मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी आज संवाद साधला. त्यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या राजकारणावरही त्यांनी टीका केली. राज्यातील परिस्थिती राजकारण करण्याची नाही. त्यामुळे माझ्याकडूनही राजकारण होणार नाही, पण नेत्यांनी राजकारण करू नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावर सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे, असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी दिलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे. जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील, कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, मजुरांची यादी द्या; उद्धव ठाकरेंना रेल्वेमंत्र्यांचं उत्तर
केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन मिळत नसल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जेवढ्या ट्रेन्स मागितल्या, त्या सर्व दिल्या. अगदी रात्री उशीरा ही लिस्ट आली तरी मजुरांना ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे ह्यांचे वक्तव्य हे निव्वळ राजकारण आहे. स्वत:चे अपयश लपवण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | पॅकेजची मागणी करणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर