Maharashtra Breaking LIVE Updates: रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र पर्यटकांचा जीव घेणारे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. तसेच गद्दार हेर ज्योती मल्होत्राला आज...More
फ्लॅश
दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि २३ मे २०२५ च्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता आहे
पुढील ६-७ दिवस पश्चिम किनाऱ्यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२२ ते २४ मे २०२५ रोजी कोकण आणि गोव्यात आणि २४ मे २०२५ रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे
पुढील २-३ दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल
२२ ते २६ मे २०२५ रोजी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र लाटांची परिस्थिती
२२ आणि २३ मे २०२५ रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
*21 तारखेला रात्री 2 च्या सुमारास आग लागली *
नाशिक मनपाचे अग्निशमन दल सुरवातीला दाखल झाले
पॉलिफिल्म बनवते त्यासाठी लागणार कच्चा माल अत्यंत जवलनशील आहे
त्याची आग लिक्विड होऊन पसरते
पाण्याने आग विझत नाही फोम त्यासाठी लागतो
पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या टीम आली आहे
जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहोत
एक्सपर्ट लोक येत आहेत प्रोपेन टॅंक आहे त्यात लिक्विड गॅस आहे
तो टॅंक फिक्स आहे, हलविता येत नाही*
तो 50 ते 60 मीटर दूर आहे
तिथे हवा नसल्याने नुकसान नाही
लोकांचा जीव वाचविणे ही आमची प्राथमिकता आहे
टँकच्या बाजूला धरणातील गाळ टाकून थंडावा निर्माण केला जात आहे
जे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 1किलोमीटरवर काळजी घेतली जात आहे
जरी टॅंक ला आग लागली तरी सेफ्टी वॉल आहेत त्यामुळे टॅंक फूटण्याची शक्यता कमी आहे, जरी तसे झाले तरीही त्याची तीव्रता कमी करू
एकदा स्फोट झाला तर त्याच्या धमाका मुळे घराच्या काचा फुटू शकतात लोकांना इजा पोहचू शकते म्हणून लोकना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे
आग विझविण्यासाठी कोणत्याच साधनांची कमतरता नाही, इतर जिल्ह्यातून चांगले सहकार्य मिळत आहे
महाराष्ट्र सरकारने जर्मनीतील IMEX फ्रँकफर्ट या जागतिक व्यापारी प्रदर्शनात महाराष्ट्र कन्व्हेंशन ब्युरो (MCB) ची ऐतिहासिक घोषणा केली. महाराष्ट्र राज्याचा हा भारतातील पहिला राज्यप्रणित उपक्रम ज्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर ही शहरे जागतिक MICE (Meetings, Incentives, Conferences & Exhibitions) केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पत्रकार परिषदेला भारतासहित वेगवेगळ्या ३५ देशांचे मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र जागतिक व्यासपीठावर व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र बनणार आहे. २०२६ मध्ये मुंबई ICANN आणि International Baccalaureate (IB) Congress सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदांचे यजमानपद भूषवणार आहे, ज्यामुळे भारताच्या MICE उद्योगाला नवे उभारी मिळेल.
आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ शिष्टमंडळाने सहभाग घेतला. याचे नेतृत्व श्री. इंद्रनील नाईक पर्यटन राज्यमंत्री , श्री. अतुल पाटणे प्रधान सचिव (पर्यटन) , श्री. संतोष रोकडे उपसचिव (पर्यटन) आणि डॉ. बी.एन. पाटील पर्यटन संचालनालयाचे संचालक यांनी केले. या उपक्रमाला इंटरनॅशनल काँग्रेस अँड कन्व्हेन्शन असोसिएशन (ICCA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेंथिल गोपीनाथ यांचे पाठबळ लाभले आहे.
महाराष्ट्र कन्व्हेंशन ब्युरोच्या माध्यमातून महाराष्ट्र स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणार, रोजगाराच्या संधी वाढवणार आणि जागतिक पर्यटन क्षेत्रात आपली अनोखी ओळख निर्माण करणार आहे.
छगन भुजबळ भाषण पॉइंटर...
- स्वाभाविक आहे तुम्हाला आनंद होणे
- सर्व अध्यक्ष सर्व कार्यकर्त्( घोषणा थांबवत मैं आगे बढता हुं आप शांत रहो)
- मिडिया विचारत होते जहा नहीं चैयना वहा नहीं रहना... पण मी देर से आया लेकीन दुरुस्त आया ( भुजबळांची जोरदार शेराशायरी)
- भुजबळांचे भुज "बळ" हे तुम्ही आहात...
- बाबासाहेबानी देखील राजीनामा दिला होता... त्याचे कारण अनेक होते.
- आम्हीही शिवसेना सोडली... राजीनामा दिला होता.
- मंडल आयोग तयार करा ही मागणी
- काँगेस दोन झाले तरी शिवसेना आणि भाजपच्या विरोधात जनादेश गेला होता.
- काँग्रेस राष्ट्रवादी दोघे वेगळे लढून पण जनादेश भाजप शिवसेनेच्या विरोधात होता.
- सरकार स्थापन झाले आणि मी पहिला प्रांत अध्यक्ष झालो.... उपमुख्यमंत्री पण झालो.
- शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घर बांधण्याचे काम केले.
- जेव्हा एकत्र घर बांधल पण काही कारणांनी वेगळे होत तेव्हा खूप दुःख होते... खंत वाटते( शरद पवारांची साथ का सोडली त्याचे कारण सांगण्याचे पर्यन्त)
- हे मंत्री पदाची आधीची माहिती होते... पण मी कुठेच वाचता केली नाही ... माझ्या pa यांना पण माहीत नव्हते.
- मोदीसाहेब आणि अमित शहा यांनी ठरवले... दुरुस्त केले पाहिजे.
- अखेर शपथविधी झाला... मी नऊ दहा वेळा मंत्री झालो मला त्याचा आनंद झाला...
- सापशिडी सारखी झाल.... साप आला खाली आलो... ही सुरूच असणार.
- मी नाशिकचा बालक आहे... पालक कोण होईल त्याची काळजी का करता... बालक तुमच्या सोबत आहे.
- त्यावर एकवेळ मुख्यमंत्री यांच्याशी बोलेल. पण आपले कोणतेच काम अडणार नाही.
- जे कारभारी असतील त्यांना सांगू आपण...
- मागच्या वेळी पण दुसरे पालकमंत्री होते तरी त्यांना काम सांगितले ते काम झाले.
- शहरात अनेक काम झाले... रस्ते, उड्डाणपूल झाले... गोदावरी परिसरातील काम झाले.
- कुंभमेळ्याचे काम कमी वेळात कसे होणार? हे विचारू आपण त्यांना
- पुढे आता निवडणुका आहे.... ओबीसी जात जनगणना होणे ही मागणी झाली मोदी साहेबांनी ते मान्य केले.
- सिन्नरचे चार काम निवडले त्यात सांगितले... एकही ओबीसी नाही... पण त्यांत आम्ही चाचपणी केली त्यात एक गावात ओबीसीच सरपंच निघाला...
- मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो
- निवडणुकीत सांगितले होते की ओबीसी आमचा DNA आहे.
- शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण देण्याचे ठरवले तेव्हा आम्ही त्याच्या सोबत राहिलो.
- आता मोदी साहेब यांनी जात जनगणना घोषणा केली.... आज त्यांच्या सोबत आहे .
- अजित दादांनी सांगितले.... फुले शाहू आंबेडकर यांच्या नीतीवर जाणार... मग तो मार्ग म्हणजे सर्वांना समान अधिकार... महिला पुरुष यांना एक अधिकार.
- पुढच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर कामाला लागा
- सर्वांना संधी द्यावी लागेल...
- लहान घटकातला असेल तरी संधी देऊ.... कोणी म्हणलं तो पडणार.... पडला तरी चालेल संधी द्यावी लागेल.( कार्यकर्त्यांना निवडणुकीला सज्ज होण्याच्या सूचना)
- शहरात वॉटर, मिटर, गटार यापेक्षा जास्त काम करावे लागेल
- गरीबांना मदत करा ते कधीही तुम्हाला विसरणार नाही.
- मुंबईत मी निवडून आलो तेव्हा तेथे एकच माळी कुटुंब होत ते म्हणजे छगन भुजबळ.
- आम्ही तेव्हा शाखेत बसायचो काम करायचो..
- लोक अजित दादांना हार फुले घालता... अजित दादा जिंदाबाद.... अस करून चालणार नाही.
- काही लोक विमानतळ येथे येतात काही रेस्ट हाऊस येथे येतात.. कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहे.
- साहेब साहेब... करता पण साहेब सब जाणता है.
सिंधुदुर्ग : येथील आंबोली घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. चाळीस फूट मोरीच्या ठिकाणी दरड कोसळली आहे. या घाटात सध्या एकेरी वाहतूक सुरू असून दरड बाजूला करण्याचं काम सुरु आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी 105 कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर झाले आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजूरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले असून टाटा आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून रोहा एमआयडीसी क्षेत्रात हे नवीन केंद्र उभे राहणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्यविकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे. अजित पवार यांनी केंद्रमंजूरीसाठी केलेला पाठपुरावा आणि सहकार्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
बारामती : येथील पथविक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कारवाईविरोधात बारामती शहरातील कारभारी चौकात आंदोलन केलंय. बारामती नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात हे आंदोलन आहे. या आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. हे आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून त्यांच्याकडे काही मागण्या देखील करणार आहेत.
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना फोन केला आहे. या प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचे 9 महिन्यांचे अपत्य कुठे आहे? याचा तातडीने शोध घ्या आणि ते तिच्या आईच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करा, अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
नंदुरबार : नागपूर-सुरत महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दीड वर्षीय बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. विसरवाडी गावाजवळ हॉटेल राहुल समोर ही घटना घडली आहे. कोंडाईबारी घाटातील जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने प्राण्यांचा सुरक्षितेचा प्रश्न समोर आला आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नाशिक : शहर व परिसरात पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत डिसेंबर अखेरपासून आतापर्यंत सुमारे 42 हजार 554 टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आलीये. सार्वजनिक शांतता भंग करत कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारे कृत्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रस्त्यावरील गुन्हेगारीबाबत 'झिरो टॉलरन्स' भूमिकेतून सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त तथा पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस निरीक्षकांना कारवाईच्या सूचना याअगोदरच दिल्या आहेत. त्यानुसार परिमंडळ-1 व परिमंडळ-2 मध्ये टवाळखोर, मद्यपींसह हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई पोलिस करत आहेत. तसेच स्टॉप अॅन्ड सर्च कारवाईदेखील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्री सुरू करण्यात आली आहे. संशयित दुचाकीचालकांना थांबवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील उद्याने, मोकळ्या जागा तसेच महिलांकडून दर्शविण्यात आलेली संवदेनशील ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. दिवस-रात्र पोलिसांची गस्त सुरू असून संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचं पोलिसांकडून इशारा देण्यात आलाय.
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात काकाचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. मुल तालुक्यातल्या करवन येथील ही घटना आहे. आज सकाळी गावातील 5 जण गावाशेजारी शेतशिवारात गेले होते. याचवेळी शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यामध्ये बंडू परशुराम उराडे (55) यांचा मृत्यू तर त्यांना वाचवायला गेलेला पुतण्या किशोर मधुकर उराडे (35) हा गंभीर जखमी झाला. जखमीवर मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतक शेतकऱ्याचा मृतदेह उचलण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 13 दिवसात वाघांच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले आहेत.
परभणी : शहरातून जाणाऱ्या परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य वस्तीतील मोबाईलचे शोरुम काल रात्री चोरट्यांनी फोडले असून लाखो रुपयांचे मोबाईल व इतर साहित्य लंपास केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हानच या चोरट्यांनी उभे केले आहे. ऐन रस्त्यावरील सॅमसंग मोबाइल शोरूमचे शटर चोरट्यांनी जॅकच्या माध्यमातून वरती केले आणि आत प्रवेश करून दुकानातील वेगवेगळे मोबाईल, मोबाईलच्या एक्सेसरीज आणि इतर साहित्य चोरून नेले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान नेमका किती रुपयांच्या मोबाईल आणि साहित्याची चोरी झालीय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दुकानातील जवळपास सर्वच साहित्य चोरांनी लंपास केले आहे.
बीड : परळीतील एसटी महामंडळाच्या आगारात नव्या दहा लालपरी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करून बसेसचे लोकार्पण करण्यात आले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असल्याने परळी आगारात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची नेहमीच वर्दळ असल्याने येथे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती. आता महामंडळाने दहा नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेसचे विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले आहे.
रायगड : जिल्ह्यात सलग 4 दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा नागरिकांना चांगलाच फटका बसलाय. रायगड जिल्हयातील अनेक भागात अवकाळीमुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. रोहा शहरात काल झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदार व्यावसायिकांची तारांबळ उडाली. म्हसळा तालुक्यात देखील काही गावात घरांवरील कौले वादळी वाऱ्यामुळे उडाली आहेत. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
भारतीय भांडवली बाजारात घसरण
सेन्सेक्स ७५० अंकांनी घसरला तर निफ्टी २५० अंकांनी खाली
आशियाई बाजारातील पडझडीचे बाजारावर परिणाम
सोबतच, मूडीजनं अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग घटवल्यानं गुंतवणूकदारांकडून अमेरिकन भांडवली बाजारातून काढता पाय
अमेरिकेतील वाढत्या कर्जाचा डोंगर गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय
अशातच, बाजाराच्या सुरुवातीला भारतीय बाजारावर देखील त्याचे परिणाम
आयटी आणि बॅंकिंग समभागांमुळे बाजारात पडझड
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. शिवाय जोरदार वाऱ्यामुळे समुद्र देखील खवळल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या हंगामामध्ये कोकणातील किनारपट्टी पर्यटकांत विना ऊस पडल्याचे पाहायला मिळतय. अजून दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केलं असून मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. कोकणात दापोली गुहागर सह अन्य किनारपट्टीवर समुद्र खवळल्यामुळे अजस्त्र लाटा पाहायला मिळत आहेत. मे महिन्याच्या मध्यावर जोरदार पडत असलेल्या पावसाचा परिणाम आंबा बागायतदारांवर देखील झाल्याचे पाहायला मिळते.
पुणे : सिंहगड रोड परिसरात सुरक्षा रक्षक भिंत पडली. बारांगणी मळा सर्वे नंबर 128 रिया शालू रेसिडेन्सी धायरी या ठिकाणची संरक्षण भिंत पडून दोन चाकी व चार चाकी गाड्या गाडल्या गेल्या. दोन दिवस झालेल्या पावसाने सुरक्षारक्षक भिंत कोसळली आहे.
सातारा : गेल्या दोन दिवसापासून सातारा शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. परंतु आज पहाटेपासूनच सातारा शहरात वातावरणात अचानक बदल झाला झाल्यामुळे सातारा शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यातील १५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचे आज उद्घाटन...
रेल्वेच्या १०३ पुनर्विकसित स्थानकांचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्यातील १५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेत, रेल्वे स्थानकांचे आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचा उद्देश असून त्याअंतर्गत देशभरातील १,३०० हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात १३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी १५ स्थानकांचे उद्घाटन आज २२ मे रोजी करण्यात येणार आहे.
या स्थानकांमध्ये परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर, देवळाली, धुळे, सावदा, चांदा, एनएससीबी इतवारी, आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या ८० स्थानकांपैकी या योजनेत १२ प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
या स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम १५ महिन्यांत पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही स्थानके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासी-अनुकूल सुविधांनी विकसित करण्यात आली आहेत.
जालना : जिल्ह्यात सलग आठ दिवसापासून वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ओढे आणि नदी दुधडी भरून वाहू लागलेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या गिरजा नदीचे कोरडे पात्र मान्सूनपूर्व पावसामुळे आता खळखळून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केली असून अनेक ठिकाणी पावसासोबत वादळी वाऱ्यामुळे शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील १५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचे आज उद्घाटन...
रेल्वेच्या १०३ पुनर्विकसित स्थानकांचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्यातील १५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेत, रेल्वे स्थानकांचे आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचा उद्देश असून त्याअंतर्गत देशभरातील १,३०० हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात १३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी १५ स्थानकांचे उद्घाटन आज २२ मे रोजी करण्यात येणार आहे.
या स्थानकांमध्ये परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर, देवळाली, धुळे, सावदा, चांदा, एनएससीबी इतवारी, आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या ८० स्थानकांपैकी या योजनेत १२ प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
या स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम १५ महिन्यांत पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही स्थानके आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासी-अनुकूल सुविधांनी विकसित करण्यात आली आहेत.
नाशिकच्या जिंदाल कंपनीमध्ये लागलेली आग अजूनही धुमसते आहे. काल रात्री उशिरा पर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू होते. आग वाढत असताना कंपनीतील कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. मात्र ऑईलच्या टाकीचा स्पोर्ट झाल्यानंतर दोन कामगारांचे पाय त्यात भाजले गेले मात्र तात्काळ दोन्ही कामगारांना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नाशिक : जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग सलग तिसऱ्या दिवशीही धुमसतच आहे. काल सकाळपासून नियंत्रणात आलेली आग सायंकाळनंतर आग पुन्हा एकदा भडकली. त्यामुळे संपूर्ण रात्रीभर अग्निशमन दलाने आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. आग आता बर्यापैकी नियंत्रणात आली असली, तरीही तांत्रिक पातळीवर ती पुढील काही तास धुमसत राहण्याची शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिसरात धुराचे लोट अजूनही पाहायला मिळत असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापन दल सतर्क आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, आगीमुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर
२५ ते २७ मे अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने दौऱ्याला महत्त्व
नागपूर, नांदेड आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शाह हजेरी लावणार
नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूटसह नांदेडमधील शंकरराव चव्हाण मेमोरियल येथील कार्यक्रमात शहांची विशेष उपस्थिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मराठवाड्यातील मंडळ अध्यक्षांशी शाह संवाद साधणार
तर मुंबईतील मुंबई विद्यापीठ आणि माधवबाग मंदिराच्या कार्यक्रमांमध्येही शाह उपस्थित राहणार
धाराशिव जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला.. तर अनेक ठिकाणी पाणी साचले. मे मध्ये जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असतात, त्याच महिन्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. मे महिन्यातच आलेल्या पावसाने शेती मशागतीची काम ठप्प झालेत.
दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार
पुढील ३६ तासांत कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होत आणखी तीव्रता वाढणार
हिंगणा तालुक्यातील शेषनगर येथे काल झालेल्या वळवाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने संत्र्याची झाडे समूळ उखडली गेली, ज्यामुळे परिसरात आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून नवीन प्रयोग म्हणून संत्रा बागेची लागवड केली होती. यावर्षी पिकाला सुरुवात होत असतानाच या नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
नागपुरात काल रात्री झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम विमानसेवेवर ही दिसून आला...
* नागपूरातून उडणाऱ्या दोन फ्लाईटला तर नागपूर विमानतळावर उतरणाऱ्या सात फ्लाईटला त्यामुळे विलंब झाला..
उशिरा उड्डाण झालेले फ्लाईट
* नागपूर - इंदूर
* नागपूर - मेंगलोर
उशिरा आलेले फ्लाईट...
* गोवा - नागपूर
* अहमदाबाद - नागपूर
* मुंबई - नागपूर
* बेंगळूर - नागपूर
* मुंबई - नागपूर
* पुणे - नागपूर
* दिल्ली - नागपूर
पुण्यात होर्डिंग आणि फ्लॅटचा प्रश्न गंभीर होत चाललाय..
वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे, भुगांव येथे रस्त्याच्या मधोमध असलेल्या तारेवर फाटलेला फ्लेक्स येऊन अडकला
होर्डिंगला लावलेला फ्लेक्स, वाऱ्याने फाटून तो उडत येऊन तारेवर अडकल्याने वाहन चालकांची मोठी अडचण झाली होती
पुण्याहून कोलाड कोकण कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा फ्लेक्स अडकल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना जपून वाहन त्या ठिकाणाहून काढावं लागत होतं
-काही वेळानंतर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून हा फ्लेक्स तारेवरून काढून टाकत मार्ग मोकळा करण्यात आला
गोवा राज्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. पावसाची तीव्रता पाहता गोवा वेधशाळेने पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेले भले मोठे झाड पावसामुळे रस्त्यावर कोसळले. तेथे उभ्या करून ठेवलेली १० दुचाकी वाहने या झाडाखाली चिरडल्या गेल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी टळली. तर जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘दूधसागर’ धबधब्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीच्या भागात चक्रीय वारे घोंगावत आहेत. त्या प्रभावातून कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन चार दिवस सतत पाऊस पडत आहे. तसेच हवामान खात्याने देखील यंदा पाऊस लवकर असल्याचा अंदाज व्यक्त केला. याच अनुषंगाने आता तळकोकणातील शेतकऱ्यानी नांगरणी करत भात पेरणीला सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतीची नागरणी करून भात पेरणीला सुरुवात केली आहे.
रात्री झालेल्या पावसामुळे भिवंडी वाडा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे तसेच रस्त्याचे काँक्रिटी करणाचे काम देखील अनेक ठिकाणी सुरू असल्याने या महामार्गावर भिवंडीहून वाड्याच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर तब्बल 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत . वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तारेवरची कसरत करत आहेत. तर या महामार्गावर पडलेले अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत.
काल संध्याकाळी आणि रात्री मुंबईत मुसळधार पाऊस, सोबत सोसाट्याचा वारा,
सकाळपासून मात्र पावसाची विश्रांती
आज देखील मुंबईत पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा
रात्री झालेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या लोकल 10 मिनिटे उशिराने,
तर पश्चिम रेल्वेच्या लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने
धाराशिव जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला. पावसाचा जोर कायम असल्याने रस्ते जलमय झाले. तर अनेक ठिकाणी पाणी साचले. मे मध्ये जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असतात, त्याच महिन्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह 30 ते 40 मिनिटे जोरदार पाऊस पडला, त्यानंतर मात्र रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती.कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. सकाळी पाऊस नाही. आकाश ढगाळ.
पुण्यात काल दीवसभर पाऊस नव्हता. रात्री थोडावेळ हलका पाऊस झाला . मात्र मध्यरात्रीपासुन पावसाची उघडीप आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंवर सूनेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि नणंदेला अटक.. फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू, हुंड्यासाठी छळ केल्याचा आईवडिलांचा आरोप
यंदा सरासरीपेक्षा ७ ते १७ टक्के अधिक पावसाची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती, मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट