= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनामुळे नुकसान करावं लागत असल्याच्या उद्विगनेतून पोल्ट्री व्यावसायिकाने जीवंत कोंबड्या खड्ड्यात पुरल्या आहेत. सोलापुरातल्या डोणगाव येथील फिरोज मनियार असे या लघु पोल्ट्री उद्योजकाचे नाव आहे. फिरोज गेल्या काही वर्षांपासून पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. जवळपास 1 हजार कोंबड्याच्या माध्यमातून दर 45 दिवसाला साधारण 20 हजार रुपये इतका त्यांना नफा मिळतो. मात्र कोरोनाच्या भितीमुळे चिकन व्यावसायावर मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पन्न न होता मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जवळपास 750 कोंबड्या फिरोज मनियार यांनी खड्यात पुरल्या. कोरोना व्हायरसच्या भितीमुळे अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत आहे. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना ही कोरोनामुळे मोठा फटका सहन करावा लागत आहे. चिकन खाल्याने कोरानाची लागण होत नसल्याचे वारंवार सांगितल्यानंतर देखील चिकनचे दर अद्याप ही खाली उतरलेलेच आहेत. सोलापुरातील पोल्ट्रीफार्म उद्योजकांनाही दररोज लाखोंचं नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे शासनातर्फे आता या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी कुक्कुटपालक करत आहेत. रोज पसरणाऱ्या अफवामुळे उद्योगात मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही मानवनिर्मित आपत्ती समजून शासनाने मदत करावी यासाठी कुकुटपालकांनी सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अधिवेशन उद्या गुंडाळणार आहोत. सर्व आमदार त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत. त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे, ती कोरोनाबाबतची जनजागृती आणि त्याबाबत उठणाऱ्या अफवांवर चाप लावणं. त्यासाठी ते काय पावलं उचलणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह, जे 40 जण दुबईला गेले होते त्या गटातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, सिव्हिल रुग्णालयात दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गुढीपाडवा जवळ येताच सर्वांना वेध लागतात ते नववर्ष स्वागत यात्रेचे. मात्र या वर्षीच्या नववर्ष स्वागत यात्रेला देखील कोरोना व्हायरसचे ग्रहण लागले आहे. कारण ठाणे जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच आयोजकांनी आपल्या नववर्ष स्वागत यात्रा या रद्द केल्या आहेत. याबाबत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व आयोजकांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वच आयोजकांनी आपल्या नववर्ष स्वागतयात्रा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबत जमा झालेला पैसा हा समाजकार्यासाठी वापरणार असल्याचे देखील सांगितले. या बैठकीत कोपीनेश्वर मंदिराच्या सर्व स्वागत यात्रा डोंबिवलीच्या गणपती मंदिराची स्वागत यात्रा तसेच कल्याण मीरा-भाईंदर कळवा अशा वेगवेगळ्या शहरातील स्वागत यात्रा रद्द करण्यात आल्याचे सर्वांनी सांगितले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गुढीपाडवा जवळ येताच सर्वांना वेध लागतात ते नववर्ष स्वागत यात्रेचे. मात्र या वर्षीच्या नववर्ष स्वागत यात्रेला देखील कोरोना व्हायरसचे ग्रहण लागले आहे. कारण ठाणे जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच आयोजकांनी आपल्या नववर्ष स्वागत यात्रा या रद्द केल्या आहेत. याबाबत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व आयोजकांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वच आयोजकांनी आपल्या नववर्ष स्वागतयात्रा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबत जमा झालेला पैसा हा समाजकार्यासाठी वापरणार असल्याचे देखील सांगितले. या बैठकीत कोपीनेश्वर मंदिराच्या सर्व स्वागत यात्रा डोंबिवलीच्या गणपती मंदिराची स्वागत यात्रा तसेच कल्याण मीरा-भाईंदर कळवा अशा वेगवेगळ्या शहरातील स्वागत यात्रा रद्द करण्यात आल्याचे सर्वांनी सांगितले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनाच्या भीतीने तीर्थक्षेत्र माहूर गडावरील गर्दी ओसरली आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ असलेल्या माहूर गडावरच हे चित्र आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी नेहमीच हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी असते. मात्र सध्या सर्वांनाच कोरोनोच्या भीतीने ग्रासलं आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र माहूर गडावर भाविकांची संख्या रोडावल्याने गडावर सध्या शुकशुकाट जाणवत आहे. गडाच्या पायथ्याशी असणारे शेकडो दुकानदार भक्तांच्या प्रतीक्षेत आहेत. एरवी, माहूर शहरात देखील भक्तांची मोठी वर्दळ असते, मात्र आता कोरोनामुळे माहूर शहरात देखील तुरळक गर्दी दिसत आहे. त्यामुळे व्यापारी हॉटेलचालक सारेच आर्थिक अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या भीतीने तीर्थक्षेत्रावरचा अनेकांचा रोजगार मंदावला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना थेट दर्शन देण्यात येत आहे. तसेच आगामी चैत्र उत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याचे ठरवलं आहे, यासह इतरही उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याबाबत मंदिर व्यवस्थापनाच्या विश्वस्तांनी माहिती दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्रसह अन्य चार राज्यांमध्ये 14 ते 21 मार्च सुट्टी जाहिर करण्याबाबत केंद्र शासनाच्या पत्राचा हवाला देऊन बातमी दिली जात आहे. हे पत्र फेक असून राज्य शासनाने केंद्राकडे विचारणा केली त्यावर अशा स्वरूपाचे पत्र काढण्यात आले नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे या पत्रावर विश्वास न ठेवता माध्यमांनी त्याला प्रसिद्धी देऊ नये, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
एअर इंडियाची देशाबाहेरी सर्व उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत रद्द
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनाचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू, याआधी कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये झाला होता वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक | काल नव्याने पाठवण्यात आलेले सहाही नमूने निगेटिव्ह, 2 संशयितांचे उद्या येणार नमूने, नाशिकमध्ये अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवडमधील दहावी, बारावी वगळता सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालना येथे 14 आणि 15 मार्चला होणारे विद्रोही साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलंय. कोरोनाच्या प्रभावामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. लेखिका अरूंधती रॉय यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात उर्दु लेखक सलामबिन रजाक यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुणे : शहरात 'करोना'ग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनाही लागण होऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने कैद्यांसाठी दीड हजार कापडी मास्क तयार करण्यात आले असून, कारागृहातून कोर्टात जाणाऱ्या प्रत्येक कैद्याला गुरुवारपासून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोर्टातून येणाऱ्या कैद्याला प्रवेशद्वाराच्या आत हात धुण्यासाठी सॅनिटायझरही पुरविण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यात आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण, राज्यातील रुग्णांची संख्या 17 वर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली : कोरोना व्हायरसने देशात सर्वत्र दहशत पसरली आहे. लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे. लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी शासन सर्वपरी प्रयत्न करतंय, त्याचबरोबर आता लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आता लोक कलावंतही पुढे सरसावले आहेत. पारंपरिक कलेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जागरण-गोंधळाच्या माध्यमातून गोंधळी हे जनजागृती करताना दिसत आहेत. असंच एक कोरोना व्हायरस वरील गीत ´काग अंबाबाई झोपलीस शांत, कोरोना व्हायरस आला महाराष्ट्रात कोरोना व्हायरस आला महाराष्ट्रात. गात हिंगोलीचे गोंधळी संदीप सोनवणे व त्यांच्या सहकारी मित्रांनी मागील काही दिवसांपासून जणजागृती सुरू केली. संदीप यांनी कोरोना व्हायरसपासून बचाव कसा करावा, अशी माहिती गोंधळ गीताच्या माध्यमातून दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपुरात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या तीन झाली आहे. आधी संक्रमित झालेल्या रुग्णाची पत्नी आणि सोबतच आधी संक्रमित झालेल्या रुग्णाचा कार्यालयीन सहकाऱ्यालाही याची लागण झालीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन पुढे ढकलंलं