coronavirus LIVE UPDATES | ठाण्यात एका दिवसात 3 नवे कोरोना बाधित रुग्ण, ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या 16 वर
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत.कोरोनाने भारतात देखील अडीच हजाराच्या वर आकडा गाठला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 03 Apr 2020 09:32 PM

पार्श्वभूमी
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2543 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 50 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 171 लोक ठीक झाले आहेत. आरोग्य...More
नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2543 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 50 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 171 लोक ठीक झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की, 24 तासांमध्ये 400 हून अधिक कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.कोरोनाबाबत सरकारकडून अनेक उपाययोजनाकोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव राजीव गाबाने बुधवारी राज्यातील पोलीस आयुक्तांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. बैठकीमध्ये राज्यसरकारला दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा युद्धपातळीवर कॉन्टेक्ट ट्रेसिंग करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर वीजा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यां विरोधात करवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक 325 कोरोना बाधित आहेत. तर केरळमध्ये 265, तामिळनाडूमध्ये 234, दिल्लीमध्ये 123, उत्तरप्रदेशमध्ये 116, राजस्थानमध्ये 108, कर्नाटकात 105 प्रकरणं समोर आली आहेत. तसेच जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 8 लाखांच्या पार गेला आहे.पाहा व्हिडीओ : राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची उत्तरे तामिळनाडू : तब्लिकीच्या धार्मिक कार्यक्रमातून 110 संसर्गजन्यदिल्लीमध्ये तब्लिकी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमातून तामिळनाडूमध्ये परतलेल्या 110 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ज्यामुळे राज्यातील संसर्गजन्य लोकांची संख्या 234 वर पोहोचली आहे. तामिळनाडूमध्ये 515 लोकांची ओळख पटली असून ते सर्वजण निजामुद्दीन येथे पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मीडियी रिपोर्ट्सनुसार, राज्यातील जवळपास 1500 लोक कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यापैकी 1131 लोक राज्यात परतले आहेत.एका आठवड्यात मृतांचा आकडा दुप्पट झाला; डब्ल्यूएचओ चिंतीतवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएचओ) ने बुधवारी सांगितलं की, कोरोना व्हायरसची महामारी संपूर्ण जगभरात पसरली असून सध्या वाढत चाललेल्या प्रादुर्भावामुळे ते चिंतीत आहेत. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेडरोस एडहानोम घेब्रेयासस यांनी सांगितलं की, 'मागील आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पुढिल काही दिवसांत संसर्ग झालेल्यांची संख्या 10 लाख आणि मृत्यू झालेल्यांची संख्या 50,000 होऊ शकते.'
कल्याण शहरात आढळलेला कोरोनाचा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. या रुग्णाला नुकताच मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. या रुग्णामुळे त्याची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर सुरुवातीला मुंबईच्या कस्तुरबा आणि नंतर जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यात हे तिघेही पूर्णपणे वर झाले असून त्यांना नुकताच डिस्चार्जही देण्यात आला आहे.