मुंबई : राज्यात आज  4,219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 538  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 95 हजार 236  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे. 


राज्यात आज 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 50 हजार 229 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 758 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (23), नंदूरबार (1),  धुळे (1), जालना (44), लातूर (98), परभणी (57), हिंगोली (14),  नांदेड (26), अमरावती (02), अकोला (29), वाशिम (04),  बुलढाणा (92), यवतमाळ (09), नागपूर (74),  वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (7), चंद्रपूर (31),   गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 55,19,679 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,87,025 (11.68 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,92,510 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,911  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 458 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4010 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1206 दिवसांवर गेला आहे. 


 देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढली


देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 43,263 कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 40,567 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 369 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.