Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Updates: राज्यातील आणि देशातील या ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates: मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ काल भीषण दुर्घटना घडली. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या दोन लोकलमधले 13 प्रवासी खाली पडले. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर नऊजण गंभीर जखमी...More
शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श ,
मयत विनोद म्हस्के सह मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्केचा मृत्यू.
अँकर :जालना जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय विजेचा धक्का लागून बाप आणि दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, जालना तालुक्यातील वरुड गावात शेतकाम करत असताना दोन लहानग्यासह त्यांच्या पित्याला विद्युत तारेचा जोरदार शॉक बसला.
या घटनेत विनोद मस्के आणि त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला.
दरम्यान गावकऱ्यांना घटनेची माहिती कळताच तिन्ही जणांना तत्काळ जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून
या दुर्दैवी घटनेमुळे वरुडगावासह संपूर्ण परिसरात शोकसंतप्त भावना व्यक्त होत आहेत.
मनोज जरांगे पाटलांचा बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा
मनोज जरांगे पाटील उद्या बच्चू कडूंची घेणार भेट
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच गेल्या तीन दिवसापासून गुरुकुंज मोझरी मध्ये सुरू आहे बेमुदत अन्नत्याग उपोषण...
उद्या दुपारी 4 वाजता मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या अन्नदात्याग उपोषणाला पाठिंबा देऊन घेणार बच्चू कडूंची भेट...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळमध्ये पाण्याखालील संग्रहालयाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ
मुंबई, दि. 10 : आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले.
सेवानिवृत्त जहाजाचे स्वरूप
या जहाजाचे १,१२० टन वजन आहे. तर ८३.९ मोटर लांबी असून ९.७ मीटर रुंदी आहे. ५.२ मीटर इतकी खोली आहे. हे जहाज १२ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहे. केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास करणे या योजनेंतर्गत ‘स्पेशल असिस्टंट्स टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ (भाग 3) (Special Assistance to States for Capital investment (Part-3) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आयएनएस गुलदार सेवानिवृत्त युद्धनौका निवती रॉक जवळ समुद्रात संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करणे (Ex - INS Guldar Underwater Museum, Artificial reef and Submarine Tourism, Sindhudurg) या प्रकल्पास केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २७ डिसेंबर २०२४ रोजी रु.४६.९१ कोटीस मान्यता दिली आहे. भारतीय नौदलाने सदरचे निवृत्त जहाज पोर्टब्लेअर, अंदमान येथून कारवार नेव्हल बेस, कर्नाटक याठिकाणी स्वखर्चाने पोहोच करण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची विनंती मान्य केली, ज्यामुळे राज्य शासनाची आर्थिक बचत झाली आहे.
प्रकल्पाचे टप्पे
भारतीय नौदलाकडून बोटीचा अधिकृतरित्या २२ फेब्रुवारी २०२४ रोजी कारवार नेवल बेस येथे बोटीचा अधिकृत ताबा घेण्यात आला. कारवार येथून विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे जहाज घेऊन (Tow) येणे. हे जहाज १६ मार्च २०२५ रोजी यशस्वीरित्या कारवार येथून विजयदुर्ग येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जेट्टीवर सुरक्षितरित्या आणण्यात आले.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (एमएमबी) विजयदुर्ग येथील जेट्टीला विना मोबदला साधारणपणे सहा ते सात महिने सदरचे जहाज सुरक्षितरित्या ठेवण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. जहाजाची पर्यावरणीय साफसफाई करण्याकरिता नियुक्त केलेल्या संस्थेने या जहाजाची १५ एप्रिल २०२५ रोजी पूर्णपणे पर्यावरणीयदृष्ट्या साफसफाई केली आहे. आयएनएस गुलदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्राच्या तळाशी निवती रॉक येथील (Latitude-15° 56.138°N and 73° 22.601'E Longitude 15°50.676'N and 73°25.956°E) येथे विराजमान (Scuttling) करण्याकरिता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांना १६ एप्रिल २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला असून वातावरण अनुकूल असेल त्या दिवशी प्रत्यक्षपणे ही कार्यवाही पार पाडली जाणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर करण्याचे नियोजित आहे.
- नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या तिघींना लाच घेताना अटक...
- वैद्यकीय अधीक्षक, कॅशियर व खासगी महिलेस पकडले...
अँकर - नामको कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया झालेली असताना या महिलेला डिस्चार्ज देण्याकरिता तिच्या पतीकडून ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत नऊ हजारांची लाच घेण्यात आली. त्यातील उर्वरित २१ हजारांची मागणी करत त्यापैकी ११ हजार रुपये लाच स्वीकारताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाखा जहागिरदार, कॅशिअर महिला आणि गायत्री सोमवंशी या तिघींना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याप्रकरणी सोमवारी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय योजनांचा लाभ घेत असतांना हॉस्पिटलकडून अतिरिक्त पैसे मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा असे आवाहन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केलंय तर हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत कायदेशीर तपास सुरू असून दोन महिन्यांपूर्वीची तक्रार असावी याबाबत कल्पना नसल्याचा खुलासा नामको हॉस्पिटलचे व्यवस्थापक समीर तुळजापूरकर यांनी केलंय.
Anc:बीड जिल्ह्यात गत वर्षभरात 300 हून अधिक बालविवाह झाल्याचे समोर आलंय.. ज्यात 258 बालविवाह रोखण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. तर प्रशासनाने 18 जणांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत..
जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये प्रशासनाकडून जनजागृती केली जातेय. त्याच माध्यमातून हे बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलं. मात्र जिल्ह्यात बालविवाह रोखले जात असल्याने इतर ठिकाणी जाऊन बालविवाह होत असल्याची चिंतेची बाब जिल्हा बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.. यात प्रामुख्याने ऊसतोड कामगार मुलांच्या बालविवाहाचा समावेश आहे..
बाईट: अश्विनी जगताप - जिल्हा समन्वयक बाल प्रकल्प अधिकारी
बाईट: तत्त्वशील कांबळे - बाल हक्क कार्यकर्ता (फिल्ड वर्कर)
बालविवाहाची कारणे
मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामीण भागात पालक चिंतेत असतात.. त्यात ऊसतोडीसाठी कामगारांचे स्थलांतर होते.. त्यामुळे त्यांच्या किशोरवयीन मुलीचा प्रश्न निर्माण होतो. अशातच बालविवाहाचा पर्याय पालकांकडून निवडला जातो.. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बालविवाहाचे सारखे प्रमाण आढळून आले आहे..
कोकण ग्रामीण विकास पर्यटन कार्यक्रमाच्या अंतर्गत एकाच गावात तब्बल 14 कोटींची कामे मंजूर.
भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांचा आक्षेप...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली सखोल चौकशीची मागणी.
चुकीच्या पद्धतीने कामांना तांत्रिक मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्य सचिवांच्या माध्यमातून चौकशी व्हावी - विनय नातू यांची मागणी
एकट्या कर्दे गावाला 14 कोटींचा निधी केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी असल्याचा विनय नातू यांचा आरोप.
शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांच्या मतदार संघातील कर्दे गावातल्या 14 कोटींच्या निधीकडे विनय नातू यांनी सरकारचे वेधले लक्ष.
पाच गावांचा विकास निधी एकाच गावला देणे हे योग्य नाही
बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय.. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र मागील महिन्यात झालेल्या पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाले.. अद्याप या पिकांचे पंचनामे झाले नसून, आहे त्या कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. सरकारचे धोरण चुकीचे असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा.. अशी मागणी शेतकरी करीत आहे..
जिल्हा रुग्णालयातून आरोपी फरार..
जीवे मारण्याचा प्रयत्न आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सुनील लोखंडे असे आरोपीचे नाव
जिल्हा रुग्णालयात गेल्या सहा दिवसांपासून होता उपचारासाठी दाखल..
उपचार सुरू असताना बंदोबस्तासाठी असलेल्या गार्ड आणि हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांची नजर चुकून पळाला आरोपी..
तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मेटके यांच्यावर केला होता आरोपीने गोळीबार..
तेव्हापासून नगर शहरातील कारागृहात होता शिक्षा भोगत
चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाला शिंदेंचा पुन्हा धक्का
उबाठाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा आज थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश
धाने पाटील याच्यासोबत त्याचा मुलगा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील याच्यासह शेकडो कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
बदलापूर स्थानकावर दोन प्रवाशांमध्ये हाणामारी, इतर प्रवाशांची धावपळ
सकाळी साडेआठच्या सुमारास कर्जत वरून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकल मध्ये दोन प्रवाशात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
लोकल मधून प्रवासी उतरतांना दोघा प्रवाशात हाणामारी झाली या हाणामारी मुळे प्रवशांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
मंत्रिमंडळ बैठकीत "कोण कोणाचा बाप" यावर चर्चा
शिवसेना मंत्र्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार
नितेश राणे यांनी धाराशिव येथे भाषणात शिवसेनेवर नाव न घेता केली होती टीका,
"सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सी एम बसला आहे" हे वाक्य सेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागले
"आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?" असा सेना मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीत सवाल
या वरून मुख्यमंत्री यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे केली नाराजी व्यक्त
असे बोलणे टाळले पाहिजे, असा दिला सल्ला,
- नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न...
- तिमथी दहातोंडे असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्याचं नाव...
- ख्रिस्ती जमिनी हडपणाऱ्या संस्थेवर पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप...
- पोलिसांना वारंवार अर्ज देऊनही कायदेशीर कारवाई होत नसल्याने आत्महत्याचा केला प्रयत्न...
- सरकारवाडा पोलिसांनी आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या तिमथी दहातोंडेस घेतले ताब्यात
राष्ट्रवादी शरद पवार गटाला वर्धापनदिनी साताऱ्यात धक्का
पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश
शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना आव्हान देण्यासाठी भाजपाचे खेळी
भाजपाच्या मुंबईतील नरिमन पॉईंट प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सुरू आहे..या पक्षप्रवेशासाठी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे उपस्थित आहेत.
सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का आहे. तर शंभूराज देसाई यांच्यासाठी हे एक आव्हान असणार आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला वर्धापनदिनी साताऱ्यात धक्का
पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष हिंदुराव पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश
शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना आव्हान देण्यासाठी भाजपाचे खेळी
भाजपाच्या मुंबईतील नरिमन पॉईंट प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सुरू आहे..या पक्षप्रवेशासाठी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे उपस्थित आहेत.
सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का आहे. तर शंभूराज देसाई यांच्यासाठी हे एक आव्हान असणार आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
चारकोप विधानसभेचे मनसे अध्यक्ष दिनेश साळवी म्हणाले की *चारकोप विधानसभेतील सेंट मेरी स्कूल मध्ये, तिसरी भाषा सक्ती म्हणून हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जाईल असं पत्रक पालकांना दिल्यानंतर, या विषयाबाबत पालकांनी आमच्याकडे तक्रार केली होती.
आज मनसे चारकोप विधानसभेच्या शिष्ठमंडळाने सदर शाळेच्या मुख्याध्यापक झेंडे यांची भेट घेऊन त्यांना तिसरी भाषा सक्ती करू नका असे पत्र दिले आणि पुन्हा आमच्याकडे या विषयाबाबत पालकांची तक्रार आली तर आम्ही गप्प बसून सहन करणार नाही अशी सूचना ही दिली.
शाळेच्या मुख्याध्यापक झेंडे ने आम्हाला आश्वासन दिले आहे की, आम्ही तिसरी भाषा म्हणून हिंदी अथवा अन्य कोणतीही भाषेची सक्ती करणार नाही आणि आमच्या पत्रकातून आत्ताचं हिंदी भाषा हा विषय काडून नवीन पत्रक बनवत आहोत.
बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस
शेकडो प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं मुंडन आंदोलन
सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूरबाजार तहसील कार्यालयात मुंडन करत सरकारचा निषेध करताय...
कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोझरी याठिकाणी अन्नत्याग उपोषणावर बसले आहे...
बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस
शेकडो प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं मुंडन आंदोलन
सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूरबाजार तहसील कार्यालयात मुंडन करत सरकारचा निषेध करताय...
कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोझरी याठिकाणी अन्नत्याग उपोषणावर बसले आहे...
धुळ्यातील एसबीआय बँकेत काल झालेल्या शिवसेनेच्या राड्या नंतर एसबीआय बँकेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. महिलेला मराठी भाषेवरून हीनावल्याचा आरोप करत धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँकेच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज बँकेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँक बंद ठेवत काळ्याफिती लावून शिवसैनिकांचा निषेध व्यक्त केला. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेबाहेर निदर्शने केली.. कुठलंही कारण नसताना शिवसैनिकांनी कामाच्या वेळेस बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत काळ्या फिती लावत कामबंद निषेध आंदोलन करण्यात आले.
धुळ्यातील एसबीआय बँकेत काल झालेल्या शिवसेनेच्या राड्या नंतर एसबीआय बँकेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. महिलेला मराठी भाषेवरून हीनावल्याचा आरोप करत धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँकेच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज बँकेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँक बंद ठेवत काळ्याफिती लावून शिवसैनिकांचा निषेध व्यक्त केला. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेबाहेर निदर्शने केली.. कुठलंही कारण नसताना शिवसैनिकांनी कामाच्या वेळेस बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत काळ्या फिती लावत कामबंद निषेध आंदोलन करण्यात आले.
जगातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साऊथ आफ्रिकेमधील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये बीडच्या चार धावपटूंनी इतिहास रचला आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ.संजय जानवळे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.विश्वास गवते, हरी ठोंबरे यांनी तब्बल 90 किलोमीटरचा थरारक ट्रॅक 11 तासांच्या आत पार केला. पीटरमारीत्जबर्ग ते डर्बन या चढ-उताराच्या मार्गावर 70 देशांतील 23 हजार धावपटूंची चुरस असताना, बीडच्या खेळाडूंनी दाखवलेली ही कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या या स्पर्धे बीडच्या स्पर्धकांनी मोठी कामगिरी बजावली. या यशामुळे बीड जिल्ह्यातील नव्या धावपटूंना प्रेरणा मिळणार आहे.
जगातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साऊथ आफ्रिकेमधील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये बीडच्या चार धावपटूंनी इतिहास रचला आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ.संजय जानवळे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.विश्वास गवते, हरी ठोंबरे यांनी तब्बल 90 किलोमीटरचा थरारक ट्रॅक 11 तासांच्या आत पार केला. पीटरमारीत्जबर्ग ते डर्बन या चढ-उताराच्या मार्गावर 70 देशांतील 23 हजार धावपटूंची चुरस असताना, बीडच्या खेळाडूंनी दाखवलेली ही कामगिरी अभिमानास्पद ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या या स्पर्धे बीडच्या स्पर्धकांनी मोठी कामगिरी बजावली. या यशामुळे बीड जिल्ह्यातील नव्या धावपटूंना प्रेरणा मिळणार आहे.
पवार साहेब सोबत आले तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होईल. असं मत अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी व्यक्त केलंय. आजवर जे अजित दादांवर टीका करायचे ते त्यांचं नेतृत्व स्वीकारतायेत, याचा आम्हाला आनंद आहे.
बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस
प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पात उतरले...
कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोझरी याठिकाणी अन्नत्याग उपोषणावर बसले आहे...
बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस
प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पात उतरले...
कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोझरी याठिकाणी अन्नत्याग उपोषणावर बसले आहे...
अमरावतीत पून्हा एकदा उबाठाला खिंडार
उबाठाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील हे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
धाने पाटील याच्यासोबत त्याचा मुलगा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील याच्यासह शेकडो कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत
या आधी संजय बंड आणि त्यांची पत्नी प्रिया बंड यानीही उबाठाची साथ सोडली होती
मुंबईत बाॅम्बब्लास्ट करण्याचा एका माथेफिरूकडून पुणे नियंत्रण कक्षाला धमकी वजा फोन
पुण्यातील कोथरूमधील रहिवाशी संदीप गाडे यांच्याकडे काम करणारा व्यक्ती सुभाष सिंग यानेही धमकी दिल्याचे समोर
संदीप यांच्याकडे काम करणारा सुभाष हा दोन दिवसापूर्वी काम सोडून गेला होता
मंगळवारी पहाटे सुभाषने संदीप यांना फोन करून गोळ्या घालण्याची धमकी दिली
इतकच काय तर पुढे मुंबईतही बाॅम्बस्फोट घडवणार असल्याचा धमकीवजा इशारा दिला
याबाबत संदीप यांनी पुणे नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली
पुणे पोलिसांनी याबाबत मुंबई पोलिस नियत्रंण कक्षालाही फोनवरही माहिती दिली
या प्रकरणी अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत
दारूच्या नशेतच सुभाष सिंग याने हा फोन केला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत बाॅम्बब्लास्ट करण्याचा एका माथेफिरूकडून पुणे नियंत्रण कक्षाला धमकी वजा फोन
पुण्यातील कोथरूमधील रहिवाशी संदीप गाडे यांच्याकडे काम करणारा व्यक्ती सुभाष सिंग यानेही धमकी दिल्याचे समोर
संदीप यांच्याकडे काम करणारा सुभाष हा दोन दिवसापूर्वी काम सोडून गेला होता
मंगळवारी पहाटे सुभाषने संदीप यांना फोन करून गोळ्या घालण्याची धमकी दिली
इतकच काय तर पुढे मुंबईतही बाॅम्बस्फोट घडवणार असल्याचा धमकीवजा इशारा दिला
याबाबत संदीप यांनी पुणे नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली
पुणे पोलिसांनी याबाबत मुंबई पोलिस नियत्रंण कक्षालाही फोनवरही माहिती दिली
या प्रकरणी अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत
दारूच्या नशेतच सुभाष सिंग याने हा फोन केला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील केज- कळंब बसला रस्तात आग लागली होती. यातील सर्व प्रवासी बचावले. मात्र याच उभ्या असलेल्या बसला धडकून युवकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.या बसची आग अग्निशामक दलाच्या जवानांनी आटोक्यात आणल्यानंतर ती बस त्याच ठिकाणी उभी होती.यानंतर रात्रीच्या अंधारात बसचा अंदाज न आल्याने एक भरधाव वेगातील दुचाकी या बसला धडकली.यामध्ये अशोक हाके याचा मृत्यू झाला तर गणेश हाके हा जखमी झाला आहे.याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील केज- कळंब बसला रस्तात आग लागली होती. यातील सर्व प्रवासी बचावले. मात्र याच उभ्या असलेल्या बसला धडकून युवकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.या बसची आग अग्निशामक दलाच्या जवानांनी आटोक्यात आणल्यानंतर ती बस त्याच ठिकाणी उभी होती.यानंतर रात्रीच्या अंधारात बसचा अंदाज न आल्याने एक भरधाव वेगातील दुचाकी या बसला धडकली.यामध्ये अशोक हाके याचा मृत्यू झाला तर गणेश हाके हा जखमी झाला आहे.याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
लातूर शहर आणि परिसरात रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.. वादळी वाऱ्याने रौद्ररूप धारण केल्याने शहरात जवळपास सात ते आठ ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती... तर शहरातील सिग्नल कॅम्प, खर्डेकर स्टॉप, आदर्श कॉलनी, राजीव गांधी चौक, जुना औसा रोड, भोई गल्ली, यासह इतर भागात विजेच्या तारांवरती झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात घालावी लागली.. दरम्यान, सोमवारी रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावलेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता.. पहाटेच्या सुमारास काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली.. सध्या पाऊस थांबला असला तरी शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम आहे..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का
राष्ट्रवादी कांग्रेसच्या वर्धापनदिनी भाजपकडून पवारांना धक्का
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सत्यजित सिंह पाटणकर भाजपात आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश करणार
सोबतच, कोथरुड मतदारसंघातील कांग्रेसचे कार्यकर्ते देखील भाजपात प्रवेश करणार
भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिकपाण्यासंदर्भात चर्चा होणार
अनेक भागांत पाऊस, सोबतच, पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होणार असल्याने शेतकऱ्यांसंबंधित निर्णय घेतले जाण्याची शक्यता
ज्यात, खते, बियाणे योग्यरित्या पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जाणार
मुंबई आणि उपनगरांमधील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता
नेरूळ स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, ठाणे स्थानकातून नेरूळ, पनवेल कडे जाणाऱ्या लोकल ठप्प,
अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प
ठाण्यातून केवळ वाशी साठी लोकल सुरू
भंडारा जिल्ह्यातील वाळूची तस्करी प्रशासनासाठी मोठी डोकंदुखी ठरली आहे. टिप्पर, ट्रॅक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून होणाऱ्या वाळू तस्करीवर पोलीस आणि जिल्हा प्रशासन कारवाई करताना बघायला मिळत आहे. मात्र, ही वाळू तस्करी थांबवण्यात प्रशासनाला पूर्णपणे यश आलेलं नाही. वाळू तस्करांनी आता नवी शक्कल काढली असून बैलबंडीच्या माध्यमातून ही वाळू तस्करी करण्यात येत आहे. भंडाऱ्याच्या साकोली, लाखांदूर तालुक्यात बैलबंडीतून ही वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. अगदी पहाटेच्या किर्रर्र अंधारात बैलबंडीधारक नदी घाटात जातात आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत बैलबंडीच्या अनेक फेऱ्या मारून वाळू एकत्र जमा करून ती विकतात. बैलबंडीच्या माध्यमातून होणारी ही वाळू तस्करी थांबविण्यात प्रशासनाला यश येते का? हे आता बघण्यासारखं आहे.
वाशिम नगरपालिका अंतर्गत येणारे कचरा घंटागाडीचे कंत्राटी गाडी चालक, हेल्पर, ट्रॅक्टरचे सफाई कामगारानी आपल्या मागण्यांना घेऊन मागील सहा दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारल आहे, किमान वेतन,पीएफ व एस.आय.सी. लागु करणे,कामगारांच्या पगारात पीएफ मध्ये व एस.आय.सी मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करणे,मागील एक महिन्याचा पगार त्वरीत करणे व पगार नियमित करणे आणि कामावरुन काढलेल्या सर्व ट्रॅक्टर कामगारांना व इतर कामगारांना विना अट रुजु करणे, कंत्राटदाराची दडपशाही व अत्याचार त्वरीत बंद करणे या मागण्यांना घेऊन कंत्राटी कामगारांनी वाशिमच्या नगरपालिकेसमोर कामबंद आंदोलन पुकारल आहे. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम थांबले आहे. या आंदोलनात कचरा गाडी चालक, हेल्पर, ट्रॅक्टरचे सफाई कामगार असे एकूण 70 कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत.
अचलपूर मतदार संघातुन विधानसभेत बच्चू कडूचा पराभव करणारे भाजपचे आमदार प्रवीण तायडेची बच्चू कडूच्या उपोषणावर सडकून टिका
सोफिया प्रकल्पाच्या विरोधात आजचे आंदोलनकर्ते तेव्हा देखील सक्रिय होते... मात्र तेव्हा अशी कोणती देवाण-घेवाण झाली जे तुम्हाला आंदोलन स्थगित करावे लागले? असा सवाल उपस्थित केला
आता देखील आंदोलन करीत असताना व्हॅनिटी व्हॅनवर शंका उपस्थित करत प्रवीण तायडे यांनी आरोप केला की, बच्चू कडू हे दर दोन तासांनी व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाऊन बसतात, शेतकऱ्यांनी यांच्याकडून काय अपेक्षा कराव्या?
मी सुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असो तो आमच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या संदर्भात निश्चितच धोरण आखतील याचा मला विश्वास आहे...
राष्ट्रसंतांच्या समाधी जवळ उपोषण सुरू आहे मात्र उपोषणकर्ते हे महिलांबद्दल अभद्र भाषेत भाषण करताना दिसले...
बच्चू कडू हे 20 वर्ष सभागृहात राहिले त्यामुळे आता त्यांना बाहेर करमत नाहीये...
मोझरीला आंदोलन करण्यामागे काही कारण आहेत, नॅशनल हायवे असल्यामुळे चक्का जाम करता येतो, ते स्वतःचा पेंडॉल देखील जाळू शकतात, उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा तोच एक प्रकार त्यांच्याजवळ आहे...
ते भाषणात नेहमी म्हणतात आम्हाला काही गरज नाही आमदारकीची, आम्ही रस्त्यावर उतरून लढाई करू, मग आता त्यांना शिक्षक मतदार संघ लढायची इतकी घाई का होत आहे ?...
कधीकाळी तेच शिक्षकांना शिव्या देत होते, राज्यात जो शिक्षक भरती घोटाळा झाला आहे तो त्यांच्याच राज्यमंत्री पदाच्या काळात झाला आहे त्यांनी आधी या सर्वांची उत्तरं द्यावी..
पावसाने मारली दडी मृग नक्षत्रही कोरडे गेले ,शेतकऱ्यांची चिंता वाढली
नेमका पाऊस केंव्हा पडणार? पेरण्या केंव्हा करायच्या
राज्यात १२ ते १९ जुन दरम्यान पाऊस
परभणीतील वनामकृवीच्या तंज्ञाचे मत
मे महिन्यात राज्यात आणि प्रामुख्याने परभणी जोरदार पाऊस झाला मात्र यानंतर जुन मध्ये पावसाने मोठी उघडीप दिलीय मृग नक्षत्र ही कोरडे गेले अनेक हवामान तज्ञांनी सांगितलेले अंदाजही चुकले त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय नेमका पाऊस कधी पडणार पेरण्या खोळंबणार की वेळेत होणार हे आमच्या प्रतिनिधींनी जाणुन घेतलय परभणीच्या वनाम कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ कैलास डाखोरे यांच्याकडून..
राज्यात मान्सून दाखल होण्याची तारीख 9 जुन आहे
यंदा मान्सून लवकर जरी आला असला तरीही सध्या खंड दिलाय
12 ते 19 जुन दरम्यान मराठवाड्यासह राज्यात मान्सून सक्रिय झालेला दिसेल सर्वत्र पाऊस पडेल
त्यांनतर परत 26 जुन ते पुढे एक आठवडा पाऊस असणार आहे
शेतकऱ्यांनी हवालदिल होवून जाऊ नये
पेरणीचा कालावधी जाणार नाही
जोपर्यंत 100 मिलिमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत
शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे यंदाही 'वरळीच्या डोम'मध्ये थाटात साजरा केला जाणार
१९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जागेची चाचपणी पक्षातील नेत्यांकडून सुरू होती
वर्धापन दिनासाठी वरळीतील डोम, नेस्कोसेंटर आणि बीकेसी हा पर्याय ठेवण्यात आला होता
मात्र पावसाचे दिवस असून पदाधिकारी आणि शिवसैनिकांना वर्धापन दिनासाठी येण्यास अडचणीचे ठरू नये म्हणून 'वरळी डोम'वर शिक्का मोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुका लक्षात घेता या मेळाव्याला विशेष महत्व
धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजप मधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर. आता शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस ही समोर आली आहे. जिल्हाप्रमुख बदलावा अशी मागणी जोर धरतीय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हा बदल गरज असल्याचे मत शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी व्यक्त केल. जिल्हाप्रमुख बदलला नाही तर पदाधिकारी सामूहिक राजीनामाच्या तयारीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तुळजापूर येथील शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या विरोधात मनसेच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज धडक मोर्चा
ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक सकाळी नऊ वाजता मोर्चाची सुरुवात होणार
मनसे नेते अविनाश जाधव सह ठाणेकर रेल्वे प्रवासी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार
मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मोबाईल ॲप द्वारे उबर टॅक्सी बाईक बुक करणे एका तरुणीला भलतेच अडचणीचे ठरले. बाईक चालकाने तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटेल रोडवर ड्रॉप केल्यानंतर त्याने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडला.हा प्रकार सुरू असतानाच त्या ठिकाणी सतर्क भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून तरुणीला सोडवले मात्र संधीचा फायदा घेत उबर बाईक चालक फरार झाला. याप्रकरणी तरुणीने वनराई पोलीस ठाण्यात उबर टॅक्सी बाईक चालकाविरोधात तक्रार दिली याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी उबर टॅक्सी बाईक चालकाला अवघ्या वीस मिनिटात अटक केली आहे.मात्र अशा उबर टॅक्सी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासुनच उबेर, ओला, झेप्टो आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांनी कामावर ठेवले पाहिजे असे मत गोरेगाव भाजप उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी वनराई पोलिसांकडे व्यक्त केले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मूर्तीं घडविण्यास अथवा त्यांची विक्री करण्यास बंदी नाही
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने(सीपीसीबी) सोमवारी उच्च न्यायालयात दिली.
मात्र नैसर्गिक जलाशयात पीओपी मूर्ती विसर्जनास बंदी कायम असल्याचेही न्यायालयाला सांगितले.
सीपीसीबी २०२० मध्ये काढलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या पीओपी मूर्तीं घडविणे, त्याची विक्री-खरेदी आणि विसर्जनास बंदी घातली होती
सीपीसीबीच्या या निर्णयाला राज्यभरातील विविध गणेश मूर्तीकार संघटनांनी आव्हान दिले
सीपीबीची या मार्गदर्शक तत्त्वांची कठोर अंमलबजवणी करण्याच्या मागणीसाठी पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी जनहित याचिका केली आहे.
पीओपी मूर्तीसंदर्भातील सीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे ही सूचना किंवा शिफारशी स्वरूपात असल्याची माहितीही सीपीसीबीकडून उच्च न्यायालयात देण्यात आली.
मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याची दखल घेऊन पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतातील विसर्जनाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे आदेशदेऊन सुनावणी ३० जूनपर्यंत तहकूब केली.
दुसरीकडे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय पीओपी मूर्ती विसर्जन करण्यावरही मज्जाव केला.
विशिष्ट परिस्थितीत पीओपीला परवानगी शक्य असल्याचा दावा राज्य सरकारने मागील सुनावणीवेळी केला होता.
यंदा ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याच्या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारशींवर लवकर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने सीपीसीबीला दिल्यानंतर सीपीसीबीने समिती स्थापन केली होती.
या समितीच्या अहवालाच्या आधारे पीओपी मूर्ती घडवण्यावर आणि त्याच्या विक्रीवर बंदी नसल्याचे, आपली मार्गदर्शक तत्त्वे सूचना स्वरुपात असल्याची बदललेली भूमिका सीपीसीबीने न्यायालयात मांडली.
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक, रेल्वे प्रशासनावर आज धडक मोर्चा, गावदेवी मैदान ते ठाणे स्टेशनपर्यंत मोर्चा धडकणार
मुंब्रा अपघातामुळे दररोज लोकलनं प्रवास करणारे कोट्यवधी प्रवासी सुन्न, एकमेकांना क्रॉस करणाऱ्या दोन लोकलमधले १३ प्रवासी खाली पडले, चौघांचा मृत्यू
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...