Maharashtra Live Updates: भयावह! मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 32 टक्के वाढ; जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान 269 शेतकरी आत्महत्या
Maharashtra Live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या बातम्या आणि घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये तब्बल 32 टक्के वाढ झाली असल्याची भयावह आकडेवारी समोर आली आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचं भीषण वास्तव या आकडेवारीतून समोर आले आहे. यात मराठवाड्यात जानेवारी...More
हर्षवर्धन सकपाळ
आज काँग्रेसचे कार्यकारणी बैठक पार पडली
या बैठकीत संविधान बचाव या विषयाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सद्भावना कार्यक्रम ठरला आहे
याची रूपरेषा मे महिन्यापर्यंत राहील.
कोण केव्हा कधी कुठे कार्यक्रम करेल याचं नियोजन झालं
एक मे रोजी महाराष्ट्र सद्भावना दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे...
संघटना पुनर्बंधासाठी निरीक्षक नेमले होते...
संघटनांचे वर्ष म्हणून आपण जाहीर केला होता...
सकारात्मक चर्चा झाली...
पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष यांनी कशाप्रकारे काम करावे यावर चर्चा झाली...
जिल्हाध्यक्ष यांनी स्वतःच्या जिल्ह्यात महिन्यातील प्रत्येक दहा दिवस ब्लॉक लेवल वर दौरा करावा आणि एक बैठक घ्यावी...
अखिल भारतीय काँग्रेस स्तरावर रिपोर्ट आम्हाला लॉगिन होता येतं का हे सुद्धा चाचणी करणार...
सलग तीन मिटींगला गैरहजर राहिला तर त्याचा पदाधिकाऱ्याचं पद सुद्धा संपुष्टात येणार...
हिंदी भाषेची सक्ती नसावी... हिंदी भाषा सक्तीच्या नावावर मराठी भाषेवरचे संकट आला आहे ते मागे घ्यावं यावर सुद्धा चर्चा झाली...
संविधान आणि सद्भावना या दोन विषयांच्या अनुषंगाने काँग्रेस कार्यरत राहील हा निर्णय झाला...
दादा भुसे
मी स्पष्टपणे नमूद करतो
हिंदी भाषेच्या संदर्भात केंद्राकडून थोपवलं जाताय हे सांगितलं जाताय असा कुठलाही भाग नाहीं
नेशनल एड्युकेशन पॉलिसी २०२० यामध्ये स्पष्टपणे भाषेच्या संदर्भात ला पॅराग्राफ आहे
तीन भाषा शिकवण्यासंदर्भात
तीन भाषेचा हा फॉर्म्युला आहे
केंद्राने कोणतीही भाषा राज्यासाठी बंधनकारक केलेली नाहीं
२०२० चा शैक्षणिक धोरण आहे
९ सप्टेंबर २०२४ ला तीन भाषेपैकी २ भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजे
राज्य सुकणू समितीच्या बैठकीत तिसरी भाषा हिंदी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय झाला
मराठी इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमाच्या शाळा आहेत उर्दू बंगाली शाळाआहे या शाळां मध्ये त्यांच्या भाषेला ते प्राधान्य देतात नंतर मराठी भाषा शिकवतात मग इंग्रजी भाषेचा पर्याय असतो
सुकाणू समितीने त्री भाषिक सूत्र निवडताना हिंदी भाषा चा विचार केला तिसरी भाषा म्हणून
आपल्या विद्यार्थ्यांना शिकायला सोप्प होईल ्यासाठी हिंदीचा भाषा विचार केला
सोलापूर ब्रेकींग :
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातल्या 1025 जागांसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर
2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी सरपंचपदासाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आलेय.
सोलापूर जिल्ह्यातील 50 टक्के ग्रामपंचायतीवर आता महिलाराज असणार आहे.
यामध्ये करमाळा 108, माढा 108, बार्शी 129, उत्तर सोलापूर 36, मोहोळ 90, पंढरपूर 95, माळशिरस 103, मंगळवेढा 79, सांगोला 76, दक्षिण सोलापूर 83, अक्कलकोट 118 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 1025 गावांच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले
बाईट : सदाशिव पडदुने (प्रांताधिकारी उत्तर सोलापूर)
Anchor:
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर योग्य ती कारवाई सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया सगळ्या पार पडणार आहेत तसेच ससून रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच डॉ सुश्रुत घैसास यांची चौकशी पूर्ण झालेली आहे, त्यांच्यावर कलम १०६(१) अन्वये गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. ससून रुग्णालयाचा पहिला अहवाल मध्ये आम्हाला काही अभिप्राय त्यांचे जाणून घ्यायचे होते तसेच त्या अहवालात काहीसा संभ्रम होता तो सुधारित अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात संदर्भात पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी यांनी...
जल जीवन मिशन नावाला... कोरड घशाला.. चार वर्षापासून काम अर्धवट..
88 लाख रुपये ची योजना मंजूर आहे..काम अर्धवट आहे... लोकांच्या नशिबी दोन किलोमीटरची पायपीट
पाणीपुरवठ्याचे काम रखडले, जल जीवन मिशन अभियान अर्धवट यामुळे गावावर पाणी टंचाईचे संकट...उमरगा हाडगा येथे भीषण पाणी टंचाई, दोन किलोमीटर वरून पाणी आणण्यासाठी पायपीट...
लातूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे पंधराशे कोटी रुपयेचे कामे जिल्हाभरात करण्यात आली आहेत.निलंगा तालुक्यातील उमरगा हडगा येथे 88 लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर होऊन चार वर्षे झाली आहेत मात्र अद्याप पर्यंत पन्नास टक्के सुद्धा काम पूर्ण झाले नाही.. याचा परिणाम थेट गावावर झाला आहे.. तहान भागवण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट त्यांच्या नशिबी आली आहे..
गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीतून पाणीपुरवठ्याची योजना मंजूर झाली... विहिरीत भरपूर पाणी आहे... चार वर्षापासून काम 50% च्या पुढे सरकत नाही..गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 3000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पूर्वीची सरकारी विहीर आणि सहा बोरवेल आहेत. मात्र उन्हाळा सुरू झाला की जलस्त्रोत आटू लागतात..त्यामुळे गावात पाण्याची कमतरता भासते ..परिणामी गावातील लाभार्थ्यांना पाण्यासाठी हातात घागरी घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करायची वेळ आली आहे... असलेली योजना तात्काळ कार्यान्वित करावी... तोपर्यंत पाण्याची पर्यायी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
बीड: बीडमध्ये महाविद्यालयीन तरुणींच्या मदतीसाठी प्रत्येक महाविद्यालयात बडी कॉप
पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत नीलम गोऱ्हे यांनी केल्या सूचना
Anc:बीडच्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कांबळे कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर गोऱ्हे यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा आढावा घेत सूचना केल्यात. यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत समाजातील लोकांनी चुकीच्या घटना घडत असताना पुढाकार घेऊन.. त्या रोखायला हव्यात.. किमान पोलिसांना तरी याची कल्पना द्यावी.. असे आवाहन केले आहे.
त्याबरोबरच पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत प्रत्येक महाविद्यालयात बडी कॉप कार्यरत केले जाणार असून यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सहज तक्रार करू शकता येणार आहे. तसेच 112 आणि 9225092839 हा हेल्पलाइन नंबर महिलेंच्या सुरक्षेसाठी 24 तास सुरू करण्यात आला..
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत मी काही बोलू शकत नाही.. या सर्व प्रकाराला 19 वर्षे झाले आहेत.. आता जे काही होईल ते पाहू असे म्हणत गोऱ्हे यांनी या चर्चेवर अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
बाईट: नीलम गोऱ्हे
विलेपार्ले मधील जैन मंदिराचा वाद नेमका काय आहे आणि आतापर्यंत मुंबई महापालिकेने नऊ वेळा नोटीस बजावून सुद्धा कारवाई झाली नाही?
2020 पासून मुंबई महापालिकेने नऊ वेळेस पाडकामासाठी नोटीस बजावली होती
नोव्हेंबर 2020
डिसेंबर 2022
डिसेंबर 2024 ( दोन वेळा)
जानेवारी 2025 ( तीन वेळा )
फेब्रुवारी 2025 ( दोन वेळा )
विलेपार्ले मधील नेमिनाथ सोसायटीचा पुनर्विकास करताना १९७४ मध्ये इमारत प्रस्ताव विभागाने या इमारतीचे आराखडे मंजूर केले होते. मंजूर आराखड्यानुसार दुसरीच्या आवारातील मंदिर बाजूला काढण्याचे प्रस्तावित होते, मात्र विकासकाने हे बांधकाम काढले नाही
विकासकाने मंदिराचे बांधकाम न हटवल्याने २००५ साली मुंबई महापालिकेने पहिली नोटीस बजावली होती
या नोटिशीला विकासकाने नगर दिवाणी न्यायालयात आव्हान दिलं होतं. इथे महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर विकासाकडे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.. इथे सुद्धा पालिकेच्या बाजूने निकाल आल्यानंतर विकासाकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली
सर्वोच्च न्यायालयाने 2012 साली या प्रकरणातील याचिका निकाली काढताना हस्तक्षेप करण्यास नकार दिला
एप्रिल 2012 मध्ये ही नगर विकास विभागाकडे या प्रकरणी अपील सादर करण्यात आले. त्यामुळे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र पुन्हा उच्च न्यायालयात याचिका गेली
या सगळ्या प्रकरणात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.. दरम्यानच्या काळात विकासकाने हे बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला मात्र बांधकाम नियमित करण्यासाठी सोसायटी आणि जमिनीच्या सहमालकाची एनओसी नसल्याने बांधकाम नियमित झाले नाही
त्यामुळे हा प्रस्ताव इमारत विभागाने नामंजूर 2018 साली केला
फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाने 15 दिवसाची नोटीस बजावली होती. कोरोनामुळे कारवाई होऊ शकली नाही पुन्हा डिसेंबर 2020 मध्ये दुसरी नोटीस या प्रकरणात पाठवण्यात आली होती
या नोटीस ला सुद्धा ट्रस्टने दिवाणी न्यायालयात आव्हान दिले
दिवाणी न्यायालयाने याचिका निघाली काढत कार्यवाहीस सात दिवसांची स्थगित दिली होती. ही स्थगिती 14 एप्रिल रोजी संपली
15 एप्रिल ला पुन्हा एकदा ट्रस्टने वाढीव कालावधीसाठी अर्ज केला होता तो न्यायालयाने नाकारला, तेव्हाच्या आदेशात 16 एप्रिल रोजी पाडकाम कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं
त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई महापालिकेने सव्वा दहा साडेदहाच्या दरम्यान मंदिराचे पाडकाम सुरू केले... कुठल्याही प्रकारे मूर्तीची विटंबना होऊ नये याची पूर्ण खबरदारी आणि काळजी घेऊन ही कारवाई मुंबई महापालिकेने केली असल्याचं मुंबई पोलिसांच्या डायरीत नमूद आहे
ही कारवाई सुरू असताना मंदिर प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतली आणि कारवाईला स्थगिती मिळवली, या सगळ्या कारवाईची चित्रीकरण करण्यात आले आहे
: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला केला असून त्यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात हा हल्ला करण्यात आला असून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमरनाथ यात्रेला काही दिवसात सुरूवात होत असतानाच हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ज्या पर्यटकांवर हल्ला झाला ते पर्यटक हे राजस्थानचे असल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
रायगड : शेकाप सोडून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजप पक्ष प्रवेशानंतर पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपमधील माझा पक्ष प्रवेश हा पहिलाच आणि शेवटचा राहील. यानंतर कोणताही पक्ष मी बदलणार नसल्याचे वक्तव्य पंडित पाटील यांनी केलं आहे. भाजप विरोधात असणारा मी परंतु माझ्या कामाच माझ्या पक्ष प्रवेशावेळी भाजपने कौतुक केलं. मला याचा आनंद झाला. रायगडच्या विकासासाठी ज्या कामासाठी पूर्वी आम्हाला मेहनत घ्यावी लागायची. मात्र, आता ती काम सहज होतील. शिवाय माझ्या सोबत भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा योग्य न्याय देण्याचा या माध्यमातून उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझ्यामुळे भाजप संघटनेला मोठी ताकद मिळेल. भाजप हा पक्ष मोठा असल्यामुळे या पक्षाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे, असे त्यांनी म्हटले.
मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकालगत आलेल्या झोपडपट्टीमध्ये एक महिलेची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. सुमन सूरज निर्मल असे या मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती हा सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. आज पहाटे जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला घरात पत्नीची हत्या झाल्याचे दिसून आले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी विक्रोळी पोलीस, फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, क्राईम ब्रांच दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने विक्रोळी परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिक सातपिर दर्गा अतिक्रमण प्रकरण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई नाशिक मध्ये
पडकाम झालेल्या जागेची पहाणी करून सम्पूर्ण माहिती घेण्यासाठी दलवाई नाशिक मध्ये
दर्गाचे पाडकाम झलेल्या जागी जाऊ नका नाशिक पोलिसांची दलवाई यांना विनंती
-पाडकाम झालेल्या जागी जाऊ नये अशी समजूत काढण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि त्याचे पथक दलवाई यांची भेट घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह पोहकले
-विशेष म्हणजे कालच सर्वोच्च न्यायालयात दर्गा ट्रस्ट ची याचिका रद्द करण्यात आलीय
दलवाई सध्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत
नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नॅशनल हायवे क्रमांक सहाच्या पुलावर मोठे भगदाड...
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर अचानक पडला भगदाड....
नवापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकीपाडा पुलवर खड्डे....
राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर खड्डे पडल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता....
याच पुलावर्ण 24 तास सुरू असते अवजड वाहनांची वाहतूक.....
पूल तयार करून दोन वर्षे पूर्ण होत नाही त्याआधीच फुलाला खड्डे....
निकृष्ट दर्जाचा पूल तयार केल्यामुळेच पुलाला खड्डे पडले असल्याचा स्थानिकांचा आरोप.
पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरण
याप्रकरणातील डॉ. सुश्रुत घैसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी हटवली
डॉ घैसास यांच्यावर ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याचदिवशी सुरक्षा हटवली
डॉ. घैसास यांच्या जीवाला धोका असल्याचं कारण देत पुणे पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली होती
डॉ सुश्रुत घैसास यांना दिलेल्या सुरक्षेवरून जोरदार टीका झाली होती
डॉ. घैसास यांची चौकशी पूर्ण झाल्यामुळे त्यांना नोटीस दिली जाणार नाही
पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बीड जिल्ह्यातील नेते रमेश अडसकर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार
रमेश अडसकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता
आज संध्याकाळी ५ वाजत रमेश अडसकर आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश करणार आहेत
Pune News : पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड मधील तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड अजय मिसर यांची नियुक्ती..स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात ९२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे
याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे..पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याची २ दिवसांची पोलिस कोठडी चे हक्क अबाधित ठेवले आहेत..त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गाडे ची चौकशी होण्याची शक्यता
Pune News : पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड मधील तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड अजय मिसर यांची नियुक्ती..स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात ९२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे
याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहे..पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याची २ दिवसांची पोलिस कोठडी चे हक्क अबाधित ठेवले आहेत..त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गाडे ची चौकशी होण्याची शक्यता
Crime News: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर गावांमध्ये एका 18 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली आहे.. शिवानी गिरी असे या मयत तरुणीचे नाव असून तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आणले गावात एकच खळबळ उडाली, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल आघाम यासह पाच जनावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही आत्महत्या नसून मुलीची हत्या केल्याचा आरोप माहित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
पुण्यातील गुन्हेगारांच्या घरांचे ‘गुगल मॅपिंग’
पुणे शहरात वाढत्या "स्ट्रीट क्राईमवर" नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आखली महत्त्वाची योजना
गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे ‘गुगल मॅपिंग’
पहिल्या टप्प्यात चार हजार रेकॉर्डवरील गुंडांवर कारवाई करण्यात येणार
रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मारहाण, वाहन तोडफोड, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर
एकूण ३७ हजार ४०८ गुन्हेगारांची कुंडली तयार असून यातील चार हजार गुन्हेगार ‘हाय रिस्क’ श्रेणीत
Mumbai Crime News : अशीच एक मोठी कारवाई मुंबई पोलिसांनी चुनाभटट्टी केली असून यात पोलिसांनी तब्बल 10 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. यात दोघा आरोपींकडून तब्बल 1 किलो चरस जप्त केलं आहे. चुनाभटट्टी पोलीस ठाणेचे एटीसी पथक आणि परिमंडळ 6 विशेष पथक पथकाला गस्ती दरम्यान रहिम शेख,(30) नावाचा इसम संशयितरित्या फिरताना आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 1.9 किलो चरस पोलिसांना सापडलं. त्याच्या चौकशीत चरस गुजरातच्या वलसाड येथील आल्याच समजताच पोलिसांच्या पथकाने वलसाडवरून नितीन टंडेल 32 याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून ही 8 किलो 146 ग्रॅम अफगाणी चरस जप्त करण्यात आलंय.
Mumbai Crime News : फसवणुकीचे पैसे खात्यात वळते करण्यास परवानगी देणार्या खातेधारकास अटक करण्यात आली आहे. मुंबई सायबर पोलिसानी या आरोपीला नागपूरमध्ये अटक केली आहे. डिजिटल अटकेच्या नावाखाली लोकांची लूट करून मिळवलेले पैसे कंपनीच्या खात्यात वळते करताच मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी 86 वर्षीय महिलेची फसवणूक करून आरोपीनी पैसे लुबाडले होते. या प्रकारणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 8 व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विनोद कुमार कृष्णराव नागेंद्र असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या कोव्हिड काळात बंद पडलेल्या कॉल सेंटर कंपनीच्या खात्यात हे पैसे वळवण्यात आले होते.
विक्रोळीत ३६ वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या
सुमन सूरज निर्मल असे या महिलेचे नाव असून ती आपल्या पतीसोबत विक्रोळी पूर्व परिसरात रहात होती
महिलेचा पती हा रात्रपाळी करून घरी पहाटे ५:३० वा आल्यानंतर ही घटना उघडकीस आली
पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून त्याने या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली
घटनास्थळी आरोपीचा शोध घेण्यासाठी डाॅगस्काॅड, फिंगरप्रिंट आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले आहेत
अधिक तपास विक्रोळी पोलिस करत आहेत
Hit and Run Accident : मध्यप्रदेशातील बोनकट्टा इथून विवाह समारंभ आटोपून एका दुचाकीवरून तिघं गावाकडं परतत असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. मृतकात पती - पत्नीसह त्यांच्यासोबत असलेली शेजाऱ्यांची पाच वर्षीय चिमुकली अशा तिघांचा समावेश आहे. ही घटना मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली. विवाह समारंभ आटोपून बोनकट्टा इथून हे तिघेही दुचाकीनं चिखला मॉईल इथं जात असताना ही घटना घडली. गोबरवाही पोलीस अधिक तपास करीत आहे.
मृतकांमध्ये यांचा आहे समावेश
कैलास मरकाम (४२)
परबता मरकाम (३६)
यामिनी कंगाली (०५)
Nagpur News: वनविभाग व वन्यप्राणी बचाव पथकाने एका वाघाच्या जखमी बछडयाचे यशस्वी रेस्क्यु केले. वाघाच्या बछड्याच्या एका पायाला गंभीर ईजा झाली आहे. त्यामुळे जखमी बछडयाला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारासाठी पाठवण्यात आले असून उपचारानंतर नैसर्गिक अधिवास सोडले जाणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या खापरी नियतक्षेत्र सिंदिविहीरी येथील संतोष ठाकरे यांच्या शेताजवळ एका नाल्यात अंदाजे आठ ते नऊ महीन्याचा- वाघाचा बछडा बसून असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांना देण्यात आली. त्यानंतर लगेच सहा. वनसंरक्षक मनोज धनविजय, वन्यप्राणी बचाव पथकाचे कुंदन हाते यांना माहिती देऊन वनपरिक्षेत्र बुटीबोरी आणि ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथील पथकाने संयुक्त रित्या मोहिम राबऊन वाघाच्या मादी बछडयाचे Physical रेस्क्यु केले.
केज: खा.बजरंग सोनवणे यांच्या केज मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.केज मधील अल्पसंख्यांक तसेच जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारून इनामदार व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीता बनसोड यांच्यासह आघाडीचे सरपंच, उपसरपंच शेकडो अल्पसंख्यांक कार्यकर्ते यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश होणार आहे. मुंबई येथे वानखेडे स्टेडियम वर मुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद केज मतदार संघात वाढणार आहे.
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या शासन निर्णयावर पुनर्विचार होणार?
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची आज पत्रकार परिषद, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता
राज्याचा शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात शासन निर्णय मागील आठवड्यात जारी केला.
मात्र त्यानंतर त्याचा विरोध मनसेसह इतर काही राजकीय पक्षांनी तर केलाच शिवाय काही संघटनांनी सुद्धा याचा विरोध केला...
सुकाणू समितीतील काही सदस्यांनी सुद्धा आपल्याला विचारात न घेता हा निर्णय घेतला असल्याचा सांगत शिक्षण विभागाच्या या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाचा विरोध केला
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय आपण घेतला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने जरी घेतला असला तरी त्यावर शालेय शिक्षण विभाग पुनर्विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे...
आज कॅबिनेट बैठकीत सुद्धा यावर चर्चा होऊ शकते सोबतच आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 32 टक्के वाढ आहे
मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचं भीषण वास्तव
मराठवाड्यात जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान २६९ शेतकरी आत्महत्या
७९ प्रकरणे सरकारी भरपाईसाठी पात्र, तर १३ प्रकरणे अपात्र
177 प्रकरणांची चौकशी सुरू
गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान 204 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती
कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या...
बीड (७१)
छत्रपती संभाजीनगर (५०)
नांदेड (३७)
परभणी (३३)
धाराशिव (३१)
लातूर (१८)
हिंगोली (१६)
जालना (१३)
बार्शीतील ड्रग्ज विक्री प्रकरणी आणखी तीन आरोपीना अटक, बार्शी ड्रग्स प्रकरणातील आरोपीची संख्या सहावर पोहोचली.
वसीम बेग (वय ३६, रा. परांडा), जावेद मुजावर (वय ३६, रा. परांडा), जमीर पटेल (वय २८ रा. गाडेगाव रोड बार्शी) यांना पोलिसांनी नव्याने अटक करण्यात आले.
या आधी असद देहलूज (वय ३७, रा. परांडा), मेहफूज शेख (वय, १९ रा. बावची, ता. परांडा), सर्फराज शेख (वय ३२, रा. काझी गल्ली बार्शी) यांना दि.१७ रोजी अटक करण्यात आले होते.
दि. 17 एप्रिल रोजी बार्शी परांडा रोडवरील एका हॉटेलजवळ छापा टाकून तीन आरोपींना अटक करून त्यात कारसह 20 ग्राम एमडी ड्रग्स आणि गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केले होते
आरोपीच्या चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसानी आणखी तीन आरोपीना अटक केल्याने ड्रग्स टोळीतील आरोपीची संख्या आता सहावर पोचली आहे.
दरम्यान तुळजापूर येथील बहुचार्चित ड्रग्स प्रकरणाचा आणि बार्शी प्रकरणाचा अद्याप तरी कोणताही संबंध उघड झालेला नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिली
गडचिरोली : जिल्ह्यातील देऊळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील चार कोटी रुपयांच्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी तब्बल 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघांना अटक करण्यात आली असून फरार असलेले कुरखेडा येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्या निलंबनाचे आदेश व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडे यांनी काढले आहे. निलंबन काळात बावणे यांचे मुख्यालय नंदुरबार येथे देण्यात आले आहे. देऊळगाव संस्थेमध्ये 2023- 24 आणि 2024- 25 या दोन वर्षात तीन कोटी 95 लाख रुपयांचा धान खरेदी घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 17 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
- नागपूरचे जिल्हाधिकारी डॅा. विपीन ईटनकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
- विपीन ईटनकर यांना राजीव गांधी प्रशासकिय गतिमानता पुरस्काराने सन्मान
- धडाकेबाज आणि लोकांसाठी सदैव तत्पर असणारे जिल्हाधिकारी म्हणून विपीन ईटनकर यांची ओळख
- यापूर्वीही विपीन ईटनकर यांना अनेक पुरस्काराने झाला सन्मान
नागपूर सायबर पोलिसांनी 4 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा डेटा चेक केला . त्यात सायबर पोलीसांच्या तपासात 540 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडीवर संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नोकरीवर नसताना पगार उचलत असल्याचे धक्कदायक सत्य पुढे आले. त्यामुळे सायबर पोलिस 540 आयडी नेम असलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी त्या नावाने नोटीस बजावली आहे . सोबतच यात संबंधित संस्था संचालकांना नोटीस बोलावून चौकशीला बोलण्यात येणार असल्याचे नागपूर सायबर सेल चे प्रमुख लोहित मतानी यांनी सांगितले. सध्या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात अली असून पोलीस तपासात अनेक धक्क्यादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात केस गळती नंतर त्याच रुग्णांना आता नख गळती सुरू झाली आहे. या गंभीर प्रकाराची बातमी एबीपी माझा ने दाखवल्यानंतर केंद्र सरकारने या भागातील रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी तात्काळ "आकस्मित चिकित्सा राहत पथक" नेमलेल आहे व तात्काळ या भागाचा दौरा या पथकाला करण्यास सांगितला आहे. यानुसार हे पथक शेगाव शहरात दाखल झाल असून आज पासून पुढील तीन दिवस हे पथक केस व नख गळती भागातील रुग्णांचा तपासणी करून अभ्यास करणार आहे. या पथकात दिल्ली ,भोपाळ, चेन्नई , पुणे येथील विविध विभागातील उच्चस्तरीय अधिकारी असून विशेष म्हणजे या पथकात यावेळी भारतीय खाद्य निगम व गव्हावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ सुद्धा सामील आहेत. या परिसरातील नागरिकांच्या रक्तामध्ये सेलेनियम प्रमाण हे अनेक पटीने वाढल्यामुळे केस व नख गळती झाल्याचे समोर आल आहे आणि त्यामुळे राशनच्या गव्हावर संशयाची सुई असल्याने भारतीय खाद्य निगम व गव्हावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ या पथकात सहभागी करून घेतलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पादनात वाढ. करण्यासाठी केरळ राज्य लाॅटरीचा अभ्यास दौरा. लॉटरीच्या अभ्यास दौऱ्यानंतर उपयोजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय समिती गठीत. वित्त विभागाच्या लॉटरी संचालनालयाकडून समिती स्थापन करण्याचा निर्णय. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती, एकूण १० सदस्य ह्या समितीत असणार. समिती राज्य लॉटरीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शासनाला उपाययोजना सुचवणार. एका महिन्याच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करणार
कोणाकोणाची समितीची वर्णी ?
सुधीर मुनगंटीवार (भाजप) – अध्यक्ष,
अमित साटम (भाजप) – सदस्य
चंद्रकांत नरके (शिवसेना शिंदे गट) – सदस्य
विठ्ठल लंघे (शिवसेना शिंदे गट) – सदस्य
चेतन तुपे (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – सदस्य
शेखर निकम (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – सदस्य
रोहित पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार गट) – सदस्य
सुनील प्रभू (शिवसेना – उद्धव ठाकरे गट) – सदस्य
अमित देशमुख (कॉंग्रेस) – सदस्य
प्रेरणा देशभ्रतार, आयुक्त राज्य लॉटरी – सदस्य सचिव
विक्रोळीत गोदरेज सिग्नलजवळ अपघात एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील ॲम्बुलन्स जखमींना दिली. विक्रोळीत गोदरेज सिग्नल जवळ दोन मोटरसायकल गाडीचा अपघात झाला यात दोन्ही मोटरसायकल चालक गंभीर जखमी आहेत. याच ठिकाणावरून चुनाभट्टीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना त्यांनी या ठिकाणी गर्दी पाहिली. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील ॲम्बुलन्स ही जखमीला देऊन त्यांना उपचाराकरिता राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली व प्रथम उपचार करण्याचे आदेश देखील रुग्णालयाला दिले आहेत
खालापूर तालुक्यातील पॅसिफिक कंपनीवर मोठी कारवाई. धोकादायक बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीवर अन्न आणि प्रशासन विभागाची धाड. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असणाऱ्या एका पॅसिफिक नावाच्या बेकायदेशीर कंपनीवर अन्न आणि प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे.या कंपनीत बेकायदेशीर भेसळयुक्त बायोडिझेल बनत असल्याची माहिती या विभागाला मिळाली.यानंतर ही कारवाई करण्यात आलीं आहे. संध्याकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.
एकीकडे पालघर जिल्ह्यातील पाणी शहरांना पुरवण्यासाठी घाट घातला जात असतानाच जिल्ह्यातील ग्रामीण भाग अजूनही तहानलेलाच असलेला पाहायला मिळतोय. शासनाची जल जीवन मिशन योजना कुचकामी ठरत असून जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणारी वावर वांगणी ग्रामपंचायतमधील सागपाणी व रिठीपाडा गावात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. सागपाणी व रिठीपाडा गावात दरवर्षी प्रमाणे डिसेंबर अखेरपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागात जल जीवन मिशन योजनेचे काम संथ गतीने सुरू असून अजूनही पूर्ण झालेले नाही त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून त्याकडेही शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तर सध्या एक दिवसाआड जलजीवन मिशनचे ठेकेदार यांच्याकडून छोटा टँकर पाठवला जात आहे त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: भयावह! मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 32 टक्के वाढ; जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान 269 शेतकरी आत्महत्या