मुंबई : राज्यात आज 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 455 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 59 हजार 906 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. 

राज्यात आज 126 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 40 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 821 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,054 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (42), नंदूरबार (2),  धुळे (19), जालना (33), परभणी (30), हिंगोली (59),   नांदेड (29),  अकोला (22), वाशिम (03),  बुलढाणा (50), यवतमाळ (07), नागपूर (75),  वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (4),  गडचिरोली (32) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 

धुळे मनपा, नंदूरबार, जालना, हिंगोली, परभणी मनपा, नांदेड मनपा, नागपूर, वर्धा,   , भंडारा, या  जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 34,56,403 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,52,273 (12.07 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,92,530 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,357  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 388 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 388 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 288 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,759 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2974 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1713 दिवसांवर गेला आहे.

देशातील रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा पन्नास हजारांकडे, 509 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 46 हजार 759 रुग्णांची भर पडली असून 509 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 31 हजार 374 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 496 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.