- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अन् देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
मराठा आरक्षणासाठी मागच्या 5 दिवसांपासून मुंबईत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आंदोलन करत असताना सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्यातील सरकार विरोधात व जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणीच्या मानवत येथील मराठा समाज बांधवांनी मुंडण आंदोलन केले आहे. तहसील कार्यालया बाहेरच हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली आहे. सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी मागच्या 5 दिवसांपासून मुंबईत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आंदोलन करत असताना सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने राज्यातील सरकार विरोधात व जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणीच्या मानवत येथील मराठा समाज बांधवांनी मुंडण आंदोलन केले आहे. तहसील कार्यालया बाहेरच हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली आहे. सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
Buldhana News : राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत सध्या 'बॅनर वॉर' रंगला आहे.. 'मी धावतो व्होटचोरी रोखण्यासाठी' या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागलेले बॅनर याला कारणीभूत ठरले आहेत.. या बॅनरला प्रत्युत्तर देणारे बॅनर विरोधकांनी विशिष्ट शैलीत लावल्याने वाद निर्माण झाला.. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सकाळी हे बॅनर पाहताच संताप व्यक्त करून बॅनर फाडले .. परिणामी, प्रकरण फक्त बॅनरबाजीत मर्यादित न राहता येट पोलिसांत गेले असून, काँग्रेस चे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
गोंदिया रेल्वे स्थानकावर उभी असलेली रेल्वेची एक्सीडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन ला अचानक आग लागली. यामुळे रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.. मात्र या व्हॅन मधील साहित्य जळून खाक झाले. तर ही आग लागल्यामुळे काही काळापर्यंत रेल्वे गाड्यांचा वेळापत्रक कोलमडले होते... रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही आग आटोक्यात आल्यानंतर आता रेल्वे वेळापत्रक पूर्ववत करण्यात आले आहे.
पश्चिम विदर्भातील सर्वात महत्त्वाचं समजलं जाणारं अप्पर वर्धा धरण 96 टक्के भरलं..
धरणात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे 55 सेमीने उघडण्यात आले..
त्यामुळे वर्धा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे..परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे..
अमरावतीत पुढील दोन दिवस येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे..
नाशिकमधे मराठा आणि ओबीसी समाजाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेत
दोन्ही गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार
मुबंईत सुरू असणाऱ्या मराठा समाज आंदोलनात समाज कंटक घुसल्याचा आरोप करत चौकशी च्या मागणीसाठी मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यलयात आलेत
तर ओबीसी समाजाचे पदाधिकारी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी एकवटले आहेत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड रोडवर असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्रात तुफान राडा झाला. या राड्यामध्ये एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या राड्यामध्ये कला केंद्रातील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौज फाटा कुलस्वामिनी कला केंद्रात दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.
नाशिकच्या नंदिनी नदी परिसरात सापडलेल्या जिलेटीन कांड्यांचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गचे काम सुरू असताना दगड फोडण्यासाठी या जिलेटीन कांड्याचा उपयोग करण्यात आला होता. काम संपल्यानंतर कंत्राटदाराने या कांड्या एका मालवाहू गाडीत ठेवल्या होत्या..कालांतराने गाडीचे पार्ट भंगारमध्ये विक्री करण्यासाठी पाठविण्यात आले. भंगार व्यवसायिकानी त्या मालबाहू गाडीतील मुदतबाह्य जिलेटीन च्या कांड्या ची विल्हेवाट लावण्यासाठी नाशिक शहरातील नंदिनी नदीच्या काठावर फेकून दिल्या होत्या. ऐन गणेशोत्सव सणांच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात जिलेटीन च्या कांड्या रविवारी आढळून आल्यानं खळबळ उडाली होतो. Cctv च्या माध्यमातून पोलिसांनी माग काढत याप्रकरणाचा शिताफीने तपास केला आहे. यात कोणत्याही घातपात घडविण्याचा प्रकार नसून स्फोटकाची विल्हेवाट लावण्याबाबत निष्काळजीपणा उघडकीस आला आहे, त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने एका वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येतील ही धक्कादायक घटना आहे. चंद्रकांत माळगे असे आत्महत्या केलेल्या 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती, तांदूळवाडी, पिंजरवाडी, संगदरी या परिसरात देखील यंदा अतिवृष्टी झाली. सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके नष्ट झाली. हाती काहीच लागणार नाही या विवंचनेत शेतकरी चंद्रकांत माळगे होते. त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा विचार त्यांना सतावत होता. त्यातूनच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती माळगे यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतायत.
बडतर्फ केलेले पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाईत घडलीय. सर्व कुटुंबीय गौरी - गणपतीच्या सणासाठी नागदरा या गावी गेले होते. अंबाजोगाई येथील घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच होते.रात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. बदलीनंतर बीड येथे त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेंव्हापासून ते नैराश्यात होते.
सोलापूर ग्रामीणनंतर सोलापूर शहरात देखील डॉल्बी बंदीचे आदेश
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत डॉल्बी वापरण्यास पोलिसांनी केली बंदी
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठोपाठ पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरात देखील डॉल्बी बंदीचे दिले आदेश
1 ते 7 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि ईद-ए-मिलाद कमिटी यांचेकडून आयोजीत मिरवणूकीमध्ये डॉल्वी सिस्टीमचा वापर करणेस बंदी
मागील काही दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोलापूरकरांच्या वतीने करण्यात येतं होती
यासाठी विविध आंदोलन, मोर्चे, सह्याची मोहीम इत्यादी गोष्टी सोलापूरकरांनी केलेल्या होत्या
या सर्व चळवळीला आता यश आल असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डॉल्बीच्या वापरावर बंदी करण्यात आलीय
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश मिळू दे यासाठी मराठा बांधवांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाला अभिषेक घालून साकडे मागितले आहे. यावेळी शेकडो मराठा बांधव शिखर शिंगणापूर येथे उपस्थित होते. यावेळी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला. नंतर मराठा बांधवांनी शंभू महादेवाला साकडे घालत मराठा समाजाला न्याय मिळावा त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी साकडे देखील घातले..
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश मिळू दे यासाठी मराठा बांधवांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाला अभिषेक घालून साकडे मागितले आहे. यावेळी शेकडो मराठा बांधव शिखर शिंगणापूर येथे उपस्थित होते. यावेळी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक देखील घालण्यात आला. नंतर मराठा बांधवांनी शंभू महादेवाला साकडे घालत मराठा समाजाला न्याय मिळावा त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी साकडे देखील घातले..
मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाइन रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला आहे. धामणगाव येथे पाईपलाइन रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी आदळल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विलास बबन पाटील (वय 50) असे असून ते लापे गावातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. कामावरून घरी जात असताना ही घटना घडली. दुचाकी खड्ड्यात आदळल्यानंतर तोल जाऊन ती थेट डंपरखाली गेली आणि दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. तसेच राज्यभर पाऊसही कोसळत आहे. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.