Coronavirus in Maharashtra Live Updates | राज्यात आज 2940 नवे कोरोनाबाधित, 63 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 44,582
Coronavirus in Maharashtra Live : राज्यात गुरुवारी (21 मे) कोरोनाच्या तब्बल 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41,642 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 28,454 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, राज्यात काल 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1454 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1408 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 22 May 2020 08:11 PM

पार्श्वभूमी
Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात गुरुवारी (21 मे) कोरोनाच्या तब्बल 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41,642 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 28,454 अॅक्टिव्ह रुग्ण...More
Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात गुरुवारी (21 मे) कोरोनाच्या तब्बल 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41,642 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 28,454 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, राज्यात काल 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 41 जण मुंबई, मालेगाव 9, पुण्यात 7, औरंगाबाद 3, नवी मुंबईमध्ये 2, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 1454 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1408 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 19 हजार 710 नमुन्यांपैकी 2 लाख 78 हजार 68 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 41,642 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 37 हजार 304 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 865 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 11,726 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 36 पुरुष तर 28 महिला आहेत. त्यातील 31 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 29 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 64 रुग्णांपैकी 38 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.
इंदापूरला
मुंबईहून आलेल्या माय-लेकाला कोरोनाची लागण झाली आहे.
इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णाना कोरोनाची लागण झाली आहे.
हे दोन्ही रुग्ण मुंबईहून इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या ठिकाणी आले होते.
यात 42 वर्षाच्या महिला व 22 वर्षाच्या युवकाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 वर गेला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. त्या दोघांच्या 11 जण संपर्कात आले असून सर्वांचे स्वॅब घेतले आहे.
मुंबईहून आलेल्या माय-लेकाला कोरोनाची लागण झाली आहे.
इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णाना कोरोनाची लागण झाली आहे.
हे दोन्ही रुग्ण मुंबईहून इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या ठिकाणी आले होते.
यात 42 वर्षाच्या महिला व 22 वर्षाच्या युवकाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 वर गेला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. त्या दोघांच्या 11 जण संपर्कात आले असून सर्वांचे स्वॅब घेतले आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2940 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 44,582 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 857 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालिकेतील करोना बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती समोर येणार. ही माहिती देणे खातेप्रमुखांची जबाबदारी. मुंबई महानगरपालिका प्रशासनातील कोरोना बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आकडेवारी सार्वजनिक व्हावी अशी मागणी होत होती.
पिंपरी चिंचवड शहरात आज 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 254 आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 254 आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आज 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 254 आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 254 आहे.
ठाणे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या केबिनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. काल सकाळी 11 वाजता पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला रुग्णवाहिका मिळाली नाही, बेड मिळाला नाही, अखेर आज पहाटे 4 वाजता त्याचा मृत्यू झाला, असा आरोप अविनाश जाधव यांना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त विजय सिंघल यांच्यावर केला. दोन महिने झाले तरी रुग्णांना बेड मिळत नाही, मग इतके दिवस झोपले होते का? असा सवालही त्यांनी विचारला. तसंच ठाण्यात सर्वाधिक रुग्ण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागात असल्याचा दावाही अविनाश जाधव यांनी केला.
पुणे : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एम आय डी सी मधील कुसुम डिस्क्लेशन या रासायनिक कंपनीला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून तिचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटना स्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल आलेले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग मोठी भयानक असल्याने कंपनीतील ड्रम आकाशात उंच उडत होते.
राज्य सरकारने आजपासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरु करण्यास परवानगी दिली. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बस सेवा सुरु झाली खरी मात्र सकाळपासून बस स्टँडवर बस उभ्या असूनहीही बसने जाण्यासाठी प्रवासीच नसल्याचं चित्र मनमाड आणि येवला बस स्थानकात पाहयला मिळालं.
मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दहा दिवसांपूर्वी आयुक्त दीपक कासार यांना कोरोनाची लागण झाली होती. आरोग्यमंत्र्यासोबतच्या बैठकीवेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यानंतरचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आयुक्त दीपक कासार कोरोनामुक्त झाले आहेत.
कोल्हापूरचं क्रीडा संकुल नेमबाजांसाठी खुलं,
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सराव सुरू,
राही सरनोबत, अनुष्का पाटील यांच्यासह आदी खेळाडूंचा सराव सुरू,
आगामी स्पर्धांसाठी क्रीडा संकुलमध्ये सराव करण्यास मिळाल्याने खेळाडूंकडून समाधान
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सराव सुरू,
राही सरनोबत, अनुष्का पाटील यांच्यासह आदी खेळाडूंचा सराव सुरू,
आगामी स्पर्धांसाठी क्रीडा संकुलमध्ये सराव करण्यास मिळाल्याने खेळाडूंकडून समाधान
सोलापूर : आज चंद्रदर्शन झाल्यास उद्या साजरी केली जाणार ईद, अन्यथा 30 रोजे (उपवास) पूर्ण करून 25 मे रोजी साजरी होणार ईद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज होणार नाही, लोकांना घरातच नमाज आणि ईद साजरी करण्याच्या सूचना, तर ईदच्या शुभेच्छा देताना हात आणि गळाभेट न करण्याचा सूचना, रमजान ईद निमित्त सोलापूर शहर काझी यांच्यावतीने सूचना जाहीर
सातारा : एक कोरोना बाधितासह चार कोविड संशयित रुग्णांचा मृत्यू, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांची माहिती, या संशयित मृतांमध्ये नऊ वर्षाच्या बालकाचा समावेश,
कोराना बाधित जावली येथील वरोशी येथील, तर संशयित कराड, उंब्रज, पाचगणी येथील
कोराना बाधित जावली येथील वरोशी येथील, तर संशयित कराड, उंब्रज, पाचगणी येथील
नागपूर : अरुण गवळीला हाय कोर्टाचा दणका, पॅरोल वाढवून मिळणार नाही, तात्काळ तळोजा जेलला सरेंडर होण्याचे निर्देश, चांगली वागणूक हे फक्त ग्राऊंड नाही, पॅरोल वाढवण्याची कायदेशीर तरतूद नाही , कोर्टाची आता वेबलिंक सुनावणी सुरू
सोलापूर : सोलापुरात कोरोना बधितांचा आकडा 500 पार, काल संध्याकाळनंतर आज सकाळी पुन्हा 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह,
तर मृतांच्या संख्येत देखील तिघांची वाढ, सोलापुरात कोरोना बाधितांचा एकूण आकडा पोहोचला 516 वर तर मृतांचा आकडा पोहोचला 37 वर
तर मृतांच्या संख्येत देखील तिघांची वाढ, सोलापुरात कोरोना बाधितांचा एकूण आकडा पोहोचला 516 वर तर मृतांचा आकडा पोहोचला 37 वर
औरंगाबादमध्ये 26 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. औरंगाबादेत 1205 कोरोना बाधित रुग्ण. आतापर्यंत 42 व्यक्तींचा मृत्यू तर 451 रुग्ण बरे होऊन घरी
नागपूर - परप्रांतीय मजुरांना एसटी मधून मध्यप्रदेश सीमेपर्यंत सोडून परत येताना धावत्या एसटीमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या चालक आणि वाहकाचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबन झालेल्या चालकाचे नाव विशाल मेंढे, तर वाहकाचे नाव पराग शेंडे आहे. दोघांनी 16 मे रोजी रामटेक वरून नागपूरला परतताना एका मित्रासह धावत्या एसटी मध्ये मद्य प्राशन करत व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ वायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 200 च्या पार गेला आहे. रात्री उशिरा 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. साताऱ्यातील कोरोनाबाधितांची संख्या 201 असून त्यापैकी 106 जण बरे होऊन घरी परतले आहे. तर कोरोनामुळे जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर : बनावट पास घेऊन कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या दोन गाड्या पोलिसांनी केल्या जप्त,
किणी टोल नाक्यावर कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा केली कारवाई,
ई पासमध्ये फेरफार करून टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक कार येत होती कोल्हापूरमध्ये,
गाड्यामधील प्रवाशी हे मुंबईतून कोल्हापुरात येत होते,
किणी टोल नाक्यावर कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा केली कारवाई,
ई पासमध्ये फेरफार करून टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक कार येत होती कोल्हापूरमध्ये,
गाड्यामधील प्रवाशी हे मुंबईतून कोल्हापुरात येत होते,
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 265 कोरोना रुग्णांची नोंद तर 7 कोरोनाबाधीतांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या 242 वर, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4809 वर, आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात 2552 रुग्णांना डिस्चार्ज
उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे 8 नवे रुग्ण सापडले. उमरगा शहरातील एक महिला व शिराढोण येथील एक महिला कोरोना बाधीत सापडल्या. रात्री उशिरा 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत , यात वाशी 1 , परंडा 1 व लोहारा तालुक्यातील जेवळी येथील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली .
कोरोना विरोधातली लढाई सरकार गांभीर्याने घेत नसून या लढाईत सर्व स्तरावर झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याने सरकार जागृत करण्यासाठी भाजपा उद्या 22 मे शुक्रवार रोजी "महाराष्ट्र बचाव" आंदोलन करणार आहे. लॉकडाऊन असल्या कारणाने कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपापल्या घराच्या आवारातच काळ्या फिती लावून आणि सरकारला आवाहन करणारे फलक लावून आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापुरात आज 18 जणांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह तर एकाचा मृत्यू, दिलासादायक बाब म्हणजे आज तब्बल 35 रुग्णांनी केली कोरोनावर मात, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा पोहोचला 488 वर तर मृतांचा एकूण आकडा 34 वर
वसई विरार नालासोपारा परिसरात कोरोनाने 400 चा आकडा पार केला आहे. आज एका दिवसात 36 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून 2 जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 2 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2345 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 41,642 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1408 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण, महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार मिठी नदीचे 60 टक्के काम पूर्ण, नालेसफाईसह रस्ते, पदपथांची सर्व कामे मॉन्सून आगमनापूर्वी पूर्ण करावीत, महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
आज ठाणे महापालिका क्षेत्रात 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 1560 वर पोहोचली
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी दगडूशेठ गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपाला देखावा असणार नाही. दरवर्षी या उत्सवमंडपाचं रुप हा भाविकांच्या आकर्षणाचा विषय असतो. यावर्षी कोणत्याही मंदिर किंवा प्रसिद्ध वास्तूच्या देखाव्याचं रुप या उत्सवमंडपाला देण्यात येणार नाही. उत्सव मंडपात फक्त मखर असेल आणि त्यामध्ये बाप्पांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आणखी 7 रुग्णांना कोरोनाची लागण. सकाळपासून 13 रुग्णांची नोंद. गेल्या 5 दिवसात 57 रुग्णांची वाढ, आत्तापर्यंतचा आकडा 250 पार. आज शहरातील 12 तर शहराबाहेरील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. आत्तापर्यंत शहरातील 252 रुग्णांना कोरोनाची लागण. आत्तापर्यंत शहराबाहेरील उपचारासाठी दाखल 43 रुग्णांना कोरोनाची लागण.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खाऊ आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. सात वर्षीय चिमुरडीचा खून झाल्याच्या घटनेने तुंग गाव हादरून गेले आहे.
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नभावाची वागणूक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांचा घणाघाती आरोप,
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्येही राज्याला जाणीव पूर्वक डावलण्यात आले. कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा कुटिल डाव. मुंबईतील वैद्यकीय सेवा सुविधा विस्तारण्यासाठी तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईसाठी विशेष निधी जाहीर करावा . कोरोना संकटातून मुंबई लवकर सावरावी व आर्थिक राजधानीचा आणि पर्यायाने देशाचाही आर्थिक कारभार सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून मुंबई आणि महाराष्ट्रावरील अन्याय दूर करावा, अशी आग्रही मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत झालेला असताना केंद्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्यात केंद्राने जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्येही राज्याला जाणीव पूर्वक डावलण्यात आले. कोरोनाच्या निमित्ताने मुंबईतील सर्व महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे वळविण्याचा केंद्राचा कुटिल डाव. मुंबईतील वैद्यकीय सेवा सुविधा विस्तारण्यासाठी तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मुंबईसाठी विशेष निधी जाहीर करावा . कोरोना संकटातून मुंबई लवकर सावरावी व आर्थिक राजधानीचा आणि पर्यायाने देशाचाही आर्थिक कारभार सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारने तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून मुंबई आणि महाराष्ट्रावरील अन्याय दूर करावा, अशी आग्रही मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
नागपुरात आज 8 कोरोना बाधित रुग्ण आढळले,
आज पॉझिटिव्ह आलेले सर्व आठही रुग्ण नागपुरात कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मोमीनपुरा भागातील आहेत,
हे सर्व आधीच संस्थात्मक क्वारंटाईन होते
आज पॉझिटिव्ह आलेले सर्व आठही रुग्ण नागपुरात कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मोमीनपुरा भागातील आहेत,
हे सर्व आधीच संस्थात्मक क्वारंटाईन होते
चंद्रपूर जिल्ह्यात एकदम नऊ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 12 वर पोहोचली आहे. शहरातील वन अकादमी इथे विलगीकरणात असलेल्या पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल असलेल्या चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली.
अमरावतीमध्ये आज पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये चार महिला तर एक पुरुषाचा समावेश आहे. अमरावतीमधील कोरोना रुग्णांची संख्या 139 वर पोहचली आहे. तर 65 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 324 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल रात्री 24 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 191 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 112 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण 21 जण मृत्युमुखी पडले.
पुणे : पुण्यातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, दीपक सावंत असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे, ते वाहतूक शाखेत कार्यरत होते, भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला
खाजगी दवाखानांनाही पीपीई कीट खरेदी करता येणार. केंद्र सरकारची वर्तमानपत्रात जाहिरात देवून माहिती, गेल्या 60 दिवसात 500 पीपीई कीट तयार करणारे उत्पादक तयार झाल्याचा जाहिरातीत दावा. 8 लॅबला पीपीई कीट तपासण्याचे अधिकार दिले होते, त्यांनी प्रमाणित केलेल्या कीट बाजारात उपलब्ध
नाशिक : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आणि आपल्या गावी जाण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून ई पास दिले जात आहेत. मात्र नाशिक पोलिसांच्या नावे चक्क बनावट ई पास तयार करून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबादचा अजब आदेश, 10 वी,12 वीच्या उत्तरपत्रिका औरंगाबादला येऊन जमा करा,
औरंगाबाद,बीड,जालना,परभणी,हिंगोली या 5 जिल्ह्यातील नियमकांना आदेश,
विभागीय मंडळाच्या आदेशाला सर्वच नियमकांचा विरोध,
उत्तरपत्रिका घेऊन न जाण्याचा निर्णय,
पाचही जिल्ह्यातील 10 वी 12 वीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
औरंगाबाद,बीड,जालना,परभणी,हिंगोली या 5 जिल्ह्यातील नियमकांना आदेश,
विभागीय मंडळाच्या आदेशाला सर्वच नियमकांचा विरोध,
उत्तरपत्रिका घेऊन न जाण्याचा निर्णय,
पाचही जिल्ह्यातील 10 वी 12 वीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता
जालना जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईवरुन परतलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 44 वर पोहोचली आहे. आजपर्यंत 8 जण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोलापुरात काल संध्याकाळनंतर 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकूण बाधितांचा आकडा पोहोचला 478 वर, आतापर्यंत 175 रुग्ण कोरोनातून मुक्त, 33 जणांचा मृत्यू,
सोलापुरातील कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी मार्कंडेय सहकारी रुग्णालय अधिग्रहण करण्याचे आदेश
सोलापुरातील कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी मार्कंडेय सहकारी रुग्णालय अधिग्रहण करण्याचे आदेश
प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं निधन, कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते
गडचिरोली जिल्ह्यात आणखी एका रुग्णाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9 वर पोहोच आहे. नव्याने आढळलेला रुग्ण आरमोरी इथला असून त्याला संस्थात्मक क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवलं होतं. दरम्यान हा रुग्ण मुंबई इथून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, जिल्ह्यात आता एकूण 1173 कोरोनाबाधित, आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू, 451 रुग्ण बरे
बीड जिल्ह्यात मागील 24 तासात चार नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये वडवणी आणि पाटोदामधील प्रत्येकी एका रुग्णाचा तर वहाली चिखलीमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. बीडमध्ये सध्या 16 अॅक्टिव रुग्ण असून एक जण कोरोनामुक्त झाला आहे.
राज्याची उपराजधानी नागपुरात आज दिवसभरात 13 नवीन कोरोना बाधित रुग्ण पुढे आले आहेत. यामध्ये पाच एसआरपीएफ जवानांचा देखील समावेश आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 387 इतकी झाली आहे. तर आज 12 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. त्यामुळे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 303 इतकी झाली आहे. या शिवाय आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे, त्यामुळे आता एकूण 77 रुग्णांवर मेयो आणि मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील 11 नर्सेस कोरोना पोझिटिव्ह, त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयातच उपचार सुरू, काल एक नर्स पॉझिटिव्ह आल्याने इतर नर्सेसच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात 11 नर्सेस पॉझिटिव्ह आढळल्या
पुण्यात आज दिवसभरात 174 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4544, पुण्यातील 2184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज दिवसभरात 14 रुग्णांची वाढ तर तिघांचा मृत्यू, सोलापुरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 470 वर, तर आतापर्यंत 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 171 वर पोहचली, आज दिवसभरात 37 रुग्णांची झाली वाढ, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण रेड झोनमधील
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2250 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 39, 297 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 65 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 697 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात 110 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 1463 वर, एका दिवसात रुग्णांच्या संख्येने केली शंभरी पार
सोलापुरात लॉकडाऊन दरम्यान जप्त केलेली वाहने दंड आकारून सोडली जाणार. पोलीस ठाणे निहाय गाड्या सोडण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याची आयुक्तांची माहिती. सोलापूर शहरात जवळपास 6 हजार वाहने पोलिसांकडून जप्त.
मुंबई : धारावीत आज नवे 25 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1378, धारावीतला डिस्चार्ज रेट 39 टक्के तर डेथ रेट 4.1 टक्के
राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, मुख्यमंत्र्यांनी बैठकीला न येण्याबाबत राज्यपालांनी कळवलं, काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून सरकारविरोधात तक्रार केली होती, त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती
कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 153 वर पोहचली,
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 19 रुग्णांची झाली वाढ,
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण रेड झोनमधील
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 19 रुग्णांची झाली वाढ,
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण रेड झोनमधील
कोरोनाच्या रुग्णांसाठी एसआरएच्या नव्या इमारतीही क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरल्या जाणार. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 11 इमारती या क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात दिल्या आहेत.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातल्या 60 पोलिसांना कोरोनाची लागण, एकूण 1 हजार 388 पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पिंपरीत आज 4 पोलिसांना कोरोना
देशांतर्गत विमान वाहतूक 25 मेपासून सुरु होणार, हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांची माहिती, सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेश
पुणे जिल्ह्यात काल रात्री नऊ वाजल्यापासून तर आता चार वाजेपर्यंत नवीन 126 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. आज आतापर्यंत 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 229 वर गेलाय. तर, जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4496 इतकी आहे.
नाशिक : रेशनकार्ड नसणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना ही मिळणार मोफत तांदूळ, रेशनचा 5 किलो तांदूळ मोफत देण्याचा अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचा निर्णय
ज्यांनी याआधी लाभ घेतला त्यांना वगळले जाणार, ज्यांचे रेशनकार्ड कुठल्या कारणाने प्रशासकीय प्रकियांमध्ये अडकले आहेत, त्यांना मिळणार मोफत तांदूळ, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
ज्यांनी याआधी लाभ घेतला त्यांना वगळले जाणार, ज्यांचे रेशनकार्ड कुठल्या कारणाने प्रशासकीय प्रकियांमध्ये अडकले आहेत, त्यांना मिळणार मोफत तांदूळ, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
चंद्रपूर : चंद्रपूरमधून दिलासादायक माहिती समोर येत आहे. शहरातील पहिल्या पॉझिटिव रुग्णाचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा 16 मे रोजी घेतलेला पहिला अहवाल काल निगेटिव्ह आला होता. तर 17 मे रोजी घेतलेला दुसरा स्वॅबचा अहवालही निगेटिव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. हा रुग्ण नागपुरात कोरोनासह अन्य आजाराच्या उपचारासाठी दाखल होता. त्याला आता डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एकच अॅक्टिव कोरोनाबाधित रुग्ण आहे.
यशोधन इमारतीत वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे
चर्चगेट परिसरातील दिनशॉ वाच्छा मार्गावरील यशोधन इमारतीत कोविड १९ बाधित रुग्ण आढळल्यामुळे, या इमारतीतील फक्त चौथा मजला प्रतिबंधित (सील) करण्यात आला आहे. संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात आलेली नाही.
कोविड १९ संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना सुधारित पुनर्रचनेनुसार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन' व्यतिरिक्त 'सीलबंद इमारती' ही आणखी एक वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण (asymptomatic) आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला 'सीलबंद' म्हणून घोषित करण्यात येते.
चर्चगेट परिसरातील दिनशॉ वाच्छा मार्गावरील यशोधन इमारतीत कोविड १९ बाधित रुग्ण आढळल्यामुळे, या इमारतीतील फक्त चौथा मजला प्रतिबंधित (सील) करण्यात आला आहे. संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात आलेली नाही.
कोविड १९ संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना सुधारित पुनर्रचनेनुसार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन' व्यतिरिक्त 'सीलबंद इमारती' ही आणखी एक वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण (asymptomatic) आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला 'सीलबंद' म्हणून घोषित करण्यात येते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत. पीक कर्जाचे वाटप किती? शेतकऱ्यांना किती खते, बियाणे लागणार? सध्या किती उपलब्धता आहे याची माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधी कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. खते, बियाणांची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घेणार खरीप हंगामाचा आढावा, राज्याचा आढावा उद्या सादर होणार, पीक कर्जाचे वाटप किती? शेतकऱ्यांना किती खते, बियाणे लागणार, सध्या किती उपलब्धता आहे याची घेणार माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधी कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतला नाशिक जिल्ह्याचा आढावा, खते बियाणांची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा
ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील जिल्ह्यात बदल्या,
पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी बदली,
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली,
देविदास पवार ह्यांची परभणी महापालिका आयुक्तपदी बदली, समीर उन्हाळे यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरून उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी बदली,
संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी बदली
पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी बदली,
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली,
देविदास पवार ह्यांची परभणी महापालिका आयुक्तपदी बदली, समीर उन्हाळे यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरून उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी बदली,
संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी बदली
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पोलीस निरीक्षक, महिला पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर याआधी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस कर्मचाऱ्यास लागण झालेली आहे. असे एकूण सहा पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.
मुंबई : मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवर आज देखील इतर राज्यात जाणाऱ्या मजूर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसभरात उत्तर भारतात सात गाड्या या टर्मिनस वरून सोडण्यात येणार असून दोन गाड्या दुपारच्या वेळेस निघणार आहेत. बुधवारी या ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे प्रशासनवर टिकेची झोड उठल्यावर आज मात्र या ठिकाणी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. वांद्रे टर्मिनस, वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर बॅरिकेटिंग लावण्यात आले आहेत. फक्त बेस्टच्या बसने आलेल्या प्रवाशांनाच आत मध्ये सोडले जात आहे. तसेच प्रवाश्यांचे अधिकृत मिळालेली प्रवासाची परवानगी तपासूनच टर्मिनस परिसरात घेतले जात आहे. मात्र तरी देखील टर्मिनस परिसरात आज देखील मोठ्या संख्येने मजूर प्रवाशी जमले आहेत.
19 मे, रात्री 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील 426778 मजूरांसठी 320 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून 51, लोकमान्य टिळक टर्मिनस हून 45, पुण्याहून 32, बोरिवली हून 25 , वांद्रे टर्मिनसहून 22 व पनवेलहून 21 गाड्या सोडण्यात आल्या.
या सर्वच मजूरांच्या रेल्वे प्रवासाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलत आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं.
या सर्वच मजूरांच्या रेल्वे प्रवासाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलत आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं.
आज सकाळी मांजरसुंबा घाटात केमिकलच्या टँकरचा स्फोट, हा स्फोट इतका भीषण होता की या टँकरमधून केमिकल 500 फुटापेक्षा जास्त अंतरावर ती फेकलं गेलं, केमिकल ज्या ठिकाणी बाहेर फेकले गेले त्या सगळ्या ठिकाणांवर आजच्या ज्वाळा पाहायला मिळत होत्या, भीषण म्हणजे या केमिकलमुळे रस्त्यावरचे डांबर सुद्धा पेटले होते.
राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हायवे वर घटना
राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हायवे वर घटना
पालघर जिल्ह्यात आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. दिल्लीवरुन आलेल्या पालघरमधील कासा इथल्या रहिवाशाला आशागड येथील संतोषी येथे क्वॉरन्टाईन करण्यात आले होतं. त्याचा कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील हायरिस्क पाच जणांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. तर लो रिस्क असलेल्या 14 जणांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. याबाबतीत कासा शहरात सर्वे सुरु करण्यात आला असून पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र तयार होण्याची पाळी निर्माण झाली आहे.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक, जिल्हातील सध्याची स्थिती आणि खरीप आढावा घेण्यात आला
धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81 वर पोहोचली आहे. शिरपूर शहरातील 50 वर्षीय एसटी चालकाला कोरोनाची बाधा झाली आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 299 वर पोहोचला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली असून काल रात्री 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 112 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंत्रालयातील प्रधान सचिव कोरोना पॉझिटिव्ह, रिपोर्ट आल्यानंतर ते राहत असलेली चर्चगेट येथील यशोधन इमारत सील करण्याचे आदेश, मुंबई महापालिकेचे आदेश
उस्मानाबाद शहर तातडीने बंद. शहरात केवळ एक कोरोना रुग्ण सापडल्याने प्रशासन अचानक सतर्क,
पूर्वी जाहीर केलेली वेळ अचानक मागे घेऊन दुकाने बंद,
सकाळी सुरु झालेले मार्केट अत्यावश्यक सेवा वगळता साडे दहाच्या सुमारास तातडीने बंद करण्यात आले.
पूर्वी जाहीर केलेली वेळ अचानक मागे घेऊन दुकाने बंद,
सकाळी सुरु झालेले मार्केट अत्यावश्यक सेवा वगळता साडे दहाच्या सुमारास तातडीने बंद करण्यात आले.
बीड जिल्ह्यात एकूण 20 रुग्ण, एकाचा मृत्यू, 24 तासात बीड जिल्ह्यात आणखी 8 पॉझिटिव्ह, पहिल्यांदाच बीड शहरात एकूण पाच जण कोरोना बाधित आढळले
Nashik Corona Update | सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावात 12 नवे कोरोना बाधित, 3 चिमुकल्यांना कोरोनाची लागण, हॉटस्पॉट मालेगावातील रुग्णसंख्या 661 वर, जिल्ह्यात एकूण 851 कोरोनाबाधित, 601 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले, सध्या 208 जणांवर उपचार सुरु, जिल्ह्यात 42 मृत्यू यात सर्वाधिक म्हणजेच 40 मृत्यू मालेगावात
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम , रात्री उशिरा 12 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह,
काल दिवसभरात आढळले 51 नवीन रुग्ण ,
जिल्ह्याची रुग्ण संख्या 134 वर ,
सहा दिवसात आढळले तब्बल 111 रुग्ण,
सोलापुरात काल संध्याकाळनंतर पुन्हा 5 कोरोना बधितांची वाढ, दोघांचा मृत्यू, एकूण कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला 461 वर तर मृतांचा आकडा पोहोचला 32 वर
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 108वर; रत्नागिरी, गुहागर आणि संगमेश्वरमध्ये नवीन रूग्ण; तर 33 जणांची कोरोनावर यशस्वी मात
सत्ताधाऱ्यांशी संबंधित साखर कारखान्यासाठीच्या कर्जाला सरकारची हमी ही नित्याची बाब. मात्र सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी साखर कारखान्यांना कर्ज हमी देताना नव्या अटी शर्तीचा निर्णय घेतला होता. परंतु लॉकडाऊनच्या काळात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपणच स्वीकारलेल्या जुन्या अटी रद्द करून सरकारने काँग्रेस राष्ट्रवादीची संबंधी दोन आमदारांच्या साखर कारखान्यांना ७२ कोटींची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या आदेशांमध्ये कर्ज थकल्यास आधी कारखान्याची व नंतर संचालक मंडळाची मालमत्ता विकून वसुली करण्याची अट होती. ही अट रद्द करून काँग्रेसचे भोरच्या संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला १२ कोटी तर राष्ट्रवादीचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना ६० कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय नुकत्याच 28 एप्रिलला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ह्याच अटीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपची संबंधित चार कारखान्यांना कामे दिली होती ती नव्या सरकारने रद्द केली होती
औरंगाबादमध्ये रात्रीतून कोरोनाचे 41 रुग्ण वाढले आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1117 वर पोहोचली आहे. त्यापैकी 401 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात आणखी दोन जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. मुंबईहून शिराळा तालुक्यात आलेल्या 42 वर्षीय महिलेची आणि दिल्लीवरुन खानापूर तालुक्यात आलेला 55 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 57 आहे. त्यापैकी 33 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 23 जण अॅक्टिव्ह आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील राजाळे इथल्या 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या 22 वर झाली आहे. त्यापैकी 19 जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्या सध्या एकच अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.
मंत्रालयातील आणखी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. एका विभागाचे प्रधान सचिव असलेले IAS अधिकारी कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. याआधीही मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.
उस्मानाबाद जिल्ह्यात सहा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहेत. यात परांडा तालुक्यातील दोन जण, भूम तालुक्यातील 13 वर्षीय मुलगा, उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील एक तरुण, तुळजापूरमधील एका महिलेचा समावेश आहे. यापैकी तुळजापूरमधील महिला पुण्यावरुन आली असून इतर सगळेजण मुबंईहून परतले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर सर्व सहा जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं होतं. दरम्यान या सहा जणांच्या संपर्कात 46 जण असल्याची माहिती मिळत आहे. उस्मानाबाद शहरातील रुग्णाला ब्लड कॅन्सर असून तुळजापूर इथली कोरोनाबाधित महिला सहा महिन्यांची गरोदर आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी ही माहिती दिली.
Tags:Maharashtra Corona CasesCoronavirus PreventionCoronaVirus EffectCorona PreventionCorona LockdownCorona DeathsCorona AlertCoronavirus MaharashtraCorona indiaCoronavirus Maharashtra UpdateLockdown 4.0Maharashtra Coronavirus Updatecoronavirus in Maharashtracorona maskCoronavirus updatesMaharashtra Coronaviruscorona in MaharashtracoronacoronavirusCoronavirus Updatecovid 19
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Coronavirus in Maharashtra Live Updates | राज्यात आज 2940 नवे कोरोनाबाधित, 63 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 44,582