Maharashtra Budget Session Live : कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली

Maharashtra assembly budget session 2023  : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Mar 2023 11:28 AM
'झोपलेले सरकार जागे होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे'; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

Opposition Protest : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी.


कशी उभारु गुढी? असं म्हणत विरोधकांची निदर्शने.


झोपलेले सरकार जागे होऊ दे जनतेचा पाडवा गोड होऊ दे, विरोधकांच्या घोषणा

'झोपलेले सरकार जागे होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे'; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

Opposition Protest : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी.


कशी उभारु गुढी? असं म्हणत विरोधकांची निदर्शने.


झोपलेले सरकार जागे होऊ दे जनतेचा पाडवा गोड होऊ दे, विरोधकांच्या घोषणा

जल बोगद्याच्या कामामुळे मुंबईतील प्रतीक्षानगर इथल्या इमारतींना भेगा, तात्काळ दुरुस्ती करण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी

Pravin Darekar : एबीपी माझाच्या बातमीची विधानपरिषदेत दखल


एबीपी माझाने जल बोगद्याचं काम सुरु असल्यामुळे प्रतीक्षा नगर येथील इमारतींना भेगा गेल्याची बाब निदर्शनास आणली होती


इमारती पडून नागरिकांचा मृत्यू झाल्यावर सरकार जागे होणार का? आमदार प्रवीण दरकेर यांचा सरकारला खडा सवाल 


इमारतींची तात्काळ दुरुस्ती करण्याची दरेकर यांची मागणी

मुंबईत होणाऱ्या प्रदुषणाबाबत पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायपावर कमिटी : दिपक केसरकर 

 


दिपक केसरकर 


Maharashtra Budget Session :  मुंबईत होणाऱ्या प्रदुषणाबाबत पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायपावर कमिटी बनवली आहे


- अद्यावत यंत्रणा वापरण्याचे आदेश दिलेत 


- इलेक्ट्रिकल बसेस याकरता आणल्या 


- मुंबई उपनगरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर करणे महाग आहे. पण सीएनजी करणे सोपे आहे.

Ajit Pawar : शेतकऱ्यांनी नवीन वर्ष साजरं करायच कसं? अद्याप नकुसानीचे पंचनामे नाहीत, अजित पवारांचा संतापले 

Ajit Pawar : अवकाळी पावसामुळं (unseasonal rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसं साजरं करायच? असा सवालही अजित पवारांनी केली. 

Maharashtra Budget Session :  विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज पाच मिनीटे तहकूब

Maharashtra Budget Session :  जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्यासह शेतकरी प्रश्नावरुन विरोधकांनी विदानपरिषदेत गदारोळ केला. त्यामुळं विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. 


 आमदार विक्रम काळे


आज 6 दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत


उद्या संभाजीनगरला मोर्चा आहे.


अनेक कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत


17 लाख कर्मचारी संपावर आहेत


सहा दिवस झाले तरी सरकारने बैठक घेतली नाही


सरकारनं प्रश्न सोडवले पाहिजेत.


जुन्या पेशनचा विषय अजून सुटलेला नसल्याचे आमदार विक्रम काळे म्हणाले. 

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली, सभापतींना पत्र

Maharashtra Budget Session :  कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी आमदार पदाची पेन्शन नाकारली आहे. याबाबत आमदार म्हात्रेंनी विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र लिहलं आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असल्यामुळं आपण पेन्शन नाकारत असल्याचा पत्रात उल्लेख आहे. 



मुंबईत बनावट गोळ्यांची विक्री, याप्रकरणी कारवाई होणार का? अंबादास दानवेंचा सवाल

अंबादास दानवे


मुंबईत बनावट गोळ्या आणि त्याची विक्री होत आहे.


मंत्रालयातील अधिकारी विवेक वामन कांबळी बनावट औषधामुळे मृत्यू झाला आहे


सैफी रुग्णालयातून बनावट इंजेक्शन दिल्यामुळे मृत्य झाला.


या घटनांवर कारवाई कधी होणार असा सवाल दानवेंनी उपस्थित केला.


पोलिसांचा या प्रकरणात थेट संबंध येत नाही तर औषधी द्रव्य विभागाचा येतो


सैफी रुग्णालय आणि मेडिकल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?


महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडू नये यासाठी आपण काय करणार असा सवाल दानवेंनी उपस्थित केला. 

मराठी शाळेतील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नका, शिक्षक आमदार विक्रम काळेंची मागणी

शिक्षक आमदार आणि शिक्षण मंत्री यांच्यामध्ये विधान परिषदेत खडाजंगी


- मराठी शाळेतील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नका


- शिक्षक आमदार विक्रम काळे यांची सभागृहात मागणी


- जर फी घेतली तर कर्मचारी आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील- विक्रम काळे 


- आमदार विक्रम काळे यांच्या इशाऱ्याला मंत्री दीपक केसरकर यांचं जोरदार प्रत्युत्तर


- संस्थानिकांच्या ताब्यातील संस्था शासनाच्या ताब्यात द्या आम्ही सर्व संस्थांच्या जबाबदारी घेण्यासाठी तयार आहोत


- संस्था सरकारच्या ताब्यात आल्यास सर्व शिक्षकांना अनुदान देऊ

Budget Session : 'खोक्यांची पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे', विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2023) आजपासून शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. आजही विरोधक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन झाल्याचे पाहयला मिळालं. कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या  पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली. मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) येताच विरोधकांनी  'खोक्यांची पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे', 'ईडी पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे' अशी घोषणाबाजी केली.



फक्त घोषणांनी काही होणार नाही प्रत्यक्षात मदत केली पाहिजे : बाळासाहेब थोरात

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात


शेतकरी अडचणीत होता तो अजून अडचणीत गेला आहे.


सरकार शेतकऱ्यांचे आहे तरीही त्यांच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही.


फक्त घोषणांनी काही होणार नाही प्रत्यक्षात मदत केली पाहिजे.


घोषणाचा  सुकाळ आणि कार्यवाहीचा दुष्काळ आहे.


शालेय मुलांना पोषण आहार नीट मिळत नाही.

Ambadas Danve : सरकारचं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष, मंत्री सभा घेण्यात व्यस्त; अवकाळीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल

  Ambadas Danve :  अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नकुसान झालं आहे. अद्याप या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना सरकारचे मंत्री मात्र सभा घेण्यात व्यस्त आहेत. त्याचं शेतकऱ्यांकडे थोडेही लक्ष नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.   

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Budget Session 2023 Live Updates : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज चर्चा होमार आहे. तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन तसेच जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.


अवकाळीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होणार 


अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज विधानसभेत चर्चा होणार आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.


27 फ्रेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात


27 फ्रेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली आहे. सध्या अधिवेशनाचा चौथा आठवडा सुरु आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी पक्षांचे नेते विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. गॅस दरवाढ, शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागण्यांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.