मानपत्र, स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराच स्वरुप आहे. सागर वैद्य यांच्यासह अभिनेत्री मृणाल दुसानीस, ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा रोवणारा रोईंगपटू दत्तू भोकनळ, उद्योजक किरण चव्हाण, कांदा निर्यातदार खंडू देवरे, पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे, पर्यावरणप्रेमी हैदरअली नुराणी आदींना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदानासाठी गिरणा गौरवने सन्मानित करण्यात आलं.
यंदा या पुरस्काराचं 17 वं वर्ष होतं. यावेळी फ. मु. शिंदेंनी खुमासदार शैलीत राजकीय सामाजिक सद्यस्थिती भाष्य केलं.