सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. पण ते आश्वासन न पाळल्याने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
दरम्यान या मोर्चासाठी परवानगी न घेतल्याने सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना अडवून धरलं. मात्र आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पुढे आझाद मैदानाकडे मोर्चेकऱ्यांना जाऊ देण्यात आलं.
पोलिसांनी अडवल्यानंतर मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये बराच शाब्दिक वाद झाला. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पुढे जाऊ दिलं.
सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार नाही केला तर तीव्र आंदोलन करु, अशा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.