Maharashtra Live Blog Updates: कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलची आग आटोक्यात, 43 रुग्णांचा जीव वाचला
Maharashtra Live Blog Updates: 5 जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: शक्तीपीठ महामार्गविरोधात आंदोलन केल्याने राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजू...More
नाशिक : पावसाळा सुरू होताच नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीये. मागील आठवड्यात १६ रुग्ण आढळले, तर आतापर्यंत १३७ रुग्णांची नोंद झालेली आहे. आणि सध्या २५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घट आहे. मागील वर्षी जूनमध्ये १६५ रुग्णांवर उपचार सुरू होते. महापालिकेच्या आरोग्य विभागानं विशेष उपाययोजना सुरू केल्या असून, झोपडपट्टी, नाले व जलसाठ्यांची तपासणी सुरू आहे. डेंग्यूचा प्रसार मुख्यतः Aedes नावाच्या मच्छरांमुळे होतो. हे मच्छर सकाळी आणि संध्याकाळी चावतात आणि घरातल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. डेंग्यूची मुख्य लक्षणं म्हणजे ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, उलटी आणि त्वचेवर लाल चट्टे. लक्षणं दिसताच तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलाय. तर महापालिकेने फॉगिंग, औषध फवारणी आणि जनजागृती मोहिमा सुरू केल्या आहेत. तरीसुद्धा नागरिकांनी घरात पाणी साचू देऊ नये, डेंग्यूचा ताप ओसरल्यावरही रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. त्यामुळे रक्ताच्या तपासण्या आवश्यक असल्याचेही पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी आवाहन केलंय.
साताऱ्यातील कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. यावेळी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर 43 रुग्ण उपचार घेत होते. अचानक आग लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली. पण वेळीच सर्व रुग्णांना सुरक्षितस्थळी नेण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटने गॅसच्या पाईपला आग लागल्याची समोर आले आहे. आग लागल्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलमध्ये धुराचे लोट पसरले होते. आगीमुळे आणि धुरामुळे रुग्णांमध्ये आणि नातेवाईकांच्या भीतीचे वातावरण पाहायला मिळालं. पेशंट भीतीने पळापळी करत होते. हॉस्पिटल सुरक्षेच्या बाबतीत कमी पडल्याची तक्रार करत रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
धाराशिवमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकऱ्यावर गुन्हे दाखल
महामार्ग अडवला आणि जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून शेतकऱ्यावर गुन्हे दाखल
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी केला होता रास्ता रोको
एक तासापेक्षा जास्त काळ रस्ता अडवल्यामुळे धाराशिव मधील शेतकऱ्यावर धाराशिव पोलिसांकडून गुन्हे दाखल
राज्यातील 8213 गावांमध्ये अद्याप शाळेची सुविधा नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे
या गावांपैकी 1650 गावांमध्ये प्राथमिक शाळा, तर 6563 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नसल्याचे निदर्शनास आले आहे
राज्यातील 5 हजार 373 शाळांमध्ये वीज, 530 शाळांमध्ये पिण्याचे पाणी, 3 हजार 353 शाळांमध्ये मुलींसाठी तर 5124 शाळांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र शौचालय नसल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्य सरकारकडून पारनरचे आमदार आमदार काशिनाख दाते यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर
गडचिरोली : चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी पुलाला लागल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्तीसगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून पर्लकोटा नदी ही छत्तीसगड मधून भामरागडकडे वाहते. त्यामुळे पूलावर पाणी चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नदीवर नवीन पूलाचे बांधकाम करण्यात करण्यात येत असले तरी ते अपूर्ण आहे. त्यामुळे सध्या जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने पूलावर पाणी आल्यास तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटू शकतो. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यातील सहा प्रमुख जिल्हा मार्ग पुरामुळे बंद होते. आज सकाळी सर्व मार्ग सुरू झाले आहेत.
नालासोपारा : नालासोपारा बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्या प्रकरणात दोन पोलिस आणि एका दलाला वर गुन्हे दाखल
श्याम शिंदे, राजेश महाजन असे पोलिसांचे नाव आहे तर लाजपत लाला असे दलालाचे नाव आहे.
काल मंगळवारी बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात या पोलिसांचे नाव लिहिली होती.
बांधकाम व्यवसायातील आर्थिक व्यवहारातून दलाला मार्फत शिंदे आणि महाजन या पोलिसांनी मानसिक छळ केला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
आचोळे पोलीस ठाण्यात
कलम १०८, ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात पोलिसांनी दोन्ही शिक्षकांचे मोबाईल जप्त केले आहेत
सदरील मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहे
पोलीस कोठडी संपण्यापूर्वी मोबाईल मधील डेटा रिकव्हर करून ताब्यात घेतला जाणार आहे
तर कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे
सध्या शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
बोगस जात प्रमाणपत्रासंदर्भातील राज्य सरकारच्या दोन अध्यादेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस नाराज?. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अल्पसंख्यांक नेत्यांची अजित पवारांकडे नाराजी. किरीट सोमय्यांच्या एकांगी भूमिकेमुळे दोष नसलेला मुस्लिम समाज यात भरडला जात असल्याची भावना. जन्मदाखले देण्याचे थांबवल्याने आणि अनेक जन्म दाखले सरसकट रद्द झाल्याने मुस्लिम समाजातील शिक्षण आणि मालमत्ता खरेदी-विक्रीची कामं थांबलीत.
सोमय्यांच्या भूमिकेवर अजित दादा नाराज!. या संदर्भात लवकरच लावणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक. अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे सोमय्यांना आवर घालण्याची मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती. बनावट जात प्रमाणपत्रांचा मुद्दा सोमय्यांनी एका धर्माशी जोडल्याने दोष नसलेल्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा अजित पवार मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे मांडणार. राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांची माहिती. अजित पवार आणि बावनकुळे यांच्या बैठकीनंतर काय निर्णय होतो याकडे राष्ट्रवादी आणि अल्पसंख्यांक समाजाचे लक्ष.
शिवसेना कोणाची प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
उद्धव ठाकरेंच्या वतीने चिन्ह आणि पक्षाच्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयात उल्लेख
तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे तातडीने सुनावणी घ्यावी - उद्धव ठाकरेंचे वकील देवदत्त कामतांचा युक्तिवाद
आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रकरणी जसे अंतरिम आदेश देण्यात आले होते तशी अपेक्षा आहे - उद्धव ठाकरेंचे वकील देवदत्त कामतांचा युक्तिवाद
यापूर्वीच ठाकरेंचा युक्तिवाद फेटाळून लावला गेला आहे .. दोन निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत - शिंदेंच्या वकिलांचा प्रतिवाद
आता तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता काय - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांचा सवाल
१६ जुलैला सुनावणी होईल - न्यायमूर्ती एम एम सुंदरेश
गडचिरोली : पुलावरून पाणी वाहत असताना नको ते धाडस करत वाहन पाण्यात टाकल्याने दुचाकीस्वार वाहून गेल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील सती नदी पूलावर घडली. नशीब बलवत्तर म्हणून तेथे उपस्थित कामगार आणि पोलिसांनी त्या वाहून जाणाऱ्या इसमास वाचवण्यात यश मिळाले. अजय बाळकृष्ण रामटेके, वय 40 वर्षे, रा. श्रीराम नगर, कुरखेडा असे त्या इसमाचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. सती नदीच्या पूलावरूनही पाणी वाहत असताना अजय रामटेके यांनी धाडस करीत वाहन टाकले. मात्र क्षणातच ते वाहून गेले. यावेळी पुलावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस जवान आणि कामगारामी दोरीच्या साह्याने वाहून जाणाऱ्या वाचवण्यात यश मिळवले. यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना नुसत धाडस करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काही वेळात वरळी डोम येथे करणार पाहणी
पाच जुलै रोजी वरळी डोम येथे होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाचे नेते करणार पाहणी
मनसे कडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब करणार पाहणी..
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद; सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंकडून तातडीने सुनावणी घेण्याची विनंती
तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससारखा दिलासा हवा आहे , स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका आहेत , ठाकरेंकडन विनंती
16 जुलैला होणार सुनावणी
गडचिरोली : सिरोंचा येथील नगराध्यक्ष शेख फरजाना, उपनगराध्यक्ष शेख अब्दुल रऊफ अब्दुल गफार यांच्यासह सभापती नरेश कुमार अलोणे, नगरसेवक राजेश बंदेला, दुग्याला साईलू, अकुदरी पोचम, भवानी गणपुरवार यांनी आदिवासी विद्यार्थी संघाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सिरोंचा नगरपंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व होते. मात्र आता आदिवासी विद्यार्थी संघाचे शिलेदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने अविसंला मोठा धक्का बसला आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे एनडीएत उभारणी
थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. पावणे अकरा वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
Pune News: लोणावळयातील तुंगार्ली गावातील ग्रामदैवत जाखमाता मंदिर व शेजारी असलेल्या हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली आहे. जाखमाता मंदिरातील दानपेटी ही जड असल्याने ती जागेवरच फोडण्यात आली असून हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेऊन शेजारी असलेल्या जाखमाता उद्यानात जाऊन फोडली आहे. हनुमान मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. अंगावर रेनकोट घातलेला एक चोरटा यामध्ये दानपेटी उचलून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. लोणावळा शहरांमधील चोरीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. सध्या चोरट्यांनी देवस्थानच्या पेट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मागील दीड महिन्यांमधील मंदिरांमधील चोऱ्यांचा हा पाचवा प्रकार आहे. तुंगार्ली ग्रामस्थांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांना माहिती दिली आहे. तसेच ग्रामस्थांकडून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरांमधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे पोलीस देखील या घटनेचा तपास करत आहेत.
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला सहा महिने उलटून गेले.मात्र अद्याप या प्रकरणातला एकआरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.त्याला तात्काळ अटक करा त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे त्याला अटक न केल्यास मी लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी आज जाहीर केलंय.
बीड: सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला सहा महिने उलटून गेले.मात्र अद्याप या प्रकरणातला एकआरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.त्याला तात्काळ अटक करा त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे त्याला अटक न केल्यास मी लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी आज जाहीर केलंय.
बीडमध्ये सुनावणीच्या दिवशी न्यायालयाच्या परिसरात आरोपींचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे पक्ष चिन्ह गाड्या मोठ्या संख्येने आणून वातावरण भयभीत करून कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.वेळोवेळी मागणी करून देखील सर्व आरोपी एकाच जेलमध्ये आहेत त्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवावं.असं न झाल्यास मी कठोर निर्णय घेणार असून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलाय.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इन कमिंग सुरूच आहे बडगुजर यांच्यां पाठोपाठ आता माजी आमदार अपुर्व हिरे कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. शेकडो कार्यकर्ते नाशिकहून मुबंईच्या दिशेने रवाना होत आहेत.
रायगड मधील सर्व धबधबे प्रवाहित आले असून या धबधब्यावर फिरण्यासाठी मुंबई पुणे येथून हजारो पर्यटक येत असतात मात्र या निसर्ग पर्यटनाचा आनंद घेत असताना तेवढेच अपघात देखील होतात हीच बाब लक्षात घेत यंदा जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून माणगाव मधील डेंजर झोन मध्ये येणाऱ्या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.मात्र या सूचनांचे पालन न करता काही महाशय बिनधास्त उतरतात आणि आपला जीव गमवून बसतात. अशीच घटना माणगाव मधील कुंभे परिसरात असणारे चनाट धबधब्यावर काल घडली l.मुंबईवरून फिरण्यासाठी आलेल्या चौघांपैकी एकाचा खोल पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाला. ऋषिक वासुदेव पाथीपाका अस या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 22 वर्षांचा होता. मुंबईच्या जोगेश्वरी मधील गांधी नगर मधून तो आपल्या 3 मित्रांबरोबर फिरण्यासाठी आला असता ही घटना घडली. त्यानंतर 24 तासानंतर त्याला घनदाट जंगलात असलेल्या चनाट धबधबा परिसरातून एस व्ही आर एस एस या बचाव पथकाकडून बाहेर काढण्यात आले. माणगाव तालुक्यातील चनाट परिसरातील धबधब्यावर देखील बंदी असताना असे तरुण बिनधास्त निसर्ग पर्यटनाचा काळजी न घेता किंवा येथील तज्ञांचा सल्ला न घेता आनंद लुटत आहेत. त्यामुळे अशा घटना घडत असल्याच पाहायला मिळतय.
विधानसभेत आज नाना पटोले एक दिवसाच्या निलंबनानंतर पुन्हा कामकाजात सहभागी होतील. आज देखील नाना पटोले आणि विरोधक बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आक्रमक होताना पाहायला मिळतील. विधानसभेत 32 शिराळा जिल्हा सांगली या गावातील नागपंचमीच्या सणाला जिवंतनाथाची पूजा करण्यावर मागील काही वर्षांपासून शासनाद्वारे घालण्यात आलेली बंदी उठवावी ही मागणी आमदार सत्यजित देशमुख करताना पाहायला मिळतील देशात ज्या पद्धतीने जल्लीकट्टू आणि बैलगाडा शर्यती यांना कायद्याची पाहताना येतात ज्याप्रमाणे परवानगी देण्यात आलेली आहे नागपंचमीच्या सणासाठी पूर्वापार पद्धतीने चालत आलेल्या जिवंत नागाच्या पूजेसाठी परवानगी द्या ही मागणी पाहायला मिळेल.
धाराशिव जिल्हा परिषद शाळा म्हटलं की घटलेली पटसंख्या हे चित्र डोळ्यासमोर येत. मात्र तुळजापुरातील सावरगावात शाळेत पटसंख्या आहे. मात्र सोडलेल्या व्यवस्थेने शाळा मोडकळी आली आहे. येथील शाळेत 18 वर्ग खोल्या या धोकादायक आहेत. त्याच्या पाडकामाच्या आदेशही देण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांना दुसऱ्यावर खोल्या नसल्याने धोकादायक इमारतीतच शिक्षण घ्यावं लागत आहे. तसेच एका वर्ग खोलीत 80 ते 85 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. जिल्हा परिषदेची कन्या शाळा आहे मात्र मुलींसाठी स्वच्छतागृह नीट नाही. शालेय पोषण आहारात मध्यान भोजन दिले जाते. मात्र तो भोजन शिजवण्यासाठीच किचन शेड ही नीट नाही. शाळेच्या सुरूस्तीकडे लक्ष द्याव अशी मागणी शिक्षकांसह विद्यार्थी, ग्रामस्थ करत आहेत.
हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात धक्कादायक घटणा घडली आहे. ३० ते ३५ वयोगटातील एका अनोळखी महिलेने सीएसएमटी-पनवेल लोकलमधून प्रवास करताना आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाला सोडून पळ काढल्याची घटना घडली आहे. लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या बहाण्यान बाळ सोपवून ती महिला सिवुड स्थानकावर न उतरता पळून गेली.
शिवसेना मंत्र्यांची निधीवाटपावरून झाली महत्वाची बैठक
शिवसेनामंत्र्यांच्या झालेल्या बैठकित तीनही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावर एकमत
निधीवाटपवरून तीनही पक्षातील नाराजी टाळणासाठी शिवसेना मंत्र्यांमध्ये समसमान निधीचा फाॅर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती
लवकरच याबाबत तीनही पक्षातील प्रमुख नेते किंवा समन्वय समितीच्या बैठकित याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता
निधीवरून आजच भाजप आमदार विनोद अग्रवाल आणि संजय पूरम यांनी मंत्री भरत गोगावलेंची वाट अडवत जाब विचारला
निधीवरून मंत्री आणि आमदारांमध्ये होणारी ही खडाजंगी रोखण्यासाठी महायुतीतील समन्वय समितीत किंवा तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये अधिवेशन काळात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
नागपूरमध्ये स्कूलबस सुरक्षा याचिकेवर सुनावणी करतांना शहरत ८३७ स्कूल बस अवैद्य परवान्यावर धावत असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे शालेय बिद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
जिल्हा स्तरीय समित्यांकडून वाहनाची नीट पडतडणी होत नसल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले. सोबत अपात्र वाहनावर पोलीस कारवाई करत नसल्याचे समोर आले.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यात ही बाब पुढे आली
धाराशिव मधील भूम तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखत आपला गड कायम राखला. पंधरा सदस्य असलेल्या संघावर राहुल मोटे यांच्या पॅनलचे सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत राहुल मोटे यांनी खरेदी विक्री संघावरील वर्चस्व कायम राखल आहे. खरेच विक्री संघाच्या निवडणुकीसाठी 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 47 अर्ज मागे घेतले त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. आमदार तानाजी सावंत या निवडणुकीकडे लक्ष देतील असं कार्यकर्त्यांना वाटत होतं मात्र त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं. त्यामुळे सावंत समर्थकांचा हिरमोड झाला.
किरकोळ कारणावरून धक्का लागल्याने आरोपी सागर झेंडे याने हातातील बियरची बॉटल फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या गुन्हेगाराची मस्ती बीड पोलिसांनी उतरवली.. आरोपी सागर झेंडेला पोलिसांनी अटक करत शहरातून फिरवले.
पोलीस स्टेशनसमोरचं असलेल्या गांधी चौकातील अर्बन बँकेच्या एटीएम मशीनची खेळछाड करुन एका टोळीनं हजारो रुपयांची रक्कम काढली होती. ही बाब बँक मॅनेजरच्या लक्षात येताचं तिथं लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून टोळीतील एकाला भंडारा पोलिसांच्या डीबी पथकानं शहरातील एका लॉजवरून अटक केली. त्याचे अन्य सहकारी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हरियाणा येथील मोहम्मद अर्शद (३२) असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे. या टोळीनं भंडारा शहरासह आणखी कुठं कुठं असा एटीएम फ्रॉड केलाय याचा शोध आता भंडारा पोलीस घेत आहे.
विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या विजय पवार विरोधात आणखी एका पालकाने तक्रार केलीय. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केलीय.
मुंबईच्या वांद्रे कला नगर परिसरात त्रिभाषा सूत्रा वरून ठाकरे सरकारने मराठीचा घाट केला अशी बॅनरबाजी
थेट उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवस्थानाजवळील परिसरात ही बॅनर बाजी करण्यात आली आहे
बॅनर वर “त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारल होतत विसरलात की काय? असा थेट प्रश्न ठाकरे गटाला विचारण्यात आला आहे
“सत्य बाहेर आले घशात गेले दात उबाठानेच केला मराठीचा घात” असा आशय
तसेच बॅनरवर महाराष्ट्र शासनाचे समाजमाध्यमांवरील संकेतस्थळ डीजीआयपीआर यावरील पोस्ट ही मांडण्यात आलेली आहे
कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे नाराज नेते संजय पवार आज मातोश्रीवर
नाराज व्यक्त केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना घेतलं बोलवून
संजय पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, दुपारी बारा वाजता घेणार उद्धव ठाकरे यांची भेट
संजय राऊत, सुनील प्रभू, अनिल परब यांनी संजय पवार यांच्याशी फोनवरून साधला संवाद
रामटेक विधानसभा मतदार संघात बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभे राहिल्याने निलंबन झालेले माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे काँग्रेसने निलंबन मागे घेतले आहे. काल दिल्ली येथे झालेल्या बैठकी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाअर्जुन रेड्डी यांची सूचनेने हा निर्णय घेण्यात आला.
वर्ग शिक्षकाने वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तर आले नाही. त्यावरून वर्ग शिक्षकाने रागावले व तुझ्या आई-वडिलांना तू अभ्यास करत नाही. हे मी सांगेन असं रागावल्याच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात ही धक्कादायक व तितकीच चिंता वाढविणारी घटना घडली आहे.
शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्याने राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल
बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका
राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल
कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलची आग आटोक्यात, 43 रुग्णांचा जीव वाचला