Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
गडचिरोली: शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेली 23 वर्षीय तरुणी उघड्यावर शौचास गेलेली असताना तिला अमानुष मारहाण केल्याने ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची घटना गडचिरोली लगतच्या शिवनी गावात समोर आली आहे. त्या तरुणीवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून नागपूरला हलवण्यात आले आहे. त्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी वैद्यकीय तपासानंतरच या संदर्भात माहिती स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तरुणी रविवारी रात्रीच्या सुमारास उघड्यावर शौचास गेली होती. मात्र बराच वेळ ती परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला तर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या हाताला जखमा असून डोळ्याखाली दगड किंवा विटाणे मारहाण केल्याचे व्रण होते. या घटनेची माहिती मिळतात गडचिरोली पोलिसांनी आरोपी शोधण्यासाठी पाच पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेला रवाना केली आहेत. हल्लेखोर गावातील आहे की बाहेरील याचा तपास सुरू आहे.
भाईंदर : भाईंदर जवळील उत्तन गावातील स्वर्गदीप या मासेमारी बोटीला खोल समुद्रात अद्वैता या मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे घडली होती. त्याघटनेची लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे, लाईव्ह व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे की , मालवाहू अद्वैता या जहाजाने मासेमारी करण्यासाठी आलेल्या स्वर्गदीप जहाजाला धडक देत असताना दिसत आहेत तसेच स्वर्गदीप जहाजावरील मच्छिमार आरडाओरड करताना दिसत आहेत या अपघातात मासेमारी बोटीचे मोठे नुकसान झाले असून, अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याच मच्छीमारांनी सांगितले आहे.
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी यवतमाळच्या दिग्रस येथील मानोरा चौकात खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी शिंदे गटासह सरकारवर जोरदार टीका खासदार यांनी केली. गरिब आणि सामान्य माणसाची कामे दिली सोडून तुमच्यातच भांडण लागले आहेत. शिंदेगटाच्या कामावर स्टे देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्याने लावला आहेत. सरकारमध्ये एकमत नाही,तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांना काय न्याय देणार आहात. कुठेय पालकमंत्री, कुठे फिरत आहात,गंगेच्या नदीत डुबकी मारण्यापेक्षा या भागातील शेतकऱ्यांना न्याय द्या अशी टिका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केली.
- नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल
- दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरणार शाळा
- उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल
- उन्हाळी सुट्यांपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार शाळा
- सकाळी ७.३० ते दुपारी ११.४५ वाजेपर्यंत भरणार शाळा
- आजपासून निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात
- नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल
- दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरणार शाळा
- उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल
- उन्हाळी सुट्यांपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार शाळा
- सकाळी ७.३० ते दुपारी ११.४५ वाजेपर्यंत भरणार शाळा
- आजपासून निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात
पुण्यातील स्वारगेट डेपोत एसटीमध्ये बलात्कार झालेल्या पीडितेची बदनामी सुरुये, ती बदनामी थांबवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. यावर उद्या सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे. विधितज्ञ असीम सरोदे आणि ठाकरे शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी यासाठी पुढाकार घेतलाय.
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव
करूणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून आव्हान
दंडाधिकारी कोर्टानं करूणा यांचे धनंजय मुंडेंविरोधातील आरोप अंशत: मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं
करूणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रूपये भत्ता देण्याचे कोर्टाचे आदेश
मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज सायंकाळी भोजनाचे आमंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सागर निवासस्थानी जेवणाचे आमंत्रण
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जेवणाचे निमंत्रण
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन
सर्व मंत्र्यांना अधिकाधिक उपस्थिती लावण्याचे मुख्यमंत्री आदेश देण्याची शक्यता
रायगड : जिल्ह्यातील रांजणखार डावली नवखार गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या गावातील नागरिकांनी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. पाचशेहून अधिक गावकरी या मोर्चात सहभागी झाले. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी या गावकऱ्यांना भेट दिली. मात्र गावकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाल्याने गावकऱ्यांनी पुन्हा संताप व्यक्त करत जो पर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही, तोपर्यंत इथून कुठेही हलणार नाही, असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बूच यांची हायकोर्टात धाव
मुंबई सत्र न्यायालयानं गुन्हा नोंदवण्याच्या दिलेल्या आदेशाला याचिकेतून आव्हान
भांडवल बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुंबईतील विशेष न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत
सेबीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन रामामूर्ती, तत्कालीन अध्यक्ष व जनहित संचालक प्रमोद अग्रवाल तसेच सेबीचे तीन पूर्णवेळ सदस्य अश्वनी भाटिया, अनंत नारायण जी आणि कमलेश चंद्र वार्ष्णेय यांचा समावेश
अदानी समूहाच्या कथित आर्थिक घोटाळ्यातील परकीय निधीत बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची भागीदारी असल्याचा आरोप अमेरिकास्थित हिंडनबर्गने केला होता
त्यानंतर, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष असलेल्या माधवी बुच या वादाच्या भोव-यात
टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे विरार पश्चिमेच्या आगाशी नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रांचे वितरण एक तर खासगी कुरिअर मार्फत होत असते किंवा टपाल खात्यामार्फत होत असते. अर्नाळा परिसरातील एका नाल्यात हजारो कागदपत्रांचा संच आढळला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय आयुर्विम्याची प्रमाणपत्रे, बँकांची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच अनेकांच्या मुलाखतीची पत्रे व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे.
विधानसभेत आज ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर
सर्वाधिक पुरवण्या मागण्या ग्रामविकास विभागाला ३७५२ कोटी
त्यानंतर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाला 1688 कोटी
नगर विकास विभाग 590 कोटी
उच्च व तंत्र शिक्षण विभाग 412 कोटी
सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग विभाग ३१३ कोटी
पर्यावरण व वातावरण बदल 255 कोटी
महसूल 67 कोटी
इतर मागास बहुजन कल्याण 67 कोटी
तर सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वात कमी 45 कोटी प्रस्तावीत केले आहे
पंतप्रधान आवास योजनेसाठी सर्वाधिक 3752 कोटीची तरतूद
त्या पाठोपाठ मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजना कृषी पंप दोन हजार कोटी
रस्ते व पूल प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी 1450 कोटी
मुद्रांक शुल्क अनुदान महानगरपालिका व नगरपालिका यासाठी 600 कोटी
राज्यातील चार साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून खेळत्या भाग भांडवल निर्मितीसाठी मार्जिन मनी म्हणून 296 कोटी
पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या भूसंपादना करता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परतफेरीसाठी २४४ कोटी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
मुंबई महानगरपालिकेच्या अ गटाच्या अभियंतेच्या परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
25 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती मात्र 19 फेब्रुवारीलाच या परीक्षेचे पेपर लीक झाले.
आणि कोट्यावधी रुपयाला हे पेपर परीक्षा देणाऱ्या अभियंत्यांना विकण्यात आल्याचा आरोप मनसेने केला.
हा सगळा प्रकार मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांनी उघडकीस आणला होता.
आज या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी महानगरपालिकेच्या गट 'ए' परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, 25 तारखेला होणारी परीक्षा आधीच 19 तारखेला फोडली गेली. या परीक्षेसाठी सुमारे 1200 उमेदवारांनी सहभाग घेतला होता.
देशपांडे यांनी दावा केला की प्रत्येक प्रश्नपत्रिका 10 लाख रुपयांना विकली गेली आणि संपूर्ण प्रक्रियेत शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, "या परीक्षेच्या माध्यमातून भ्रष्ट अभियंते महापालिकेत भरती होणार आहेत का?"
त्यांनी स्पष्ट केले की, एकदा हे अभियंते लाच देऊन नोकरी मिळवतील, तेव्हा ते भविष्यातही पैशासाठी भ्रष्टाचारच करतील. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मनसेची ठाम भूमिका आहे.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
देशपांडे यांनी सांगितले की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना या घोटाळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. लवकरच राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे, जिथे हा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला जाईल.
मनसेने परीक्षेच्या रद्द करण्याची आणि चौकशीच्या मागणीची ठाम भूमिका घेतली आहे. जर सरकारने दोषींवर कारवाई केली नाही, तर मनसे आपल्या पद्धतीने पुढील निर्णय घेईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मनीष धुरी यांची प्रतिक्रिया
मनसेचे मनीष धुरी यांनी सांगितले की, त्यांच्याकडे या घोटाळ्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यांनी सांगितले की, "जे परीक्षार्थी प्रामाणिकपणे परीक्षा दिली, त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही हा विषय राज ठाकरे यांच्यासमोर मांडला आहे."
मनसे लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करेल, असेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषद विरोधी पक्ष नेतेपदावरुन शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच?
विधानसभेत शिवसेना-ठाकरेंचा आणि विधानरिषदेत काॅग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा- नाना पटोले
विधानपरिषदेत अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचा कालावधी ऑगस्ट पर्यंत बाकी आहे
नव्या सरकारच्या कार्यकाळात विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता काॅग्रेसचा असावा अशी कांग्रेसची मागणी आहे
त्यामुळे विधानपरिषद विरोधी पक्षनेकेपदावरुन कांग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच होण्याची चिन्हं
ज्या सभागृहात ज्या विरोधी पक्षाची संख्या जास्त असते त्यांचा विरोधी पक्ष नेता ही परंपरा आहे- नाना पटोले
विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांना शिवसेना ठाकरे गट आजच पत्र देण्याच्या तयारीत
ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा करणार
विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपद ठाकरेचे शिवसेना देण्यास मान्यता दिल्यास विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेस पक्ष दावा करणार
काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाहता विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस कडून दावा केला जाणार असल्याची माहिती
सतेज पाटील यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदासाठी चर्चा
अमरावती
अमरावतीत "शिवसन्मान" महामोर्चाला सुरवात
प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण..
प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करून अटक करण्याची मागणी...
मोर्चात खासदार बळवंत वानखडे, प्रहारचे नेते बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर सह सर्वपक्षीय नेते उपस्थित..
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा मोर्चा धडकणार...
प्रशांत कोरडकर यांच्या विरोधात राज्यातील पहिला महामोर्चा अमरावतीत...
Virar: टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे विरार पश्चिमेच्या आगाशी नाल्यात आढळल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रांचे वितरण एक तर खासगी कुरिअर मार्फत होत असते किंवा टपाल खात्यामार्फत होत असते. अर्नाळा परिसरातील एका नाल्यात हजारो कागदपत्रांचा संच आढळला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय आयुर्विम्याची प्रमाणपत्रे, बँकांची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच अनेकांच्या मुलाखतीची पत्रे व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे.
सामान्यांना वितरण न करताच कचऱ्यात
लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला ही कागदपत्रे सापडली. नाल्याच्या कडेला तसेच पाण्यात पडलेली ही कागदपत्रे अनेक ठिकाणी खराब झाली आहेत. भिजली आहेत. ही कागदपत्रे ताब्यात घेतली, तेव्हा ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सामान्यांना मिळण्याऐवजी ती परस्पर कचऱ्यात फेकून दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
पोस्टमनची, की कार्यालयाची चूक
टपाल खात्याच्या टपाल वितरणाची एक पद्धत ठरलेली असते. मुख्य टपाल कार्यालयातून उपटपाल कार्यालयात वितरणासाठी पत्रे जात असतात. उपटपाल कार्यालयातून ती पोस्टमन संबंधितांना देत असतो. टपाल कार्यालयाच्या क्षेत्रातील विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन त्याचे विभाग पाडलेले असतात. ठराविक विभागात ठराविक पोस्टमन त्याच्या त्याच्या क्षेत्रातील टपालाचे वितरण करीत असतो.
अर्नाळा कार्यालयाची चौकशी व्हावी
अर्नाळा टपाल कार्यालयामध्ये ही पत्र गेली असण्याची शक्यता आहे. हा विभाग अर्नाळा टपाल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. ती वितरणासाठी पोस्टमनकडे दिली होती का आणि दिली असल्यास संबंधित पोस्टमन कोण, त्याने ती का वितरित केली नाहीत, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आधार कार्ड हे अनेकांच्या कागदपत्रांचे मूळ तसेच ओळखीचे महत्त्वाचे दस्तावेज आहे. असे असताना हे महत्त्वाचे कागदपत्र संबंधितांना वितरण करण्याअगोदरच त्याची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
नोकरीचे स्वप्न कचऱ्यात
हे कागदपत्र वितरण न करता परस्पर विल्हेवाट लावून अनेकांच्या जीवनाशी खेळ खेळला झालेला आहे. नाल्याच्या किनारी सापडलेल्या कागदपत्रात अनेकांना पाठवलेली मुलाखतीची पत्रे आहेत. ही पत्रे मिळाली असती, तर अनेकांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले असते; परंतु हे पत्र संबंधितांना न देताच त्यांच्या भवितव्याशी हा खेळ खेळला गेला आहे. त्याचबरोबर अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकांनी पाठवलेली क्रेडिट आणि डेबिट कार्डही त्यात आहेत. याशिवाय अनेकांनी आपल्या भविष्याच्या तरतुदीसाठी आयुर्विमा उतरवला होता. आयुर्विम्याची प्रमाणपत्रे तसेच त्याची काही कागदपत्रे ही या टपालात होती. आपल्या भविष्याची पुंजी ठेवलेली कागदपत्रेच अचानक परस्पर गायब झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ज्यांनी कुणी सामान्यांच्या भावनांशी हा खेळ खेळत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.
नागपुर
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री.
छत्रपती शाहू महाराज असतात त्यांना आज चहापाण्यासाठी बोलावलं होतं त्यांच्या निमित्त अनेक विषयावर चर्चा झाली...
On रक्षा खडसे मुलगी प्रकरण
केंद्रीय मंत्र्यांचे परिवार सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचा काय होणार असा प्रश्न आहे.... सामान्य जनतेच्या आयोजन कसे सुरक्षित राहतील...
महाराष्ट्र राज्य कायदा शून्य ते कडे चाललं आहे, का ?असा प्रश्न निर्माण होत आहे...
महादेव मुंडे च्या पत्नीने पतीच्या हत्येबाबत प्रश्न निर्माण केला आहे.
राज्य सरकार यावर संवेदनशील नाही.
On अधिवेशनन मंत्री आरोप
किती दिवसापासून प्रश्न सुरू आहे मी राज्य सरकारला घ्यायचा आहे पण अजून निर्णय घेतला नाही...
राहुल गांधी सुनील केदार यांच्या चोवीस तासात कारवाई होते मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होत नाही.
काय सुरू आहे हे समजत नाही.. राजीनामा मागीतील असं मला वाटत नाही.
On शक्ती कायदा
मी गृहमंत्री असताना शक्ती कायद्यांतर्गत बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी पद्धतीची तरतू त्या कायद्यात होती... चार वर्ष लोटूनही केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली नाही.. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तांत्रिक अडचणी आहे माझी मागणी आहे तांत्रिक अडचणी असेल तर त्या तज्ञ लोकांशी बदल करून कारवाई करावी.. त्या अडचणी दूर करून कायदा करावा...
On फडणवीस, शिंदे,खोटे प्रकरण चौकशी
यावर मौन पाळलं..
On कोरटकर
प्रशांत कोरटकरच्या घराला सुरक्षा असताना त्याला फरार करण्यात आले का? सरकारकडून त्याला सहकार्य का होत आहे. त्याच्या मागचं काय कारण आहे.. सरकारमधील लोकांशी काय संबंध आहे. सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचे फोटो पाहायला मिळत आहे.
त्याच्या कारवाई झाली पाहिजे तो जिथे कुठे असेल त्याला शोधून काढला पाहिजे कोणाच्याही जवळचा असला तरी, त्याला महाराष्ट्र माफ करणे हे लक्षात ठेवून पकडून कारवाई करावी.
On शाहू महाराज
कोरटकर प्रकरणासह कायदा सुव्यवस्था, रक्षा खडसे मुलीचे प्रकरण, यासह अनेक विषयावर चर्चा झाली..
On पुणे पोलीस हल्या प्रकरण
जर पोलिसांवर हल्ला झाल्या असेल तर याचा अर्थ पोलिसांचा धाक नसल्यानं अश्या बाबी घडत असतात... हे पूर्णतः अपयश आहे....
पाच कंदिल येथील म्युनिसिपल मार्केट मधील मोदी भंडार आणि जवळ असलेल्या अन्य चार दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान दुकानदारांचे झाले असल्याची माहिती दुकानदारांनी यावेळी दिली...
घटनेची माहिती मिळतात धुळे महानगरपालिका अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले... दरम्यान या अग्निशामक बंबांनी दहा ते बारा फेऱ्या करुन आगीवर नियंत्रण मिळवले. यात मात्र दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये दुकानदारांचे झालेले नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान झालेल्या दुकानदारांनी केली आहे...
सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपण उभारली आहे
१२ लाखांहून अधिक घरे ग्रामीण भागात उभारण्याचे नियोजन आहे
अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे
त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल
१ लाख ३१ हजार हेक्टर हून अधिक जमीनीला यामुळे फायदा होईल
९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे
५५ हजार कोटींहून अधिक निधी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत
इथेनॉलचा पर्यायी वापर वाढवला जात आहे
एमएसपी अतंर्गत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक खरेदी सरकारने केली आहे
१ तालुका १ मार्केट कमिटी स्कीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
३२५ महिला बचत गटांना सरकारने ड्रोन पुरवले आहेत
नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाचा हा प्रयत्न आहे
१८ हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे
तसेच लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून प्रत्येक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
इंजिनियर व मेडिकल परीक्षांसाठी अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
शिष्यवृत्तीच्या माध्यमातून १ हजार २०० कॉलेज व ४ हजार हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे
महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोग्राम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी नवी मुंबई येथे डाटा सेंटर उभारण्यात येत आहे
तसेच सायबर क्राइम ला आळा घालण्याच२ प्रयत्न या माध्यमातून केला जाईल
सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे ३ नर्सिंग कॉलेज उभारण्यात येतील
नाशिक हे हब म्हणून उभे होते आहे
रक्तदान, कँसर, थायरॉईड अशा सात विविध आरोग्य बाबींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे
मिशन लक्षवेध योजना सरकारने सुरू केले आहे
या योजनेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंना तयार करण्याचा मानस आहे
त्यात आर्चरी, टेबल टेनिस, व विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात येत आहे
केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे
त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन करतो
ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड
पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे तपास देऊन एक महिना झाला आहे
मात्र ते साप्ताहिक सुट्टीवर आहेत त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे
तपास अधिकारी सुट्टीवर असतील तर तपास होणार कसा? हा आमचा प्रश्न आहे
विशेष पथकाकडून तपास सुरू आहे मात्र मूळ तपास अधिकारीच यात नाही
तेच गैरहजर असल्याने न्याय मागायचा कोणाकडे
यात एसआयटी आणि सीआयडी स्थापन करून तपास करावा
नंदुरबार ब्रेकिंग.....
जुन्या घटनेचा वाद टोकाला कुराडीने एक घाव दोन तुकडे.....
मजुराचा हत्येचा घटनेने हादरला सातपुडा....
धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्गुणपणे मजुराची हत्या....
फाड्या खाज्या पावरा वय 40 अस मृत इसमाचे नाव...
पोटाची खडकी भरण्यासाठी पंढरपूर येथे मजुरीसाठी गेलेल्या धडगाव तालुक्यातील बिललगाव गावातील फाड्या पावरा हा मजुरी करून परत आपल्या गावी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच घडला हत्याकांड...
नदीवर आंघोळीला जात असताना, पूर्वीच्या शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या गावातील काहींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण नंतर धारदार कुऱ्हाडीने केला हल्ला.....
3 जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
हत्या करणारे तिघे आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत....
मृत्युदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे .....
१ हजार २९० बसेस या महापालिकांना देण्यात येणार आहेत
महाराष्ट्राची नवीन इलेक्ट्रिक व्हेहिकल पॉलिसी राबवण्याचा निर्णय घेतला आहे
त्यामुळे प्रदूषण कमी होईल
कार्बन उत्सर्जन कमी होईल
वीज निर्मिती क्षेत्रात ९० हजार रोजगार निर्माण करत आहोत
मागास त्याला सौर पंप योजना आणली आहे
सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपण उभारली आहे
१२ लाखांहून अधिक घरे ग्रामीण भागात उभारण्याचे नियोजन आहे
अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे
त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल
१ लाख ३१ हजार हेक्टर हून अधिक जमीनीला यामुळे फायदा होईल
९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे
५५ हजार कोटींहून अधिक निधी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत
इथेनॉलचा पर्यायी वापर वाढवला जात आहे
एमएसपी अतंर्गत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक खरेदी सरकारने केली आहे
तालुका १ मार्केट कमिटी स्कीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
३२५ महिला बचत गटांना सरकारने ड्रोन पुरवले आहेत
नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाचा हा प्रयत्न आहे
१८ हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे
तसेच लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून प्रत्येक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला सुरुवात
आंदोलनाविषयी माझे कोणाशी बोलणं झालेले नाही मात्र मी उपोषणावर ठाम होते
आम्हाला न्याय मिळाल्या नाही
या प्रकरणात एसटी आणि सीआयडी मार्फत चौकशी व्हावे
पथकाकडून काही सांगणं झालं नाही
यात SIT CID स्थापन करावेच लागेल
धस यांनी केलेल्या विनंतीवरून उपोषण स्थगित केले होते मात्र मागणी मान्य झाली नाही
पोलीस उपाधीक्षक दहा दिवसांपासून रजेवर आहेत
त्यामुळे तपासा संदर्भात काही माहिती मिळत नाही
प्रशासनाने आमची दिशाभूल केली
त्यामुळे शेवटची भूमिका उपोषणाची आहे
प्रशासनाचा संपर्क झालेला नाही
एसआयटी आणि सीआयडी स्थापन केली तरच उपोषण मागे घेणारे
नाही तर माझा मृतदेह परळीला जाईल
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे यांच्याकडे मागणी आहे
यात SIT CID स्थापन करा
राज्यपाल
- कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नांबाबत कृती केली जात आहे
- दावोसमध्ये भारताने 15 लाख कोटींचे करार केले
- त्यातून 15 लाख रोजगार निर्मिती होणार आहे
- नागपूर गोवा शक्तीपीठाचे काम सुरू असुन सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण केला जाईल
- 26 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे
भिवंडी ठाणे खाडी पट्ट्यात अनधिकृत पणे रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप तहसीलदार अभिजित खोले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुधाकर कामडी व राजेंद्र वंजारी यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तीन सक्शन पंप एक बार्ज केला नष्ट केले आहेत.खाडीमध्ये शासकीय बोटीच्या सहाय्याने अनाधिकृत रित्या रेती उपसा करणाऱ्या पथकाने दिवे केवणी समोरील वाघबील ठाणे खाडी किनारी एक सक्शन पंप पथकास आढळून आला.त्या सक्षम पंपाचे वॉल खोलून सक्शन पंप मध्ये पाणी भरल्याने पथकाने सेक्शन पंप चे पाईप कट करून ते पेटवून देऊन सक्शन पंप खाडी पात्रामध्ये बुडविण्यात आला.तर पिंपळास ते कोन खाडी मध्ये अनधिकृत रेती उपसा करणारे दोन सक्शन पंप व एक बार्ज पकडण्यात आले.हे सर्व साधनसामुग्री कोन येथील बंदरावर खेचून आणून गॅस कटर च्या साहाय्याने सक्शन पंप व बार्ज नष्ट करून अज्ञात रेती उत्खनन करणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी ठाणे खाडी पट्ट्यात अनधिकृत पणे रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप तहसीलदार अभिजित खोले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुधाकर कामडी व राजेंद्र वंजारी यांच्या नेतृत्वाखालील महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तीन सक्शन पंप एक बार्ज केला नष्ट केले आहेत.खाडीमध्ये शासकीय बोटीच्या सहाय्याने अनाधिकृत रित्या रेती उपसा करणाऱ्या पथकाने दिवे केवणी समोरील वाघबील ठाणे खाडी किनारी एक सक्शन पंप पथकास आढळून आला.त्या सक्षम पंपाचे वॉल खोलून सक्शन पंप मध्ये पाणी भरल्याने पथकाने सेक्शन पंप चे पाईप कट करून ते पेटवून देऊन सक्शन पंप खाडी पात्रामध्ये बुडविण्यात आला.तर पिंपळास ते कोन खाडी मध्ये अनधिकृत रेती उपसा करणारे दोन सक्शन पंप व एक बार्ज पकडण्यात आले.हे सर्व साधनसामुग्री कोन येथील बंदरावर खेचून आणून गॅस कटर च्या साहाय्याने सक्शन पंप व बार्ज नष्ट करून अज्ञात रेती उत्खनन करणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यपाल
महाराष्ट्र हे नॅशनल टेक्सटाईल मिशनची घोषणा करणारे पहिले राज्य
त्यामुळे राज्यातील टेक्सटाईल क्षेत्रातील रोजगाराला चालना मिळेल
२०२४-२५ मध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजना राबवत आहे
९० हजारांहून अधिक तरुणांना त्यात रोजगार मिळाला आहे
नागपूर गोवा शक्तीपीठ बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
या रस्त्याने फक्त प्रवासाचा वेग वाढणार नसून संबंधित भागाची आर्थिक प्रगती ही होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचं केल स्वागत
विधान भवनाच्या पाय-यावर अमित देशमुख येताच मुख्यमंत्री यांनी तुमचं स्वागत आहे अस म्हणत केला नमस्कार
मुख्यमंत्री राज्यपालांच स्वागत करण्यासाठी पाय-यावर उभे होते
तेवढ्यात अमित देशमुख येताच नमस्कार करत केल स्वागत
- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांच्यां विरोधात अविश्वास ठराव
- 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात
- 15/3 ने सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास
- नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास सादर करणारे 15 सदस्य दाखल
- नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आजी माजी सभापतीपदे मध्ये पुन्हा राजकिय वर्चस्वाची लढाई
सभापती देविदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापतीआणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवाजी चुंबळेचे देविदास पिंगळे यांना आव्हान
-
- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने
असर संस्थेच्या अहवालातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची स्थिती समोर
आठवीच्या 30% विद्यार्थ्यांना वाचता येईना, तर 68% जणांना भागाकार जमेना
असर संस्थेच्या अहवालातून बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची ढासळलेली स्थिती समोर आली आहे. आठवीच्या 30 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना तर 68% जणांना भागाकार जमेना अशी स्थिती आहे.
असर या देश पातळीवर काम करणाऱ्या संस्थेच्या शिक्षणासंबंधीचा अहवाल समोर आला. त्यातून ही बाब समोर आली आहे. तिसरी ते पाचवी पर्यंतचे 55% विद्यार्थी वाचनात ढ असून 59% जणांना वजाबाकी सारखी छोटी गणित देखील येत नसल्याचे वास्तव आहे.
त्यामुळे आता येणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद प्रशासनाला गुणवत्ता वाढीसाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे.
ब्रेकिंग न्यूज - जळगाव
एकनाथ खडसे on अधिवेशन
सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. जळगाव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केळी विकास महामंडळाची स्थापना करू अशी घोषणा केली होती मात्र अद्यापही ती पूर्ण केली नाही
लेवा पाटील आणि गुजर महामंडळाची स्थापना करू अशी देखील घोषणा त्यांनी केली होती मात्र ती देखील पूर्ण केली नाही.
असे अनेक जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे सह रस्त्याचे विषय प्रलंबित आहेत.
त्यामुळे या अधिवेशनात हे सर्व प्रश्न मांडण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल
---------
माननीय मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातल्या ज्या धमक्या आल्या याचा आम्ही निषेधच करतो
मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे खरोखरच धमकी दिली की कोणी धमकी पाठवली
----------
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत महिलांना एका दुसरा हप्ता मिळेल मात्र यापुढे ते मिळत राहतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे
सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली मात्र ते कधी देणार आहेत या संदर्भात आम्ही विचार न करणार आहोत
शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली मात्र ही कर्जमाफी केव्हा मिळणार आहे
Byte - एकनाथ खडसे...
नंदुरबार फ्लॅश....
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार जिल्ह्यात जल संकट.....
वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट.....
सातपुड्याच्या दुर्गम भागात आतापासूनच धरण पडली कोरडी....
धडगाव तालुक्यातील अनेक धरण आणि तलावात फक्त 10 टक्के जलसाठा उपलब्ध....
Mumbai: पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर भांडुप ते विक्रोळी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सुमारे दीड ते दोन किमी वाहनांचा रांगा पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र यामुळे कामासाठी मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्याना अर्धा ते एक तास इथे खोळंबा होताना पाहायला मिळतो आहे. या मार्गावर पहाटे पाच वाजताच्या दरम्यान एक रेती वाहून नेणारा डंपर , कचरा वाहून नेणाऱ्या क्लीन अप ट्रक ला धडकला. यामुळे हा ट्रक रस्त्यात उलटला.यात रामावतार प्रजापती या ट्रक चालकाचा मृत्यू झाला.वाहतूक पोलिसांनी ही अपघात ग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला केली असली तरी यामुळे झालेली वाहतूक कोंडी वाढत गेली आणि ती अजून ही पूर्व द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, डीसीपी अन एपीआयवर कोयत्याने हल्ला
दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर हल्ला झालाय. बचावासाठी पोलीस उपायुक्तांनी सुद्धा गोळीबार केल्यानं एक आरोपी जखमी झालाय. यात चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झालेत. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेंव्हा पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार अशी खबर पोलिसांना मिळाली होती. मग डीसीपी पवारांनी एपीआय जराडसह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी मंदिर परिसरात दोघे दबा धरुन बसल्याचं लक्षात आलं. मग त्या परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री सव्वा बाराच्या सुमारास स्वतः डीसीपी आणि एपीआय दोन दरोडेखोरांच्या दिशेने निघाले, या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र दोघांनी पळून जाण्याचं धाडस स्वीकारलं, तेंव्हा डीसीपी आणि एपीआय पुढं सरसावले. दोघांपैकी एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. बचावासाठी डीसीपींनी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर ही दरोडेखोराने डिसीपींवर कोयत्याने वार केला, डीसीपी पवार थोडं मागे हटले. मात्र वार चुकवू शकले नाहीत, त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. डीसीपी पवार रक्तबंबाळ झाले. अशात त्यांनी एक गोळी झाडली, ती दरोडेखोराने चुकवली. मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढं आले, त्याने त्यांच्यावर ही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. मग जखमी अवस्थेत असलेल्या डिसीपींनी दुसरी गोळी थेट पायावर झाडली, यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आलं, दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं. जवळपास वीस मिनिटं पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डिसीपींना छातीवर पाच टाके पडलेत. ते थोडक्यात बचवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जराड यांना ही मोठा इजा झालेली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जखमी दरोडेखोरावर उपचार सुरुयेत तर अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे. डीसीपी पवार, एपीआय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या. दसऱ्यादिवशी याचं टोळीनं एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकत, पोलिसावर हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात बहुळ गावात एका घरावर दरोडा टाकला, त्यावेळी त्या कुटुंबातील पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. आता पुढचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना डीसीपी पवार, एपीआय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्या.
संजय राऊत
- केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचच विनयभंग होतो आणि गृहमंत्री कोण तर देवेंद्रजी
- राजकारणातून यांना वेळचं मिळत नाही गृहखात्याकडे बघायला
- आता हे सामाजिक कार्यच करणारे वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे हे सर्व
- महाराष्ट्रात तुम्ही काय पेरताय जिते सत्तातिथे हे बलात्कारी
- काल आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला गुंडांनी
- आनंदआश्रम शिंदेंनी बळकावले नावावर करून घेतले
- आम्ही दिघेसाहेबांना शास व हार घातला. आम्ही गेल्यावर याच गुंडांनी ते रस्त्यावर फेकले हा दिघेसाहेबांचा अपमान नाही का ?
- केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकाचं काय
- लाडक्या बहिणीचा दररोज खुळखुळा वाजवतना
- बीडमध्ये काय चाललयं
- मुंडेंची पत्नी व मुलगी परत उपोषणाला बसलेत
on विरोधीपक्ष नेते
- नक्कीच आमचा हकक आहे
- सत्ता कोणाची असो विरोधीपक्षाने आपली कामगिरी चोख बजावली पाहिजे
- तुम्ही जरी संशयास्पद निवडून आला असलात तरी
- भ्रष्ठाचार्यांना वेसन घालण्यासाठी लोकशाहीने तो हक्क दिलाय
- विरोधीपक्ष नेत्याचा निर्णय विधीमंडळ पक्ष घेतो
on खूर्ची
- खूर्चीसाठीच शिंदे अमितशहाना भेटले होते
- मात्र कायमस्वरुपी खूर्ची हवी असल्यास पक्षात विलीन व्हा असेही शहांनी सांगितले
- रिफायनरी व्हावी यासाठी आमच्यातले माजी आमदारांना त्यांनी तिथे बोलावलं आहे. त्यासाठीच ते या आधी प्रयत्न करतहोते
- या प्रक्लपाने विष पेरले जात आहे. कोकणाला याचा फटका बसणार
- लोकांचा विरोध कायम असेल तर शिवसेना त्यांच्यासोबत
- आमच्यातला जो गाळ चाललाय तो तोच बाटली बाॅय, जे शाखेतपार्टी करतात, त्याचा मागे फोटो पाहिलेत आपण
- निलम गोर्हे अनावधाने बोलला असाल किंवा जानीवपूर्वक माफी ही जाहिरच माफी मागावी
नागपूर -
बाईट - खा. शाहू महाराज छत्रपती -
- आमचे सहकारी गडचिरोलीचे खासदार त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आलोय
- प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होते,ऐकण्यात आले आहे की ते दुसऱ्या राज्यात गेले आहे,त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे
- जामीन मिळाला असेल तरीपण 11 तारखेपर्यंत वेळ दिला आहे,6 मार्च ला मुख्यमंत्री येणार आहेत
- निषेध नोंदवून सगळे कंटाळले असतील,पण असे वक्तव्य करणे योग्य नाही
- सगळ्यांनी निषेध व्यक्त केला आहे
- कोणालाही ते वक्तव्य आवडलेलं नाही
- त्यांनी काय म्हटले आहे ते प्रसार माध्यमात आले आहे,पण त्यांनी काय म्हटले ते निषेधार्या आहे
- अनिल देशमुख यांचेकडे सहज भेट आहे
- राज्य सरकार म्हणते कारवाई करणार,पण ते लवकर कारवाई करत नाही
- सरकारने स्वतः कोरटकर यांच्यावर गुन्हा नोंदविला पाहिजे
- जे कायदे आहेत ते पुरेसे आहेत,त्या कायद्या अंतर्गत कारवाई करता येते,नवीन कायद्याची गरज नाही
Beed: परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे आज पासून जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उपोषण करणार आहेत.
साडेनऊ वाजता ज्ञानेश्वरी मुंडे परळीहून बीड कडे निघतील. त्यानंतर साधारण 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्या उपोषणाला सुरुवात होईल. परळीतील महादेव मुंडे यांचा 16 महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरात खून झाला होता. यातील आरोपी अद्यापही अटक नाहीत. त्यामुळे यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण करणार आहेत.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. मात्र तरी देखील अद्याप यातील एकाही आरोपींना अटक झालेली नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोग ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे.
पंढरपुरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव नुकताच संपन्न झाला. अभिजात शास्त्रीय संगीताचा महोत्सव म्हणून अभिषेकी संगीत महोत्सवासाठी राज्यातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. अपर्णा केळकर, पंडित राजा काळे , अमर ओक, ओजस आडिया अशा कलाकारांच्या सादरीकरणाने पंढरपूरकर मंत्रमुग्ध झाले. सलग तीन वर्षापासून तरंगिनी प्रतिष्ठान पुणे, नादब्रह्म फाउंडेशन आणि मनमाडकर परिवार यांच्या वतीने पंढरपुरात जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते.
कोल्हापूर ब्रेकिंग
केर्ले ते नांदगाव रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत
पिंपळे, उदाळवाडी सह अनेक ठिकाणी दररोज अपघातांच्या घटना
आज सुद्धा अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे अपघात
दहावीच्या परीक्षेसाठी मुलांना एसटीतून उतरून पायी चालत जाण्याची वेळ
अनेक ठिकाणी रस्ता अरुंद केल्याने नागरिकांमधून संताप
धाराशिव ब्रेकिंग
.....
धाराशिव शहरातील पाच दुकान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक
शहरातील ताजमहल टॉकीज पुलाजवळील यमाई मंदिर परिसरात आग
दुकानांमध्ये लॉन्ड्री, बिल्डिंग मटेरियल, घड्याळाच्या दुकानाचा समावेश
एका दुकानदाराचा दुकानासह घराचा समावेश
अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
Breaking news
- नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्ग्यासंदर्भात आज वक्फ बोर्डात सुनावणी
- सात पीर दर्गा विरुद्ध नाशिक महानगर पालिका यांच्यात सुनावणी
-
- छत्रपती संभाजीनगर येथे ही सुनावणी होणार
- सकल हिंदू समाजाच्या वतीनेही हस्तक्षेप याचिका दाखल होण्याची शक्यता
मागील आठवड्यात नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या परिसरातील काढले होते अतिक्रमण
याकारवाई नंतर शहरात तणाव निर्माण झाला होता
- वक्फ बोर्डाच्या सुनावणीत आज काय घडतं याकडं लक्ष
प्रशांत कोरटकर आरोप प्रकरण अपडेट -
प्रशांत कोरटकर विरोधात नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपासही आता कोल्हापूर पोलीस करणार आहे...
कारण नागपूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आता रीतसर कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे... कारण कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करत आहे.. त्यामुळे तपासाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून नागपुरातील गुन्हाही कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करत तपासाची सूत्र त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे....
रायगड - मॅट्रोमोनी साईटवर महिलाना आकर्षित करून त्यांच्याशी जवळीक साधून लग्न करण्याचा बहाणा करणाऱ्या एका व्यक्तीला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर महिलांना लग्नाचे आमिष दाखवायचा त्यानंतर महिलांना आपल्या जाळ्यात खेचायचा मात्र कर्जत मधील एका महिलेला या आरोपीने अशाच जाळ्यात खेचून आपल्याला अमरावती मध्ये बियर शॉपी सुरू करायची आहे अस सांगून या आरोपीने या महिलेकडून तब्बल फसवण्याचा प्रयत्न केला आणि 7 लाख रुपयांची रक्कम या महिलेकडून आपल्या खात्यात जमा करून घेतली मात्र महिलेच्या जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आले तेव्हा मात्र या महिलेने कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला कर्जत पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपीला पकडून त्याला अटक केली आहे. प्रतीक संजय देवरे वय वर्ष 37 अस या आरोपीचे नाव असून तो नाशिक येथे राहणारा आहे.
कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्ती कुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील येरुनकर हे पुढील तपास करत आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उष्ण तापमान असण्याची तज्ञांनी व्यक्त केली शक्यता, जानेवारी 2025 इतिहासातील सर्वात उष्ण महिना असल्याची झाली नोंद
उच्च व अत्युच्च तापमानासाठी देश व जगात चंद्रपूरची ख्याती आहे. मात्र यावर्षी देखील चंद्रपूर जिल्ह्याचं उष्णतामान विक्रमी व वाढलेले राहील अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक हवामान परिषदेने जागतिक तापमानात सरासरी दीड अंशांनी वाढ झाल्याचे स्पष्ट केले असून जानेवारी 2025 हा महिना आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदला गेला आहे. वातावरणातील अडथळे असलेले अल निनो व ला नीनो ही दोन्ही संकटे या वर्षी स्थिरावलेली आहेत. यामुळेच तापमानात होणारे कमी-अधिक बदल देखील यंदा स्थिरावण्याची शक्यता आहे. परिणामी वाढलेले तापमान कमी करण्यासाठी कुठलाही नैसर्गिक पर्याय नसल्याने हे तापमान वाढत्या क्रमात राहण्याची शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे चंद्रपूरसाठी मार्च- एप्रिल- मे हे महिने अधिक तापमानाचे असतात. याला प्रमुख कारण इथलं प्रदूषण असलं तरी तापमानाची ही स्थिती बघता मनपा आणि जिल्हा आरोग्य विभागाने आतापासूनच उष्णता रोधी कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. विविध सार्वजनिक व शासकीय रुग्णालयांमध्ये शीतकक्ष स्थापन केले जात असून उष्णता व तापमानापासून ग्रस्त रुग्णांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहे.
वादग्रस्त रिफायनरी बारसुलाच होणार
विश्वसनीय सूत्रांची माहीती
राज्य सरकार तसा पाठपुरावा करत असल्याची माहीती
हा प्रकल्प इतर राज्यात घेऊन जाण्यासाठी हालचाली सुरू आहेत
मात्र कितीही विरोध झाला तरी रिफायणरी महाराष्ट्रात करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न
महाराष्ट्रात आंदोलन सुरु झाल्यानंतर आराम्को कंपनीने गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांत बोलणी सुरु केली असल्याची चर्चा आहे
मात्र या कंपनीशी आणि केंद्र सरकार सोबत बोलणी करुन बारसू मध्येच हा प्रकल्प सुरु करण्याचा राज्य सरकरचा प्रयत्न
बारसू येथील मृदा परिक्षण सकारात्मक असून राज्य सरकार याच ठिकाणी प्रकल्प सुरु करण्यासाठी आग्रही असल्याची माहीती
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब ठरले महत्त्वाचे
देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत
यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचं उघड झाले आहे
आरोपींनी पाईपला करदोड्याने मूठ तयार करून देशमुख यांना मारहाण केली
तसेच एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली हे पुरावे सीआयडीने आरोप पत्रात नमूद केले आहे
यामध्ये 66 भक्कम पुरावे जप्त केले असून 184 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले तर पाच गोपनीय साक्षीदारही महत्त्वाचे ठरले
सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोप पत्रातील मोबाईल फोन बाबतची माहिती महत्त्वाची ठरली
विष्णू चाटे याचा मोबाईल तपास यंत्रणेला सापडला नाही
परंतु वाल्मीक कराडचे तीन महागडे आयफोन तपास यंत्रणेला ताब्यात घेण्यात यश आले या तपासात हे मोबाईल फोन महत्त्वाचे ठरले आहेत
फिकट निळ्या रंगाचा आयफोन 13 प्रो
सोनेरी रंगाचा आयफोन 16 प्रो
आणि आणखी एक सोनेरी रंगाचा आयफोन 13 प्रो या फोनमधील डेटा आणि कॉल डिटेल्स महत्त्वाचे ठरले
यातून खंडणी आणि हत्येच्या तपासातील बरेच मुद्दे तपास यंत्रणेने अधोरेखित केले आहे
या फोनवरून झालेल्या संभाषणाच्या आवाजाचे नमुने तपास यंत्रणेने घेतले आहेत
छत्रपती संभाजी महाराज याच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे
अनस कुरेशी असे या आरोपीचे नाव असून तो एक सेल्समन आहे.
अनसने त्याच्या मोबाइलवरील व्हाॅटेस स्टेटसवर औरंगजेब याच्या समर्थनार्थ आणि हिंदु धर्मिकांच्या भावना दुखावतील या हेतूने पोस्ट केली होती
त्यात त्याने 'हबीबी जो हमे हर नही पाए मैदान ए जंग मै, और वो हमसे बदला ले रहे है! मैदाने सिनेमा हाॅल मै...!' या आशयाचे स्टेटस ठेवले होते
या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी कलम २९९ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे
परभणी - शहीद सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय देण्यासाठी आज ३ मार्च सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर हजारोंच्या संख्येने राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भीमसैनिक आंबेडकरी समाज व संविधान प्रेमी नागरिक धडकणार असून सर्व आंबेडकरी संघटना सर्व पक्ष संविधान प्रेमी नागरिकाचा सहभाग राहणार आहे.
उघड्या चोचीचा करकोचा व मुग्धबलाक या नावांनी ओळखले जाणाऱ्या करकोच्यांनी यंदा पलूस तालुक्यातील आमणापूरच्या कोंडार परिसरात मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. परदेशी पाहुण्यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या आमणापूरच्या कोंडार परिसरात एकाच वेळी तब्बल 20 मुग्धबलाक पक्षांची नोंद झाल्याची माहिती येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे. गतवर्षी पाऊसकाळ लांबल्याने तसेच नदीची पाणीपातळी जास्त राहिल्याने यावर्षी उथळ पाण्याअभावी हिवाळ्यात पाहुणे पक्षी आमणापूर कृष्णाकाठावर रूसल्याचे पहायला मिळाले. आता नदीची पाणीपातळी कमी होताच याठिकाणी पक्षांची शाळा भरू लागली आहे. मात्र यामध्ये नदी प्रदुषणाचे संकेत देणारे पक्षी अधिक आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात चिकन पॉक्सचा धोका....
लहान बालकांमध्ये सर्वाधिक चिकन पॉक्स......
चिकन पॉक्स हा संसर्गजन्य रोग असल्याने अनेक लहान मुलांना त्याची लागण ......
ताप येणे अंगाला पुरळ ,फोड नंतर खरुज होण्याचा धोका....
लहान मुलांसोबतच वयोवृद्धांना देखील चिकन पॉक्स ची लागण.....
या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का?
महाविकास आघाडी कडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचं नाव दिले जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची तयारी आहे...
मात्र त्यासाठी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांचा सुद्धा पाठिंबा लागणार आहे आणि त्याची चर्चा सुरू आहे...
ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर आहे त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे...
मात्र महाविकासाकडे कडून विरोधी पक्ष नेते पदाचा पत्र विधानसभा अध्यक्ष यांना नेमकं कधी दिले जाणार? याबाबत स्पष्टता आलेली नाही...
मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह तिच्या मैत्रिणीची छेडखानी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे. एक अल्पवयीन मुलगा ही चौकशी साठी ताब्यात घेण्यात आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी संत मुक्ताई यात्रेत छेडखानीचा प्रकार झाल्याच्यानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी काल पोलीस ठाण्यात जाऊन आक्रमक भूमिका घेतली होती.
रोजच्या धावपळीत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जगतातील बातम्या आपण बघताय, आता ही बातमी आहे, व्याघ्र अभयारण्यातील. ही बातमी आहे, भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वन वैभव आणि वन्य जीवांचा मोठा अधिवास असलेल्या उमरेड - पवनी - करांडला अभयारण्यातील... या व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना भुरळ घालतेंयं ते रुबाबदार N4 वाघ व F2 वाघिणी आणि तिचे पाच बछडे.....वाघिणीचे बछडे मस्ती करतानाचा एक व्हिडिओ समोर आलायं.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलिस स्टेशन समोर असलेल्या चिमूर-पिंपळनेरी रोड समोरील झुडपात एक मृत अर्भक आढळून आले आहे. कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेले हे मृत अर्भक आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. हे मानवी अर्थक स्त्री जातीचे आहे का आणि हे अर्भक कुठून आले या बाबत चिमूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केलाय.
अकोल्यातल्या अकोट शहरात श्रद्धा भक्ती ज्ञानाच्या अपूर्व स़ंगमात वासुदेव भक्त न्हाऊन गेले... माऊलींच्या अश्वांच्या रिंगणात भक्ती रंगाची उधळण पाहायला मिळाली... अगदी भव्य दिंडी सोहळ्यात अकोट नगरी दुमदुमलीऐ... श्री संत वासुदेव महाराज यांच्या 108 वा जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. जन्मोत्सवानिमित्त गुरुमाऊली पालखी रथाची नगरप्रदक्षिणा व वारकरी दिंडी सोहळा पार पडला.. ओम वासुदेव नमो नमः' 'पुंडलिका वरदे हरी विठ्ठल..' 'ज्ञानोबा तुकाराम' गजराने टाळ मृदंगाच्या ठेक्यावर नाचत गात गांवोगांवच्या शेकडो दिंड्यात हजारो भाविक सहभागी झाले होते... विशेष म्हणजे...अश्वांच्या रिंगण सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा होता.. अगदी गोल रिंगण खास आकर्षण ठरले.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (3 मार्च) सुरु होणार आहे. 3 मार्च ते 21 मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. तसेच 10 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विविध अपडेट्स येत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचारप्रकरणी देखील विविध खुलासा होत आहे. या राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -