Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार, त्यानंतर महाडच्या सभेला जाणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा

 Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha:  मुंबईत बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 May 2023 09:05 PM
Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: चीन घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत; उद्धव ठाकरे यांची टीका

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: चीन घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: स्वत: ला हिंदुहृदयसम्राट होता येत नाही...म्हणून शिवसेनाप्रमुखांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू: उद्धव ठाकरे

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: स्वत: ला हिंदुहृदयसम्राट होता येत नाही...म्हणून शिवसेनाप्रमुखांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: महाराष्ट्राचे तुकडे करणारा कोणीही असो त्याचे तुकडे आम्ही करणार...हा आमचा इशारा समजा: उद्धव ठाकरे

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  महाराष्ट्राचे तुकडे करणारा कोणीही असो त्याचे तुकडे आम्ही करणार...हा आमचा इशारा समजा: उद्धव ठाकरे

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: आपलं सरकार गेल्यानंतर या खोके सरकारने सोन्याची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली - उद्धव ठाकरे यांचा घणाघात

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: आपलं सरकार गेल्यानंतर या खोके सरकारने सोन्याची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली - उद्धव ठाकरे यांचा घणाघात

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार, त्यानंतर महाडच्या सभेला जाणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार. त्यानंतर महाडच्या सभेला जाणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: महाविकास आघाडीतील ऐक्य टिकण्यासाठी प्रयत्न करावं लागणार आहे. अनेकांना, ज्येष्ठ नेत्यांना मोठं मनं करावं लागणार आहे: अजित पवार

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  महाविकास आघाडीतील ऐक्य टिकण्यासाठी प्रयत्न करावं लागणार आहे. अनेकांना, ज्येष्ठ नेत्यांना मोठं मनं करावं लागणार आहे, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी म्हटले. 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: हे सरकार दगाफटका करून सत्तेवर आले आहे...लोकांमध्ये सरकारविरोधात रोष आहे; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा हल्लाबोल 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  शेतकरी अडचणीत आला आहे तरी सरकार झोपेत आहे...शेतकऱ्यांना साथ देण्याची आवश्यकता आहे: अजित पवार


राज्यात गुंडगिरी वाढली कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत 


ह्यांचे फोटो कोणाला पाहायचे नाहीत...बळजबरी लोकांना दाखवत  आहेत...


हे सरकार दगाफटका करून सत्तेवर आलेले सरकार- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा हल्लाबोल 

- बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईत मराठी माणूस टिकला: अजित पवार


- बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईत मराठी माणूस टिकला: अजित पवार 

केंद्रात...राज्यात आणि स्थानिक पातळीवर सत्ता हवी आणि थ्रीपल इंजिन सरकार हवं असं म्हणतात...पण ह्यांचे इंजिन सरकार बिनकामाचे आहे: अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  केंद्रात...राज्यात आणि स्थानिक पातळीवर सत्ता हवी आणि थ्रीपल इंजिन सरकार हवं असं म्हणतात...पण ह्यांचे इंजिन सरकार बिनकामाचे आहे: अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: राज्यात सुरू असलेले गलिच्छ राजकारण लोकांना आवडलं नाही..सत्ताधाऱ्यांना लोक धडा शिकवणार: अशोक चव्हाण

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: राज्यात सुरू असलेले गलिच्छ राजकारण लोकांना आवडलं नाही..सत्ताधाऱ्यांना लोक धडा शिकवणार: अशोक चव्हाण

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: खारघरमधील घटना हे सरकारने घडवलेले हत्याकांड आहे...आप्पासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा सरकारचा प्रयत्न: नाना पटोले यांचा आरोप

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: भाजप शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीयांच्या विरोधात आहे


बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना लोकांनी जागा दाखवली. 


पराभवाच्या भीतीने महापालिका, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत...


खारघरमधील घटना हे सरकारने घडवलेले हत्याकांड आहे...


आप्पासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात  आला असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: छगन भुजबळ...अनिल देशमुख आणि मी तुरुंगात जाऊन आलो आहोत...आता आम्ही तुम्हाला घाबरत नाही; संजय राऊत यांचे आव्हान

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: छगन भुजबळ...अनिल देशमुख आणि मी तुरुंगात जाऊन आलो आहोत...आता आम्ही तुम्हाला घाबरत नाही असे संजय राऊत यांनी म्हटले. ही वज्रमूठ कायम राहिल आणि 2024 मध्ये निवडून येऊ असे त्यांनी म्हटले. 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे....त्यातून शिवसेनेवर आघात; संजय राऊत यांचा आरोप

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  एक नेता 9 वर्षापासून मन की बात सुरू आहे... काम की बात नाही करत...मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे....त्यातून शिवसेनेवर आघात; संजय राऊत यांचा आरोप 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे....त्यातून शिवसेनेवर आघात; संजय राऊत यांचा आरोप

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  एक नेता 9 वर्षापासून मन की बात सुरू आहे... काम की बात नाही करत...मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे....त्यातून शिवसेनेवर आघात; संजय राऊत यांचा आरोप 

शिवसेनेने 25 वर्ष ज्यांच्यासोबत युती केली, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला: भाई जगताप

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  शिवसेनेने 25 वर्ष ज्यांच्यासोबत युती केली, त्यांनी खंजीर खुपसला...काँग्रेस-राष्ट्रवादीचा असा इतिहास नाही. आम्ही आघाडी केली की पूर्ण करतो, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले.  

महाविकास आघाडी एकत्रितपणे लढल्यास कोणीही वाकडं करू शकत नाही, हे बाजार समितीच्या निवडणूक निकालातून समोर आले आहे: जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडी एकत्रितपणे लढल्यास कोणीही वाकडं करू शकत नाही, हे बाजार समितीच्या निवडणूक निकालातून समोर आले आहे: जितेंद्र आव्हाड

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: 30-35 वर्ष रखडलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प मविआच्या काळात मार्गी लागला: जितेंद्र आव्हाड

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  30-35 वर्ष रखडलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प मविआच्या काळात मार्गी लागला: जितेंद्र आव्हाड 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: नाटे गावातून मच्छिमारातून 30 हजार लोकांना रोजगार मिळतोय, रिफायनरीमधून 22 हजार लोकांना रोजगार: जितेंद्र आव्हाड यांचा दावा 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: बारसूमधील लोकांशी चर्चा अद्यापही नाही. नाटे गावातून मच्छिमारातून 30 हजार लोकांना रोजगार मिळत आहे, चांगल्या सुविधा दिल्यास एक लाखांना रोजगार मिळेल; जितेंद्र आव्हाड यांचा दावा 

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: मुंबई ही कामगारांच्या घामाने सजली आहे. इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली: जितेंद्र आव्हाड

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha:  मुंबई ही कामगारांच्या घामाने सजली आहे. इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली. मागील 10 वर्षात मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर राग असलेली लोक दिल्लीत बसली आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले, गद्दारदेखील गुजरातला गेले; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Varjamuth Sabha Aditya Thackeray : महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले, गद्दारदेखील गुजरातला गेले. मुंबईला तोडण्याचे काम सुरू असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले, गद्दारदेखील गुजरातला गेले; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Varjamuth Sabha Aditya Thackeray : महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले, गद्दारदेखील गुजरातला गेले. मुंबईला तोडण्याचे काम सुरू असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

MVA Vajramuth Sabha : हे सरकार कंत्राटदार आणि बिल्डरांचं; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

ना मुंबईचा आवाज, ना मंत्रिमंडळात एकही महिला असं हे गद्दार सरकार आहे. हे सरकार कंत्राटदार आणि बिल्डरांचं सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांना वाईट बोलणारे मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहेत हे दुर्दैव असल्याचंही ते म्हणाले. 

पार्श्वभूमी

 Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha:  महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)  मुंबईत (Mumbai News) वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) पार पडणार आहे. मुंबईत वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून आतापर्यंत अनेक प्रमुख नेत्यांनी सभेच्या तयारीचा आढावाही घेतला आहे. तसेच, पोलिसांकडूनही सभास्थळी सुरक्षेची पाहणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. 


महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभांचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी  शक्तीप्रदर्शन  करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता. आता  महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी शिंदे सरकारवर त्याच मैदानातून हल्लाबोल करणार आहे. 


तिन्ही पक्षांकडून मुंबईतील वज्रमूठ सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. सभेच्या ठिकाणी स्टेज उभारण्यात आला आहे. सोबतच तिन्ही पक्षाचे झेंडे देखील परिसरात लावण्यात आले आहेत. सभा स्थळी प्रत्येक खुर्चीवर पाण्याची एक बाटली ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय सभास्थळी सहा रुग्णवाहिकादेखील आहेत. 


महाविकास आघाडीच्या राज्यभरात 16 सभा 


महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दुसरी सभा नागपुरात पार पडली होती आणि आज मुंबईत सभा होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.