Maharashtra Live blog Updates: लक्ष्मण हाके वांगदरीत दाखल, भरत कराड यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मे 2023 मध्ये मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल. या दौऱ्यात...More
सातारा : जिल्ह्यात पावसाची पुन्हा एकदा दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरी धोधो कोसळत असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रस्त्यांवर पाणी साचलं आहे, तर शेतकऱ्यांची खरीप हंगामातील काढणीची कामं अडथळ्यात आली आहेत. कोसळधार पावसाचा खेळ जिल्ह्यात सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
रायगड : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या मनेरी नानवली समुद्र किनारी पुन्हा एकदा अंमली पदार्थांचा मोठा साठा सापडला आहे. हा अमली पदार्थांचा साठा दिघी सागरी पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. हा सापडलेला अमली पदार्थांचा साठा समुद्रकिनारी वाहून माहिती समोर आली आहे. एकूण 11 किलो 966 ग्रॅम वजनाचा ‘चरस’ हा अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 59 लाख 83 हजार रुपये इतकी असल्याचे समजते. या प्रकरणाचे अधिक चौकशी दिघी सागरी पोलीस करत आहेत.
मुंबई : गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल, जो २०१८ मध्ये २७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता, तो विस्तारित कोस्टल रोड प्रकल्पात अडथळा ठरत असल्याने मुंबई महापालिकेने तो पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल पश्चिम द्रुतगती मार्गाशी थेट जोडणारा असून, गोरेगाव–मालाडमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. पालिका प्रशासनाने त्या जागी दुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, मात्र सध्या विरोधामुळे वाद वाढताना दिसतो आहे.
मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले होर्डिंग
महाराष्ट्रात १९६० पासून गेल्या ६४ वर्षाच्या काळात आता पर्यंत एकूण १२ मराठा मुख्यमंत्री झाले.
मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसचं का?, म्हणून होर्डिंगवर उल्लेख
देवेंद्र फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होर्डिंगवर उल्लेख
2021 साली उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घालविले.
अज्ञात व्यक्तीने लावले वैजापूर शहरात होर्डिंग्ज
सोलापूर : सोलापुरात पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, आणि आता पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं असून, नव्याने सुरु झालेल्या पावसामुळे सोलापूरकरांची चिंता आणखी वाढली आहे.
भंडारा : तुमसर पंचायत समितीचे भाजपचे माजी पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले यांनी त्यांच्या समर्थकांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. नंदू रहांगडाले हे सध्या भाजपचे पंचायत समिती गट नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात नंदु रहांगडाले यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तुमसर नगरपालिकेची आगामी काळात निवडणूक होत आहे. या दृष्टीने हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जातोय. नंदू रहांगडाले हे भाजपच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य निवडून आले असले तरी, ते शरद पवार पक्षाचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात.
लातूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज वांगदरी गावाला भेट देऊन आत्महत्या केलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी हाके म्हणाले की, “भरत कराड याचा ओबीसी समाजाच्या आरक्षण लढ्यात बळी गेला आहे. त्याच्या घराची अवस्था पाहिल्यानंतर लक्षात येते की समाजाची खरी परिस्थिती किती गंभीर आहे. हा सरकारने घेतलेला बळी आहे. जर शासनाने मदत केली नाही, तर ओबीसी बांधव एकत्र येऊन मदत करतील.”
ते पुढे म्हणाले की, 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने काढलेल्या GR मुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. एकीकडे बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट सुरू असताना आता शासनानेच मराठा समाजाला प्रमाणपत्र काढून देण्यासाठी GR काढला आणि त्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, असे सांगणे हे धडधडीत खोटे आहे. अशी टीका त्यांनी केली.
जालना : सरकारच्या दोन सप्टेंबर रोजीच्या जीआरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावे, या मागणीसाठी 15 तारखेला जालन्यात बंजारा कृती समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. बंजारा कृती समितीच्या वतीने आज जालन्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये या मोर्चाचे नियोजन करण्यात आलं असून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता मूळ टक्केवारीतच ST प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुर्डू ग्रामपंचायतच्या बेकायदा मुरूम उपसा प्रकरणी गुन्हा दाखल झालेले ग्रामसेवक मोहन पवार यांचा अहवाल जिल्हा परिषद मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांनी मागविला असून यानंतर पवार यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. कुर्डू येथील बेकायदा मुरूम उपसा प्रकरणात अजित पवार यांनी केलेला फोन वायरल झाला आणि हे प्रकरण राज्यभर गाजू लागले. नुकताच यश सर्व प्रकाराचा अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला असून यामध्ये हा मुरूम उपसा संपूर्ण बेकायदा असल्याचे समोर आल आहे . आता या सर्व प्रकाराची जबाबदारी स्थानिक ग्रामसेवक मोहन पवार यांच्यावर असताना त्यांनी ही कारवाई केली नसल्याने त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. आता या सर्व प्रकरणाचा अहवाल माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आला असून या अहवालानंतर ग्रामसेवक मोहन पवार यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल असे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले आहे.
Beed News: बीडच्या परळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली.. हा प्रकार मध्यरात्री घडला परंतु सकाळपर्यंत याबाबत कोणालाही माहिती नव्हती.सकाळी घरातील मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली.शोभा मुंडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर आरोपी तिचा पती तुकाराम मुंडे हा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता.
Beed News: बीडच्या परळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली.. हा प्रकार मध्यरात्री घडला परंतु सकाळपर्यंत याबाबत कोणालाही माहिती नव्हती.सकाळी घरातील मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली.शोभा मुंडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर आरोपी तिचा पती तुकाराम मुंडे हा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता.
Beed News: बीडच्या परळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली.. हा प्रकार मध्यरात्री घडला परंतु सकाळपर्यंत याबाबत कोणालाही माहिती नव्हती.सकाळी घरातील मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली.शोभा मुंडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर आरोपी तिचा पती तुकाराम मुंडे हा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता.
मिरा- भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील परिमंडळ १ च्या हद्दीत फ्लिपकार्ट माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना भाईंदर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २८ उच्च दर्जाचे मोबाईल फोन आणि तब्बल चार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भाईंदर पोलिसांना फ्लिपकार्ट कंपनीकडून तक्रार मिळाली होती. तक्रारीत जळगाव येथील एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून मोबाईल फोन खरेदीच केला नसतानाही त्याच्या बँक खात्यातून पैसे वळते झाल्याचे नमूद केले होते. तपासात हे स्पष्ट झाले की, बुक न केलेले चार फोन भाईंदर येथे एका संशयिताने रस्त्यावरच स्वीकारले होते.
फ्लिपकार्टकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल चौकशी केली. अखेर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाईंदर उड्डाणपुलाजवळ सापळा रचून मोबाईल फोन घेण्यासाठी आलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली. आणि चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी नागरिकांचे वाहन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक मिळवून CRED.Apk, MParivahan Fake UI.Apk, Adult Chat.Apk यांसारख्या बनावट अॅप लिंक पाठवत. संबंधित लिंकवर क्लिक होताच पीडितांचे मोबाईल हॅक होऊन कॉल फॉरवर्डिंग, SMS फॉरवर्डिंग, पासवर्ड बदल यांसारख्या फिचर्सचा अॅक्सेस आरोपींना मिळायचा. यामुळे त्यांना नागरिकांच्या बँक खात्यांची माहिती आणि ओटीपी मिळत होते. या ओटीपीचा वापर करून आरोपी फ्लिपकार्टवर महागडे मोबाईल फोन खरेदी करून ते इतरांना विकत आणि त्यांची देखील फसवणूक करत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणीच्या निवडीला देखील वेग
भाजपच्या कार्यकारिणीत धक्कातंत्र मिळण्याची शक्यता
अकार्यक्षम लोकांना डच्चू तर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार
येत्या महिन्याभरात भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नव्या कार्यकारिणीकडे सर्वांचे लक्ष
भाजपची नवी कार्यकारिणीत जवळपास ५० जणं असणार
Crime News : जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या मामाचा पतीने खून केल्याची घटना घडली असून यामुळे भुसावळ शहर हे हादरले आहे. सुभान शेख याचे गेल्या काही दिवसापासून पत्नी सईदा यांच्यात वाद सुरू होता .दोन दिवसापूर्वी पत्नी घर सोडून माहिती गेल्यानंतर कौटुंबिक वादातून तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री नातेवाईकांची बैठक घेतली असता, यावेळी वाद चिघळूण आला असून सुभान शेख ने पत्नीचा मामा समद शेख यांच्या छाती मान पोटावर चाकूने सपासप वार केले तसेच सासरा जमील शेख याच्यावरही वार केले असून यात समद शेख याचा मृत्यू झाला आहे तर जखमींना भुसावळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे,जावई सुभान शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, या घटनेने भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे
Beed News: बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता 25 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. समाज माध्यमातून होणाऱ्या पोस्टचे पडसाद रस्त्यावरून तू लागले आहेत बॅनरबाजीमुळे अनेक ठिकाणी तणावही निर्माण झाला होता.
तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नवरात्र उत्सवाची सुरुवात या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी आजपासून 25 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतील. अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या दरम्यान काढण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास शस्त्र, सोटे, काठी, बंदूक आदी वापरण्यास परवानगी नाही.
भायखळा के पी रोडवर भीषण अपघात, पार्सल चा ट्रक उलटला
वाहन चालकाची डुलगी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डिवायडरवरून ट्रक पलटी झाला
घटनास्थळी पोलीस दाखल पंचनामा सुरू
मात्र रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर शहरात भाऊ,मैत्रिणीसह जिमला गेलेल्या 20 वर्षीय मुलगी जिममध्ये अचानक चक्कर येऊन पडली.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बीड बायपास परिसरात काल संध्याकाळी घडली. एकुलती एक मुलगी गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रियंका अनिल खरात वय 20 रा. बीड बायपास असं मयत झालेल्या मुलीचे नाव आहे.प्रियंका ने बी फार्मसी चे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केला आहे.
परभणी जिल्ह्यात काल सर्व दूर जोरदार पाऊस बरसलाय त्यातल्या त्यात पूर्णा तालुक्यामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर होता त्यामुळे पूर्णा तालुक्यातील थुणा नदीला पूर आला या पुराच्या पाण्यामध्ये नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामावरील चार मजूर जेसीबी मशीन वर अडकले आहेत समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना जोरदार पाऊस बरसला त्यातल्या त्यात थुना नदीला पूर आला त्यामुळे पाणी वाढल्याने रात्रभर हे मजूर याच मशीनवर बसून आहेत सुरक्षित आहेत मात्र त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असुन पुराचे पाणी ही कमी झाले आहे.पुर्णेचे नायब तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक हे नदीकाठी बसून असून आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
जेसीबी वर अडकलेल्या मजुरांची नाव
विक्की सिंग लक्ष्मण सिंग
सलाउद्दीन सिदिक्की
शिवकुमार
सदाकत अली
भिवंडी तालुक्यातील पडघा डोहाले गावातील एका चिकन कंपनीचा कचरा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उंबर्डे डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या घंटागाडी चालकाच्या मदतीने हा कचरा टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे .
कंपनीतून निघणाऱ्या या कचऱ्याला उग्र वास येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अखेर संशय व्यक्त करणाऱ्या नागरिकांनी या घंटागाडी चालकाला रंगेहात पकडले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल मुसळधार पाऊसाने धुमाकूळ घातला होता.त्यामुळे गुंडा गावाच्या शिवारात ओढ्याना पूर आलेला होता कामानिमित्त शेतात गेलेल्या दोन महिला या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या सखुबाई भालेराव आणि गयाबाई सारोळे असे पुरात पाहून गेलेल्या महिलांचे नावे आहेत. गावकऱ्यांच्या वतीने कालपासूनच ओढ्याच्या पाण्यात उतरून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होत अखेर 12 तासानंतर आज पहाटेच्या सुमारास त्यांचे मृतदेह शोधण्यामध्ये गावकऱ्यांना यश आल आहे,दोन्ही महिलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले आहेत हे मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये क्षविच्छेदनासाठी पाठवले आहेत
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल मुसळधार पाऊसाने धुमाकूळ घातला होता.त्यामुळे गुंडा गावाच्या शिवारात ओढ्याना पूर आलेला होता कामानिमित्त शेतात गेलेल्या दोन महिला या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या सखुबाई भालेराव आणि गयाबाई सारोळे असे पुरात पाहून गेलेल्या महिलांचे नावे आहेत. गावकऱ्यांच्या वतीने कालपासूनच ओढ्याच्या पाण्यात उतरून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होत अखेर 12 तासानंतर आज पहाटेच्या सुमारास त्यांचे मृतदेह शोधण्यामध्ये गावकऱ्यांना यश आल आहे,दोन्ही महिलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले आहेत हे मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये क्षविच्छेदनासाठी पाठवले आहेत
Beed Crime: बीड जिल्ह्यात मारहाण अपहरण या घटनांचे सत्र सुरूच आहे. बीडच्या गोरे वस्ती येथील नागनाथ नन्नवरे यांना दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण होत असल्याचं समोर आलं. ही मारहाण झाल्यानंतर नन्नवरे यांचे एका चार चाकी गाडीत अपहरण करण्यात आले. या संपूर्ण घटनेचा थरार चित्रित करण्यात आला आहे. नन्नवरे यांच्या पत्नी दिया नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन व्यक्तींसह अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जातोय. दरम्यान या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीनेच हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा संशय आहे. या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केलाय. मात्र दिवसाढवळ्या मारहाण करून अपहरण झालेल्या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Beed Crime: बीड जिल्ह्यात मारहाण अपहरण या घटनांचे सत्र सुरूच आहे. बीडच्या गोरे वस्ती येथील नागनाथ नन्नवरे यांना दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण होत असल्याचं समोर आलं. ही मारहाण झाल्यानंतर नन्नवरे यांचे एका चार चाकी गाडीत अपहरण करण्यात आले. या संपूर्ण घटनेचा थरार चित्रित करण्यात आला आहे. नन्नवरे यांच्या पत्नी दिया नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन व्यक्तींसह अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जातोय. दरम्यान या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीनेच हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा संशय आहे. या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केलाय. मात्र दिवसाढवळ्या मारहाण करून अपहरण झालेल्या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
शिर्डीत भिक्षेकऱ्यांची वाढलेली संख्येचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आता भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलंय.. ज्या वयात पाठीवर दप्तर आणि हातात पुस्तकं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात खांद्यावर हार-फुलांची टोपली आणि भिक्षेसाठी पुढे पसरलेले हात, हे चित्र शिर्डीच्या रस्त्यांवर दिसायला लागलंय.. साईंच्या दारात दररोज दिसणारे हे वास्तव बदलण्यासाठी आता शिर्डी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.. भिक्षा मागणाऱ्या 12 मुलांची सुटका करत त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. बालकल्याण समितीने या सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहांमध्ये केली असून तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे.. पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरी आणि बालभिक्षेकरी प्रवृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..
केंद्र सरकारने 2027 साली जात निहाय जनगनना करण्याच निर्णय घेतला आहे व हीच मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत होती. 1931 नंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे. या कामाला आतापासून वेग आल्याचं दिसत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश काढून राज्यातील ही जनगणना सुरळीत पार पाडावी यासाठी संनियंत्रण व अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 14 जणांची समिती नेमली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं राज्य ओबीसी कर्मचारी व अधिकारी महासंघाने स्वागत केला आहे. 2027 साली होणाऱ्या जनगणनेची तयारी राज्य सरकारने आतापासून सुरू केल्याने जनगणनेच्या कामाला वेग येणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शविल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या टिसी काढण्यासाठी पालकांनी सामुहिक अर्ज केला आहे. त्यामुळे मराठा-ओबीसी वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
घाटकोपर च्या एलबीएस रोड वर भीषण अपघात
बॅरिकेटिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर
तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती
कार मध्ये असलेल्या दोन तरुणी आणि एक तरुण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप
मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक...मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता
शिंदेंच्या शिवसेनेत विभागप्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजीनाट्य कायम...उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेऊनही तोडगा नाहीच...महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी न परवडणारी...
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घरात सध्या दिशा पटनीचे वडील, निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पटनी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसेच भिंतीवर चार-पाच फायरिंग केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मे २०२३ मध्ये मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates: लक्ष्मण हाके वांगदरीत दाखल, भरत कराड यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट