भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बाबुराव आडसकर हे मराठवाड्याच्या राजकारणातील एकेकाळचं सर्वात चर्चित त्रिकुट होतं. बाबुराव आडसकर आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यात अनेकदा संघर्षही पाहायला मिळाला.
दरम्यान दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीडच्या राजकारणातील अजून एक प्रभावी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. बाबुराव आडसकर यांनी अनेक वर्ष बीडसह महाराष्ट्रातील राजकारणावर प्रभुत्व गाजवलं.