राज्यात अनेक ठिकाणी महिल्या या गावचा कारभार चालवतात पण व्याहळी गावच्या या सरपंच महिलाची कहाणी काही वेगळीच आहे.
दोन वर्षांपूर्वी पारधी समाजासाठी आरक्षित जागेवर पल्लवी शिंदे जिंकून आल्या आणि गावच्या सरपंच झाल्या. परंतु घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना आजही रोजंदारीवर काम करावं लागत आहे.
दोन वर्षात गावचा चेहरा बदलण्याचा आणि गावात सोयीसुविधा आणण्याचा त्या प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. काही विकासकामांसाठी गावच्या उद्दाम लोकांचा त्यांना त्रासही सहन करावा लागतो.
राजकारण म्हटलं की डामडौल येतो आणि त्यासोबतच रुबाब. पण व्याहळीच्या सरपंचबाईंना पाहून आजही महिला सबलीकरणाचा प्रश्न अनुत्तरीतच राहिलाय का असं वाटून जातं.