coronavirus LIVE UPDATES | वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजार उद्यापासून सुरु होणार
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत.कोरोनाने भारतात देखील दहा हजाराच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 15 Apr 2020 09:11 PM

पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 350 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2684 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा...More
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 350 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2684 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 11 जण मुंबईत, 4 पुण्यात तर तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 178 जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 46 हजार 588 नमुन्यांपैकी 42 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 2684 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 67 हजार 701 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 5647 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 259 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरूष तर 7 महिला आहेत. त्यातील 5 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 11 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 18 रुग्णांपैकी 13 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते. तर रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता.महाराष्ट्र एकूण रूग्ण – 2684मृत्यू - 178मुंबई महानगरपालिका- 1756 (मृत्यू 112)ठाणे- 10ठाणे महानगरपालिका- 96 (मृत्यू 3)नवी मुंबई मनपा- 63 (मृत्यू 3)कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)उल्हासनगर- 1भिवंडी, निजामपूर - 1मिरा-भाईंदर- 49 (मृत्यू 2)पालघर- 5 (मृत्यू 1 )वसई- विरार- 29 (मृत्यू 3)रायगड- 5पनवेल- 10 (मृत्यू 1)नाशिक - 2नाशिक मनपा- 2मालेगाव मनपा - 42 (मृत्यू 2)अहमदनगर- 10 (मृत्यू 1)अहमदनगर मनपा - 17धुळे -2 (मृत्यू 1)जळगाव- 1जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)पुणे- 10पुणे मनपा- 310 (मृत्यू 34)पिंपरी-चिंचवड मनपा- 31 (मृत्यू 1)सातारा- 6 (मृत्यू 2)सोलापूर मनपा- 1 (मृत्यू 1)कोल्हापूर- 1कोल्हापूर मनपा- 5सांगली- 26सिंधुदुर्ग- 1रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)औरंगाबाद मनपा- 23 (मृत्यू 2)जालना- 1हिंगोली- 1लातूर मनपा-8उस्मानाबाद-4बीड - 1अकोला मनपा - 12अमरावती मनपा- 6 (मृत्यू 1)यवतमाळ- 5बुलढाणा - 17 (मृत्यू 1)वाशिम - 1नागपूर- 5नागपूर मनपा - 39 (मृत्यू 1)गोंदिया - 1राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5059 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 18.37 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजार उद्यापासून सुरु होणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदेनी माहिती दिली आहे. आज सर्व संबंधितांची बैठक घेऊन अडचणी, तसेच व्यापाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या
धान्य बाजारपेठेत बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सरकारचं महत्वाचं पाऊल
किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली मागणी आगाऊ नोंदवावी त्यानुसार त्यांचा माल थेट टेम्पोत चढवण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
धान्य बाजारपेठेत बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सरकारचं महत्वाचं पाऊल
किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली मागणी आगाऊ नोंदवावी त्यानुसार त्यांचा माल थेट टेम्पोत चढवण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.