LIVE UPDATES | महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी
-Amarnat Yatra | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रद्द-विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, राज्य सरकारचा जीआर-Corona Vaccine | ...तर डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस लोकांना उपलब्ध होऊ शकते, सीरम इन्स्टिट्युटचा दावा-IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन-Corona Update | ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर, ठाणे दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावरकोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 22 Jul 2020 07:37 PM

पार्श्वभूमी
कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...कोरोनाव्हायरस लस बनविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात...More
कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...कोरोनाव्हायरस लस बनविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्याचे काम करत आहे. ऑक्सफर्डने पहिल्या स्टेजमध्ये केलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल सकारत्मक मिळाले या संदर्भातील अहवाल द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ही लस कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते.अधिकृत AZD1222 या नावाने ओळखली जाणारी हीलस जेनर इन्स्टिट्यूटने बनवली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, जेनर इन्स्टिट्यूटची ही लस कोरोनाव्हायरस पासून दुहेरी संरक्षण प्रदान करु शकेल, ही लस शरीरात अँटीबॉडीड आणि किलर टी- सेल्स बनवण्यात मदत करु शकते. ज्यामुळे कोरोनाव्हारस विरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल.भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचंभारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं फार महत्त्वाचं आहे. कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने कोट्यवधींची गुंतवणूक केलीय. सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे या लसीचे कोट्यवधी डोस तयार आहेत. त्यांनीही या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी घेतलीय. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. ते यशस्वी झाल्यास कोरोनावर खऱ्या अर्थाने उत्तर सापडलेलं असेल.दूध खरेदी दरांबाबत आज दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकदुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून 'कोरोना'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत . या विविध समस्यांच्या अनुशंगाने शेतकरी आणि दुध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळाकोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आज झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये वर्ल्ड कप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे. वर्ल्ड कप रद्द झाल्यामुळे बीसीसीआयकडून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं.
हिंगोली : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने घराबाहेर पडलेल्यांची धांदल उडाली आहे.
महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी. महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या नेमणुका केल्या आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या नेमणुकांना विरोध केलाय. घटक पक्षांशी विचारविनिमय न करता नेमणूक केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी. केलेल्या नेमणुका रद्द करण्याची मागणी. याआधी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राष्ट्रवादीच्या खात्यातील मंत्री अनिल देशमुख यांनी केल्या होत्या. त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. आता काँग्रेसच्या मंत्र्यांनी कोणालाही विश्वासात न घेता बदल्या केल्याने नाराजी.
चंद्रपुर : चिमूर तालुक्यातील भिसी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि विस्तार अधिकाऱ्याला ACB ने केली अटक, फिर्यादीला केली 70 हजारांची मागणी आणि लाचेपोटी घेतली 30 हजारांची रक्कम, सरपंच योगिता गोहणे, उपसरपंच लीलाधर बन्सोड आणि चिमुर पंचायत समिती विस्तार अधिकारी हुमणे लाच रक्कम घेण्यासाठी आले होते एकत्र, निलंबीत ग्रामसेवकाचे प्रकरण मार्गी लावण्यासाठी मागितली लाच, 30 हजारांची रक्कम घेताना तिघांना रंगेहात केली अटक
सोलापूर शहरात 64 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह तर चौघांचा मृत्यू. आतापर्यंत शहरातील 4052 जण कोरोना बाधित तर 333 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. आज प्राप्त अहवालानुसार 51 जणांना डिस्चार्ज तर आतापर्यंत 2242 रुग्ण बरे होऊन परतले. उर्वरित 1477 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचिवांना कोरोनाची लागण. विधानभवनातील विधानसभा अध्यक्षांच्या कार्यलयात निर्जंतुकीकरण. कार्यालतील इतर कर्मचाऱ्यांची होणार प्राथमिक आरोग्य चाचणी. गरज पडल्यास किंवा लक्षणं आढळल्यास विधानसभा अध्यक्ष आणि इतर कर्मचाऱ्यांनाही व्हावं लागणार क्वॉरंटाईन, पालिकेची माहिती. यापूर्वी विधानभवनात 14 जण पॉजिटिव्ह आढळलेत. पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू असताना विधानभवनात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.
वर्धा ते पुलगाव मार्गावर निमगाव शिवारात बोलेरो गाडी ट्रकवर आदळून तीन जणांचा मृत्यू, मृतांमध्ये अमोल तिखे, अर्जुन शिंदे रा. पारडी (तिखे) जिल्हा वाशीम आणि अभिषेक त्रिपाठी रा. गोरखपूर यांचा समावेश आहे, रात्री उशिरा अपघात घडल्यानंतर पंचनामा करत सकाळी शवविच्छेदन करण्यात आले, नागपूरकडे जात असताना घडला अपघात
कोल्हापुरातील कोरोना विलगीकरण कक्षात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. अशा घटना घडू नये यासाठी SOP ची अंमलबजावणी करण्याची सूचना पोलीस प्रशासनास केली आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचिवांना कोरोनाची लागण. विधानभवनातील विधानसभा अध्यक्षांच्या कार्यलयात निर्जंतुकीकरण. कार्यालतील इतर कर्मचाऱ्यांची होणार प्राथमिक आरोग्य चाचणी. गरज पडल्यास किंवा लक्षणं आढळल्यास विधानसभा अध्यक्ष आणि इतर कर्मचाऱ्यांनाही व्हावं लागणार क्वॉरंटाईन, पालिकेची माहिती. यापूर्वी विधानभवनात 14 जण पॉजिटिव्ह आढळलेत. पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू असताना विधानभवनात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.
येत्या 5 ऑगस्ट रोजी श्री राम मंदीराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यावर शरद पवार यांनी नुकतीच टिका केली होती. राम मंदीराचे भूमिपुजन करून देशातील कोरोना नष्ट होणार नसल्याची उपहासात्मक टिका शरद पवार यांनी केल्यानंतर या विरोधात आता भाजपा युवा मोर्चा मैदानात उतरली आहे. शरद पवार यांच्या व्यक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा यांनी निषेध करीत पवार यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. श्री राम मंदीर ही देशाची, भाजपाची अस्मिता आहे. मंदीराच्या भूमिपुजनावरून देशात आनंदाचे वातावरण असताना शरद पवार यांनी सदरचे व्यक्तव्य म्हणजे एखाद्या समाजाला खुश करण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप भाजपा युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे. शरद पवार यांना श्री रामाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील घरी राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याची सुरवात पनवेल येथून केली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये काम करणारा माथाडी कामगार , मापाडी, व्यापारी वर्ग अत्यावश्यक सेवेत येत असूनही त्यांना अद्याप रेल्वे मधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे भागातील एमआयडीसी भागातही माथाडी वर्ग मोठ्या संखेने काम करतो. रेल्वे मधून जाण्यास परवानगी नसल्याने कामाच्या ठिकाणी पोचण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. लांबून कामावर येण्यासाठी रेल्वे मार्ग सोईस्कर पडत असतानाही प्रशासन मात्र परवानगी देत नाही. याबाबत अनेक वेळा राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे रेल्वे मध्ये प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी , ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन कडून वाशीत आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. श्रावणाचा पवित्र महिना असल्याने मंदिर उघडे करण्याची मागणी. सोशल डिस्टंसिंग पाळून धार्मिक कार्य करू द्या. पूजा आणि विधी साहित्य विकणाऱ्यावर उपासमारीची वेळ आल्याने मंदिरे उघडे करण्याची परवानगी द्यावी.
औरंगाबादेत गेल्या चार दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत..गेल्या चार दिवसात घेतल्या गेलेल्या टेस्टमध्ये 507 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे.25 जुलैपर्यंत या टेस्ट केल्या जाणार आहेत. आणि त्यानंतर जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचे महापालिकेचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना त्यांचं दुकान उघडता येणार नाही .फळे, भाजी, अंडी, मांस विक्रेत्यांना व्यापार करता येणार नाही
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले एसटी आगारातील चालक- वाहक व कर्मचारी यांनी लाॅकडाऊनच्या काळात चांगली सेवा दिल्यामुळे शिवसेनेच्या वतीने या कोरोना योध्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना मास्क, सॅनेटायझरचे वाटपही करण्यात आले. शिवसेनेच्यावतीने वेंगुर्ला एसटी आगार, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर काही सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायजर स्टँड बसवण्यात आले.
तबला, नाल, ढोलकी, पखवाज ही वाद्य गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. घराघरात त्यांचे सूर घुमतात. पण, यंदा कोरोनामुळे या वाद्यांच्या व्यवसायावर देखील सध्या कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. आरती, भजनं बंद किंवा कमी प्रमाणात करण्याचा निर्णय गावांगावांमध्ये झाला आहे. शिवाय, कोरोनामुळे या वाद्यांच्या दुकानामध्ये देखील सध्या भजनी मंडळी अगदी तुरळक प्रमाणात फिरकताना दिसत आहेत. शिवाय लॉकडाऊन असल्यानं नागरिक देखील घराबाहेर पडत नाहीत. नवीन वाद्यांची खरेदी असो किंवा त्यांची दुरूस्ती यांचं प्रमाण गतवर्षीच्या किंवा मागील काही वर्षांची तुलना करता अगदी नगण्य आहे. त्यामुळे या व्यवसायावर देखील कोरोनाचा परिणाम झाला आहे. दरम्यान, कामानिमित्त मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या तरूणांनी गावी स्थायिक होत या व्यवसायावर संयम ठेवून प्रयत्न केल्यास त्यांना त्यातून चांगलं अर्थाजन होऊ शकेल अशी माहिती देखील या व्यवसायात मागील 10 ते 15 वर्षापासून काम करणारे जाणकार व्यक्त करतात.
राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, महाराष्ट्रातून शरद पवार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले, राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी, भागवत कराड यांनी घेतली खासदार म्हणून शपथ घेतली
औरंगाबाद - मराठा ठोक मोर्चाला उद्या आंदोलन करण्यास मज्जाव, आंदोलनकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, मराठा ठोक मोर्चा उद्या करणार आंदोलन, आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे पुतळ्याजवळ आंदोलन, कोरोनाच्या स्थितीत आंदोलन करता येणार नाही असं पोलिसांचं म्हणणं
पुण्यातील वडगाव मावळ तालुक्यात एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांनी छर्र्याच्या बंदुकीतून हा गोळीबार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. जखमी व्यक्ती एका फार्म हाऊसवर मॅनेजर म्हणून काम करतो. त्याच्या शरीरात तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. पण त्याच्या नेमका कोणी आणि का गोळीबार केला, याचा छडा मावळ पोलीस लावत आहेत. जखमी मॅनेजरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किमी तर अवजड वाहनांना ताशी 80 किमीची मर्यादा वाढवून दिली आहे. तरीही चालक वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. त्यामुळं आता उर्से आणि खालापूर टोल नाका दरम्यानच्या अंतरावर महामार्ग पोलिसांची करडी नजर असेल. दोन्ही टोल नाक्यांमधील 50 किलोमीटरचे अंतर हलक्या वाहनाने 37 मिनिटांच्या तर अवजड वाहनाने 46 मिनिटांच्या आत कापले तर त्यांच्याकडून एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. फास्ट टॅगचा आधार घेत ही कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅन झालेली वेळ आणि दुसऱ्या टोल नाक्यावर स्कॅन झालेली वेळ यावरून वेग मर्यादा ओलांडली का हे सिद्ध होणार आहे. सध्या 70 टक्के वाहनांनी फास्ट टॅगची सुविधा अमलात आणल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे ई चलनाद्वारे दंड आकारणे सोयीचे होणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून कारवाईला वेग येणार आहे. राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्यूचा आकडा प्रति वर्षी 10 टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट वाहतूक विभागाने बाळगलय. त्या अनुषंगानेच ही कारवाई केली जाणार आहे.
नाशिक - गोंदे औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल, कोरोनाचा फैलावास कारणीभूत ठरल्याचा ठपका,
फिजिकल डिस्ट्सिंग आणि इतर नियमांचे पालन न केल्याने गुन्हा दाखल,
,कम्पनी मधील तब्बल 186 कामगारांना कोरोना ची लागण,
रोथे एर्ड कंपनी विरोधात गुन्हा दाखल,
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाडीवरहे पोलिसात गुन्ह्याची नोंद
फिजिकल डिस्ट्सिंग आणि इतर नियमांचे पालन न केल्याने गुन्हा दाखल,
,कम्पनी मधील तब्बल 186 कामगारांना कोरोना ची लागण,
रोथे एर्ड कंपनी विरोधात गुन्हा दाखल,
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाडीवरहे पोलिसात गुन्ह्याची नोंद
ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्ण महिला कोरोना पॉझिटिव असल्याचं समोर आलं आहे. त्रास जाणवू लागल्यामुळे तिला उपचारांसाठी कळवा इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. ठाण्यातील रुग्णालयात ही मनोरुग्ण महिला ज्या वॉर्डमध्ये उपचार घेत होती त्यात अन्य 30 मनोरुग्ण महिला उपचार घेत आहेत, प्रशासनाने मात्र इतर मनोरुग्ण महिलांना विलगीकरण कक्षात ठेवलेलं नाही. मनोरुग्ण महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिला स्टाफ देखील आज ड्युटीवर हजार झाल्यामुळे रुग्णालयात भीतीचं वातावरण आहे.
औरंगाबाद खासगी गुत्तेदाराची आत्महत्या, सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या, सावकारी छळाचा व्हिडीओ करुन गळफास घेऊन केली आत्महत्या,
राधाकृष्ण उर्फ पोपट बोडखे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव, खुलताबाद तालुक्यातील
आखातवाडा गावातील रहिवाशी
राधाकृष्ण उर्फ पोपट बोडखे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव, खुलताबाद तालुक्यातील
आखातवाडा गावातील रहिवाशी
नालासोपाऱ्यात एसटी स्टॅण्ड बंद केल्याने प्रवासी रेल्वे स्थानकावर, लोकलने प्रवास करण्याची मागणी, रेल्वे ट्रॅकवर उतरुन ट्रेन रोखण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात
औरंगाबाद जिल्ह्यातील 99 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 11765 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6497 बरे झाले, 408 जणांचा मृत्यू झाला. तर 4860 जणांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबादेत गेल्या चार दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. गेल्या चार दिवसात घेतल्या गेलेल्या टेस्टमध्ये जवळचा 40 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे. 25 जुलैपर्यंत या टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यानंतर जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचे महापालिकेचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना त्यांचं दुकान उघडता येणार नाही .फळे, भाजी, अंडी मास विक्रेत्यांना व्यापार करता येणार नाही.
महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांची 27 जुलैला होणार बैठक, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक,
महाराष्ट्र भाजपची नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत प्रथमच बैठक,
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सर्व प्रमुख पदाधिकारी असणार उपस्थित
संघटनात्मक बांधणी, कोरोनसंदर्भात सुरू असलेलं काम आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीचा घेतला जाणार आढावा
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा भाजप प्रदेश कार्यालयातून होणार बैठक
महाराष्ट्र भाजपची नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत प्रथमच बैठक,
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सर्व प्रमुख पदाधिकारी असणार उपस्थित
संघटनात्मक बांधणी, कोरोनसंदर्भात सुरू असलेलं काम आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीचा घेतला जाणार आढावा
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा भाजप प्रदेश कार्यालयातून होणार बैठक
बीड जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह,
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 23, परळी 5 , अंबाजोगाई 1 , गेवराई 8, केज 3, पाटोदा 1 माजलगाव 1, शिरूर तालुक्यातील 2 अशा एकूण 44 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 424 झाली आहे. जिल्ह्यातील आजचा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे .
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 23, परळी 5 , अंबाजोगाई 1 , गेवराई 8, केज 3, पाटोदा 1 माजलगाव 1, शिरूर तालुक्यातील 2 अशा एकूण 44 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 424 झाली आहे. जिल्ह्यातील आजचा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे .
बीड जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह,
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 23, परळी 5 , अंबाजोगाई 1 , गेवराई 8, केज 3, पाटोदा 1 माजलगाव 1, शिरूर तालुक्यातील 2 अशा एकूण 44 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 424 झाली आहे. जिल्ह्यातील आजचा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे .
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 23, परळी 5 , अंबाजोगाई 1 , गेवराई 8, केज 3, पाटोदा 1 माजलगाव 1, शिरूर तालुक्यातील 2 अशा एकूण 44 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 424 झाली आहे. जिल्ह्यातील आजचा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे .
चंद्रपूर : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना निनावी पत्राद्वारे धमकी, पत्रात जीवे मारण्याचा इशारा, अवैध दारूविक्रेत्यांनी धमकी दिली असल्याचा संशय, अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी आमदार करीत असलेल्या प्रयत्नांचा विरोध, पत्र येताच आमदार जोरगेवारांची पोलिसात तक्रार, लेखी धमकीमुळं राजकीय वर्तुळात खळबळ
मंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण, मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी उपचार सुरू, अब्दुल सत्तार यांना कोरोनाची सौम्य लक्षणे, प्रकृती उत्तम असल्याची मुलगा समीर यांची माहिती
शिवाजी विद्यापीठातील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेची छेडछाड, महिलेशी असभ्य वर्तन केल्याने वॉर्ड बॉयला नातेवाईकांनी चोपल, राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये संबधित वॉर्ड बॉय विरोधात गुन्हा दाखल, वॉर्ड बॉय महापालिकेचा कंत्राटी कामगार असल्याची प्राथमिक माहिती
पुण्यातील कामशेत परिसरातून 500 किलो गांजा जप्त..अंदाजे 75 लाख इतकी या गांजाची किंमत..एका घरात ठेवला होता गांजा..पोलिसांनी आल्याचे पाहून आरोपीने काढला पळ..पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
पुण्यात तब्बल 578 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. कामशेतमधील सराईत गुन्हेगाराच्या घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. एका आरोपीस ही पोलिसांनी जेरबंद केलं पण मुख्य आरोपीने मात्र पलायन केलंय. सराईत गुन्हेगार संतोष वाळूंजच्या घरात हा साठा होता. तिथं पोलीस पोहचले असता त्याने पळ काढला. त्याचा साथीदार धनाजी जिटे मात्र पोलिसांच्या हाती लागला. तेंव्हा घराचा तळमजला भरून गांजा आढळला. कामशेत पोलिसांनी 86 लाखाचा 578 किलो गांजा ताब्यात घेतला.
राज्यातल्या पहिल्या नॉन मेडीको आरटीपीसीआर लॅबला मान्यता, अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था नागपूरकडून मान्यता, लोक सहभागातून उभा राहिलेल्या उस्मानाबादच्या लॅबला मान्यता, उद्यापासून चाचण्या सूरू होतील, 1 कोटी 20 लाखांचा निधी लोकांना जमा करून लॅब उभारली, रोज 600 तपासण्या होऊ शकतात
मुंबई महापालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले कोरोना पॉझिटिव्ह, सेव्हन हिल्स हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल, अमेय घोले गेले ४ महिने बीएमसीच्या सर्व हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या नियोजनात व्यस्त होते, सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात राहील्यामुळे करोनाचा संसर्ग झाला.
सोलापूर शहरात 153 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह, दोघांचा मृत्यू, आतापर्यंत शहरातील 3988 जण कोरोना बाधित तर 329 रुग्णांचा मृत्यू,
आज दिवसभरात 59 रुग्णांना डिस्चार्ज तर आतापर्यंत 2191 रुग्ण बरे, उर्वरित 1468 रुग्णांवर उपचार सुरू
आज दिवसभरात 59 रुग्णांना डिस्चार्ज तर आतापर्यंत 2191 रुग्ण बरे, उर्वरित 1468 रुग्णांवर उपचार सुरू
आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. सारथीच्या धर्तीवर महाज्योती संस्थेला आर्थिक मदत आणि मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी या मागण्यांवर चर्चा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता व्हिसीद्वारे बैठक पार पडणार आहे.
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, विधी व न्याय, बहुजन कल्याण, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, विधी व न्याय, बहुजन कल्याण, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
परभणी - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. परभणीमधील नांदखेडा रोड भागातील घरीच कोरोनाची लागण झाली. त्यांच्या संपर्कातील सर्वांच्या तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या घरासह परिसर सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली.
वर्धा जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस बरसला. पावसामुळ शहरातील वाहतूकही प्रभावित झाली होती. सकाळपासून उकाडा वाढला होता. अचानक पाऊस बरसू लागला. पावसाने हजेरी लावल्यामुळे मजुरांना काम अर्धवट सोडून घरची वाट धरावी लागली.
वसई : नायगांवच्या बाफणे गावात महावितरणच्या खांबावरील इलेक्ट्रिक वायरीचा शॉक लागून 4 म्हैसीचा जागीच मृत्यू झाला आहे. नायगाव पूर्व बाफाणे गावाच्या हद्दीत रामदेव ब्लॉक च्या शेजारील शेतात आज सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
आता महाविद्यालयीन विद्यार्थीही काॅलेजने फीमध्ये सवलत द्यावी अशी मागणी करत आहेत. पुण्यातील एलएलबीच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी फीमध्ये ५० टक्के सवलत मिळावी अशी मागणी केली आहे. मागच्या सेमिस्टर मध्ये फक्त १० दिवस काॅलेज झालं आणि लाॅकडाऊन सुरु झाल. आताचं सेमिस्टरमध्येही सगळे विद्यार्थी घरी आहेत. काही लाॅ काॅलेजचे तर आॅनलाईन क्लासेसही सुरु झालेले नाहीत असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काॅलेजने फक्त ट्यूशन फी घ्यावी आणि बाकीची फी माफ करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. याआधी खाजगी शाळांकडे पालकही हीच मागणी करत आहेत. शाळांनी फक्त ट्यूशन फी घ्यावी अशी मागणी पालकही करत आहेत.
धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं, राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांचं ट्वीट
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, तामिळनाडूच्या वेल्लोरच्या तुरुंगात साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न, नलिनी मागील 29 वर्षांपासून तुरुंगात
मनमाड : कांदा व्यापारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 2 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवसांसाठी कांदा, धान्यसह सर्व लिलाव बंद करण्यात आले आहे.लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.
सांगली : आतापर्यंत कोरोनापासून सुरक्षित असलेल्या
सांगली पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मिरजमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा रात्री अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. चार पोलीस आणि दोन अधिकाऱ्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन केले आहे. मार्चपासून आतापर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावात पोलिसांना कोरोनापासून दूर ठेवण्यात सांगली पोलीस दलाला यश आले होते.
सांगली पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मिरजमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा रात्री अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. चार पोलीस आणि दोन अधिकाऱ्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन केले आहे. मार्चपासून आतापर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावात पोलिसांना कोरोनापासून दूर ठेवण्यात सांगली पोलीस दलाला यश आले होते.
बारामतीत कोरोनाचा आठवा बळी गेला आहे. एका रात्रीत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल रात्री भिकोबानगर येथील 65 वर्षीय वृध्दाचा तर आज पहाटे गुणवडी येथील 64 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बारामतीत एकूण 79 कोरोनाचे पेशंट झाले असून 33 जण बरे झाले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात रात्रभरात 559 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील रुग्णांची संख्या 54572 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 1387 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 34371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीड शहरातील 16 कोरोना बधितांपैकी खाजगी दवाखान्यातील दोन डॉक्टर आणि 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे. परळीमधील 5, गेवराई 3, आष्टी आणि अंबाजोगाई येथील प्रत्येकी एक आहे. तर दिवसभरात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 380 असून 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 189 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
गृह विलगिकरणाचं उल्लंघन करून दुबई निघून जाणं कोरोनाग्रस्त महिलेला चांगलंच भोवणार आहे. संबंधित महिलेवर महापालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा, तसेच कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका या संबंधित महिलेवर आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 188, 269, 270 तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गृह विलगिकरणाचं उल्लंघन करून दुबई निघून जाणं कोरोनाग्रस्त महिलेला चांगलंच भोवणार आहे. संबंधित महिलेवर महापालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा, तसेच कोरोनाचा संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका या संबंधित महिलेवर आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 188, 269, 270 तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बुलडाणा : सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील निरोड इथं स्वाभिमानीच्या वतीने प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात बैलांना दुधाची आंघोळ घालुन आंदोलन केले आहे. सरकारने दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दुध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे. आणि तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी यांच्या दुध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा इशारा या आंदोलनातून सरकारला देण्यात आला आहे.
सांगली पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात देखील टँकर फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. बिद्री या ठिकाणी गोकुळचा टँकर फोडला.
सांगली पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात देखील टँकर फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. बिद्री या ठिकाणी गोकुळचा टँकर फोडला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दराच्या आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. पुणे-बंगळुरु हायवेवरील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दुध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता. स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुग्ध विभागाने गोकुळला नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत, सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरु ठेवली होती. त्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दराच्या आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. पुणे-बंगळुरु हायवेवरील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दुध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता. स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुग्ध विभागाने गोकुळला नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत, सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरु ठेवली होती. त्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला.
नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. महापालिकेतील कंत्राटी किंवा कायम असणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यांना उपचारासाठी सुट्ट्या घेतलेल्या काळाचा पुर्ण पगार मिळणार. नवी मुंबई महानगर पालिकेच्या ट्विटर अकौउटवरुन माहिती. नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचा देखील वृत्ताला दुजोरा
कोल्हापूरच्या नांदनी या ठिकाणी भैरवनाथला दुधाचा अभिषेक घालून दूध दर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गावागावात अभिषेक घालण्यास सुरुवात केली.
पुणे व्यापारी महासंघानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
23 जुलैनंतर पुढे लॉकडाऊन केल्यास आंदोलनाचा इशारा
अन्यथा 30 हजार व्यापाऱ्यांना आत्मदहनाची परवानगी द्या अशी मागणी व्यापारी महासंघानं पत्र लिहून केली आहे.
23 जुलैनंतर पुढे लॉकडाऊन केल्यास आंदोलनाचा इशारा
अन्यथा 30 हजार व्यापाऱ्यांना आत्मदहनाची परवानगी द्या अशी मागणी व्यापारी महासंघानं पत्र लिहून केली आहे.
वर्धा : आर्वी येथे वीजबिल माफीच्या मागणीकरता आंदोलन, वीजबिल कृती समितीमधील युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उंच इमारतीवर चढून हे आंदोलन केलं, वीजबिल भरण्यास असमर्थ नागरिकांची कोंडी होईल, अशी भूमिका महावितरणन घेऊ नये, अशी मागणी करत केलं आंदोलन
वाशिम :वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात आज दुपारी पुन्हा एकवेळा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या 5 दिवसापासून उघडीप दिल्या नंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेती च्या कामांना वेग मिळणार आहे
दुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून 'कोरोना'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत . या विविध समस्यांच्या अनुशंगाने शेतकरी आणि दुध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून 'कोरोना'मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत . या विविध समस्यांच्या अनुशंगाने शेतकरी आणि दुध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.
4 ऑगस्ट पासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा सुरू होणार, त्यासाठी नियमावली देण्यात येणार, कंटेन्मेंट झोन सोडून शाळा सुरू होणार
निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. 18 जुलै रोजी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे पाठवला आहे. NDRF मधून 1 हजार 65 कोटी रुपयांची मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावात केली आहे. NDRF च्या नियमानुसार ही प्राथमिक मागणी आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विनंती करायची आहे त्यांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी. त्यांनीही परिस्थिती पाहिली आहे, ते मदत करतील अशी अपेक्षा आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळसाठी राज्य सरकारने केंद्राला 1 हजार 65 कोटींच्या नुकसान भरपाई साठी प्रस्ताव पाठवला,
18 जुलै रोजी राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठवले,
NDRF च्या निकषानुसार प्राथमिक मागणी,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण, तेजस ठाकरेंच्या इतर सुरक्षारक्षकांची तातडीने कोरोना चाचणी झाली, इतर सुरक्षारक्षकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं आहे, तेजस ठाकरे यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना एस टीनं कोकणात जाता येणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा @abpmajhatv https://t.co/assGgXQFXW
कोकणात जाणाऱ्या चारकमान्यांसाठी खुशखबर, कोकणात एसटीने प्रवास करता येणार, पण त्यासाठी काही नियमावलीचं पालन करावं लागणार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली कोकणातल्या आमदारांची बैठक,
चाकरमानी कोकणात कसे जाणार? यावर चर्चा, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरुप पाठवणार आणि आणणार, अनिल परब यांचं आश्वासन, तसंच कोकणातल्या चाकरमान्यांवरुन कोणीही राजकारण करु नये, परिवहन मंत्री अनिल परब यांचा विरोधकांना टोला
चाकरमानी कोकणात कसे जाणार? यावर चर्चा, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरुप पाठवणार आणि आणणार, अनिल परब यांचं आश्वासन, तसंच कोकणातल्या चाकरमान्यांवरुन कोणीही राजकारण करु नये, परिवहन मंत्री अनिल परब यांचा विरोधकांना टोला
दुधाच्या दराचा निकाल 1 ऑगस्टच्या आत लावा, अन्यथा 1 ऑगस्टला भाजप, रयत संघटना, रासप एकत्र येऊन तीव्र आंदोलन करणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मेल द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मंगळवेढा सबजेल मधील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 28 कैद्यांपैकी 3 कैदी रात्री पळाले, मात्र पोलिसांच्या तीन टीमने या कोरोनाग्रस्त तीनही कैद्यांना आज पहाटे परत पकडले, पहाटे 3 वाजता कोठडीची कौले, गज वाकवात हे 3 कोरोनाग्रस्त कैदी पळाले होते. यातील दोघांना पहाटे 5 वाजता मंगळवेढा परिसरातूनच पकडले, मात्र एक कैदी मोबाईल व दुचाकी चोरून पळाला होता, त्याला मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर परिसरातून पकडले, हे कैदी कोरोना पॉझिटिव्ह असूनही पोलिसांनी त्यांना पकडले, आता या पोलिसांची तपासणी करावी लागणार आहे, हे तीनपैकी एक कैदी खुनाच्या आरोपात असून दोघे खुनाच्या प्रयत्न म्हणजे एक 302 मधील तर दोघे 307 मधील आरोपी आहेत.
उद्धव ठाकरेंना अयोध्येत जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही, अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला, अयोध्येच्या रस्त्यामधील अडथळे शिवसेनेने दूर केले, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य
दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक, मंत्री, काही शेतकरी संघटना तसंच प्रशाकीय अधिकारी यांच्यात बैठक होणार, आज राज्यात अनेक ठिकाणी दूध दरासाठी आंदोलनं
दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक, मंत्री, काही शेतकरी संघटना तसंच प्रशाकीय अधिकारी यांच्यात बैठक होणार, आज राज्यात अनेक ठिकाणी दूध दरासाठी आंदोलनं
गोकूळ दूध संघावर कारवाईचा इशारा, मंगळवारी दूध संकलन बंद ठेऊन राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरुन नोटीस, दूधला पाच रुपये अनुदान देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला गोकुळचा पाठिंबा, दुग्ध विभागाच्या उपनिबंधकांनी बजावली नोटीस, दूध संकलन बंद ठेवल्यास सहकार कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा, संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर नोटीस
नव्या निर्माता संघाची स्थापना, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ, अमेय खोपकर अध्यक्ष, महेश मांजरेकर उपाध्यक्ष, चंद्रकांत लोकरे, खजिनदार, दिलीप जाधव, कार्यवाह तर श्रीपाद पद्माकर, सहकार्यवाह. अनंत पणशीकर हे प्रवक्ते
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला पुतण्याला कोरोनाची लागण झाली, याचा धक्का लहानग्या भावाला बसला. यात त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर यातून स्वतःला सावरु न शकलेल्या दोघा भावांची ही मृत्यूंशी झुंज संपली. 61, 66 आणि 63 अशी तिघांची वय होती. यांच्यासह कुटुंबातील 18 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतर सर्वांनी कोरोनावर मात केली पण हे तिघे सख्खे भाऊ मात्र यातून वाचू शकले नाहीत. तिघांना आधी वेगवेगळे आजार ही होते.
चंद्रपुर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या 24 तासात चंद्रपुर शहरात 88 मिलिमीटर तर सावली तालुक्यात 78.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे सावली तालुक्यात विज पडून एका महिलेचा मृत्यू देखील झालाय. केरोडा येथील ही घटना असून विद्या राजेंद्र वालदे या 40 वर्षीय महिलेचा अंगावर विज पडल्याने मृत्यु झालाय. तर दुसरीकडे संततधार बरसत असलेल्या या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी जमा झाले आहे. शहरातील मानवटकर हॉस्पिटल, हिंदी सिटी शाळा, PWD ची कर्मचारी वसाहत आणि तुकूम रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाची ही संततधार अशीच सुरु राहिल्यास लोकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोना लसीची मानवी चाचणी घेण्यासाठी देशातील बारा हॉस्पिटल, वैद्यकीय संस्थांची आय.सी.एम.आर ने निवड केली आहे. या लसीची मानवी चाचणी घेण्या अगोदरच्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मानवी चाचणीला प्रारंभ होण्यापूर्वीच्या सगळ्या शास्त्रीय प्रक्रिया आय.सी.एम.आर आणि भारत बायोटेक यांनी पूर्ण केल्या आहेत. मानवी चाचणी संबंधी आय.सी.एम.आर ने चाचणीसाठी निवडलेल्या हॉस्पिटल,वैद्यकीय संस्थांना पत्र देखील लिहिले आहे. पत्रातील सूचनेनुसार या मानवी चाचण्या पार पडणार आहेत.या सगळ्या मानवी चाचण्यांचा अहवाल पाठवल्या नंतर कोरोना लसीचे भवितव्य ठरणार आहे.कोरोना लसीच्या मानवी चाचण्या यशस्वी ठरल्या तर 15 ऑगस्ट रोजी ही लस उपलब्ध करून देण्याची आय.सी.एम.आर ची योजना आहे.
मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: अस्लम शेख यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली. आपल्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नसून आयसोलेशमध्ये असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं. तसंच माझ्या संपर्कात आलेल्या इतरांनीही चाचणी करुन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून धरण परिसरात म्हणावा तसा पाऊसही झाला नाही. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या चार साखळी धरणांमध्ये 14.81 टीएमसी एवढा पाणीसाठा होता तर आज अवघा 9.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलाय. हा पाणीसाठा पुढील दीड ते दोन महिने पुरेल एवढाच आहे. म्हणूनच खडकवासला धरणातून शेतीसाठीचं नियोजीत आवर्तनही तुर्तास थांबवण्यात आलंय. तसंच भविष्यात पाऊस नाहीच पडला तर पुणेकरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागू शकतं.
खडकवासला - ३६.६५% पाणीसाठा,
पानशेत - ४०.४२% पाणीसाठा,
वरसगाव - २९.६०% पाणीसाठा,
टेमघर - १७.४७% पाणीसाठा,
खडकवासला - ३६.६५% पाणीसाठा,
पानशेत - ४०.४२% पाणीसाठा,
वरसगाव - २९.६०% पाणीसाठा,
टेमघर - १७.४७% पाणीसाठा,
'एक शरद बाकी सगळे गारद' अंतर्गत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर शिवसेना नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनलाॅक मुलाखत घेत आहेत, लवकर ती प्रसारित होणार आहे.
नागपूर : 10 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेलेल्या मुलाची शोध मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली आहे. नागपूरच्या गुलमोहरनगर भागातून नेहल मेश्राम नावाचा 10 वर्षांचा मुलगा काल परिसरात दमदार पाऊस झाल्यानंतर नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला होता. अग्निशमन दलाने काल रात्री त्याला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविली आहे.
पालघर : तलासरी तालुक्यातील वसा डोंगरी पाडा येथे जमिनीतून अचानक गरम वाफा येत असल्याने स्थानिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे,आज पहाटे पासून हा प्रकार समोर आलाय याच भागात गेल्या काही महिन्यापासून भूकंपाचे धक्के ही बसत होते, त्यामुळे स्थानिकांमधे शंकचे वातावरण ही निर्माण झाल आहे.
ठाण्यात पूर्णतः लॉक डाऊन संपून आता हॉट स्पॉट मध्येच लॉक डाऊन सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज पासून भाजी मंडई, धान्य मार्केट, कपडा मार्केट, आणि इतर ठिकाणी दुकाने, व्यापार सुरू होणार आहेत. 18 दिवसांच्या लॉक डाऊन नंतर ठाणेकर आज कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे. ठाण्यातील मुख्य भाजीपाला मार्केट, स्टेशन रोड परिसरातील मार्केट आणि खारकर आळीतील धान्य मार्केट आज पासून उघडले जाईल. याठिकाणी ग्राहकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे महापालिकेनं आधीच दुकानदारांना सांगून सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी हॉट स्पॉट मध्ये लॉक डाऊनचे सर्व नियम कठोरतेने पाळले जातील. पालिकेने हॉटस्पॉटची यादी प्रसिद्ध केली आहे. याठिकाणी दुकाने उघडण्यास परवानगी नसेल.
आज सोमवती अमावस्या. एरवी जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला खंडेरायाची मोठी यात्रा भरते. पण यावेळी कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आलीय. त्याचबरोबर या यात्रेच्या दिवशी जेजुरी गडावरुन उत्सवमुर्ती पालखीतुन कर्हा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येतात. पण यावेळी हा पालखी सोहळा देखील आज रद्द करण्यात आला. एरवी सोमवती अमावस्येला भंडार्याच्या उधळणीने पिवळा धम्मक होणारा इथला आसमंत यावेळी तसा झाला नाही. मात्र मंदिराचे पुजारी,सेवेकरी आणि विश्वस्त यांनी खंडेरायाचे पुजा विधी केले. सकाळी त्रिकालपुजा आणि महापुजा झाल्यानंतर या मोजक्या लोकांनीच गडावर भंडार्याची उधळण करत परंपरेच पालन केलं .
उस्मानाबाद: येथे खासगी मदतीतून उभी राहिलेली पहिली कोरोना टेस्टिंग प्रयोगशाळा येत्या दोन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिवसाकाठी ४०० तपासण्या करता येणार आहेत,मंत्री टोपे यांनी बोलताना आरोग्य यंत्रणेकडून अक्षम्य चुका झाल्याचे स्पष्ट करत जिल्हा शल्यचिकित्सक तसेच संबंधित यंत्रणेवर तोफ डागली.
देशभरात सुधारित ग्राहक संरक्षण कायदा, 2019 आजपासून म्हणजे 20 जुलैपासून अंमलात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारने 15 जुलै रोजी जारी केली आहे. नवीन ग्राहक संरक्षण कायदा जुन्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 चा कायदा कालबाह्य होऊन नवीन कायदा त्याची जागा घेणार आहे. नव्या कायद्यानुसार ग्राहकांना पहिल्यांदा नवीन अधिकार मिळणार आहेत.
केडीएमसी क्वारंटाईन सेंटरमधून एका कोरोना रुग्णाची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या,
भिवंडी टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमधील दुर्दैवी घटना,
रुग्णाचा जागीच मृत्यू झाला असून अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल
भिवंडी टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमधील दुर्दैवी घटना,
रुग्णाचा जागीच मृत्यू झाला असून अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल
नव्या निर्माता संघाच्या हालचालीनंतर प्रथमच महाराष्ट्रातले नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे वितरक व व्यवस्थापक एकवटले. नव्या संघाची स्थापना. कोरोना काळात आलेल्या अडचणीमुळे एकत्रित येण्यावर भर.
कोरोनाच्या काळात सुपीक डोक्यातील अनेक कल्पना सध्या समोर येत आहेत. असाच एक शास्त्रीय प्रयोग बार्शीतील प्राध्यापकाने केलाय. निर्जंतुकिकरणासाठी अतिनील प्रकाश अर्थात यूव्ही लाईटचा वापर करून अनोख्य अशा बॉक्सची निर्मिती केलीय. प्रा. किरण गायकवाड असे या वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव आहे. अनलॉक होत असताना हळूहळू उद्योग आणि व्यवसाय सुरू होत आहेत. यावेळेस रोखीचे व्यवहार देखील लोक मोठ्या प्रमाणे करत असतात. त्याचप्रमाणे कार्यालयांमध्ये कागदपत्रांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. हे करत असताना व्यक्तीचा एकमेकांशी संपर्क होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रा. किरण गायकवाड यांनी आपला विद्यार्थी अथर्वराज धुमाळ यांना सोबत घेऊन अनोखा बॉक्स तयार केला आहे. या बॉक्समध्ये नोटांसह, कागद किंवा इतर कोणतेही वस्तू काही सेकंद ठेवल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुक होऊ शकत असल्याची माहिती किरण गायकवाड यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 10803 वर. बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 6141. आजपर्यंत एकूण 396 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4266 रुग्णांवर उपचार सुरू. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 137 पॉझिटिव्ह.
हनी ट्रॅप ऑडिओ क्लिप प्रकरणातील आरोपी साहिल सय्यदला अटक. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानकापूर परिसरात त्याच्या राहत्या घरातून अटक केली. गोपनीय माहिती मिळाली होती की साहिल काही वेळ त्याच्या घरी येणार आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पळून जाण्याचा तयारीत असताना अटक केली आहे. साहिल सय्यद ऑडिओ क्लिप प्रकरण तसेच इतर अनेक फसवणुकीच्या, धमकावण्याच्या, संपत्ती बळकावण्याच्या प्रकरणात पोलिसांना वॉन्टेड होता. याच साहिल सय्यद वरुन सध्या गृहमंत्री अनिल देशमुख आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात पत्र युद्ध सुरू आहे.
गोंदिया : परवाना नसताना १ कोटी २८ लाख रुपयांचा रासायनिक खतांचा साठा केल्यामुळे गोडाऊन सील, पोलीस व कृषी विभागाची कारवाई, गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील घटना, राईस मिलच्या गोडाऊनमध्ये केला होता अवैध साठा
कल्याण मधील विलगीकरण केंद्रात रुग्णाची खिडकीतून उडी मारून आत्महत्या. ठाणे-नाशिक महामार्ग लागत असणाऱ्या विलगीकरणं केंद्रातील घटना.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ... आज दिवसभरात अलिबाग तालुक्यात आढळले तब्बल ७१ नवीन रुग्ण... अलिबागमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४४ वर.
नियोजन भवन, सोलापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरु, बैठकीस राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, महापौर, आमदार भारत नाना भालके, प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, राजेंद्र राऊत, बबनदादा शिंदे उपस्थित
दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान दिले पाहिजे,
1 ऑगस्टला भाजप आंदोलन करणार, सरकारी अधिकाऱ्यांना दूध भेट देणार,
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
1 ऑगस्टला भाजप आंदोलन करणार, सरकारी अधिकाऱ्यांना दूध भेट देणार,
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
भाजप आमदार आणणार नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात हक्कभंग, भाजपचे नागपूर शहर आणि जिल्हा मिळून 10 आमदार, काल आढावा बैठक झाली, ती महाविकास आघाडीचीच बैठक असल्यासारखी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोडले तर अन्य आमदार, खासदार, महापौर कोणालाच बोलवले नसल्याचा आरोप, सरकारच्या जीआरच्या निर्देशांचे थेट उल्लंघन केल्याचा आरोप, त्यामुळे दहाही आमदार नितीन राऊतच्या विरोधात हक्कभंग आणणार
पुण्यात सिंहगड परिसरात असणाऱ्या खानापूरमध्ये बकऱ्या चोरीला, काल रात्री 2 वाजताच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून चोरी, आज आखाड असल्याने विक्रीस आणलेले 19 बकऱ्या चोरीला, 19 बकऱ्यांची किंमत तब्बल दीड लाख रुपये असल्याचे दुकान मालकांनी सांगितले आहे.
सोलापूरमध्ये कोरोना बैठकीसाठी निघालेल्या शरद पवार यांनी आज माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकांना वेळ देत भेटीगाठी घेतल्याने मोहिते समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे. आज सकाळी शरद पवार हे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समवेत बारामती येथून कोरोना बैठकीसाठी सोलापूरला निघाले. या दौरा शासकीय कार्यक्रमात केवळ माळशिरस तालुक्यातील रमेश पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देणार होते. त्याप्रमाणे पवार यांनी सकाळी रमेश पाटील यांच्या निवासस्थानी वाकडी वाट करून जात त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. वास्तविक रमेश पाटील यांचे कुटुंब शरद पवार समर्थक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असून रमेश पाटील हा राष्ट्रवादीचा साधा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. कण्हेर येथून थेट सोलापूरला जाणार असा समज असताना पवार यांच्या वाहनाचा ताफा माळशिरस मधील मोहिते पाटील विरोधक डॉ रामदास देशमुख यांच्या घराकडे वळला. येथे मोहिते पाटील यांच्या कट्टर विरोधकांची फौजच पवारांच्या भेटीसाठी थांबली होती. येथे या सर्व नेत्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पवार सोलापूरला निघाले खरे मात्र पुन्हा वेळापुरात उत्तम जानकर यांच्या निवासस्थानाकडे अचानक गाडी वळवली. माळशिरस तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी सुरु केलेल्या धान्यबँकेतून पवारांच्या हस्ते काही महिलांना धान्याचे वाटप करण्यात आल्यावर मग पवारांचा ताफा सोलापूरकडे रवाना झाला. मात्र पवार माळशिरस तालुक्यात असेपर्यंत मोहिते समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. नेहमी शिवरत्नवर बैठक घेणारे पवार आज चक्क मोहिते विरोधकांच्या शिवतीर्थ आणि गरुड बंगल्यावर थांबल्याने मोहिते समर्थकांत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे .
सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास वरदायिनी असलेले उजनी धरण मायनस मधून प्लसमध्ये आले आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास कृषी विकासाला हातभार लागलेल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्याकडे नेहमीच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या उन्हाळ्यात दिनांक 13 मे 2020 रोजी पाच वाजता उजनी धरण मायनस मध्ये गेले होते. 14 जून 2020 ला सर्वात निचांकी म्हणजेच मायनस - 24.15 टक्यांपर्यंत गेलेल्या धरणात पुणे जिल्ह्यातून व भीमा खोरयात पडलेल्या पावसाचे पाणी आल्याने पाणी पातळी वाढली आहे. 13 मे 2020 ला मायनस मध्ये गेलेले धरण काल सायंकाळी सहा वाजता प्लस मध्ये आले आहे.
उजनी धरणातील आज रविवारी ची सकाळी सहा वाजण्याची पाण्याची स्थिती
- पाणीपातळी : 491.040 मीटर
- एकूण पाणीसाठा : 1804.80 द. ल. घ. मी.
- टक्केवारी : 0.13 टक्के
- एकूण पाणीसाठी :- 63.73 टी एम सी
सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास कृषी विकासाला हातभार लागलेल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्याकडे नेहमीच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या उन्हाळ्यात दिनांक 13 मे 2020 रोजी पाच वाजता उजनी धरण मायनस मध्ये गेले होते. 14 जून 2020 ला सर्वात निचांकी म्हणजेच मायनस - 24.15 टक्यांपर्यंत गेलेल्या धरणात पुणे जिल्ह्यातून व भीमा खोरयात पडलेल्या पावसाचे पाणी आल्याने पाणी पातळी वाढली आहे. 13 मे 2020 ला मायनस मध्ये गेलेले धरण काल सायंकाळी सहा वाजता प्लस मध्ये आले आहे.
उजनी धरणातील आज रविवारी ची सकाळी सहा वाजण्याची पाण्याची स्थिती
- पाणीपातळी : 491.040 मीटर
- एकूण पाणीसाठा : 1804.80 द. ल. घ. मी.
- टक्केवारी : 0.13 टक्के
- एकूण पाणीसाठी :- 63.73 टी एम सी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार सोलापुरात दाखल, जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकांचे आयोजन, या बैठकांनंतर 3.30 वाजता पत्रकार परिषदेत संवाद साधणार
महाराष्ट्र राज्य मागास आयोगाचे तीन तेरा,
मुदत संपून सात महिने उलटले तरी तिघाडी सरकारला सोयरसुतक नाही,
महाराष्ट्राच्या मागास जनतेची घोर प्रतारणा केली जातेय,
त्वरित मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे, अन्यथा सरकारला रोषाला सामोरे जावे लागेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप
मीरा भाईंदर क्षेञातील लॉकडाउन कालावधील काल राञी 12 वाजता संपल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी शहरातील 10 हॉटस्पॉटमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा आदेश जाहीर केला आहे परुंतु उर्वरित विभागासाठी निर्बंथ शिथिल करण्यात आले असून, सम विषम पध्दतीने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हॉटस्पॉटची क्षेञे :
सरस्वती नगर, भाईंदर पूर्व, साईबाबा नगर, भाईंदर पूर्व, बी.पी.रोड, गोडदेव नाका, भाईंदर पूर्व, खारीगाव,बी.पी.रोड, भाईंदर पूर्व, आर.एन.पी. पार्क भाईंदर पूर्व, रेवआगर, मुर्धागाव, भाईंदर पश्चिम, शिवनेरी, गल्ली नंबर २३ उत्तन रोड, भाईंदर पश्चिम, पाली, सुंदर गल्ली पेट्रोल पंप चौक, भाईंदर पश्चिम, सेनानगर, गोडदेव गांव, भाईंदर पूर्व, शिर्डी नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व
हॉटस्पॉटची क्षेञे :
सरस्वती नगर, भाईंदर पूर्व, साईबाबा नगर, भाईंदर पूर्व, बी.पी.रोड, गोडदेव नाका, भाईंदर पूर्व, खारीगाव,बी.पी.रोड, भाईंदर पूर्व, आर.एन.पी. पार्क भाईंदर पूर्व, रेवआगर, मुर्धागाव, भाईंदर पश्चिम, शिवनेरी, गल्ली नंबर २३ उत्तन रोड, भाईंदर पश्चिम, पाली, सुंदर गल्ली पेट्रोल पंप चौक, भाईंदर पश्चिम, सेनानगर, गोडदेव गांव, भाईंदर पूर्व, शिर्डी नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व
पुणे -
पुण्यात पेट्रोलिंग करताना सहकारनगर भागात पुणे पोलिसांच्या विशेष शाखेन 83 हजार 523 रुपयांची दारु केली जप्त,
स्वारगेट कात्रज रस्त्यावर दारू विकत असताना पोलिसांनी केलं चौघांना अटक, विठ्ठल सावजी,बबलू श्रीवास्तव,कालिदास मिसळे,धीरज परदेशी अशी चौघांची नावे
पुण्यात पेट्रोलिंग करताना सहकारनगर भागात पुणे पोलिसांच्या विशेष शाखेन 83 हजार 523 रुपयांची दारु केली जप्त,
स्वारगेट कात्रज रस्त्यावर दारू विकत असताना पोलिसांनी केलं चौघांना अटक, विठ्ठल सावजी,बबलू श्रीवास्तव,कालिदास मिसळे,धीरज परदेशी अशी चौघांची नावे
धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील सुतार गल्लीतील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल २८ जूनला पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं . उपचारादरम्यान ११ जुलैला दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनानं महिलेच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी महिलेच्या मुलासह दोन नातेवाईक धुळ्यात आलेत . रुग्णालयात मुलाने आईचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. आईचा चेहरा पाहताना तिच्या गळ्यातील मंगलपोत, कानातील बाळ्या , नाकातील नथ आदी सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्याला दिसले, ते कुठे आहे अशी विचारणा केली; परंतु त्यावेळी कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करत लगेच अंत्यविधीसाठी मृतदेह पॅक करून दिला. त्यानंतर वेळोवेळी चाैकशी करूनही आईचे दोन तोळे सोन्याचे दागिने मिळाले नाही. त्यामुळे साधारण ७० ते ८० हजार रुपये किमतीचे दागिने रुग्णालयातच कर्मचाऱ्यांनी काढून घेतले अशी तक्रार मृत महिलेच्या मुलाने केलीय .तर यासंदर्भात साक्रीतील भाजपनं पोलीस निरीक्षकांना निवेदन देत मृत महिलेच्या अंगावरील दागिने काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय . दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय
पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरचा पहिला दिवशीच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणारा ठरला. चिंचवडमधील गांधी पेठेत तर अक्षरशः वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण झालं होतं. आखाड महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने मटण-चिकन आणि मासे खरेदीसाठी ही झुंबड उडाली होती. खरं तर दिवसभर खरेदीची आज मुभा देण्यात आलीये पण आता लॉकडाऊन संपल्याच्या अविर्भावतच काही नागरिक वावरत आहेत. गर्दी किती ही झाली तरी दुपारीच आखाड साजरा करणार अशी अडमुठी भूमिका घेतलेली आहे.
पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरचा पहिला दिवस हा सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणारा ठरला. चिंचवडमधील गांधी पेठेत तर अक्षरशः वाहतूक कोंडीचं चित्र निर्माण झालं होतं. आखाड महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने मटण-चिकन आणि मासे खरेदीसाठी ही झुंबड उडाली होती. खरं तर दिवसभर खरेदीची आज मुभा देण्यात आलीये पण आता लॉकडाऊन संपल्याच्या अविर्भावतच काही नागरिक वावरत आहेत.
सोलापुरातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. दुपारी 1 वाजता जिल्ह्यातील आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. तर दुपारी 2 वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5265 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 365 रुग्णांनी आपला जीव गमवला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्युदर असलेल्या शहरांपैकी सोलापूर देखील आहे. हेच मृत्युदर कमी करणे प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या नियोजन भवन येथे आढावा बैठक पार पडणार आहे. सध्या या ठिकाणी तयारी सुरू आहे.
औरंगाबाद काल केलेल्या व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्टमध्ये 27 व्यापारी पॉझिटिव्ह निघाले. आजही करणार जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची टेस्ट, एका व्यापाऱ्यांच्या घरातील 14 लोकं पॉझिटिव्ह .पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची माहिती
नाशिक महानगरपालिका प्रशासनाने शहरातील 1 हजार 32 धोकेदायक वाडे आणि इमारतींना नोटिसा बजवल्या असून घर खाली करण्याचे आदेश दिलेत. त्याच बरोबर इमारतीच्या बाहेर मनपा धोकादायक इमारतीचा फलकही लावणार आहे, 15 दिवसांपूर्वी शहरातील भद्रकाली परिसरात वाडा कोसळून एकाचा मृत्यू झाला होता, दोन दिवसांपूर्वीच मुंबईत ही इमारत कोसळली होती, त्यामुळे कोरोनाच्या संकटात आणखी दुसरे विघ्न नको म्हणून मनपाने नोटीस बजावून नागरिकांना वर जबाबदारी टाकली आहे
अमेरिका आणि ब्राझिलनंतर आता भारतात एका दिवसात सर्वाधित कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात आता कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 10 लाख 77 हजार 618 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 26,816 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 6 लाख 77 हजार 422 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 38 हजार 902 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 543 मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ; ग्रामीण भागाची स्थितीही चिंताजनक, कोरोनाचा आकडा 11000 पार, पालघर जिल्ह्यात शनिवार संध्याकाळपर्यंत एका दिवसात नवीन 323 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू तर ग्रामीण मध्ये तर ववि मनपा मध्ये 5 मृत्यू
एकीकडे महाराष्ट्रात मध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर या कोरोनाच्या आडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करून पैसे कमविणारे ही समोर येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने रेमेडिसिवीरसारख्या कोरोनाग्रस्तांना फायद्याचे असलेल्या औषधांचा कालाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. रेमेडिसिवीर किंवा टोसीलिझोमाब सारख्या कोरोनाग्रस्त रुग्णांना आराम देणाऱ्या औषधांची किंमत सहा ते दहा पट वाढवून या औषधांचा काळा बाजार करणारी ही टोळी आहे. एफडीएला याबाबत माहिती मिळताच त्यांनी नकली गिऱ्हाईक बनून त्यांना संपर्क केला. मुलुंडमधून त्यांनी ही औषध देताना दोन जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष सातच्या मदतीने या टोळीतील आणखी 5 अशा सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून रेमेडिसिवीरच्या 13 बॉटल ही जमा करण्यात आल्या आहेत. सध्या याचा तपास गुन्हेशाखा करीत आहे. तर एफडीए देखील अशा प्रकारे कोरोनाच्या काळात औषधाचा काळा बाजार करणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर आता कडक कारवाई करीत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील 134 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह, आतापर्यंत 10538 कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी 5986 बरे झाले, 392 जणांचा मृत्यू झाला. तर 4160 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 14, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 85 जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत.
अखेर पंढरपूर मधून देवाच्या पादुका आरणकडे वाहनातून निघाल्या, देव आणि सावता महाराज यांच्या भेटीची परंपरा 124 वर्षाची परंपरा अबाधित राहणार, सावता मंदिर ट्रस्टचे मानकरी वाहन घेऊन पंढरपूरमध्ये दाखल
कोरोनामुळे माढा तालुक्यातील आरण येथे आज सावता महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी 144 कलाम पुकारले असून यंदा कोणताही सोहळा घेतला जाणार नाही. पंढरपूरवरून देवाच्या पादुका सावता महाराजांच्या भेटीला जाणेही अनिश्चित आहे. त्यामुळे यंदा देव आणइ सावता माळी यांची परंपरागत भेट होण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षी येथे हजारोच्या संख्येने माळी बांधव राज्यभरातून सावता महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी येत असतात. आज मात्र हा संपूर्ण परिसर पोलिसांच्या ताब्यात असून गावात संचारबंदी सुरू आहे .
9 दिवसांच्या संचारबंदी नंतर आज सकाळी औरंगाबाद शहरात भाजीपाला,फळे विक्रेत्यांनी आपली दुकानं लावण्यास सुरवात केली आहे. नागरिकही सकाळी काही प्रमाणात बाहेर पडले आहेत. औरंगाबाद शहरात जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना अँटीजन टेस्ट करून कोरोना निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे मात्र यालाही 25 तारखेपर्यंत मुदत दिली आहे.त्यामुळे औरंगाबाद शहराचे 9 दिवस संचारबंदी संपल्यानंतर ही सकाळ अशी आहे ..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- LIVE UPDATES | महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी