Ramesh Kadam : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार रमेश पोलिसांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणातून दोषमुक्त झाले आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असताना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ केल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी रमेश कमद यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी झाली. यामध्ये रमेश कदम यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ माजी आमदार रमेश कदम शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आले आहे. आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणा-या पोलिसांना रमेश कदम शिवीगाळ करतानाची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली होती. याप्रकरणी रमेश कदमांविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाला होता. मात्र, पोलिसांनीच आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करत 25 हजारांची लाच मागितल्याचा कदमांनी कोर्टात दावा केला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम गेली काही वर्ष जेलमध्येच कैद आहेत. 


नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ माजी आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यावेळी त्यांनी पोलिसाला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. जेलमधील एका पोलिस कॉन्टेबलने रमेश कदम यांना त्यांच्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाताना पाहिलं. परत येण्यास सांगितलं असता कदमांचा पारा चढला आणि पोलिसाला शिवगाळ केली. असा आरोप होता. यानंतर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  


काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना भायखळ्याच्या पुरुष कारागृहात हलवण्यात आलं.  अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला होता.
काय आहेत आरोप?
 – कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती 
– उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं 
– नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
– अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या 
– लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले 
– महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले 
– विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप