Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
Nanded - नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा मध्ये होळी अर्थात होल्ला मोहल्ला सण उत्साहात साजरा करण्यात आला. सचखंड गुरुद्वारा येथे पाच दिवस होळीचा हा सण साजरा केला जातो. गेले सव्वा तीनशे वर्षापासून ही परंपरा पाळली जाते. देश विदेशातून हजारो भाविक होळी निमित्त नांदेड मध्ये दाखल होत असतात. यंदाही हजारो भाविक या सणानिमित्त नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. होल्ला मोहल्लाची सांगता प्रतिकात्मक हल्लाबोल काढून करण्यात येते. हल्लाबोल मध्ये शीख भाविक हातात शस्त्र घेऊन प्रतिकात्मक हल्ला करतात.
ब्रेकींग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराच नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता
उद्या दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीला बैठक
कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर उद्या चर्चा होऊन बैठकी नंतर उमेदवाराच नाव जाहीर करण्यात येणार
सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना सूचना
जयंत पाटील भाषण मुद्दे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू देत.. आपण आपल्या मतदारसंघात तयारी सुरू करावी...
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकासाठी आतापासूनच उमेदवार तयार ठेवा
तसेच महानगरपालिका आणि नगरपालिकेसाठी देखील आपण आता तयार राहिलं पाहिजे
सांगली जिल्ह्याला संघर्ष नवा नाही, कठीण परिस्थिती देखील या जिल्ह्यातील कार्यकर्ते पक्षासोबत आहेत
सरकारकडून महामंडळाची घोषणा करण्यात आली होती परंतु एकही महामंडळ करण्यात आलेलं नाही
सतरा वेगवेगळ्या महामंडळाची निर्मिती करण्यात आली. परंतु आज संक्रात मात्र यांना काही दिलं नाही
महामंडळ निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील कुठेही दिलेलं नाही. सरकार ओबीसी महामंडळाच्या नावाखाली कंपन्या चालवत आहे
ओबीसी समाजाला निवडणुकीपुरतं आश्वासन दिले गेले
समस्त ओबीसी समाजाला अस्वस्थ करून त्यांचे प्रश्न घेऊन आपण महाराष्ट्रासमोर गेले पाहिजे
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत
निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा नारा देण्यात आला, सळसळत्या रक्तात याचा परिणाम झाला. खर तर पढेगे तो बढेगे हा नारा दिला पाहिजे
पण आज देशाला पढेंगे तो बढेंगे या घोषणाची गरज आहे
जग पृथ्वी इंटेलिजन्स वर चालले आहे तर आपण बटेंगे तो कटेंगे यावर चाललोय
किती आमदार आले आणि किती आमदार गेले हा प्रश्न महत्त्वाचा नाही.
घराघरात घुसून महिलांचे लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज भरण्यात आले , ज्या महिलांचे नावे लाडकी बहीण मधून कमी झालेत त्या महिलांसाठी आता जनआंदोलन उभे करावे लागेल
शेतकरी , तरुणाच्या प्रश्नावर आंदोलन उभारावे लागेल,
मी आणि आर आर पाटील असताना जिल्ह्यात दुसरा कोणताही पक्ष सत्तेत येत होता
रोहित पाटील यांनी युवकांचे संघटन करून युवकांचे प्रश्न सोडवावेत
हर्षवर्धन पाटील भाषण मुद्दे
लोकसभेला 31 जागा आल्यानंतर आपण हिशोब करत बसलो... आणि सहजच लाखाच्या मताधिक्याने आपले आमदार निवडून येतील अशा भ्रमात आपण राहिलो त्यामुळे विधानसभेला आपला पराभव झाला
कोण मुख्यमंत्री होणार कोण उपमुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार या भूमिकेत आपण बसलो...
त्यामुळे विरोधी पक्षासाठी लागणाऱ्या संख्येला इतकं देखील आपल्याला संख्या मिळाले नाही... याचा विचार आपल्याला केला पाहिजे
विधानसभेच्या पराभवाची कारणे आता आपल्याला शोधावे लागतील... शोध घेऊन त्यातून बोध घेऊन दिशा ठरवावी लागेल
माझ्या मतदारसंघात 332 बुत आहेत... फक्त 16 बुथवर मी आघाडीवर आहे. पंचायत समिती नगरपालिका जवळपास 60 टक्के ग्रामपंचायती माझ्याकडे आहेत... तरी देखील असं घडलं.. असं आजपर्यंत कधी घडलं होतं का?
आता निवडणुका पुढे ढकलले आहेत... कधी लागतील माहित नाही.. पण आज ना उद्या कधीतरी या निवडणुका लागतील.. त्याला ताकदीने आतापासून तयार रहा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून दोन-चार वर्षे सोडली तर आपण कायम सत्तेत आहे
लोकसभेचे वातावरण विधानसभेला राहिलं नाही विधानसभेचे वातावरण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील बदलेल
विकास काम आता आपलं काम नाही... आता आपलं काम पहिला मांडणी करणे. आंदोलन करणं आणि झालेल्या अन्यायावर संघर्ष करणार हेच काम आपल आहे
दुधाच्या अनुदानावर आता आपल्याला आंदोलन करावा लागणार आहे
चलविचल होत राहते... परिस्थिती बदलणार आहे..
मुठभर मावळे घेऊन लढणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना डोळ्यासमोर ठेवा आणि जय शिवरायची घोषणा देऊन कामाला लागा
ब्रेकींग
छत्रपती संभाजीनगरच्या मुंबई-नागपूर महामार्गावर अपघात
आयशर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक
अपघातात आयशर ट्रक आणि दुचाकी पेटली
भीषण अपघातात आयशर आणि दुचाकी जळून खाक
वाहनांना लागलेल्या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला लागली आग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे मत
जळगाव :- मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली असती तर पोट निवडणुकीचा भुर्दंड पडला असता असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. या निरीक्षणावरून आता मोठा वाद उठला आहे. राजकीय नेत्यांसह सामान्य जनता आता निर्णयावर आपले मत व्यक्त करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही बद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणतात की, ‘ते म्हणतात मंत्री महोदय कोकाटे यांची आमदारकी रद्द केली तर निवडणूक खर्चाचा भुर्दंड पडेल... वाह ! सरकारच्या खर्चाची यांना चिंता ?’
जर हा मुद्दा असेल तर मर्डर, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यात असलेल्या आरोपींवर खर्च कशाला करता डायरेक्ट फाशी देऊन टाका !
गुन्हेगाराला खरंच शिक्षा करायची असेल तर ज्या पक्षाने मंत्री महोदयांना उमेदवारी दिली त्या पक्षाकडून निवडणूक खर्चाची रिकव्हरी करता येईल... पण… असे म्हणत रोहिणी खडसे यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे.
रायगड ब्रेकींग
महाड वरंध घाटामध्ये महामंडळाची एसटी बस पलटी
अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी...
जखमींवर महाड रुग्णालयात उपचार सुरू
Anchor - रायगड मधून अपघाताची बातमी समोर येत आहे.या अपघातात महाड भोर वरंधा घाटामध्ये महामंडळाची एसटी बस पलटी होऊन 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सायंकाळी साडे चार वाजता भोर वरंध घाटामधील एका तीव्र वळणावर चालकाचा अचानक ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींवर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकेशन - महाड वरंध
शशिकांत शिंदे भाषण मुद्दे
सांगलीतून तुझी सुरुवात होईल ते भविष्यात राज्यात गुढी उभारली जाईल
आता येथून पुढे फोन लावल्यावर जय शिवराय बोलायचं... सांगलीतून होईल.. हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे
कोणताही फोन आला तर सुरुवातीला जय शिवराय म्हणायचंच
सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला आपण शाबूत ठेवला... परंतु दुर्दैवाने सातारा मधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाभूत झाला
गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले त्यांनी हार मानले नाहीत... त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले
तसेच तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा... शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
विधानसभा निवडणुकीत भाजप व्यवस्थित पेरणी केली.. त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले
आता आपल्याला पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे लागणार आहे
एकीकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे घोषणा केल्या जातात... आणि दुसरीकडे मात्र धार्मिक तीळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे...
आगामी काळात तालुकास्तरावर मेळावे घेतले जातील. जो कार्यकर्ता सक्षम आहे त्याच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. तसेच जो पक्षात येण्यास इच्छुक आहे त्याला देखील जबाबदारी देण्याचा विचार होईल
हल्ली तरुणांना भावनिकतेच्या मुद्द्यावर दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे
सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदांच्या जागेवर स्थानिक तरुणांचा हक्क असल्याचं जाणून दिलं पाहिजे
सरकार शासकीय कार्यालयामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम करण्याचा प्रयत्न करत आहे, यासाठी आता आंदोलन उभारण्याची गरज आहे
जिल्ह्यातील शंभर कार्यकर्त्यांची फौज अशी तयार ठेवा... की राज्यात कोणताही मुद्दा उपस्थित झाला तर त्याची सुरुवात आंदोलनातून सांगलीतून झाली पाहिजे
ज्या योजना बंद होत आहेत त्या योजनेचे लाभार्थी शोधा व त्यांना सरकार अन्याय कसं करत आहे हे पटवून द्या
राजकीय पाठबळ असल्याशिवाय खोके बोके कुणीही पुढे येत नाहीत... बीड मुद्द्यावर शशिकांत शिंदे यांची टिप्पणी
मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दिलेल्या दिलासा वर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
मी न्यायालयाच्या विरोधात बोलत नाही.. पण कोर्टात म्हणत असेल खर्च वाढेल म्हणून निवडणुका परत नको... अशा पद्धतीने निकाल देत असतील तर राज्यात पुन्हा निवडणुका होतील की नाही याबाबत शंका आहे...
फोडाफोडी केलेला पश्चिम महाराष्ट्र पुन्हा आम्ही आमच्या ताब्यात मिळवू
Mumbai flash
जरी ही काल मोठ्या उत्साहात धुळवड संपली असली तरी ही आज पुन्हा रंगणार मुंबईत WPL चे अंतिम सामने...
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमला आज रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स...
आज सायंकाळी ठीक ६:३० वाजता रंगणार अंतिम सामने...
मुंबई इंडियन्स कॅप्टन हरमनप्रीत कौर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स कॅप्टन मेग लॅनिंग या दोघांकडे सर्वांचे लक्ष..
होम ग्राउंड वर मुंबई इंडियन्सची टीम सज्ज...
दिल्ली कॅपिटल्स पहिल्यांदा मुंबईत खेळणार अंतिम सामने..
लगादार WPl मध्ये तिसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल फायनल मॅच मध्ये..
मार्च २०२३ मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद जिंकले.
आज मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले का याकडे सर्वांचं लक्ष...
सातारा
महाराणी ताराबाईंची समाधी उपेक्षित – ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष?
300 वर्ष पूर्ण होतील तरीही महाराणी ताराराणीची समाधी उपेक्षितच..
संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांची समाधीची दुरावस्था; शासनाने दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी
साताऱ्यातील संगम माहुली येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी महाराणी ताराराणी यांची समाधी उपेक्षितच असून शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ही समाधी नदीपात्रातील वाळू आणि गोट्यांनी व्यापलेली पाहायला मिळतेय. महाराणी ताराराणी यांची बाईट तीनशेहून अधिक वर्ष पूर्ण होऊनही.ही समाधी उपेक्षितच असलेली पाहायला मिळत आहे.अनेक संस्थांनी या समाधीच्या जिर्णोद्धाराचा नावाखाली पुढाकार घेतला मात्र अजूनही या ठिकाणी या समाधीचे काम न झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांच्यासह शिवभक्त नाराज असल्याचे पाहायला मिळते. या समाधी ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी
प्रशासनाचे दुर्लक्ष – स्थानिकांचा संताप बाईट..
इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिक या समाधीच्या दुर्दशेबाबत नाराज आहेत. महाराणी ताराबाई यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी दिलेल्या संघर्षाचा इतिहास मोठा आहे, पण त्यांच्या समाधीची स्थिती पाहता प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.
ग्रामस्थ बाईट..
साताऱ्यातील अनेक इतिहासप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते महाराणी ताराबाई यांच्या समाधीच्या सुशोभीकरणाची आणि संवर्धनाची मागणी करत आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जनतेची मागणी आहे.साताऱ्याच्या ऐतिहासिक वारशाला न्याय मिळणार का? की प्रशासन याकडे दुर्लक्षच करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली-:
राष्ट्रवादी शरद पवार गट मेळावा
आमदार रोहित पाटील भाषण मुद्दे
आपल्या व मित्र पक्षांचे सदस्य कमी असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आपली सत्ता निश्चित येईल.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील 69 पैकी 60 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आम्ही खेचून आणली आहे
अनेक मुंग्या मिळून नागाला जसं पळवून लावू शकतात तसेच राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज आहे
आगामी काळात निवडणुका जिंकण्यासाठी जयंत पाटील यांना जिल्ह्यातच कसं राहता येईल हे पाहिलं पाहिजे आग्रह करता कामा नये
ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांना गेलेच पाहिजे
एखाद्या नगरपंचायतीची किंवा महानगरपालिकेची शहरापूर्वी निवडणूक नाही सर्दी राज्याची निवडणूक असणार आहे
आजपर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आता सांगलीला महत्व दिलं जात नसल्याचं दिसून येते
सांगली जिल्ह्याला आता अजिबात महत्व नाही
कोणतेही काम करताना नेत्याने कमीपणा घेण्याची गरज नाही
पक्ष उभा करण्यासाठी आपण पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे
चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया...
# या मागणीत चूक काय आहे ? औरंगजेबचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं, प्रकांड पंडित असला तरी आपण रावणाचा पुतळा जाळतोच ना, औरंगजेबाची मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढा आणि त्या ठिकाणी बोर्ड लावा की छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस झळणाऱ्या औरंग्याची ही कबर आहे
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरून नाना पटोले यांनी घेतला यु टर्न
मी गमतीनं घेतलं....काही लोक सिरीयस घेत असतील तर, त्यांनी सिरीयस राहावं
म्हणालेत काल धुलीवंदनानिमित्त थट्टा मस्करी केली आता सरकारनं सिरीयस होऊन जनतेच्या प्रश्नावर सामोर यावं
Anchor : काल होळीचा दिवस होता, धुलीवंदनाचा दिवस होता. आणि आमच्या संस्कृतीमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. आपापसातील सगळे मतभेद विसरून आम्ही सर्वांनी राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे. यामुळे राज्यात सध्याच्या राजकीय घडामोडी चालल्या आहेत, त्यामुळे मी सुरुवातीलाचं म्हंटल आहे की, बुरा नं मानो होली है!!!! असं म्हणून त्या विषयाला मी गमतीनं घेतलं आहे. काही लोक सिरीयस घेत असतील तर, त्यांनी सिरीयस राहावं....हे सगळ्यांसाठीचं आहे. पण, आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा.... शेतकऱ्यांना साधं विद्युत मिळत नाही, सौर ऊर्जेचे पंप द्यायला सरकार निघाली होती ते पण देत नाहीत. जंगली जनावरांचा गावांमध्ये हैदोस आहे. वाघ फिरत आहेत, तरुण पोरांच्या हाताला काम नाही, महागाई आभाळाला टेकलेली आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. राज्यात सर्वात उंच कोणतं डोंगर असेल तर, राज्यावर असलेलं कर्जाचं डोंगर हे सर्वात उंच आहे. सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे. ही काळजी काँग्रेसला आहे. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आम्हाला काळजी आहे की, जनतेच्या प्रश्नाला घेऊन चर्चा व्हावी, काल थट्टेचा दिवस होता थट्टा आता संपली. सरकारने आता खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला घेऊन आणि माध्यमानेही समोर यावं असा यू टर्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. काल नाना पटोले यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सोबत यावर त्यांना मुख्यमंत्री करू अशी प्रतिक्रिया दिली होती यावर आज नाना पटोले यांनी यु टर्न घेतलाय.
Byte 1 : नाना पटोले (1.53)
---------------------------------------------
फडणवीस सरकारमध्ये ६५ टक्के मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
आरएसएस चे लोकं टाकायचा प्रयत्न करतायेत का??
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र कळला ही फडणवीसांना आमची मागणी
नाना पटोले यांची कृषिमंत्री कोकाटे यांच्यावरून फडणवीस सरकारवर बोचरी टीका
Anchor : या सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री हे चं दागी आहेत, आरोप आहेत त्यांच्यावर. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्री दागी असतील तर अशातूनचं त्यांची मानसिकता लक्षात येते. त्यामुळे फडणवीसंनाच आम्ही नेहमी सांगतो की एक मंत्री नाही तर ६५ टक्के मंत्र्यांना या मंत्रिमंडळातून काढावे लागते. अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप आहेत या ठिकाणी मी त्यांच्यावर टिप्पणी करणार नाही. एकीकडे ओएसडी कसा असावा, पीए कसा असावा याच्यावरचे नॉर्मस् फडणवीस ठरवतात. आरएसएस चे लोक टाकायचा प्रयत्न करतायेत का तो एक भाग आहे. हे जे डेप्युटी कलेक्टर रँकचे जे काही अधिकारी आहे त्यांना भ्रष्टाचारी म्हणायचं आणि त्यांना ओएसडी होऊ द्यायचं नाही, असा एक प्रकार अलीकडच्या काळात महाराष्ट्रात आपण बघतोय. म्हणून आपण म्हणतोय की फडणवीस यांच्या सरकार मधील ६५ मंत्री यांच्यावर विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कितीतरी वॉशिंग मशीन मध्ये गेलेत आणि साफ होऊन आलेत, त्याच्यातले कितीतरी त्यांच्या आजूबाजूला बसतात. मग नॉर्मस् लावायचे आहे तर सगळ्यांना लावा....भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करा ही आमची भूमिका असल्याची टीका नाना पाटोळे यांनी महायुती सरकारवर केली. कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर लावलेल्या आरोपावर नाशिक कोर्टाने नोंदविलेल्या निरीक्षणावर नाना पटोले हे माध्यमांशी बोलत होते.
भगवान गौतम बुध्द "ज्ञान प्राप्त" झालेल्या बिहार राज्यातील "बुध्दगया" येथील विहार बौध्द धर्मगुरु" च्या ताब्यात देण्या संदर्भात " मुक निदर्शन"
१९४९ चा कायदा रद्द करावा तसेच भगवान बुध्द धर्माचा अवमान करण्याच्या हेतु ने ट्रस्टी पदावर कायदया दुरुपयोग करून बौध्द "भुिखं संघटना" " ट्रस्टी विश्वस्त "पदावर येण्यास बंदी केली जात आहे
भारतात हिंदु मंदिरात पुजारी असतात, मुस्लिम मस्जिद मध्ये मौलवी असतात, खिश्चन चर्च मध्ये फादर असतात. अख्या अनेक देवस्थान मध्ये प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य .
बिहर येथील " बुध्द गंया विहारांवर " देखील हिंदु पंडीत देवस्थानांच्या ट्रस्टी व विश्वस्त पदावर ठेवून बोध्दधर्माचा अवमान केला आहे. त्या अवमान त्वरीत थांबावा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सांगली जिल्हा बैठक लाईव्ह
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मा. मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
मागे झालेल्या बैठकीत हर्षवर्धन पाटील, आ. शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवडलेले गेले होते
राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार पहिली बैठक
परभणीचे तापमान 38 अंशावर
जिल्ह्यात ३ दिवसांपासुन उष्णतेची लाट
परभणी जिल्ह्यात मागच्या ३ दिवसांपासुन उष्णतेची लाट कायम असुन आज जिल्ह्याचे तापमान हे ३८ अंशावर गेले आहे.वाढत्या तापमानाचा फटका जनजीवनावर होत आहे दुपारच्या वेळी प्रमुख रस्त्यासह गल्ली बोळातील रस्ते ही सामसुम होत आहे तर घरबाहेर पडताना ही रुमाल बांधून तसेच टोप्या घालुन परभणीकर दिसत आहेत.
रायगड ब्रेकिंग
मुंबई गोवा महामार्गवरील अवजड वाहतूक उद्या दुपारनंतर राहणार बंद
रायगड जिल्हाधिकारी डॉ किशन जावळे यांची माहिती
होळी सणाला आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय
Anchor - होळी आणि धुलिवंदनाला मोठया संख्येने मुंबईकर मंडळी गावी शिमग्यासाठी आली असून या मंडळींना पून्हा मुंबईकडे सुखरूप आणि वेळेत पोहचता यावे याकरिता रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून अवजड वाहतुकीस उद्या दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.मुंबई गोवा महामार्गवरील रायगड जिल्हा हद्दीतील मुंबईच्या दिशेकडून खारपाडा ते कशेडी बोगदा आणि गोवा दिशेकडून येताना कशेडी ते खारपाडा असा मार्ग अवजड वाहतूकिसाठी बंद राहणार आहे.पाली खोपोली पुणे मार्गांवरील देखील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
इतर अत्यावश्यक सुविधा पुरविणाऱ्या वाहनांना सवलत असणार आहे.
बारामती माळेगाव युगेंद्र पवार बाईट
माळेगाव कारखान्यावर आम्हीच फक्त आंदोलन केले नाही
सगळ्या पक्षाच्या लोकांनी आंदोलन केलं
नीरा नदी दूषित झाली, त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे
15 वर्षांपूर्वी छत्रपती सहकारी कारखाना दर देत होता आज काय परिस्थितीआहे त्याची
माळेगाव सहकारी साखर कारखाना मध्ये अनेक बदल साहेबांनी केलं
आज जे सत्ताधारी आजूबाजूला चालवतात त्यांनी इथे आलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे साहेबांचे म्हणणं असावं
दुषीत पाण्याने कॅन्सर वाढले आहे. एकेकाळी 70 ते 80 टन ऊस काढत होते. आज 20 टनावर आले आहे. दूषित पाणी असल्याने मासे, झाडं मरत आहेत
कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली..जे पक्षात झालं ते कार्यकर्त्यांसाठी आमच्यासोबत राहणे सोपं न्हवत. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही पाठीमागे उभं राहू..जर चांगले उमेदवार असतील तर माळेगाव सहकारी साखर कारखाना लढायला काय हरकत आहे
ऑन
शरयू कारखाना आहे त्या तालुक्यात नेहमी आपण एक नंबर भाव दिला आहे
तो खाजगी कारखाना आहे माळेगाव सहकारी कारखाना
त्यांचे पण खूप खाजगी कारखाने आहेत त्यांचे म्हणजे केशव बापूंचे नव्हे तुम्ही समजून घ्या (अजित पवारांकडे रोक)
एक नाही तर सात आठ कारखाने आहेत इथेच हा विषय केशव बापूंनी थांबवावा मी बोलायला लागलो तर अवघड जाईल
ऑन जय पवार लग्न
माझा लहान भाऊ आहे मी त्यांना शुभेच्छा देतो
नाशिक - सतीश वाणी, कोकाटे यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका करणारे वकील तथा माजी न्यायाधीश
ऑन कोकाटे स्थगिती कोर्ट निरीक्षण
- वाईट लोकांची वाईट खेळी
- घाई गर्दीत कोकाटे यांचा निकाल दिला आहे
- इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही
- सुनील केदार यांच्या बाबत फडके मॅडमने सांगितले होते
- गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे
- एकीकडे खोटं सांगून सदनिका घेतो
- दुसरीकडे ३० लाख वाटायला लागतात त्यासाठी बंदूक लायसन्स मागितले
- एक व्यक्ती आहे भ्रष्ट आहे त्याला उपमुख्यमंत्री केलं गेलं
- लिली थॉमसनचं प्रकरण आहे
- आरोप झाले तर राजीनामा देतात
- कोकाटे निर्लज्ज मनुष्य आहे,
- तडीपार राहिलेला मनुष्य आपल्या देशाचा गृहमंत्री
- आपल्या नाशिकचा पालकमंत्री गृहमंत्री ठरवतात हे दुर्दैव
- सिंचनात पाणी येत नाही तर मी काय करू असे एक जण बोलले
- माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात अंजली राठोड ने याचिका दाखल केली
- झुंझार आव्हाड हे देखील याचिका करत आहे
- कोणीही राज्यपाल यांच्याकडे गेले
- सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ते सर्वांना लागू होते
- कायदा सर्वांना मान्य आहे
- खून झाल्यावर फाशी की जन्मठेप हे ठरलेलं आहे
- कोकाटे यांना शिक्षा दिली आहे तर त्याला स्थगिती कशी दिली
- दंड तर भरलेला आहेच ना ? कारवाई व्हायला पाहिजे होते
- लिली थॉमसन यांच्या प्रमाणे राज्यपाल कारवाई करणार की नाही
- मी स्वतः राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे
- कोकाटे यांचे गोव्याला हॉटेल, ३० लाख महिन्याला वाटतात
- मला न्यायाधीश यांच्यावर कॉमेंट करायची नाही
- आम्ही निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलोय
- चुकीचा निर्णय दिला आहे
- सुनील केदार प्रकरणात २१ प्रकरणाचे निर्णय आहे
- २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्यांना आमदारकीला उभं करू नये असे फाळके मॅडमने म्हंटले आहे
- ज्यांनी निकाल दिला अशा न्यायाधीशाने समाजकार्य करावे
- कशाला पगार घेऊन काम करतात
- लोक स्टँडी नाही असे आम्हाला सांगितले होते
- बबन घोलप १६ वर्षांपासून बाहेर आहे
- मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले
- जीवने न्यायाधीश यांच्यावर rss चा दबाव आला का ?
- ते पण नागपूरचे आहेत ना
- न्यायाधीश यांनी निकाल आधीच टाईप करून आणला होता
- बाकीचे निकाल ६ महिने लावतात
- आम्हाला संध्याकाळी नकला सुद्धा द्यायला तयार नव्हते
- प्रत्येक नागरिकाला अधिकार
- आपला प्रतिनिधी योग्य असला पाहिजे
- न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही
एबीपी माझाने केलेल्या बातमीनंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाला जाग
लेखा परीक्षण अहवालाबद्दल करण्यात आला खुलासा
ठाणे महानगरपालिकेचा सन २०१९- २०चा लेखा परीक्षण अहवाल स्थायी समितीस सादर झाल्याची तर उर्वरित अहवालासाठी मार्च-२०२५ आणि डिसेंबर-२०२५ चे उद्दिष्टे निर्धारित करण्यात आले असल्याचे प्रेस नोट काढून दिली माहिती
सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षणाचे कामकाजही पूर्ण झाले असून अंतिम लेखा परीक्षण मार्च-२०२५ च्या अखेरीस स्थायी समितीस होणार सादर.
माझाच्या बातमी नंतर सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण जुलै २०२४ पासून सुरू असून डिसेंबर -२०२५ पर्यंत स्थायी समितीस सादर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले
एबीपी माझा ने ठाणे महानगरपालिकेचा लेखा परीक्षण अहवाल गेल्या पाच वर्षांपासून जनतेसमोर सादरच केला नसल्याची बाब उघडकीस आणली होती
त्यानंतर महापालिकेने कोणकोणते लेखापरीक्षण अहवाल पूर्ण झालेत आणि उर्वरित अहवाल कधीपर्यंत पूर्ण होतील याची माहिती दिली आहे
Anchor- कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय..शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन पुकारलय..तर याला शिवप्रेमी.. पुरोगामी जनतेनं बैठक घेवून विरोध केलाय..दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बैठकीतही याचे पडसाद उमटलेतं..यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोगामी कोल्हापूरकर आमनेसामने आल्याचं समोर आलयं..पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट..
व्ही.ओ 1 - कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झालीये..तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ साकारलं..गेली 62 वर्ष झाली शिवाजी विद्यापीठ या नावानेच विद्यापीठाची कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात ओळख आहे..दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतली आहे..विद्यापीठाचं नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी आता जोर धरू लागलीयं..याच पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने 17 मार्चला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा गोवा बनावटीची दारू राजरोजपणे येते. सन २०१८ ते २०२४ दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने तब्बल २ कोटी ६९ लाख २२ हजार ७९२ रुपये किमतीचा गोवा बनावटीचा जप्त केलेला अवैध दारूसाठ्यावर रोलर चालवला. ओरोस येथील शासकीय जागेत न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुडाळ चे निरीक्षक मिलिंद गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या भावात गेल्या आठ दिवसात जवळपास साडेआठ हजार रुपयांची वाढ झाली आहे आज चांदीचा भाव सर्वोच्च पातळीवर असून एक किलो चांदीसाठी ग्राहकांना एक लाख पाच हजार दोनशे रुपये मोजावे लागत आहे.... हा इतिहासातील सर्वोच्च भाव असून यामुळे मात्र चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या तरी आहे.
----------------------
बाईट - डॉ.राहुल जांगिड , सराफा असोसिएशन , खामगाव.
-----------------------
गेल्या पाच वर्षात चांदीचे भाव पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून...
मार्च 2021 - 62862/kg
मार्च 2022 - 66990/kg
मार्च 2023 - 72582/kg
मार्च 2024 - 77800/kg
ऑक्टो 2024 - 88400/kg
मार्च 2025 - 105200/ kg
--------------------------
खामगाव येथील चांदीचे बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध असल्यामुळे देशभरातून या ठिकाणी ग्राहक चांदी खरेदी करण्यासाठी येतात चांदीची भांडी, चांदीची मूर्ती व विविध चांदीचे आभूषणे या ठिकाणी तयार करून मिळतात व ती 100% शुद्धतेचे असल्याने खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेवर देशभरातील ग्राहकांचा विश्वास आहे मात्र आता चांदीच्या किमती वाढल्याने नेहमी गजबजलेली असणारी बाजारपेठ सध्या तरी ग्राहकांनी चांदी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र खामगावच्या बाजारपेठेतून दिसत आहे.
चंद्रपूर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची विविध विषयांवर प्रतिक्रिया...
ऑन माणिकराव कोकाटे शिक्षा स्थिती
# कोर्टाने कुठल्या आधारावर निरीक्षण दिलं माहित नाही पण निवडणूका घ्यायच्या, नाही घ्यायच्या, त्याबाबतचा खर्च हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, उद्या कोर्ट पैसे वाचतील म्हणून पाच वर्षांऐवजी दहा वर्षांनी निवडणूक घ्या असं म्हणणार आहे का त्यामुळे ज्या जी केस आहे त्याबाबतच कोर्टाचं निरीक्षण असावं
ऑन नाना पटोले ऑफर
# मला वाटतं हा धुळीवंदनाचा जोक असावा, त्यांच्याकडे 46 आमदार आहे, अतिशय चांगलं काम करणाऱ्या दोन उपमुख्यमंत्र्यांना संशयाच्या वातावरणात गुंतवायचं, जनता देखील काँग्रेसला सिरियसली घेत नाही तुम्ही देखील घेऊ नका
ऑन संजय राऊत आरोप
# कोणाची काय चर्चा झाली हे जर 24 तासात सांगितलं तर ठीक आहे नाहीतर त्याची एक्सपायरी डेट होते, अशा गोष्टींना कवडीची किंमत नाही, फक्त सणसणाटी करण्यासाठी या गोष्टी असतात, यामुळे नेत्यांवरचा जनतेचा विश्वास कमी होत आहे
वाशिम
धावत्या इंडिका कारच्या इंजिने घेतला पेट..गाडीचे किरकोळ नुकसान...
वाशिम जिल्ह्यातील आसेगाव ते धानोरा मार्गावरील फाळेगाव जवळ धावत्या इंडिका कारच्या इंजिन पेट घेतल्याची घटना समोर आलीये, इंडिका गाडीच्या इंजन जवळ तांत्रिक बिघाड झाल्याने पेट घेतल्याचे लक्षात येताच गाडी बाजूला घेत,गाडी थांबवून तत्काळ गाडीतील प्रवाशी खाली उतरले. दरम्यान आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. या गाडीच्या आगीत इंडिकाचे किरकोळ नुकसान झाले.
अँकर:
सोन्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या सोन्याचा दर 90,000 रुपये प्रति तोळा आहे, आणि लवकरच तो एक लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे वाढते आकर्षण, जागतिक बाजारातील घडामोडी आणि टेरिफ वॉर यांसारख्या कारणांमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला आहे ईशान देशमुख यांनी.
कुमार जैन, सोने व्यापार तज्ज्ञ 121
या महिन्यात सोन्याचा दर एक लाखाच्या पुढे जाईल.
यामागचे प्रमुख कारण म्हणजे टेरिफ वॉर.
तरीही ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे.
लोक हे गुंतवणुकीच्या उद्देशाने सोनं खरेदी करत आहेत, आणि त्यांनाही विश्वास आहे की सोन्याचा दर एक लाखाच्या वर जाईल.
संभाजीनगर ब्रेकींग
औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे माजी आमदार तथा धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांना जिल्हाबंदी
छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यानी काढले जिल्हाबंदीचे आदेश
एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत संभाजीनगरात जिल्हाबंदी करण्याचे आदेश
२९ मार्च रोजी संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मिलिंद एकबोटे औरंगजेबची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची मिळाली होती प्रशासनाला गोपनीय माहिती
Breaking news
- मुजोर रिक्षा चालक मझहर अन्वर खानसह त्याच्या साथीदाराला अटक
- शालिमार चौकात मुजोर रिक्षा चालकांने कार चालकांशी हुज्जत घातली होती
- या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता*
-
- रिक्षा चालकांनी शिवीगाळ करत केली होती वाहन चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली होती
- व्हिडीओ व्हायरल झाल्यान पोलिसांवर टिकेची झोड उठत होती,त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली
- भद्रकाली पोलीस ठाण्यात मुजोर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल
- महिला हात जोडत विनवणी करत असतांनाही रिक्षा चालकांची झुंडशाही आली होती समोर
कोल्हापूर
नागपूर रत्नागिरी महामार्गात माझी जमीन जाणार असल्यामुळे लेआउट बदलला हा राजू शेट्टींचा आरोप अज्ञानपणातून आहे... या महामार्गात कोणाकोणाच्या जमिनी आणि कोणते कोणते गट नंबर जाणार आहेत याचा त्यांनी आधी अभ्यास करावा वैफल्यग्रस्त होऊन कोणतेही आरोप करू नये असा सल्ला शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे... जुन्या लेआउट मध्ये माझी जमीन जात नव्हती मात्र नवीन लेआउट मध्ये माझी जमीन जाणार आहे... ती सुद्धा माहिती राजू शेट्टी यांना नाही असं म्हणत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजू शेट्टी यांना डीवचलय.... दरम्यान रत्नागिरी नागपूर महामार्गावरील अंकली ते चोकाक रस्त्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना चौपट दर मिळावा यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करत आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही दिवसात यासंदर्भात बैठक घेणार असल्याचा अस्वस्थ केलय... चौपट दर मिळाल्याशिवाय या रस्त्याचं काम सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा देखील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे....
मंत्री शिरसाट पॉइंटर...
लाडकी बहिण योजना चांगली आहे.त्यासाठी पैसे दिले पाहजे.यात दुमत नाही.परंतु विकासाची कामे कमी केले हरकत नाही.मात्र माझा आक्षेप की सामाजिक न्याय व आदिवासी खात्याला घटनेच्या तरतुदी नुसार पैसे द्यावे लागत आहे.यात कट करता येत नाही.
लाडकी बहिण साठी ४ हजार पंतप्रधान आवास योजना साठी १५०० कोटी, ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला आहे.हा विभाग मागास लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आहे.मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी या खात्याला कट बसला तर कमी कसे होतील? यासाठी तरतूद करून द्या अस माझं मत आहे.
याचा परिणाम होईल.याचा दुर्गामी परिणाम होईल उद्रेक होईल.यासाठी मी विनंती करेल सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचे पैसे कपात करू नये यासाठी मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना पत्र लिहून मागणी करणार आहे.
माझ्या खात्यातून पैसे घेताना संमती घेतली पाहजे होती.संमती मागितली असती तर मला देता आली नसती.हे बंधन आम्हाला कायद्याने दिले आहे.
ठाकरे बंधू भाऊ एकत्र....
उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रच यावे असा प्रयत्न बाळासाहेब असताना प्रयत्न झाला मात्रसेका हाताने टाळी वाजत नहीं.आता टाळी वाजवण्यापलीकडे गेले आता अशक्य वाटत नाही.
गद्दार ची होळी....
आमचे विरोधक त्यांना जाणीव झाली आपण चुकलो आहे.जाणीव होन गरजेचं आहे.स्वतः मागे घर. त्यांना स्वाभिनामा ठेच पोहचवणं आहे.निवडणूक झाल्यापासून हे बंद झालं..
रंगात अशा रंगत रंग ज्यातून कुणाला त्रास होणार नाही
तुम्ही जे करत आहे ते स्वतःच्या मनाला विचारा
अहिल्यानगर
Anc- औरंगजेबाची कबर ही काढून टाकावी अशी मागणी होत आहे...दरम्यान आज विश्व हिंदू परिषदेने अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती दिली आहे...जर सरकारने लवकरात लवकर औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर लाखो हिंदू हे छत्रपती संभाजी नगर येथे जाऊन "कार सेवा" करतील असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिलाय...औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले...त्याचे कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको अशी भावना यावेळी कुलकर्णी यांनी व्यक्त केली त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ यांनी.
121- विवेक कुलकर्णी, संयोजक, बजरंग दल
छत्रपती संभाजीनगर ब्रेकींग
औरंगजेबच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस वाढवण्यात आला
एसआरपीची एक तुकडी
दोन अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तात
दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे
दोन ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत
कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करूनच सोडले जात आहे
कालच पोलीस उपअधीक्षक यांनी कबरीच्या ठिकाणी दिली होती भेट
बीडच्या स्वराज नगर भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.. मात्र फेसबुक पोस्टवर केलेल्या सुसाईड नोट वरून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बीड शहरातील स्वराज नगर भागात सकाळच्या सुमारास कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बाहेर एका व्यक्तीने एसीच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. धनंजय नागरगोजे असं या शिक्षकाचे नाव असून ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेवर शिक्षक होते.
2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अनेक अडचणी आल्या. असे कारण सध्या सांगितले जात आहे. नागरगोजे यांनी काल फेसबुक पोस्ट करून आत्महत्या करत असल्याचं सांगितले होते. त्यात काही व्यक्तींची नावे देखील नोंदवले होते. आता यावरूनच पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
Breaking news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मनक मोर्चे बांधणीला सुरवात
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबुतीकरणाकडे दिले जाणार लक्ष
- नाशिक मनसे नेत्यांची आज मुंबईत राज ठाकरे यांच्यासोबत पार पडली बैठक
- दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती
-भाजप मधून मनसेत प्रवेश केलेल्या दिनकर पाटील यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवली होती
- सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस तपासासाठी गुन्हा घडलेल्या ठिकाणावर दाखल.
- शिरूर कासार तालुक्यातील बावी गावाच्या परिसरात दाखल.
- बावी गावातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी शिरूर कासार पोलिसांकडून सुरू आहे तपास.
- सतीश उर्फ खोक्या भोसले पोलीस कोठडीत असताना पोलिसांकडून तपासाला वेग.
- गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथीलत सेंट्रल बँकेला भीषण आग..
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती..
आग इतकी भीषण होती की यात बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक...
बँक सुरू असताना आग लागल्याने सर्व कर्मचारी घाबरून बँक बाहेर पडले.. सुदैवाने यात कुठली जीवित हानी झाली नाही..
चांदुर रेल्वे येथील अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवते आहे..
मात्र आग विजत नसल्याने धामणगाव आणि तीवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलवण्यात आले..
बँकेला अचानक आग लागली दिसल्याने नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली..
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवलाय...
सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादासंदर्भातील अर्जावर 4 एप्रिल रोजी होणार सुनावणी
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याकडून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा सारंगी महाजन यांचा आरोप
अंबाजोगाई येथील न्यायालयात झाली सुनावणी
4 एप्रिल रोजी होणार पुढील सुनावणी
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
शिंगोत्सवासाठी आलेला मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाला
मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर माणगाव. आणि माणगाव पुणे राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी
महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा... परतीच्या प्रवासाला निघालेले प्रवाशी पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले
जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे धाराशिव जिल्ह्यातील 151 ग्रामपंचायत सदस्य अपात्र
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरन पूजार यांच्याकडून ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार अपात्रतेची कारवाई
9 जुलै 2024 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांवर कारवाईचे ग्रामविकास विभागाचे आदेश
जिल्हाभरातील 542 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, सोमवारपासून अनेकांवर कारवाई होणार असल्याची माहिती
राखीव जागेवरून निवडून आल्यानंतर वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असत
मात्र अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाईच्या कचाट्यात
अनेक सरपंच ही अपात्रतेच्या उंबरठ्यावर, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने राजकीय क्षेत्रात खळबळ
पडोली येथे झालेल्या एसटीच्या अपघातानंतर स्थानिकांचा उद्रेक... रॉंग साईड येणाऱ्या ट्रक चालकांना स्थानिकांनी केली मारहाण, प्रशासनाला दोन दिवसांपूर्वीच अपघातानंतर महामार्गावर सांडलेली राख उचलण्याची केली होती विनंती मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप, या अपघाताला आणि पर्यायाने फ्लाय ऐश ला जबाबदार असलेल्या चढ्ढा ट्रान्सपोर्टवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी.
- नाशिक मधील रिक्षा चालकांची गुंडगिरी
- अनधिकृत रिक्षाचालकांकडून सर्वसामान्यांवर दादागिरी
- शालिमार चौकात रिक्षा चालकांची गुंडगिरी मोबाईल कॅमेरात कैद
- गाडीचा कट लागण्याच निमित्त करून परिवारासह चाललेल्या इसमाला मारहाण
- गाडीतील महिला हात जोडून माफी मागत असताना देखील रिक्षाचालकांची मुजोरी
- नाशिक मध्ये अनधिकृत रिक्षाचालकांचा हैदोस
- वाहतूक पॉलिसांचे दुर्लक्ष
- सर्वसामान्यांवर रिक्षा चालकांची सर्रास दादागिरी आणि झुंडशाही
- शहरातील अनधिकृत रिक्षा चालक तात्काळ हटवण्याची नागरिकांची मागणी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यां विरोधात नाशिकमधे मोर्चा काढण्याचा इशारा
18 मार्च रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा
माणिकराव कोकाटे यांच्यां विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले अपक्ष उमेदवार शरद शिंदें पाटील यांचा इशारा
कोकाटे यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यासाठी मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सिन्नर मध्ये पोट निवडणूक घेण्याची मागणी
पुढील 6 महिन्यात सिन्नर मध्ये पोट निवडणूक घेण्याची मागणी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यां विरोधात नाशिकमधे मोर्चा काढण्याचा इशारा
18 मार्च रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा
माणिकराव कोकाटे यांच्यां विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेले अपक्ष उमेदवार शरद शिंदें पाटील यांचा इशारा
कोकाटे यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यासाठी मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सिन्नर मध्ये पोट निवडणूक घेण्याची मागणी
पुढील 6 महिन्यात सिन्नर मध्ये पोट निवडणूक घेण्याची मागणी
तुळजाभवानी मंदिर परिसर आणि कामाची नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून पाहणी
तुळजाभवानी मंदिराच्या शिखर बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाहणीला महत्त्व
मंदिरसंस्थान कडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटला छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध
केंद्रीय पुरातत्व खात्याकडून दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी, संभाजी महाराजांच्या मागणीनंतर मंत्री आशिष शेलारंकडून केंद्रीय पुरातत्व विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती
केंद्रीय पुरातत्व विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिट अगोदर नुतन जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्याकडून कामाची पाहणी
तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कारभाराला भोपे पुजाऱ्यांकडून विरोध, त्यानंतर मंदिर पुनर्बांधणीचा वाद पेटला
रत्नागिरी -नागपूर महामार्गाच्या आज होणा-या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यां पाठोपाठ राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यासाठी शिरोळ निवासस्थानी पोलिस दाखल
आज १० वाजता शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरून रास्ता रोको आंदोलन करण्याचा दिला होता इशारा
रायगडच्या माथेरान मधील रेल्वे अधिकारी विश्राम गृहातील आऊट हाऊस मध्ये एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.मात्र या मृतदेहाचा तपासणीनंतर या व्यक्तीचा खून झाल्याचा संशय समोर आले आहे.या व्यक्तीसोबत इतर दोघांसोबत हाणामारी झाली होती आणि या हाणामारीत या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत सुशांत गजगे याला धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याचा रिपोर्ट देखील तपासणीनंतर उघड झाल्याने माथेरान परिसरात खळबळ उडाली आहे. माथेरान पोलिस उपविभागीय अधिकारी डी.डी.टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि त्यांची टीम अधिक तपास करत आहेत.
हिंगोलीच्या हिवरखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, गावातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे, गावात कोट्यावधी रुपये खर्च करून जल जीवन मिशनचे काम करण्यात आलं मात्र योजनेचे पाणी गावात आलं नसल्याने महिलांना गावापासून दोन किलोमीटर असलेल्या विहिरीवर आपला जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे, अनेक वेळा प्रशासनाकडे पाण्याची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने येथील गावकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे,
लातूर जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकटा रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगामुळे पिकाची वाढ खुंटत असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.चिकटा रोगामुळे ज्वारी पिकाची पानांवर चिकट थर जमा होतो, परिणामी झाडांची वाढ खुंटते आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, औसा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात ज्वारी पिकांवर मोठ्या प्रमाणात चिकटा हा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यानच्या वीस दिवसात राज्यातील तरुणांनी तब्बल एक लाख अपरिचित म्हणजेच ते कधीच गेलेले नाही, ज्या मंदिरांची त्यांना फारशी माहिती नाही अशा मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घ्यावे असे आगळे वेगळे "अपरिचित मंदिर दर्शन अभियान" विश्व हिंदू परिषदेने राबविले आहे.. त्यासाठी प्रत्येक तरुणाने तो राहत असलेल्या परिसरातील मात्र तो कधीच गेलेला नाही, अशा अपरिचित, अज्ञात, माहिती नसलेल्या किमान तीन मंदिरापर्यंत जावे, त्याची माहिती जाणून घ्यावी, इतिहास समजून घ्यावा, सद्य परिस्थितीत मंदिर कसा चालवला जात आहे, त्याची व्यवस्था कोण पाहत आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे या सर्व मुद्द्यांची माहिती जाणून घ्यावी अशी विहिपची अपेक्षा आहे... विशेष म्हणजे त्यासाठी हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या म्हणजेच संवेदनशील भागातील मंदिरांवर, मागास वस्त्यांमधील मंदिरांवर विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षाही विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे.
संत तुकाराम बीज यात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र देहू नगरीत वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी देहू नगर पंचायत सज्ज झाले असून वैकुंठ गमन बीज सोहळ्याला श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक देहूत येतात. या भाविकांची सुरक्षितता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी घाट परिसर स्वच्छता, तसेच मंदिराच्या आतील स्वच्छता, डासांपासून सुटकेसाठी औषध फवारणी, धूर फवारणी, मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून देहू नगर पंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे या स्वतः लक्ष घालून ही कामे करून घेत आहेत.
आजपासून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे, दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. म्हणून ही दूध वाढ करण्याचा निर्णय दूध संघटना यांनी घेतला आहे. या संधर्भात पुण्यातील कात्रज या ठिकाणी बैठक पार पडली होती.
खामगाव येथील देशभरात प्रसिद्ध असलेल्या चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या भावात नवा उच्चांक.
चांदीचे भाव १लाख ०५ हजार रुपये प्रति किलो वर.
आठवडाभरात चांदीच्या भावात ८ हजार रुपये प्रति किलो वाढ.
पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी- भोसगांव येथे डोंगराला लागलेल्या वणव्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
तुकाराम सिताराम सावंत वय 64 असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
आग विझविण्यासाठी गेलेले असताना त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
या वणव्यात 100 ते 150 झाडांची आंब्याची बाग देखील जळून खाक झाली आहे.
खामगाव तालुक्यातील आवार गावात दोन गटात काल झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील २५ जणांवर केला विविध कलमान्वये गुन्हा दाखल.
खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल.
काल रंगपंचमी साजरी करण्यादरम्यान डी जे वर गाणे वाजविण्यावरून झाला होता मोठा राडा.
सध्या या गावात राज्य राखीव पोलीस , दंगा काबू पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी रात्री उशिरा पुन्हा घेतला गावातील परिस्थितीचा आढावा.
गावातील परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींची धरपकड अद्याप सुरू असल्याची पोलिस अधीक्षकांची माहिती.
बंजारा समाजामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुळवड सणाला विशेष महत्व आहे. वर्षभरात ज्यांच्या घरी बाळ जन्माला आले आहे.त्यांच्या घरासमोर धुळवाडीला ' धुंड ' हा खेळ खेळला जातो. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या विविध तांड्यावर सध्या या धुंड खेळाची धुम सुरू आहे. बंजारा समाज बांधव पारंपारिक गीतांवर डफाच्या साथीने चौफेर ठेका धरतात.. दोन खुंटे जमिनीत गाडले जातात..हे खुंटे उपटण्याचा प्रयत्न पुरुष वर्गाकडून केला जातो. तेव्हा महिला आपल्या हातातील काठ्यांनी पुरुषांना यथेच्छ चोप देतात.व खुंटा उपटण्यास विरोध करतात..पुरुषही हा विरोध झुगारून लाकडी दंडुक्याने मार खात पुन्हा खुंटा उपटण्यासाठी प्रयत्न करत असतात.असा हा खेळ तासन तास सुरूच असतो.जेव्हा हे खुंटे उपटले जातात त्यानंतरच खेळाची सांगता होते..
लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत व्हाेट जिहादसाठी पैसा आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता. आता माजी आमदार आसिफ शेख यांनीही बाहेरहून पैसा आल्याचा खळबळजनक आराेप केला असून तो पैसा मला पराभूत करण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा शेख यांनी केला आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना पत्राद्वारे याची माहिती देणार असून कुठल्याही राष्ट्रीय तपास यंत्रणेसमाेर जावून याचे भक्कम पुरावे सादर करण्याची तयारी शेख यांनी दर्शविली आहे.एम.आय.एम.चे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ' व्हाेट जिहाद ' चा उल्लेख करत आपल्याला एक रुपयाही मिळाला नसल्याचे वक्तव्य केले हाेते.
मुंबईच्या दहिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या जंगलामध्ये तळीरामाने लावली मोठी आग.
होळीनिमित्त मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगल लागत असलेला दहिसर परिसरात गेले होते.
संध्याकाळी सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्क चा जंगलामध्ये तळीरामाने लावली आग.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार ते पाच गाड्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधले सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल होत 1 ते दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहेत.
या आगीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान चा अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाला आहे.
आग कोणी लावला या संदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान चे सुरक्षारक्षक आणि पोलीस तपास करत आहेत...
ठाणे पोलिस आयुक्तालयात ठाणे वाहतूक विभागाकडून धुळवड निमित्त ड्रंक अँड ड्राईव्ह एकूण ८१ वाहन चालक तळीरामांवर कारवाई करण्यात आली
मोठ्या प्रमाणात दंड वसूल देखील करण्यात आला
धुळवड सणानिमित्त कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम आखण्यात आली होती
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates: गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून दोन रुपयांनी वाढ झालीआहे. गायीचं दूध प्रतिलिटर 58 रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रुपयांवर पोहचलं आहे. तर संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या नावाने पैशांची वसुली केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता आहे. एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना सुरेश धस यांनी कबुली देखील दिली आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -