रायगड : घरात शिरलेलं पाणी उपसताना शॉक लागून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील चिरनेर गावात एका दाम्पत्याचा शॉक लागून मृत्यू झाला.
मुसळधार पावसामुळे नारंगीकर दाम्पत्याच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरलं होतं. हे पाणी काढताना शॉक लागल्यानंच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
शनिवारी दुपारी रामकृष्ण नारंगीकर यांच्या घरात कोणतीही हालचाल दिसून न आल्यानं शेजाऱ्यांनी डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना दोघेही जण पाण्यात पडलेले आढळून आले. दरम्यान रुग्णालयात नेलं असता नारंगीकर दाम्पत्याला मृत घोषित करण्यात आलं.