- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही; शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live Blog Breaking: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर. राज्यभरात पावसाची स्थिती कशी?
पार्श्वभूमी
अहमदाबाद दुर्घटनेत विमानातील सिनिअर क्रू असलेली मुलुंडच्या श्रद्धा धवन यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री अहमदाबाद वरून त्यांचा मृतदेह मुलुंड मधील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कल्पनगरी सोसायटी...More
राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य (scalable) उपाययोजना राबविता येणार आहेत. राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्रिस्तरीय प्रशासकीय संरचना असेल. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ५०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्र वेगाने बदलणारे आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात या धोरणामध्ये आवश्यक ते बदल / सुधारणा करण्यात येतील. त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती, राज्यस्तरीय तांत्रिक समिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र, कृषि विद्यापीठांतर्गत कृषि कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधन व नाविन्यता केंद्र काम करतील.
या धोरणाच्या माध्यमातून राज्यात कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता व नाविन्यतेसाठी एक अग्रगण्य केंद्र निर्माण होईल. या धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा "शेतकरी-केंद्रित वापर", संशोधन, डेटा देवाण-घेवाण वाढेल, स्टार्ट-अप्सना पाठबळ मिळेल आणि यातून महाराष्ट्र डिजिटल कृषि नाविन्यतेमध्ये आघाडीवर राहील, अशी अपेक्षा आहे.
या धोरणाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा "शेतकरी-केंद्रित" वापर करण्यास स्टार्टअप्स, खाजगी कंपन्या / तंत्रज्ञान कंपन्या, कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्रे, खाजगी संस्था, शेतकरी / शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) आदींना चालना मिळेल, असे उपक्रम हाती घेतले जातील. यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅग्रीटेक नाविन्यता केंद्राची संस्थात्मक उभारणी केली जाईल. हे केंद्र या धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी स्वतंत्र, पूर्णवेळ कार्यान्वयन यंत्रणा म्हणून कार्य करेल. ही यंत्रणा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी, नवकल्पनांना प्रोत्साहन, प्रकल्पांची निवड, अंमलबजावणी व अर्थसहाय्य, समन्वय, क्षमता बांधणी इ. धोरणांतर्गत विविध बाबींवर काम करेल.
आयआयटी / आयआयएस्सी सारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार कृषि विद्यापीठांमध्ये कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता आणि इनक्युबेशन केंद्र स्थापण्यात येतील.
डेटा-आधारित शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी उपयोगी ठरतील अशा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. या सुविधा राज्यव्यापी, सुरक्षित, सुसंगत व संमती-आधारित डेटा देवाण-घेवाण सुलभ करतील. क्लाऊड आधारित कृषि डेटा एक्स्चेंज (A-DeX) आणि सँडबॉक्सिंग सुविधा उपलब्ध केली जाईल, या डिजिटल प्लॅटफॉर्मशी केंद्र व राज्य शासनाचे शेती संबंधीत सर्व डेटाबेस जोडण्यात येतील (उदा. अॅग्रीस्टॅक, महावेध, महा-अॅग्रीटेक, क्रॉपसॅप, अॅगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डीबीटी इ.). या एक्स्चेंजद्वारे शेतकरी, त्यांची जमीन, पीक माहिती, स्थानिक हवामान, मृदा आरोग्य, इ. डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम सुदूर संवेदन (Al-enabled Remote Sensing) आणि Geo-spatial Intelligence यांनी युक्त एकात्मिक इंजिन विकसित करण्यात येईल. याद्वारे उपग्रह प्रतिमा, ड्रोन सर्वेक्षण, UAVs आणि IoT आधारित उपकरणांद्वारे संकलित केलेल्या विविध स्रोतांतील स्थानिक माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्यासाठी मदत करेल. ही प्रणाली MahaVedh, FASAL, Bhuvan इ. राष्ट्रीय व राज्य प्लॅटफॉर्मशी API द्वारे जोडण्यात येईल. या प्लॅटफॉर्मचा कृषि, जलसंपदा, महसूल व आपत्ती व्यवस्थापन इ. विभागांना विविध प्रयोजनांसाठी उपयोग करता येईल.
गिरीश महाजन
आम्हाला ही पक्ष वाढवायचा आहे ..पालिका ताकतीने लढवायची अहे. .ज्यांना घेतले ते ही निवडून आले आहेत..काही जेष्ठ आहेत..आप आपसातले काही वाद असतील तर मिटतील
आमच्याकडे मंत्री असलेल्ले अनेक जण मागच्या काळामध्ये टीका करत होते..मात्र आता एकरूप झाले आहेत आता कळत नाही ते दुसऱ्या पक्षात होते
आॅन बावनकुळे रविंद्र चव्हाण अनभिज्ञ
आमचं काही मिसकम्युनिकेशन झालं... हे मी मान्यच करतो… हरकत नही घरचा कार्यक्रम आहे.. त्यांनी मला तारीख माहित नाही असं बोलले असतील… कारण पक्षप्रवेश १-२ दिवसात होईल असं ठरलं होतं… मात्र लगेच झाल्याने गोंधळ झाला…
आॅन बडगुजर विशेष प्रेम
माझं कुणावर विशेष प्रेम नाही, माझं माझ्या पक्षावर प्रेम आहे आणि त्याच्या वाढीसाठी मी केलं
आॅन संजय राऊत दाऊद आरोप
आतापर्यंत तुमच्या सोबत होते तेव्हा काय झाले..हे जेलमध्ये गेलेच नाहीत तुम्ही तर जेलमध्ये ही जाऊन आलात…
अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा....मोठे पक्ष प्रवेश करणार… तुमच्याकडे कोणी राहायला तयार नाही आहे
संजय राऊत बोलतात म्हणून लोकं राहायला तयार नाही, मी आधीही उद्धवजींना सांगितलं होतं…. पक्ष बुडेल त्यांचा
आॅन सीमा हिरे
बडगुजर हे आमच्या विरोधात लढले..आता आमच्याकडे असणारे नेते…. एकवेळी आमचे विरोधी होते.. त्यामुळे नाराजी लवकरच दूर होईल…
आॅन मोठे प्रवेश
काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा यांच्याकडे आता माणसं राहणार नाहीत
Ac - शुभांगी शिंदे प्रकरणी अंबाजोगाईत सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलीयेत.अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेचा पैशासाठी छळ करून तिला जीवे मारण्याची तक्रार तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केली आहे त्यानंतर सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी पीडित कुटूंबातील सर्व सहभागी झाले होते.यावेळी शुभांगी शिंदे हिला न्याय देण्याची मागणी करण्यात आलीये.
पुणे
पुल, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा, पुण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
धोकादायक असलेले पुल, इमारती, वाडे, जाहिरात फलके काढून घ्यावेत असे सुद्धा आदेश
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामाचा आढावा
दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करा, जिल्हाधिकारी यांचे निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी आणि विविध यंत्रणांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली
जिल्ह्यातील धोकादायक तसेच अतिधोकादायक जुने पुल, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके, रेल्वे पुलाचे येत्या 7 दिवसात स्ट्रॅक्चरल ऑडिट करुन त्याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश
अमोल मिटकरी ऑन शरद पवार विधान..
# शरद पवारांनी कार्यकर्ता आढाव्या मेळाव्यात त्यांच्या पदाधिकारी आणि आमदारांना दिलेला आदेश आहे..
# त्यांच्या विधानाला अर्थातच व्यक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जातोय.. संधीसाधूपणा कुणाला म्हटलं? त्यांनी नाव नाही घेतलंय..
# मात्र, सद्यस्थितीत राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी झालेली आहे..
# लोकसभा, विधानसभा आम्ही भाजपसोबत एकत्र लढवल्यात.. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोबत लढण्याच्या तयारीत आहोत..
# शरद पवारांनी काय व्यक्तव्य करावं, हे त्यांचा अधिकार आहे.. अनेक वर्षे त्यांनी राज्यसह देशात राजकारण केलंय, ते ज्येष्ठ नेते आहेत.. त्यामुळे त्यावर आम्ही काही वेगळं बोलणार नाही.
# याआधी अनेक प्रयोग झाले.. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची अगदी टोकाची विचारधारा असतांनासुद्धा साहेबांच्याच नेतृत्वात एकत्र येत मविआ'चे सरकार स्थापन झालं.
Kolh breaking
कोल्हापूर गुन्हा अन्वेषण शाखेकडून 1 कोटी 78 लाखाची रोख रक्कम जप्त
गांधीनगरमधील व्यापाऱ्याचे पैसे चोरणाऱ्या टोळीला अटक
व्यापाऱ्याच्या चालकाच्या सहाय्याने केली पैशाची चोरी
टेम्पोमध्ये ठेवलेली 1 कोटी 90 लाख रुपयांची रक्कम केली होती लंपास
पैसे चोरीसाठी येणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
गुन्हे अन्वेषण शाखेकडून चार आरोपींना केली अटक
बाईट- योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
यवतमाळ: अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाट्यगृहाची पालकमंत्री संजय राठोड यांनी नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची पाहणी केली. नाट्यगृह तातडीने सुरु करण्यासाठी ज्या गोष्टी लगेच करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करा, असे निर्देश यावेळी पालिका प्रशासनाला दिले. नाट्यगृह तातडीने सुरु करण्यासाठी जी कामे लगेच करणे करणे आवश्यक आहे, त्याचे तातडीने अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यासाठी येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी मंजूर करू असे आश्वासन दिले. आतील कामे निधी दिल्यानंतर तातडीने करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. मुख्याधिकाऱ्यांनी नाट्यगृह बांधकामाची सद्यस्थिती व प्रगतीची माहिती यावेळी दिली.
नागपूर मध्ये थ्रेट कॉल नंतर आपत्कालीन स्थिती उतरलेले एयर इंडिगोचे 6E-2706 कोची-दिल्ली विमानाची तपासणी पूर्ण...
तपासणीत कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नसल्याने विमान पुढील उड्डाणासाठी सज्ज..
प्रवाशांची विमानात बोर्डिंग सुरू..
थोड्यावेळात विमान दिल्ली साठी रवाना होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
नागपूर मध्ये थ्रेट कॉल नंतर आपत्कालीन स्थिती उतरलेले एयर इंडिगोचे 6E-2706 कोची-दिल्ली विमानाची तपासणी पूर्ण...
तपासणीत कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नसल्याने विमान पुढील उड्डाणासाठी सज्ज..
प्रवाशांची विमानात बोर्डिंग सुरू..
थोड्यावेळात विमान दिल्ली साठी रवाना होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
अहमदाबाद एआय 172 विमान अपघातानंतर, एअर इंडियाची लंडन-अहमदाबाद सेवा आजपासून सुरू होणार होती. अहमदाबाद-लंडन विमान एआय 171 ऐवजी नवीन कॉल साइन एआय 159 ने चालवले जाणार होते. पण आजची उड्डाण रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारण असल्याने ही विमानसेवा आज रद्द करण्यात आल्याचे सांगितली जात आहेत.
विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचे कॉल आल्यानंतर नागपुरात विमानाची लँडिंग करवण्यात आली असून तपासणी सुरू आहे...
कोच्ची वरून दिल्ली जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची नागपुरात लँडिंग झाली आहे..
पोलिस आणि अग्निशमन दल विमानतळावर दाखल झाले असून विमानाची तपासणी सुरू आहे..
वीस मिनिटापूर्वी विमान नागपूर विमानतळावर उतरला आहे..
अजूनपर्यंत काहीही धोकादायक वस्तू आढळलेली नाही
बीड: बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.. 24 जून रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे..
या सुनावणीसाठी धनंजय देशमुख न्यायालयात उपस्थित होते.. यावेळी त्यांनी सहा महिन्यापासून फरार असलेल्या कृष्णा आंधळे याला जेरबंद करावे. तसेच बीडच्या जेलमध्ये हत्या प्रकरणातील आरोपी असून त्यांना विभक्त करून वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावे.. याबरोबरच कृष्णा आंधळे याचे मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते त्याच्या संपर्कात आहे त्यामुळे त्याच्यापासून आम्हाला धोका असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
शरद पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये येत असतानाचं पक्षाला आज मोठा धक्का बसणार आहे. कारण भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी घड्याळ हाती घेतायेत. स्वार्थासाठी निघालेल्या गव्हाणेंची आम्ही पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. असा दावा आता शरद पवार गटाने केलाय. गव्हाणेंनी विधानसभेपुर्वी 15 ते 16 माजी नगरसेवक अजित पवारांच्या उपस्थितीत आज घड्याळ हाती घेणारेत. आज शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये येणार असताना ही घडामोड घडतेय,
शरद पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये येत असतानाचं पक्षाला आज मोठा धक्का बसणार आहे. कारण भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी घड्याळ हाती घेतायेत. स्वार्थासाठी निघालेल्या गव्हाणेंची आम्ही पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. असा दावा आता शरद पवार गटाने केलाय. गव्हाणेंनी विधानसभेपुर्वी 15 ते 16 माजी नगरसेवक अजित पवारांच्या उपस्थितीत आज घड्याळ हाती घेणारेत. आज शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये येणार असताना ही घडामोड घडतेय,
पुण्यात येरवडा पोलिसांनी काढली आरोपीची धिंड
उधार दारू न देणाऱ्या दारू दुकानादाराला मारहाण करत दारू दुकानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीची येरवडा पोलिसांनी काढली धिंड
येरवड्यामधील एका वाईन शॉपमध्ये दुकानदाराला दुकानात दारू उधार दिली नाही म्हणून रोहित पुष्कराज पिल्ले याने मारहाण करत दुकानाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत ज्या परिसरात घटना घडली.त्याच परिसरात येरवडा पोलीस ॲक्शन मूडमध्ये येऊन आरोपीची धिंड काढली आहे.
पुण्यात तीन तरुणांकडून 3 पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेची कारवाई
तीन तरुणांकडून 03 गावठी बनावटीचे पिस्टल, 02 एक्स्ट्रा मॅक्झिन आणि 9 जिवंत काडतुसे पोलिसांनी केली जप्त
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल
आरोपी अनिकेत संजय मालपोटेसह 2 अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
गुन्हे शाखेचे पोलिस पेट्रोलिंग करत असताना कात्रज च्या जुन्या घाटात तीन तरुण गप्पा मारत थांबलेले पाहायला मिळाले, या तिघांकडे चौकशी केली असता हे तिघेही घाबरून पळून जात होते
पोलिसांनी पकडून त्यांची झाडाझडती घेतल्यानंतर त्या तिघांकडे पिस्टल आणि जिवंत काडतुसे असल्याचं समोर आलं
भंडारा: शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकरांनी हल्ला करत शेतकऱ्याला गंभीर जखमी केलं. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुद्रुक गावाच्या हद्दीत घडली. भैयालाल बनकर असं रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नावं आहे. त्यांच्यावर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
हवामान विभागानं भंडारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तविला आहे. सोसाट्याचा वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं तीव्र स्वरूपाचा हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुढील चार दिवस येलो अलर्ट हवामान विभागानं वर्तविला आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यातील राक्षसभवन थांबा येथे शेतीच्या वादातून दोन गटात वाद झाला.. या वादात महिला शेतकरी सीमा खोले यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात तिघा जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सीमा खोले यांच्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या नावे असलेली शेतजमीन त्या वैती करतात.. मात्र याच जमिनी वरून भावकीतील दीपक खोले नानासाहेब तांबे आणि रामेश्वर अवसरमल यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. आणि याच घटनेत महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून बेल्टने मारहाण झाली. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.
उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण यंदा जून महिन्यातच 50 टक्के च्या पुढे भरले असून धरणात सध्या जवळपास 91 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे. यावर्षी मान्सून पूर्व पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे उजनी धरण वजा 23 टक्क्यातून आधीक 50% असा प्रवास केवळ 30 दिवसात पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी उजनी धरण 3 ऑक्टोबरला पन्नास टक्के भरले होते. यावर्षी मात्र 17 जून रोजी 50% ची पातळी धरणाने ओलांडली आहे.
सध्या पुन्हा एकदा मान्सूनच्या आगमनानंतर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात 14 हजार 642 क्युसिक विसर्गाने पाणी जमा होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढच्या पंधरा दिवसात उजनी धरण 100% भरण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा उजनी धरणा मुळे महापुराची शक्यता तज्ञांकडून वर्तविले जात आहे.
रायगड जिल्ह्यात मध्य रात्रीपासून पावसाची विश्रांती
विश्रांती घेतलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत
मात्र नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ
रायगड जिल्ह्यातले नऊ धरण 100% भरले ... सुतारवाडी,उन्हेरे , पाभरे , संदेरी, खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरे धरणांचा समावेश.
रायगड जिल्ह्यात मध्य रात्रीपासून पावसाची विश्रांती
विश्रांती घेतलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत
मात्र नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ
रायगड जिल्ह्यातले नऊ धरण 100% भरले ... सुतारवाडी,उन्हेरे , पाभरे , संदेरी, खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरे धरणांचा समावेश.
सातारा: एमआयडीसी जवळच्या संभाजीनगर मध्ये दुकानांमध्ये पेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात युवकाने दुकानातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
सातारा शहरालगत असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील संभाजीनगर मध्ये एका दुकानात पेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात चोरट्याने दुकानातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेहल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे... याप्रकरणी अज्ञात दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रायगडच्या नेरळ परिसरात गॅस सिलिंडर मधील फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. कॉम्प्रेसर द्वारे एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरून तो व्यावसायिकांना अव्वाच्या सव्वा किमतीत विकण्याचा प्रकार यामधून समोर आलाय.कर्जतच्या पेटारवाडी परिसरातून हा संपूर्ण प्रकार सुरू होता यानंतर कर्जत पुरवठा विभागाला याची माहिती प्राप्त होताच आरोपी चेतन पांडुरंग खडे वय वर्ष ३७ आणि हर्षद संतोष कालेकर वय वर्ष २१ राहणार कर्जत असे दोघे हा संपूर्ण प्रकार करत होते त्यानंतर या दोघांना नेरळ पोलिस आणि तहसीलदार यांच्या मार्फत ताब्यात घेऊन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कर्जतच्या पेटारवाडी मधील एका पोल्ट्री फार्मच्या मागे हा सगळा प्रकार सुरू असताना पोलिसांनी या आरोपींना रंगेहाथ पकडले.यावेळी 10 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना गॅस सिलिंडर पुरविणाऱ्या अंजली गॅस एजन्सी वितरकावर सुद्धा नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नेरळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गच्चे हे करीत आहेत.
कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची उघडीप
गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ
पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर, राजारामसह 18 बंधारे पाण्याखाली
गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला
राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2500 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे.
तर कुंभी धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे
पर्यायाने पंचगंगा नदीपात्रात पाण्याची मोठी आवक होत असल्याने गेल्या 24 तासात पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.
घटप्रभा मध्यम प्रकल्प 100% भरला असून सांडव्यावरून 300 क्युसेकचा विसर्ग सुरू
जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत
नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
रायगड जिल्ह्यात मध्य रात्रीपासून पावसाची विश्रांती
विश्रांती घेतलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत
मात्र नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ
रायगड जिल्ह्यातले नऊ धरण 100% भरले ... सुतारवाडी,उन्हेरे , पाभरे , संदेरी, खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरे धरणांचा समावेश.
राजू शेट्टी यांचे शिलेदार सावकार मादनाईक भाजपच्या वाटेवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच होणार बैठक
विधानसभेला सावकार मादनाईक यांनी महायुतीला दिलं होतं बळ
राजू शेट्टी यांची तिसऱ्या आघाडीची भूमिका न पटल्याने घेणार निर्णय
विधानसभेला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिलं होतं बळ
साताऱ्यातील महाबळेश्वर,पाटण,जावली आणि सातारा यातील 235 गावांमध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प होतो आहे.कोणाचीही जमीन संपादित न करता,पर्यावरण पूरक असा हा प्रकल्प होतो आहे.याबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दरे या ठिकाणी घेण्यात आली.यावेळी या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात नेमकं काय काय केलं जाणार आहे याची माहिती देण्यात आली.या प्रकल्पात संपर्क रस्ते,एअर स्ट्रिप,जलाशयात लघुविमान,हेलिपॅड,जलमार्ग,नौका विहार,घाटमाथा रेल्वे,राजमार्ग,वेलनेस स्पा,औषधी वनस्पती उद्यान असं बरंच काही केलं जाणार आहे.यामुळे स्थानिकांना रोजगार मिळून त्यांचा उत्पन्नात वाढ होणार आहे.लवकरात लवकर हा प्रकल्प करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
प्रेमाचे प्रतीक असलेला सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यात आढळतो. ज्यांच्या संवर्धनामुळे त्यांची संख्या वाढत होती, परंतु गेल्या तीन-चार वर्षांत ही संख्या अचानक कमी होत असल्याचे दिसून आले होते. परंतु गोंदिया वन विभागाच्या संवर्धनामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 36 सारस पक्षी आढळले आहेत. 2025 च्या सारस गणनेत 13 पक्ष्यांची वाढ झाली आहे. 2024. मध्ये केवळ 23 सारस पक्षी आढळले होते. गोंदिया जिल्हा पर्यटन क्षेत्रात सारस पक्षी म्हणून ओळखला जाऊ लागला, ज्यामुळे गोंदियामध्ये मोठ्या संख्येने पक्षी मित्र प्रेमाचे प्रतीक असलेल्या सारसला पाहण्यासाठी येत असत, परंतु गेल्या काही वर्षांत सारस पक्ष्यांची संख्या अचानक कमी होऊ लागली. त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये निराशा दिसून येत होती. जिल्ह्यात एकेकाळी सारस ची संख्या 40 च्या वर पोहोचली होती. तर 2023 च्या गणनेत 12 पक्षी आढळले होते आणि 2024 च्या गणनेत फक्त 23 पक्षी आढळले. मात्र यावर्षी सारस पक्षी जनगणनेमध्ये 36 पक्षी आढळल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजमाध्यमावरून तरुणींशी मैत्री करून नंतर त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका विकृत आरोपीला दहिसर पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली. एआयद्वारे (कृत्रिम बुध्दीमत्ता) तयार केलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे मुलींना धमकावून तो अश्लील संभाषण (न्यूड व्हिडियो कॉल) करण्यास भाग पाडत होता.
त्याने अशा प्रकारे अनेक मुलींची फसवणूक केली असून त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना १३ हजार मुलींची छायाचित्रे आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेला एक तरूण अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार १९ वर्षीय तरुणीने पोलिसांकडे केली होती.
दहिसर पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गुगलकडून माहिती मागवली. खूप प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना तांत्रिक माहिती मिळवण्यात यश आले. त्यावरून पोलिसांनी आरोपीचा आयपी ॲड्रेस मिळवून तांत्रिक तपास केला आणि कर्नाटकमधील बेल्लारी जिल्हातील सांदूर येथून शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग (२५) याला अटक केली.
बीडच्या शिरूर तालुक्यातील मानूर जवळील हनुमानवाडी येथील तुपे वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोराने सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी पती पत्नीला बेदम मारहाण करून लुटमार केली. या घटनेत भागवत तुपे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी 3 जून रोजी झाली होती. यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती होती. दरम्यान उज्वल निकम यांच्याकडून आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता. तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले. दरम्यान आज कराडच्या आरोप निश्चितीबाबत आणि डिजिटल एव्हिडन्स आरोपीच्या वकीलांना मिळण्याबाबत युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.
ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर हे हजारो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे मोठ्या संख्येने सुधाकर बडगुजर यांचे समर्थक नाशिकहून मुंबईला रवाना होत आहे. दहा ते बारा बसेस भरून हे संपूर्ण सुधाकर बडगुजर यांच्या समर्थक आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालय येथे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत. बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरातून कार्यकर्त्यांच्या भरलेल्या बस मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
२० ,२१ तारखेला अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा
पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सभरवाल यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. काहीवेळात हे पार्थिव त्यांच्या पवई येथील जलवायू विहार इमारतीमध्ये दाखल होईल. या ठिकाणी एक तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि इथून चकाला येथे विद्युत दाहिनी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
एकेकाळी डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता कात टाकलीय.. बँकेच्या आर्थिक व्यवहारात सुधारणा होत पीक कर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली आहेय. 2024 - 25 या आर्थिक वर्षात 52 सभासदांना दोन कोटी एकवीस लाखाचे पीककर्ज वितरित केलेय. दहा वर्षांनंतर प्रथमच पिक कर्जाचे वितरण करण्यात आले आहेय. यावर्षी 285 शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केले त्यांना कर्ज देण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या हंगामात दुपट्टीने कर्ज वाटप करण्याचे निश्चित करण्यात आलेय. त्यामुळे आणखी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
शिवसेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज करणार भाजपमध्ये प्रवेश. माजी मंत्री बबन घोलप माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर नयना घोलप यांच्यासह शेकडो समर्थकांसह होणार भाजपमध्ये प्रवेश. सुधाकर बडगुजर मोठं शक्तिप्रदर्शन करत मुंबईला जाणार. स्थानिक आमदार सीमा हिरे आणि पदाधिकारी माजी नगरसेवकांचा विरोध झुगारून होतेय भाजप प्रवेश.
नाशिकच्या आडगाव येथील ट्रक टर्मिनल येथे आज सायंकाळी उशिरा आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा दाखल झाला होता, विविध मागण्या घेऊन हे मोर्चेकरी आदिवासी विकास भवन येथे जात होते मात्र आदिवासी मंत्री अशोक उईके नाशिक दौऱ्यावर असल्याने त्यांना शहराच्या प्रवेशद्वारावर रोखून ठेवले होते. मोर्चेकरी आक्रमक झाल्यानंतर त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन दिले होते. आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मोर्चेकरांना भेटून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि उद्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.मात्र आजची रात्र मोर्चा नाशिकमध्येच मुकाम करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र शहरात पाऊस असल्याने सुरक्षित स्थळी मोर्चेकऱ्यांना पोलिसांच्या वाहनातून घेऊन जात असताना पावसाचा अंदाज न आल्याने मोर्चेकरी असलेल्या पोलिस वाहनाला अपघात झाला. उड्डांपूलाच्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असून अपघातात बिऱ्हाड मोर्चातील जवळपास 13 मोर्चेकरी जखमी झाले आहेत .तिघांना गंभीर दुखापती झाले असल्याचे समजते. पोलिसांनी जखमींना तत्काळ जवळच्या मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेरा मोर्चेकरी आणि एक पोलीस कर्मचारी या अपघातात किरकोळ जखमी आहेत.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत तुळजाभवानी विकास आराखड्याबाबत महत्त्वाची बैठक
बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीना निमंत्रण
तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असताना प्रस्तावित शिल्पावरून वाद
तुळजाभवानी माता म्हणजे भारत माता मंदिर संस्थान कडून देण्यात आलेल्या दर्जावरही चर्चा होणार
तसेच तुळजापुरात तुळजाभवानी मातेचे साकारण्यात येणारे शिल्प अष्टभुजा असलेले असावं की द्विभुजा यावरही चर्चा
बैठकीला तुळजाभवानी मंदिराच्या तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्षही निमंत्रित
मंदिर विकास आराखड्याबाबत पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थानच्या वादात समोरासमोर चर्चा
गेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळातील 35 शिक्षकांना निलंबित तर 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मोठी कारवाई केली होती. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळही उडाली होती. 2021 नंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या झपाट्याने कमी झाली. काही शाळांमध्ये तर पटसंख्या एक ते चार इतकीच राहील याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी 35 शिक्षकांना निलंबित केल आहे. यापुढेही जर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कडक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही गुलाबराव खरात यांनी दिला आहे यामुळे मात्र शिक्षकांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी धावपळही बघायला मिळत आहे.
अहमदाबाद दुर्घटनेत विमानातील सिनिअर क्रू असलेली मुलुंडच्या श्रद्धा धवन यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री अहमदाबाद वरून त्यांचा मृतदेह मुलुंड मधील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कल्पनगरी सोसायटी तसेच आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. सोसायटीमध्ये अंतिम दर्शन करून नंतर त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही; शरद पवार यांचं मोठं वक्तव्य