मुंबई : राज्यात आज  4,313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 360  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 86 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे. 


राज्यात आज 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 50 हजार 466 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 973 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (66), नंदूरबार (2),  धुळे (25), जालना (22), परभणी (53), हिंगोली (60),  नांदेड (28), अकोला (18), वाशिम (1),  बुलढाणा (74), यवतमाळ (13), नागपूर (64),  वर्धा (3), भंडारा (6), गोंदिया (3),  गडचिरोली (37) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


 आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 44,87,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,77,987 (11.98 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,98,098 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,954  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 422 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 422 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 303 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3532 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर गेला आहे.


कोरोनाचं संकट अधिक गडद; काल एकाच दिवसात रुग्णसंख्येत 12 टक्क्यांनी वाढ


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसाआधी देशात 41,965 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 509 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 35,181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.