Income Tax Raids : महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raids) केली आहे.  48 वाहनं आणि 50 अधिकारी यामध्ये आहेत. या धाडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यापैकी एक म्हणजे पंढरपूरमधील अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्याशी निगडित असलेल्या चार साखर कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी सूरु आहेत. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत.


सकाळी साडेसहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. राज्यातील 24 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. जालना जिल्ह्यात झालेल्या कारावाई पाठोपाठ महाराष्ट्रात आज आयकर विभागाची दुसरी मोठी कारवाई सुरु आहे. आज महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिजीत पाटील यांच्या चार खासगी साखर कारखान्यावरही धाडी टाकल्या आहेत. सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या कार्यालयावर देखील छापेमारी केली आहे. आयकर विभागाचे पथक सोलापुरातील व्यवसायिकाच्या कार्यालयावर सकाळपासून चौकशी करत आहे. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकारी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागामध्ये मुंबईचे, नागपूरचे पथक सामील आहे. तसेच नाशिकचे पथक देखील दाखल झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकारी देखील झालं आहे. छोटो मोठे व्यवसायिक देखील आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. पण सध्या महाराष्ट्रात मोठी कारवाई सुरु असल्याचे दिसत आहे. 


औरंगाबादमध्ये देखील आयकर विभागानं कारवाई केली होती. त्याची देखील जोरदार चर्चा झाली होती. या छापेमारीत सापडलेलं कोट्यावधींचं घबाड सापडलं आहे. वऱ्हाडी असल्याचे सांगून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. तब्बल 390 कोटींचं घबाड हाती लागलं होतं. विशेष म्हणजे ही रक्कम मोजायलाच अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले होते.




कोण आहेत अभिजीत पाटील


साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील  यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु आहे. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेल्या अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली असून, तपासणी सुरु करण्यात आली आहे.


अभिजीत पाटील हे पंढरपूरमधील एक बडे उद्योजक आहेत. तरुण उद्योजकाच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्याचे बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या उद्योजकाने काही वर्षातच राज्यातील चार खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अशातच अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला होता. नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत तो कारखाना देखील ताब्यात घेतला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: