मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10, 353 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,19,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.02% टक्क्यावर गेला आहे.


तर राज्यात आज 141 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1400 रुग्ण तर नंदूरबारात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 16 लाख  37 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 61 हजार 404 (14.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 17 हजार 926 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 173 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 62 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 हजार 407 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


मुंबईत आज 692 रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 692 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 96 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8351 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 716 दिवसांवर गेला आहे. 


देशात काल  45,951 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 


देशात गेल्या 24 तासांत 45,951 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 817 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी सोमवारी 46,148 आणि मंगळवारी 37,566 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 60,729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 36.51 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.