मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  1638 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 24  हजार 547  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.42 टक्के आहे. 
 
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7741  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (0),  धुळे (4), जालना (64), परभणी (34), हिंगोली (23), नांदेड (14),  अकोला (22), अमरावती (11),  वाशिम (02), अकोला (22), बुलढाणा (17), नागपूर (65), यवतमाळ (09),  वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (3),   गडचिरोली (8 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 26 हजार 805 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,09,798 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 928  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 12, 48 ,820 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 313 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 313 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,28,138 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4650 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1280 दिवसांवर गेला आहे.


देशात आठ महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद


कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर मंदावताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आठ महिन्यांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13,058 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 164 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 19,470 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 94 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 58 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 83 हजार 118 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.