बिबट्या अखेर जेरबंद झालाय. अप्पा शिंदे यांच्या मळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. यामुळे वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. याच बिबट्याने यापूर्वी अनेक कुत्रे फस्त केले होते. अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय. यामुळे मोरे मळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘अमेडिया’ कंपनीचे भागधारक दिग्विजसिंह पाटील बुधवारी विकास खारगे चौकशी समितीसमोर हजर झाले. पाटील यांनी नोटीस १८ नोव्हेंबरला मिळाल्याचे सांगत, आपले म्हणणे मांडण्यासाठी अधिक वेळ मागितला. खारगे समितीने त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे चौकशीसंदर्भात समितीचा अंतिम अहवाल तयार होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती कार्यरत आहे.
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या प्रबोधनकार ठाकरे चौकात ठाकरेंच्या सेनेची आणि मनसेची बॅनरबाजी
पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते करणार प्रबोधनकारांच्या पुतळ्याला अभिवादन
अमित ठाकरे देखील असणार उपस्थित
सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून तापमानाचा पारा घसरू लागला असल्याने थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे.... महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीत दिवसभर कडक ऊन आणि रात्री पूर्ण परिसरात परिसरात गारठा पडू लागला आहे. 11 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे यामुळे सायंकाळी तापमानाचा पारा घसरत असून या पडलेल्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी महाबळेश्वर मध्ये पर्यटक येऊ लागले आहेत त्याच बरोबर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, दूध विक्रेत्यांना, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन करणार तपोवन परिसराची पाहणी
- तपोवन परिसरातील झाडं तोडण्यासाठी काल झाला होता विरोध
- तपोवन परिसरात साधुमंतांसाठी साधू ग्रामची उभारणी करण्यासाठी काही झाड तोडण्याचा झाला होता निर्णय
- याच निर्णयाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी झाडांना मिठी मारून काल केले होते चिपको आंदोलन
- याच परिसरात जाऊन गिरीश महाजन पाहणी करून घेणार माहिती
- काल आंदोलन केलेल्या आंदोलकांशी देखील गिरीश महाजन चर्चा करण्याची शक्यता
सध्या सर्वत्र नगरपरिषद निवडणुकीचा धडाका सुरू आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे एरवी पतीसाठी घरगाडा संभाळून झटणाऱ्या पत्नी नगराध्यक्ष व्हाव्यात यासाठी आता नवरोबा पायाला भिंगरी लागल्यागत प्रचाराला लागले आहेत परभणीच्या मानवत मध्ये शिवसेना-भाजप युतीकडून सौ अंजली महेश कोकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून सौ राणी अंकुश लाड या उभे राहिलेले आहेत.कधी पती पत्नी सोबत प्रचार करत आहेत तर कधी पती एकीकडे आणि पत्नी एकीकडे असा प्रचार सुरुय.दोन्ही बाजूच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर असल्याने आपली पत्नी नगराध्यक्ष व्हावी यासाठी पतीकडून जोरदार प्रचार सुरू केला आहे.सत्ताधारी असलेल्या अंकुश लाड यांच्याकडून विकास कामे पुढे घेवून जाण्याचा संकल्प करण्यात आलाय तर विरोधी महेश कोक्कर यांनी मानवतचा विकासच झाला नाही असा आरोप करत शहरच्या पुढच्या २० वर्षाचे विकास व्हिजन घेवून आम्ही लढत असल्याचे सांगितले आहे.
- नाशिक सिन्नर मार्गावर रात्री झाला भीषण अपघात
- अपघातात १ ठार, ३ जखमी
-
- सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात दोन विचित्र अपघात
- पहिला अपघात मोहदरी घाटात ट्रक, रिक्षा आणि कारमध्ये झाला
त्यांनतर घाटातील वळणावर दुसरा अपघात झाला.
सिन्नरहुन नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने दुचाकी आणि चार चाकीला दिली धडक
- त्यात तीन मोटरसायकल कंटेनरखाली सापडल्याने एका व्यक्तीला जागीच मृत्यू
- तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत...
-
कबूतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात
मुलुंड पूर्वेकडे नवीन कबुतरखाना सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
जुन्या ऐरोली-मुलुंड चेक नाका परिसरात खाडीजवळ कबुतरखाना सुरू केल्यास येथे येणाऱ्या फ्लेमिंगोंना त्याचा धोका होऊ शकतो याचिकेत दावा
कबुतरांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यात आले होते मात्र पालिकेच्या या निर्णयाविरोधात पशू प्रेमी आणि जैन समुदायाने आंदोलन केल्यानंतर कबुतरांना खाद्य देण्यासाठी मुंबईतील चार ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत
मात्र मुलुंड येथे कबुतरखाना सुरू करण्यास स्थानिकांनी विरोध केला होत
गणेशोत्सव कार्यक्रमासाठी एकत्र जमलेल्या लोकांच्या मधातून रेती भरलेला ट्रॅक्टर भरधाव वेगात नेणाऱ्याला गावकऱ्यांनी थांबविल्याने रेती तस्करांनी तलवार व बंदुकीचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील 9 जणांवर रावणवाडी पोलिसांनी मकोका लावला होता. त्या मकोकाच्या 9 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी 15 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी जिल्हा सत्र न्यायालय प्रथम न्यायाधीश ए.एस. प्रतिनिधी यांनी केली.
वसईत झालेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे याचिका
शाळेत यायला १० मिनिट उशीर झाल्यामुळे १०० उठाबशा काढायला लावल्याने मृत्यू प्रकरणी सुओ मोटो दखल घेण्याची मागणी
याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून जलदगतीने चौकशी करण्याची तसेच शाळेवर देखील कारवाई करण्याची मागणी
विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्याची देखील याचिकेत मागणी
उच्च न्यायालयाच्या वकील स्वप्ना कोदे यांनी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याकडे केली याचिका
लवकरच सुनावणी होण्याची शक्यता
८ नोव्हेंबरला शाळेत यायला १० मिनिटे उशीर झाल्यामुळे शिक्षकेने सहावीत शिकणाऱ्या अंशिका उर्फ काजल गौड हिला दप्तरासकट १०० उठाबशा काढायला लावल्या होत्या
यानंतर काजलला थेट रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली होती
तिची तब्बेत खालावत असल्याचं लक्षात येताच तिला मुंबईच्या सर जे जे रुग्णालयात भरती करण्यात आल होतं पण ऐन बालदिनाच्या दिवशी तिचा मृत्यू झाला होता
याप्रकरणी वालिव पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली आहे
आज बुलढाण्यातील अनेक भागात कडाक्याच्या थंडीसह दाट धुक्याची चादर बघायला मिळाली. आज बुलढाण्यातील तापमान 11 पूर्णांक 5 दशांश इतक खाली गेलं असून अनेक भागात दात धोक्याची चादर पसरल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल आहे. रात्रीपासूनच दाट धुक्याची चादर असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ही धिम्या गतीने सुरू आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर