मुंबई : राज्यात आज  3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 685  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 12 हजार 706  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 06 टक्के आहे. 


राज्यात आज 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 101 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (10), नंदूरबार (2),  धुळे (1), जालना (36), परभणी (55), हिंगोली (17),  नांदेड (25), अकोला (29), वाशिम (01),  यवतमाळ (05),   वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), चंद्रपूर (51),   गडचिरोली (12 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 5,62,25,304 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,04,147 (11.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,96,176 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,875  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 365 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,12,570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4696 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1286 दिवसांवर गेला आहे. 


देशात सलग पाचव्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट


 भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. 9 सप्टेंबरपासून देशात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार,  गेल्या 24 तासांत 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच गेल्या 24 तासांत 339 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 37,127 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 89 हजार रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 84 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत