LIVE UPDATES | अखेर गव्याला HEMRL कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश
मोदी सरकारविरोधात आंदोलन तीव्र करणार; संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने निर्णयनव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कुठलीही गाईडलाईन नाही, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहितीअतिवृष्टी नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर; आज औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये आढावादेशभरासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिकसह खेळ आणि मनोरंजनाबाबत महत्वाचे अपडेट्स सोबतच दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Dec 2020 08:18 PM
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...या वर्षीचा शेवटचा 'मन की बात' कार्यक्रम 27 डिसेंबरला, पंतप्रधानांनी विचारलं- पुढच्या वर्षी तुमच्या काय अपेक्षा आहेत?कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला...More
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...या वर्षीचा शेवटचा 'मन की बात' कार्यक्रम 27 डिसेंबरला, पंतप्रधानांनी विचारलं- पुढच्या वर्षी तुमच्या काय अपेक्षा आहेत?कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विचारलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या नव्या वर्षामध्ये लोकांची सरकारकडून काय अपेक्षा आहे याच्याबद्दल मतही मागवलं आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अशी विचारणा केली आहे.पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "सरत्या वर्षाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता आणि येत्या नव्या वर्षात तुमच्या काय अपेक्षा आहेत." या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमासाठी लोकांचे विचार मागवले आहेत. याबाबत लोकांनी आपला संदेश 'MyGov' आणि 'नमो अॅप' वर पाठवावा, तसेच 1800-11-7800 या नंबरवरही व्हॉइस मेसेज करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.Oppo चा नवा बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत अन् फिचर्स?सध्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. आता Oppo ने आपला A53 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन Oppo A53 चाच 5G वर्जन आहे. कंपनीने हा फोन 2 रॅम आणि 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. सध्या Oppo ने आपला हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा बजेट 5G फोन भारतातही लॉन्च केला जाणार आहे.Oppo A53 5G च्या 4GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जवळपास 14,600 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच याच्या 6GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. युजर्सना हा फोन ग्रीन, सीक्रेट नाईट ब्लॅक आणि स्ट्रीमर पर्पल ऑप्शनसोबत खरेदी करता येणार आहे.Ind vs Aus: भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, मोहम्मद शमी मालिकेबाहेरऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा हात फ्रॅक्चर झाल्याने शमी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने त्याला प्रचंड वेदना होत आहे. त्यामुळे त्याला बॅट उचलणेही शक्य नाही.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अखेर गव्याला HEMRL कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश आलंय. पुणे शहराला लागुन असलेल्या बावधन परिसरात आधीपासूनच अनेक गवे आहेत असं स्थानिकांचं म्हणणे आहे. त्यामुळे या गव्याला पकडण्याएवजी त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याच निर्णय वन विभाग घेतला होता. त्यासाठी जंगलात जाणारा रस्ता वगळून इतर सर्व बाजूंनी बॅरीकेडींग करण्यात आलं होतं. तेरा दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरुड भागात गव्याला पकडण्याच्या प्रयत्नात लोकांनी पाठलाग केल्याने त्या गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावेळी गव्याला पकडण्याएवजी त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कृषी कायद्याविरोधात मुंबईत आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना रोखलं, अंबानी, अदानींच्या कार्यालयावर निघणार होता मोर्चा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नगर अर्बन बँकेची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप गांधी यांच्यासह बँकेचे संचालक, शाखाधिकारी आणि कर्जदारांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाले आहे.दिलीप गांधी हे बँकेचे माजी चेअरमन आहेत.माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह इतर आरोपींनी संगनमताने, खोटे कागदपत्र तयार करून बँकेतील 3 कोटी रुपयांचा अपहार केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नगर अर्बन बँकेची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप गांधी यांच्यासह बँकेचे संचालक, शाखाधिकारी आणि कर्जदारांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाले आहे.दिलीप गांधी हे बँकेचे माजी चेअरमन आहेत.माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह इतर आरोपींनी संगनमताने, खोटे कागदपत्र तयार करून बँकेतील 3 कोटी रुपयांचा अपहार केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अंबानीं आणि अदानींच्या इशाऱ्यावर सरकार चालतं. त्यामुळं अंबानींनीच शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आणा, असं मोदींना सांगावं- बच्चू कडू.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाण्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवणार. ठाण्यात 26 किमी उन्नत मार्ग आणि 3 किमी भुयारी मार्गाची लाईट मेट्रो धावणार.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबादमध्ये टीव्ही सेंटर परिसरातील छावणी भागात लावलेल्या 'लव्ह औरंगाबाद' फलकाची तोडफोड
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद : छावणी भागात लावलेल्या लव्ह औरंगाबाद पॉईंटची नासधूस करण्यात आली आहे. माय सिटी अंतर्गत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळ्या नावाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दारु पिऊन या व्यक्तीने नासधूस केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद : छावणी भागात लावलेल्या लव्ह औरंगाबाद पॉईंटची नासधूस करण्यात आली आहे. माय सिटी अंतर्गत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळ्या नावाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दारु पिऊन या व्यक्तीने नासधूस केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बेळगावजवळील देसूर गावातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकाऱ्याकडे लोडेड रिव्हॉल्व्हर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बेळगाव तालुक्यातील 55 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. देसुर गावात निवडणुकीच्या आधी एक दिवस मतदानपत्रिका फुटल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी सुरु होण्यापूर्वीच मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे लोडेड रिव्हॉल्व्हर असल्याचे अन्य कर्मचाऱ्यांना समजले. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.आता वरिष्ठ अधिकारी देसुर येथे जाऊन रिव्हॉल्व्हर प्रकरणाची माहिती घेत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बेळगाव तालुक्यातील 55 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. देसुर गावात निवडणुकीच्या आधी एक दिवस मतदानपत्रिका फुटल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी सुरु होण्यापूर्वीच मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे लोडेड रिव्हॉल्व्हर असल्याचे अन्य कर्मचाऱ्यांना समजले. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.आता वरिष्ठ अधिकारी देसुर येथे जाऊन रिव्हॉल्व्हर प्रकरणाची माहिती घेत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वनविभागाची टीम, पोलीस यंत्रणा आणि प्राणीप्रेमी स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांनी पुण्यातील गव्याला सुखरुप पकडण्याचे प्रयत्न सुरु. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा प्रयत्नशील.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गुन्ह्यांसाठी ओळखली जाणारी उपराजधानी नागपूर दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या गुन्ह्यात फक्त पुणे, मुंबई व राज्यातील इतर शहरांच्याच पुढे नाही तर राष्ट्रीय पातळीवर नागपूरचा पाटणा नंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. जलपर्यटन किंवा वॉटर स्पोर्ट्ससाठी नाशिककरांना आता गोवा किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. बहुचर्चित बोट क्लब आजपासून नागरिकांसाठी खुला होत आहे. स्पीड बोट, जेट स्की यासह बनाना राईड, बंपर राईड, कयाकिंग, लक्झरियस लेक क्रुझिंग इत्यादी वॉटर राईडचा प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जिओ हाऊसवर कृषी कायद्यांविरोधातील मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत जाण्यापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांना नागपुरात रोखलं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन, बावधन परिसरात गवा आढळला, वन विभागाकडून गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लंडनहून रात्री उशिरा दोन विमानं मुंबईत दाखल झाली. यातील प्रवाशांना बीएमसीने क्वॉरन्टाईन केलं आहे. प्रवाशांना क्वॉरन्टाईन करण्यासाठी 50 पेक्षा अधिक BEST बसचा वापर करण्यात आला. परंतु महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय नाराज दिसले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सांगली : रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून 4 दिवसाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. 24 डिसेंबर पासून क्रांतीसिह नाना पाटील यांच्या किल्ले मच्छिद्रगड गावामधून सुरुवात होणार आहे. आशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेस सुरुवात होणार आहे. आमदार सदाभाऊ खोत यांची माहिती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काहीजण शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आपणच शेतकऱ्यांसाठी कसे प्रयत्न करतोय हे दाखवण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. कृषि कायद्याची माहिती देण्यासाठी भाजपची 24 तारखेपासून किसान आत्मनिर्भर यात्रा सुरू होणार आहे. सांगली जिल्ह्यातून आशिष शेलार यांच्या हस्ते किसान आत्मनिर्भर यात्रेला सुरुवात होईल. शिरोळ, इचलकरंजी, पेठ वडगाव, इस्लामपूर याठिकाणी होणार सभा. 27 तारखेला चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोपची सभा, सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषदेत माहिती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सातारा जिल्ह्यातील चिंचणेर तालुक्यातील जवान कर्तव्य बजावत असताना शहीद. सिक्कीम येथे 106 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असणारे जवान सुजित किर्दत हे कर्तव्य बजावत असताना बर्फाचा कडा कोसळून झालेल्या अपघातामध्ये शहीद.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लॉकडाउनबद्दल उद्धव ठाकरे सरकारचा धरसोडपणा सुरू आहे. काल कर्फ्यु लागणार नाही किंवा लॉकडाऊन होणार नाही असं सांगितलं आणि आज नाईट कर्फ्यू लावला; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी भापजमध्ये प्रवेश केला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर हायवे दिवा येथे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने ओमनी व्हॅनला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात ओमनीतील दोघेजण जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ओमनीतील तिघे प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आलं असून यामध्ये दोघेजण जखमी झालेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर हायवे दिवा येथे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने ओमनी व्हॅनला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात ओमनीतील दोघेजण जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ओमनीतील तिघे प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आलं असून यामध्ये दोघेजण जखमी झालेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिवसेनेतून भाजपत येणार्या बाळासाहेब सानप यांना भाजपचं प्रदेश उपाध्यक्षपद मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बाळासाहेब सानप यांचा आज मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये भाजप प्रवेश होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात सुपर संभाजीनगर अशा नावाचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या एका एनजीओने महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन हा बोर्ड लावला आहे. सिटी प्रकल्पांतर्गत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या जुन्या नाण्यांचा इतिहास लावण्यात आला आणि सुपर संभाजीनगर हे देखील नाव लावण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात सुपर संभाजीनगर अशा नावाचा बोर्ड लावण्यात आलेला आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या एका एनजीओने महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन हा बोर्ड लावला आहे. सिटी प्रकल्पांतर्गत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या जुन्या नाण्यांचा इतिहास लावण्यात आला आणि सुपर संभाजीनगर हे देखील नाव लावण्यात आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने निवडणूक न घेताच पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी ठराव संमत केलाय. कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नाही असं कारण त्यासाठी देण्यात आलंय. इतर सर्व प्रकारच्या निवडणुका होत असताना साहित्य परिषदेला पोस्टल मतदानाद्वारे होणारी निवडणूक प्रक्रिया पार पाडता येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. त्यामुळे मसापच्या कार्यकारी मंडळाचा हा ठराव वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. मिलिंद जोशी कार्याध्यक्ष असलेल्या 29 जणांच्या कार्यकारी मंडळाची मुदत दोन हजार एकवीसच्या जानेवारी महिन्यात संपतेय. परंतु कचरोनाचे कारण देत निवडणूक घेण्यास नकार देण्यात आलाय. 28 जानेवारीला मसापच्या सर्वसाधारण सभेत या ठरावर निर्णय होऊ द्या असा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतलाय. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असून जवळपास 16 हजार सभासद आहेत. हे सोळा हजार सभासद पोस्टल मतदानाद्वारे कार्यकारी मंडळाची निवड करत असतात.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आलेय. सर्वसामान्य माणसांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्नास लोकांच्या उपस्थितच विवाह करावा आणि सोशल डिस्टन्ससह मास्क वापरणे बंधनकारक केलेले असताना सातपुते यांच्या विवाह सोहळ्यात हजारो लोक उपस्थित होते. सातपुते यांच्या लग्नात अक्षरशः सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आल्यानं कोरोना हद्दपार झाला की काय अशी चर्चा ही रंगली होती. आमदार सातपुते यांचा साखरपुडा झाल्यानंतर ही सातपुते विविध मुद्द्यांवरून चांगलेच ट्रोल झाले होते. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यास राज्यातील मातब्बर नेत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी कायद्याच उल्लंघन केल्यानंतर कारवाईला सामोरे जावे लागतं त्यामुळे आता सातपुते यांच्यावर कारवाई होणार का हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विठ्ठल भक्तांना खुशखबर नाताळ निमित्त उद्यापासून आता रोज 4800 भविकाना विठुरायाचे ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घेता येणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर काल मध्यरात्री एका उभ्या असलेल्या मोटार कारला भीषण आग लागली.आगीची माहिती काही चालकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच अग्निशमन दलाने ही आग पूर्णपर्ण विझवली. गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेली असल्याने त्यात कोणीही उपस्थित नव्हते यामुळे कोणी जखमी झाले नसले तरी आगीत गाडी पूर्णपणे खाक झाली. ही गाडी नक्की कोणाची होती, आग कशी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे!
श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही.
पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा!
भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही.
पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा!
भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री देखील प्रयत्न करत आहेत. यात पवार साहेब मध्यस्थी करत आहेत. आधीपासून आमची भूमिका सामंजस्याची आहे, पण काही लोक यात राजकारण करत आहेत. म्हणून पवार साहेब यात मध्यस्थी करत आहेत. मेट्रो कार शेडचा प्रश्न सुटावा यासाठी शरद पवार पंतप्रधानांशी बोलू शकतात, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाताळच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर समितीने ऑनलाइन दर्शन संख्या 1200 ने वाढवायचा निर्णय घेतला असून परवापासून आता रोज 4200 भविकांना ऑनलाईन बुकिंग करून दर्शन मिळणार. कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची माहिती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनाच्या संकटात कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील आखाडे थंड पडले होते. मात्र आजपासून या कुस्तीच्या आखाड्यात पुन्हा एकदा शड्डू घुमू लागलाय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तोंडावर पैलवानसाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे. कारण कोरोनामुळे आखाड्या बाहेरचा सराव असला तरी प्रत्यक्ष कुस्तीचा सराव करता येत नव्हता. एबीपी माझाने यासंदर्भातली बातमी वेळोवेळी लावून धरली. अखेर आजपासून कुस्ती पंढरीतले आखाडे पैलवानांच्या शड्डूने दणाणून गेले. या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये उतरणार्या पैलवानांना याचा फायदा होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांच्या अंतिम दर्शनासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी 7 वाजता परळ शाखेत येणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आदिवासी बांधवांसाठी सुरू असणारी खावटी योजनेत आता लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. खावटी योजनेतील वस्तू खरेदीच्या निविदा रद्द. आदिवासी बांधवांना थेट त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येणार. प्रत्येकी दोन हजार रुपये खात्यात जमा होणार. 11 लाख 32 हजार लाभार्थी यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज नाही, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर संपर्कप्रमुख आणि उपनेत्यांची बैठक बोलावली आहे. ग्रामपंचायत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर भगवा फडकवण्याचे आदेश सैनिकांना देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना मंत्री आणि जिल्हाप्रमुखांचीही बैठक पार पडली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय आदेश देणार? स्थानिक निवडणुका एकत्र लढणार की वेगवेगळ्या? याची उत्सुकता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावात स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदाचा नळाला पाणी आल्याने गावकऱ्यांनी वाजतगाजत पाण्याचं स्वागत केलं. आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत, ग्रामस्थांनी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. म्हैसमाळ आणि आजूबाजूच्या गावात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला, मध्यरात्रीही महिलांना टेम्भे घेऊन पाणी भरण्यासाठी थेट विहिरीत उतरावे लागत होते. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दोन वर्षांपूर्वी प्रसारित केले होते. त्यानंतर सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेन पुढाकार घेतला दीड वर्ष मेहनत घेतली. श्रमदानातून विहीर खोदली पाण्याची टाकी उभारली अखेर गावात पाणी पोहोचले. सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांना ग्रामस्थांनी अक्षरशः खांद्यावर घेऊन नाचवले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील दाटे येथील ग्रुप ग्रामपंचायतीअतंर्गत समाविष्ट असलेल्या नरेवाडी येथील स्वच्छ भारत अभियान शौचालय योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामसेवक, सरपंच आणि 15 लाभार्थ्यांकडून संगनमताने बोगस शौचालय दाखवून 1 लाख 71 हजार 600 रुपयांचा अपहार झाला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार कारवाई सुरु करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामसेवक आणि समूह समन्वयक यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. एकाच घरात चार चार शौचालय दाखवून निधी उचलल्याची तक्रार करण्यात आली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकचे बाळासाहेब सानप पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सानप यांनी थेट वर्षावर नाराजी व्यक्त केली. सानप, मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट झाली. सानप गेली काही वर्ष शिवसेनेसाठी काम करत आहेत. काही निवडणुकांमध्ये सानप यांचा मोलाचा वाटा होता. आपण मुख्यमंत्री असला तरी पक्ष कमजोर होत चालला आहे, असं सानप मुख्यमंत्र्यांना म्हणाले. काही नेत्यांमुळे पक्ष सोडत असल्याचं सानप यांनी उद्धव ठाकरेंना
सांगितलं. त्यांचा निशाणा संजय राऊत यांच्याकडे होता. दरम्यान संजय राऊत यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आहे.
सांगितलं. त्यांचा निशाणा संजय राऊत यांच्याकडे होता. दरम्यान संजय राऊत यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सातारा : पाॅवर हाऊसजवळ दुकानदाराची निघृण हत्या करण्यात आली आहे. अंडी उधार न दिल्याच्या रागातुन हे कृत्य करण्यात आलं. बबन गोखले असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. दगड आणि धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. शुभम कदम, सचिन माळवे यांना ताब्यात घेतलं आहे. शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यवतमाळ : शहरात मुख्य बाजारपेठेतील अवैध बांधकामामुळे ईमरतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याने शहरात ठिकठिकाणी असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुनील भानारकर असे मृत युवकाचे नाव असून एका व्यापारी व रहिवासी इमारतीत घरगुती काम करीत असताना ईमारतीची कमकुवत गॅलरी कोसळली, या अपघातात सुनील हा ईमारतीवरून खाली कोसळला व मलब्यात दबून त्याचा दुर्दैवी अंत झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर बिबट्याला ठार मारले. डॉ धावलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याला ठार मारले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
केंद्र सरकार शेतकरी हिताविरोधात धोरण राबवित आहे. त्यावरून नवी दिल्लीत आंदोलन पेटले असतानाच आता 22 डिसेंबरला मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अंबानी-अदानी विरोधात निघणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला यश. राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि 25 लाखांचा निधी घ्या असे आवाहन निलेश लंके यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राळेगणसिद्धी ग्रामपंचायत ने निर्णय घेतलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ड्रेनेज लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा शहरामध्ये होत असतानाच आता ड्रेनेजलाईनच्या ठेकेदारांच्या दुर्लक्षित कारभार चव्हाट्यावर आला आहे. ड्रेनेज लाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून दोन जण जखमी झाल्याची घटना पद्मानगर परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे या खड्डया भोवती ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याने रोजच या खड्ड्यामध्ये नागरिक पडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ड्रेनेज लाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे असतानाही स्वतःच्या फक्त फायद्याचा विचार करणाऱ्या ठेकेदारांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी येथे घेतली जात नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे राजरोसपणे ठेकेदारांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा होत असतानाही मनपा प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिका प्रशासनाविरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वैद्यकीय प्रवेशातील 70 : 30 कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या.वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार 70:30 कोटा आरक्षण रद्द करणारा शासनाचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने कायम केला. 7 सप्टेंबरच्या शासनाच्या परिपत्रकास आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या.
मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना वाव मिळावा यासाठी राज्य शासनाने 70:30 आरक्षण कोटा रद्द केला.
वैद्यकीय प्रवेशातील 70 : 30 कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब; आव्हान देणाऱ्या सर्व याचीका फेटाळल्या.वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील विभागानुसार 70:30 कोटा आरक्षण रद्द करणारा शासनाचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने कायम केला. 7 सप्टेंबरच्या शासनाच्या परिपत्रकास आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या.
मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना वाव मिळावा यासाठी राज्य शासनाने 70:30 आरक्षण कोटा रद्द केला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मागील 40 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये 70-30 हे क्षेत्रीय आरक्षण सुरू होते. हे क्षेत्रीय आरक्षण शासनाच्या निर्णयानंतर रद्द करण्यात आले होते. या शासन निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जवळपास आठ याचिका दाखल झाल्या होत्या. या सर्व याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने खारीज केल्या असून शासन निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापुरात acb ची मोठी कारवाई करण्यात आली आहे. 10 लाखांची लाच स्वीकारताना इन्कम टॅक्स विभागातील वरिष्ठ अधिकारी जाळ्यात.लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच 10 लाखांची रोकड घेत असताना रंगेहाथ पकडल. प्रताप चव्हाण असं अधिकार्याचे नाव आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाशिम जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. संत्रा फळ बागेवर बुरशीजन्य आजारामुळे जिल्ह्यातील संत्रा बाग धोक्यात सापडली आहे. जिल्ह्यात संत्रा बगीच्यांमध्ये झाडांना हस्त बहाराची नवीन नवती फुटलेली आहे. या नवीन नवती आणि मध्यम परिपक्व पानांवर रस शोषण करणाऱ्या काळीमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. काळ्या माशांचे प्रौढ आणि पिल्ले कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात आणि शरीरातून मधासारखा चिकट गोड पदार्थ उत्सर्जित करतात. त्यावर काळ्या बुरशीची पानावरती झपाट्याने वाढ होते. किडीद्वारे रस शोषलेली झाडे दुर्बल होतात आणि पुढील बहरात फलधारणा कमी होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आता शेतकरी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करण्यात व्यस्त दिसत आहे. वाशिमच्या मुंगळा परिसरातही याच प्रकारे संत्र्यावर हा बुरशीसदृश्य रोग झाल्याचं चित्र आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पुणे जिल्ह्यातील औंध येथून निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे असे सहा पर्यटक फिरण्यासाठी आले होते. हे पर्यटक आज दुपारच्या वेळेस दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला.
सहा पर्यटकांपैकी तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले असून त्यांना अधिक उपचारासाठी दापोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.
सहा पर्यटकांपैकी तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले असून त्यांना अधिक उपचारासाठी दापोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराच्या हालचालींना वेग आल्याने वाढवण बंदर संघर्ष समिती, स्थानिक भूमिपुत्र, बागायतदार, मच्छिमार या सर्वांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील अनेक वर्षापासून सुरु असलेल्या संघर्षाला सर्व स्तरावर पाठिंबा मिळत आहे. 15 डिसेंबर रोजी मुंबईतील कफ परेड ते झाईच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या सर्व कोळीवाड्यांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळला होता. त्यामुळे वाढवणमध्ये सुरु असलेला संघर्ष आता मुंबईपर्यंत पोहोचल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवणकडे लक्ष दिले आहे. केंद्र सरकारच्या प्रास्तवित वाढवण बंदराचा संघर्ष दिवसेंदिवस आक्रमक होत असून विरोध तीव्र होत आहे. यामुळे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह मच्छिमार संघटनांना आज 18 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर बैठकीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आता वाढवण बंदराबाबत राज्य सरकार आपली काय भूमिका जाहीर करतं याकडे पालघरवासियांचं लक्ष लागलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक यांच्यात सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण ठार झालाय. युपी बिहार येथून मुंबईला 100 ते 125 मजूर घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि मालेगाव येथे गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर खासगी बस पलटी होऊन महामार्गाच्या कडेला उभी असलेल्या काळी पिवळी गाडीवर पलटी झाली तर दोन टपऱ्यांचा चुराडा झाला. यावेळी महामार्गाने पायी फिरायला जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. बस मधील सर्व मजूर प्रवाशी सुखरूप आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चंद्रपूर : आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते गोदरू पाटील जुमनाके यांचे निधन झालं आहे. गोदरू पाटील जुमनाके गोंडवाना जनतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि जि.प. सदस्य होते. जुमनाके यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजावर मोठी शोककळा पसरली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : उरण तालुक्यातील दिघोडे येथे फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण. सकाळी साडेचार वाजल्यापासून पाणी पुरवठा धीम्या गतीने सुरु. उलवे, खारघर आणि द्रोणागिरी भागातील पाणी पुरवठा आठ वाजल्यापासून सुरळीत होणार. हेटवणे येथून नवी मुंबईतील उलवे, खारघर आणि द्रोणागिरी परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : उरण तालुक्यातील दिघोडे येथे फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण. सकाळी साडेचार वाजल्यापासून पाणी पुरवठा धीम्या गतीने सुरु. उलवे, खारघर आणि द्रोणागिरी भागातील पाणी पुरवठा आठ वाजल्यापासून सुरळीत होणार. हेटवणे येथून नवी मुंबईतील उलवे, खारघर आणि द्रोणागिरी परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : उरण तालुक्यातील दिघोडे येथे फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण. सकाळी साडेचार वाजल्यापासून पाणी पुरवठा धीम्या गतीने सुरु. उलवे, खारघर आणि द्रोणागिरी भागातील पाणी पुरवठा आठ वाजल्यापासून सुरळीत होणार. हेटवणे येथून नवी मुंबईतील उलवे, खारघर आणि द्रोणागिरी परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला. तिहेरी भीषण अपघातात मिसर थोडक्याच बचावले. रात्री उशिरा शहापूरजवळ हा अपघात झाला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बस चालकाचा ताबा सुटला. ही बस विरुद्ध दिशेने मुंबईला जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली. त्यातच मागून मुंबईच्या दिशेने जाणारी सरकारी वकील मिसर यांची इनोव्हा गाडी कंटेनर आणि पुलाच्या कठड्यात जाऊन अडकली. दरम्यान अपघातात बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : उरण तालुक्यातील दिघोडे येथे फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असून सकाळी साडेचार वाजल्यापासून पाणी पुरवठा धिम्यागतीने सुरु आहे. उलवे, खारघर आणि द्रोणागिरी भागातील पाणी पुरवठा आठ वाजल्यापासून सुरळीत होणार आहे. हेटवणे येथून नवी मुंबईतील उलवे, खारघर आणि द्रोणागिरी परिसरातील पाणीपुरवठा खंडीत झाला होता.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाणा : सलग दुसऱ्या दिवशीही बुलढाण्याच्या अनेक भागांत दाट धुकयाची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रीय महामार्ग 6 वरिल वाहतुक ठप्प असून रेल्वेचा वेगही मंदावला आहे. अनेक मार्गावरील वाहतूक संथ गतीने तर काही मार्ग ठप्प आहेत. आजचं तापमान 13.2 डिग्री सेल्सियस आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बारामती : गगनयानसाठी लागणारे बूस्टर वालचंदनगरहून जाणार आहे. आज त्याचं उद्घाटन होणार आहे. दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी इस्त्रोचे अधिकारीही या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बूस्टर बनवायला 18 महिने लागले आहेत. याआधी चंद्रयान आणि मंगल यानाचे बूस्टर्सही वालचंदनगरमध्येच बनले होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. ऑनलाईन परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासन हाय हायची घोषणाबाजी करत आहेत. कुलगुरू खुर्चीखाली कराच्या घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहेत. निकालात झालेला घोळ ठीक झाला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मराठवाड्यातील सन 1960 पुर्वीच्या निजाम कालिन जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे रुपये 200 कोटीचा निधी नुकताच पुरवणी मागणीत मंजूर झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूरच्या कमाल चौक परिसरात भररस्त्यावर एकाची हत्या. गुड्डू तिवारी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव. संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. हत्या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मेट्रो कारशेड कांजूर मार्ग इथे उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. राज्य सरकार याबाबत चाचपणी करत आहे. मेट्रो कार शेडबाबत कांजूर मार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सकल मराठा समाज, मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी आज छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन मराठा क्रांती मोर्चाची पुढची वाटचालीचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे होणा-या राज्यव्यापी बैठकीसाठी त्यांना निमंत्रण दिले. ही राज्याव्यापी बैठक 20 डिसेंबर रोजी वडाळा येथील स्पोट्स कॉम्प्लेक्स सहकार नगर येथे होणार आहे. या भेटीवेळी समन्वय समितीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना तलवार भेट देण्यात आली. बैठकिला उपस्थित राहू असे आश्वासन या समन्वय समितीच्या पदाधिका-यांना दिले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यवतमाळ : वाळलेल्या कडू लिंबाच्या झाडाच्या पोकळीत साप शिरला म्हणून चक्क झाड पेटवल्याचा अजब प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडला आहे. कळंब येथे एक बिनविषारी साप कडूलिंबाच्या पोकळीत शिरला होता. एका नागरिकाने ही घटना बघितली. त्याने या सापाला बाहेर काढण्यासाठी चिंधीला आग लावून झाडाच्या पोकळीत टाकली. बघता बघता झाडाने पेट घेतला. हे झाड नागरी वस्तीत असल्याने नागरिकात घबराट पसरली. या वेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले. अनेक प्रयासाने ही आग विझविण्यात आली. पण सुदैवाने या सापाला कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही. फायर ब्रिगेडच्या लोकांनी या सापाला वाचविले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय आता राज्याच्या गृहखात्यानं घेतला आहे. यासंदर्भातील निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सत्तेत येताच फडणवीस सरकारनं काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बहुतांश खटले भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले होते. तोच कित्ता आता आघाडी सरकारनंही गिरवला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : नेरळ रेल्वे स्थानकानजिक सुटकेसमध्ये मानवी मृतदेह आढळून आला आहे. रेल्वे स्थानकानजिकच्या नाल्यात या दोन सुटकेस आढळल्या आहेत. 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाचे डोके आढळले नसल्याने ओळख पटणं अशक्य आहे. मशीनच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचा संशय व्यक्त केला जात असून ही घटना बुधवारी घडली आहे. रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मामडकुटी परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. विद्या वाघाडे (36) असं मृतक महिलेचं नाव आहे. ही महिला चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव येथील रहिवासी आहे. वनविभागाच्या फायरलाइनच्या कामासाठी ही महिला कंत्राटी मजूर म्हणून या परिसरात काम करत होती, आज सकाळी 8.30 च्या दरम्यान वाघाने केलेल्या हल्ल्यात झाला मृत्यू, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : विविध ठिकाणी ॲमेझाॅनच्या प्रसिद्धी फलकांवर नो मराठी नो ॲमेझाॅन अशा आशयाचे संदेश लिहून विरोध दर्शवण्यात आला. बांद्रा पूर्व/पश्चिम, माहीम, अंधेरी, रेक्लमेशन भागात या अनोख्या पद्धतीत निषेध नोंदवण्यात आला. मनसेकडून मुंबईभरात अॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाणा : जिल्ह्यात अनेक भागात धुकयाची दाट चादर पसरल्याचं दिसून येत आहे. धुक्यामुळे जालना चिखली खामगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग सहावरील वाहतूक मंदावली आहे. जिल्ह्यात धुक्यामुळे आणि तापमान खालवल्याने गारठा वाढला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर : राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम 2013 अंमलात आणला, मात्र अजूनही अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी याच अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे
कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सटाणा - विंचूर प्रकाश राज्य महामार्गावरील तरसाळी फाट्याजवळ ट्रक कंटेनर आणि बसचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने पुढील अनर्थ टळला मात्र ट्रक ड्रायव्हर आणि बसचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सटाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बस सटाणा येथून ताराहबादकडे जात असताना हा अपघात झालाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कल्याण : कल्याण ग्रामीणमधील आडीवली परिसरातील बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर पोलिसांनू छापा मारला आहे. कल्याण क्राइम ब्रांचने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 11 हजार लीटर बनावटी डिझेल जप्त करण्यात आलं आहे. तर 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : आजपासून मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरु करण्यात आली आहे. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावत आहे. या एसी लोकलच्या दिवसाला दहा फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद बघून येणाऱ्या काळात या फेऱ्या वाढवल्या जातील. सुरुवातीला जरी या लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला तरी जेव्हा सामान्य नागरिकांना देखील या लोकलमध्ये प्रवासाची मुभा मिळेल तेव्हा या लोकलला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी या लोकलचे स्वागत केलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमातील त्रुटी आणि उणिवा यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी गठित केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बदल हा आपल्या जीवनातील एक सातत्यपूर्ण घटक आहे. मग तो अमुक एका कालावधीमध्ये झालेला असो किंवा अगदी एकाएकी झालेला असो. हाच बदल आपल्याला अशा एका विश्वात नेतो जे वेगळं आहे, अनपेक्षित आहे आणि तितकंच नवंही आहे. ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. यामुळं 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलली आहे. काल (बुधवारी) सकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या लोगोचं, नव्या रुपाचं अनावरण करण्यात आलं.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- LIVE UPDATES | अखेर गव्याला HEMRL कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश