अमरावती : जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शन आणि दशक्रियाविधी पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी तीन कुटुंबं दशक्रियाविधी पार पाडण्यासाठी आले असता होडी उलटल्याने 11 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील तीन जणांचे मृतदेह हाती आले असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे.




अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शनसाठी तर काहीजण दशक्रिया पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी एकाच नात्यातील तीन कुटुंब दशक्रिया पार पाडण्यासाठी आले असता या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून आठजण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. या शोध कार्यासाठी तालुका प्रशासनातील सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळावर दाखल आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.




एकाच कुटुंबातील अकरा सदस्य गाडेगावच्या मटरे कुटुंबात दशक्रिया विधीसाठी आले होते. दशक्रिया कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर ते मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास वरुडमध्ये फिरायला गेले. त्यावेळी लोक बोटीने वर्धा नदी ओलांडून भगवान शंकराला नमन करण्यासाठी जात होते. अचानक बोट उलटली आणि सर्व अकरा जण बुडाले. यात बहीण, भाऊ, सून यांचा समावेश आहे. एक महिला आणि एका लहान मुलासह तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत.


आतापर्यंत तीन मृतदेह सापडले



  • नारायण मटरे, वय 45 वर्षे, राहणार गाडेगाव

  • वंशिका प्रदीप सिवणकर, वय 2 वर्ष, रा. तिवसा घाट 

  • किरण विजय खंडाळे, वय 28 वर्ष, रा. लोणी (मृतदेह सापडला)


8 जणांचा शोध सुरू आहे



  • आश्विनी अरून खंडारे, वय 25 वर्ष, रा. सावंगा.

  • ऋषाली अरूणराव वाघमारे, वय 19 वर्ष रा. सावंगा.

  • अतुल गणेश वाघमारे, वय 25 वर्ष, रा. सावंगा.

  • निशा नारायन मटरे, वय 22 वर्ष रा. गोडगाव.

  • आदीत्यी सुखदेवराव खंडारे, वय 13 वर्ष, तारा सावंगा.

  • मोहणी सुखदेवराव खंडारे, वय 11 वर्ष, रा. तारासावंगा, 

  • पियुष तुळशीदास मटरे, वय 8 वर्ष, रा. गाडेगाव, 

  • पुनम प्रदीप सिवणकर, वय 26 वर्ष, रा. तिवसाघाट



पाणबुडे आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेल्या लोकांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते.