14 ऑक्टोबर 1956 रोजी विजायदशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी विजयादशमीला देशभरातून लाखो लोक दीक्षाभूमीवर दर्शनासाठी येतात.
दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. इथल्या भव्य बौद्ध स्तूपात बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी जय भीमच्या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून निघला होता.