मुंबई : राज्यातील  ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.  विविध जिल्ह्यातील 1 हजार 151 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 75.35 टक्के मतदान झालं. तर राज्यातील सहा नवनिर्मित नगरपंचायतीसाठी सरासरी 78.15 टक्के मतदान झालं. राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली.
  कुडाळ, लोणंद, माढा, माळशिरस, मोहोळ आणि लोहारा या सहा नवनिर्मित नगरपंचायतींची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती.  निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.   याशिवाय  विविध महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीही रविवारी मतदान झालं. नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी होऊन निकालही कालच लागला. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या यादव विजयी झाल्या.   ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी  
जिल्हा ग्रामपंचायतीची संख्या मतदान

ठाणे

101 72.68 %
पालघर 295 64.01 %
रायगड 03 70.86 %
सिंधुदुर्ग 01 74.44 %
नाशिक 218 78.46 %
नंदुरबार 197 68.29 %
अहमदनगर 32 69.44 %
जळगाव 18 76.73 %
धुळे 63 75.76 %
पुणे 36 78.53 %
सोलापूर 02 76.30 %
सातारा 01 89.76 %
औरंगाबाद 05 88.50 %
उस्मानाबाद 02 85.75 %
बीड 02 85.46 %
जालना 06 81.95 %
नांदेड 64 70.92 %
अमरावती 05 73.25 %
यवतमाळ 61 74.78 %
अकोला 03 47.55 %
वाशिम 01 60.93 %
बुलडाणा 04 77.02 %
नागपूर 07 73.41 %
वर्धा 06 67.00 %
चंद्रपूर 01 86.20 %
भंडारा 11 76.37 %
गोंदिया 01 84.20 %
गडचिरोली 02 81.19 %
एकूण 1151 सरासरी 75.35 %
    नगरपंचायत निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी  
नगरपंचायत जिल्हा मतदान
कुडाळ सिंधुदुर्ग 73.63 %
लोणंद सातारा 75.93 %
माढा सोलापूर 81.31 %
माळशिरस सोलापूर 82.18 %
लोहारा उस्मानाबाद 78.18 %
एकूण   78.15 %