coronavirus LIVE UPDATES | पुण्यातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील सहा हजाराच्या जवळपास हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Apr 2020 09:35 PM
दिवा विभागात आजपर्यंत रुग्ण आढळलेला नव्हता. मात्र, आज पहिल्या रुग्णाची नोंद झाली. तर ढोकाळी येथे राहणाऱ्या पिता (59) पुत्रांना (41) covid-19 ची बाधा झाली. त्यापैकी एक वैद्यकीय अधिकारी म्हणून होते कार्यरत आहेत. एक धक्कादायक बाब म्हणजे दोन पोलीस अधिकाऱ्यांना देखील covid-19 ची बाधा झालीय. त्यातील एक मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत (यांची नोंद नाशिकमध्ये आहे ) तर दुसरे ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. यामुळे डॉक्टर आणि नर्स यांच्यानंतर पोलिसी पेशात देखील covid-19 शिरकाव झाल्याचे निष्पन्न झालंय. सोबत कळवा पारसिक नगर येथे आणखीन एका नवीन रुग्णाची (37) भर, तसेच मुंब्र्यात राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या मुलाला देखील covid-19 ची बाधा.
पुण्यातील बालेवाडी भागातील दसरा चौकातील एका बंद हॉटेलला लागलेल्या आगीत चारजण जखमी झालेत. या बंद हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये काम करणारे कामगार रहात होते. अग्निशमन दल जागेवर पोहचण्या आधीच या चार जणांना बाहेर काढून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागलेली असावी असा अंदाज आहे.
कोरोनाविरोधातील लस सप्टेंबर दरम्यान तयार असेल असं ब्रिटनमधील प्रसिद्ध संशोधक आणि शास्त्रज्ञ सारा गिल्बर्ट यांनी म्हटलंय. सारा गिल्बर्ट या ऑक्सफर्ड विद्यापीठात व्हॅक्सिनॉलॉजीच्या प्रोफेसर आहेत. इतकंच नव्हे तर सारा गिल्बर्ट यांची टीम लशीची ह्युमन ट्रायल पुढच्या दोन आठवड्यात सुरु करणार आहेत.तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारची लस तयार करण्यासाठी किमान वर्षाचा कालावधी लागतो. त्यातही कोरोना विषाणूतील गुंतागुंत पाहता त्यावरील लशीसाठी 12 ते 18 महिन्याचा कालावधी लागू शकतो असं सांगितलं जातंय. जगभरातही कोरोनावरील लशीच्या संशोधनावर शेकडो शास्त्रज्ञांच्या टीम काम करत आहेत. ब्रिटनमधील सारा गिल्बर्ट यांची टीम तसंच तंत्रज्ञान ब्रिटनमधील सर्वात विश्वासार्ह आणि अत्याधुनिक असल्याचं मानलं जातं. दरम्यान लशीच्या उत्पादनासाठी निधी मिळावा यासाठी सारा गिल्बर्ट या ब्रिटन सरकारशी बोलणी करत आहेत.
मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. प्रशासनाच्यावतिने वारंवार सांगुनही लॉकडाऊन काळात काही लोक घराबाहेर पडून स्वत: बरोबर इतरांचा जीवही धोक्यात आणत आहेत. मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख आज स्वत: पोलिसांसोबत मालाड, मालवणी येथे फ्लँग मार्चमध्ये सहभागी झाले व नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले. शेख म्हणाले की, ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या घडिला कोरोनाच्या चाचण्या घेण्यामध्ये मुंबई शहर आघाडीवर आहे, त्यामुळेच सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई शहरामध्ये सापडत आहेत.
कोरोनाविरोधातील लस सप्टेंबर दरम्यान तयार असेल असं ब्रिटनमधील प्रसिद्ध संशोधक आणि शास्त्रज्ञ सारा गिल्बर्ट यांनी म्हटलंय. सारा गिल्बर्ट या ऑक्सफर्ड विद्यापीठात व्हॅक्सिनॉलॉजीच्या प्रोफेसर आहेत. इतकंच नव्हे तर सारा गिल्बर्ट यांची टीम लशीची ह्युमन ट्रायल पुढच्या दोन आठवड्यात सुरु करणार आहेत.
औरंगाबाद आज सारी आजारामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात घाटीमध्ये 2 तर खाजगी रुग्णालयात 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत सारी आजारामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही रूग्णांचे स्वॅब कोरोना टेस्टसाठी घेतले आहेत. अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली.
कोरोनाविरोधातील लस सप्टेंबर दरम्यान तयार असेल असं ब्रिटनमधील प्रसिद्ध संशोधक आणि शास्त्रज्ञ सारा गिल्बर्ट यांनी म्हटलंय. सारा गिल्बर्ट या ऑक्सफर्ड विद्यापीठात व्हॅक्सिनॉलॉजीच्या प्रोफेसर आहेत. इतकंच नव्हे तर सारा गिल्बर्ट यांची टीम लशीची ह्युमन ट्रायल पुढच्या दोन आठवड्यात सुरु करणार आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली कारण महाराष्ट्र हे सर्वाधिक जास्त टेस्टिंग करणारे राज्य आहे : आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाइन मद्य विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही‌. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
आता घरोघरी जाऊन लोकांची तपासणी सुरू आहे : मुख्यमत्री
हायरिस्क असलेल्या कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू : मुख्यमत्री
महाराष्ट्रात पुढचे 15 दिवस लाॅकडाऊन राहणार, बैठकीत झाला निर्णय
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ भाजीपाला आणि फळे विक्रीस बंदी. नागरिक खरेदीसाठी गर्दी करत असल्याने बाजार समितीचा निर्णय. अडत दुकानदार यांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवस्था करावी. मार्केट यार्डमध्ये जाण्याच्या आधी पोलिसांकडून होणार तपासणी.
धारावी कोरोनाचा चौथा बळी,

डॉ बालिगानगर येथील ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू,

कस्तुरबा रूग्णालयात झाला मृत्यू
,
धारावीत आतापर्यंत ४ जणांचा कोरोनामुळं मृत्यू
पुणे : मशिदीत नमाज पठण करणाऱ्या 17 तबलिगीविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, गुरुवारी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत रविवार पेठेतील मशिदीत नमाज आवाज ऐकू आल्यावर पोलिसांनी जाऊन कारवाई केली. हे सर्वजण तबलिगी जमातीचे बिहार व झारखंडचे रहिवासी आहेत. पुण्यात फेब्रुवारीमध्ये मशिदीचे काम करण्यासाठी आले होते.नंतर गावी जाणार होते.मात्र मशिदीने यांची माहिती का लपवली? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान या सर्वांची कोरोना तपासणी करण्यात आली. यांचं दिल्ली कनेक्शन नसल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
धारावीत स्क्रिनिंग सुरु, IMA डॉक्टर्स आणि महापालिका एकत्र मिळून स्क्रिनिंग सुरू करत आहेत. पाच जणांची एक टीम, यात 2 डॉक्टर्स ,1 नर्स ,2 महापालिका कर्मचारी, पहिल्या टप्प्यात 50 हजार लोकांचे स्क्रिनिंग होणार, 8-10 दिवसात पूर्ण होणार स्क्रिनिंग
पालघर
पालघर मध्ये कोरोना संक्रमण पार्श्वभूमीवर कडक नियम लादले असले तरीही ह्या नियमांचे सध्याही उल्लंघन होताना दिसत असून पालघर मधील स्वस्त धान्य दुकानांवर कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी पाहायला मिळते

विरार:- वसई विरार क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, आज 2 कोरोनाचे नवे रुग्ण वाढले आहेत

वसई विरार मध्ये कोरोना बाधितांची संख्या 34 झाली असून, 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या, नाशिकच्या चेहडी परिसरातील घटना, कोरोना आणि इंजेक्शनची भीती वाटत असल्यानं आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं, 31 वर्षाचा प्रतीक कुमावत या तरुणाने केली आत्महत्या, तरुणात कोरोनाचे लक्षण नसल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

नवी मुंबई : लाॅकडाऊनमध्ये बड्डे पार्टी करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल, पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरावर गुन्हा दाखल,

राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असताना देखील मित्रांसोबत वाढदिवस सेलिब्रेशन करणाऱ्या या नगरसेवकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
लॉकडाऊन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे, एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात उठवणं योग्य नाही : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
सातारा : कराडमध्ये कोरोनाचा एक बळी, जिल्ह्यात कोरोनामुळे दुसरा मृत्यू, 54 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन : सूत्र
अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णाने स्वत:वर करून घेतले ब्लेडने वार. रूग्ण गंभीर जखमी. रूग्ण पातूरच्या सात कोरोनाबाधित रूग्णांपैकी एक. आजारपणाच्या वैफल्यातून पाऊल उचलल्याची शक्यता. जखमी रूग्णावर उपचार सुरू. रूग्णांच्या बेतालपणामूळे उपचार करणारे डॉक्टर, नर्स हैराण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
लॉकडाऊन सुरू होण्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र सायबरवर सोशल मीडियावर बनावट बातम्या, अफवा व द्वेषयुक्त भाषणांविषयी 161 गुन्हे दाखल आहेत.

बीडमध्ये सर्वाधिक 22 घटना नोंदविण्यात आल्या असून त्यापाठोपाठ कोल्हापूर १ 12, पुणे ग्रामीण १२, मुंबई ११ आणि जळगाव १० इतरांमध्ये नोंद झाली आहे.

गुन्हेगार प्रामुख्याने कोविड -१९ आणि त्यावरील उपचारांबद्दल अफवा पसरवत असल्याचे आढळले आहे.

द्वेषयुक्त भाषणांच्या बाबतीतही एकूण नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ७३ प्रकरणे सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषणाविषयी आहेत. एकूण ३९ आरोपींना अटक करण्यात आली आणि 33 जणांची ओळख पटली आहे.

गेल्या 48 तासांत सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन मेसेजिंग कोरोना साथीच्या आजाराबद्दल बनावट बातम्या, अफवा आणि द्वेषयुक्त भाषणांबद्दल महाराष्ट्रात एकूण 30 एफआयआर नोंदविण्यात आले.
लॉकडाऊन सुरू होण्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र सायबरवर सोशल मीडियावर बनावट बातम्या, अफवा व द्वेषयुक्त भाषणांविषयी 161 गुन्हे दाखल आहेत.

बीडमध्ये सर्वाधिक 22 घटना नोंदविण्यात आल्या असून त्यापाठोपाठ कोल्हापूर १ 12, पुणे ग्रामीण १२, मुंबई ११ आणि जळगाव १० इतरांमध्ये नोंद झाली आहे.

गुन्हेगार प्रामुख्याने कोविड -१९ आणि त्यावरील उपचारांबद्दल अफवा पसरवत असल्याचे आढळले आहे.

द्वेषयुक्त भाषणांच्या बाबतीतही एकूण नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ७३ प्रकरणे सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषणाविषयी आहेत. एकूण ३९ आरोपींना अटक करण्यात आली आणि 33 जणांची ओळख पटली आहे.

गेल्या 48 तासांत सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन मेसेजिंग कोरोना साथीच्या आजाराबद्दल बनावट बातम्या, अफवा आणि द्वेषयुक्त भाषणांबद्दल महाराष्ट्रात एकूण 30 एफआयआर नोंदविण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत अडकलेल्या ऊसतोड कामगारांना आपापल्या घरी सुरक्षितपणे पाठविण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा सरकारकडे आग्रह धरला आहे. ऊसतोड कामगारांचा विषय अत्यंत महत्वाचा व संवेदनशील आहे, तो गंभीर आणि हाताबाहेर जाण्या आधी यात लक्ष घालावे. कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून आयसोलेशन मध्येच आहेत, त्यांची रॅडमली तपासणी व चेकपोस्ट करावे आणि त्यांना मुळ गावी पाठविण्याचा निर्णय तीन ते चार दिवसांत घ्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात, लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता
औरंगाबाद : शहरात पुन्हा दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यादव नगर येथील २९ वर्षीय युवक आणि सातारा परिसरातील ४० वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा २० वर पोहोचला आहे.
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्ण 6 वर,
शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या महिलेला कोरोना लागण
,
ही महिला दिल्लीतील कार्यक्रमाला जाऊन आलेल्या तरुणाच्या संपर्कात आली
,
उचत मधल्या कोरोनाग्रस्त तरुणाची ही नातेवाईक
लॉकडाऊनच्या काळात पोलीस रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांना वेळेत घरी जाताही येत नाही. त्यामुळे कुटुंबियांसाठी लागणाऱ्या दररोजच्या वस्तूही त्यांना नेता येत नाहीत. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी रोजच्या साठी लागणाऱ्या वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली. त्यांना विनामूल्य कांदा, बटाटा, सॅनिटायझर यासारख्या वस्तू दिल्या जात आहेत.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात 210 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1574 झाली आहे. तर, आज 13 जणांचा बळी गेला आहे. दिलायसादायक म्हणजे आजपर्यंत 188 लोक पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे जिल्हा हे संवेदनशील झाली आहेत. मुंबईत सर्वाधिक 1008 रुग्णांची नोंद आहे. तर, त्याआखोखाल पुणे जिल्हात 254 रुग्णसंख्या आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची रॅपीड टेस्ट घेण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनामुळे परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अजून तीन दिवसांनी देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या प्रकारचे संकेत दिले आहेत.

 Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय

मुंबई महानगरपालिका रुग्ण संख्या 1008; मृत्यू 64
ठाणे 3 - 0
ठाणे मनपा 28 - 3
नवी मुंबई मनपा 32 -2
कल्याण डोबीवली मनपा 34 -2
उल्हासनगर मनपा 1 - 0
भिवंडी निजामपूर मनपा 0 - 0
मीरा भाईरंदर मनपा 21 - 1
पालघर 3 - 1
वसई विरार मनपा 12 - 3
रायगड 0 - 0
पनवेल मनपा 6 - 1
ठाणे मंडळ एकूण 1148 - 77

नाशिक 1 - 0
नाशिक मनपा 1 - 0
मालेगाव मनपा 5 - 1
अहमदनगर 9 - 0
अहमदनगर मनपा 16 - 0
धुळे 0 - 0
धुळे मनपा 0 - 0
जळगाव 1 - 1
जळगाव मनपा 1 - 1
नंदूरबार 0 - 0
नाशिक मंडळ एकूण 34 - 2
पुणे 7 - 0
पुणे मनपा 219 - 25
पिंपरी चिंचवड मनपा 22 - 0
सोलापूर 0 - 0
सोलापूर 0 - 0
सातारा 6 - 1
पुणे मंडळ एकूण 254 - 26
कोल्हापूर 0 - 0
कोल्हापूर मनपा 5 - 0
सांगली 26 - 0
सांगली मिरज कुपवाड मनपा 0 - 0
सिंधुदुर्ग 1 - 0
रत्नागिरी 5 - 1
कोल्हापूर मंडळ एकूण 37 - 1
औरंगाबाद 1 - 0
औरंगाबाद मनपा 16 - 1
जालना 1 - 0
हिंगोली 1 - 0
परभणी 0 - 0
परभणी मनपा 0 - 0
औरंगाबाद मंडळ एकूण 19 - 1
लातूर 0 - 0
लातूर मनपा 8 - 0
उस्मानाबाद 4 - 0
बीड 1 - 0
नांदेड 0 - 0
नांदेड मनपा 0 - 0
लातूर मंडळ एकूण 13 - 0
अकोला 0 - 0
अकोला मनपा 12 - 0
अमरावती 0 - 0
अमरावती मनपा 4 - 1
यवतमाळ 4 - 0
बुलढाणा 13 - 1
वाशिम 1 - 0
अकोला मंडळ एकूण 34 - 2
नागपूर 0 - 0
नागपूर मनपा 25 - 1
वर्धा 0 - 0
भंडारा 0 - 0
गोंदिया 1 - 0
चंद्रपूर 0 - 0
चंद्रपूर मनपा 0 - 0
गडिचरोली 0 - 0
नागपूर मंडळ एकूण 26 - 1
इतर राज्यातील 9 - 0
एकूण 1574 कोरोना बाधित अन् मृत्यू 110

आजपर्यंत 33093 जणांची कोरोना चाचणी झाली पैकी 1574 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38927 लोकं होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. तर 4738 लोकांना सरकारी ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.