मुंबई : राज्यात आज 2 हजार 608 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळण्याचा आजचा सलग सातवा दिवस आहे. 17 मे पासून दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूची संख्या 1577 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 821 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 13 हजार 404 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत एकूण 47 हजार 190 लोकांना राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. पैकी 32 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 40, पुण्यात 14, सोलापुरात 2, वसई विरारमध्ये 1, साताऱ्यात 1, ठाणे 1 तर नांदेड शहरात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज झालेल् मृत्यूंपैकी 42 मृत्यू हे मागील 24 तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवडयातील आहेत.


राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 48 हजार 026 नमुन्यांपैकी 2 लाख 98 हजार 696 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 47,190 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 85 हजार 623 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 33 हजार 545 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 13,404 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.


महाराष्ट्र एकूण रूग्ण – 47,190


मृत्यू - 1577


मुंबई महानगरपालिका- 28,817 (मृत्यू 949)


ठाणे- 394 (मृत्यू 4 )


ठाणे महानगरपालिका- 2405 (मृत्यू 35)


नवी मुंबई मनपा- 1878 (मृत्यू 29)


कल्याण डोंबिवली - 784 (मृत्यू 7)


उल्हासनगर मनपा - 145 (मृत्यू 3)


भिवंडी, निजामपूर - 82 (मृत्यू 3)


मिरा-भाईंदर- 442 (मृत्यू 4)


पालघर - 111 (मृत्यू 3 )


वसई- विरार- 499 (मृत्यू 15)


रायगड- 321 (मृत्यू 5)


पनवेल- 295 (मृत्यू 12)


नाशिक - 115


नाशिक मनपा- 105 (मृत्यू 2)


मालेगाव मनपा - 711 (मृत्यू 44)


अहमदनगर- 53 (मृत्यू 5)


अहमदनगर मनपा - 19


धुळे - 17 (मृत्यू 3)


धुळे मनपा - 80 (मृत्यू 6)


जळगाव- 290 (मृत्यू 36)


जळगाव मनपा- 113 (मृत्यू 5)


नंदुरबार - 32 (मृत्यू 2)


पुणे- 312 (मृत्यू 5)


पुणे मनपा - 4805 (मृत्यू 245)


पिंपरी-चिंचवड मनपा - 230 (मृत्यू 7)


सोलापूर - 22 (मृत्यू 1)


सोलापूर मनपा- 545 (मृत्यू 34)


सातारा - 204 (मृत्यू 5)


कोल्हापूर- 206 (मृत्यू 1)


कोल्हापूर मनपा- 23


सांगली- 63


सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 11 (मृत्यू 1)


सिंधुदुर्ग- 10


रत्नागिरी- 142 (मृत्यू 3)


औरंगाबाद - 22


औरंगाबाद मनपा - 1197 (मृत्यू 42)


जालना - 54


हिंगोली - 112


परभणी - 17 (मृत्यू 1)


परभणी मनपा - 5


लातूर - 64 (मृत्यू 2)


लातूर मनपा - 3


उस्मानाबाद - 29


बीड - 26


नांदेड - 15


नांदेड मनपा - 83 (मृत्यू 5)


अकोला - 31 (मृत्यू 2)


अकोला मनपा - 342 (मृत्यू 15)


अमरावती - 13 (मृत्यू 2)


अमरावती मनपा - 143 (मृत्यू 12)


यवतमाळ - 113


बुलढाणा - 39 (मृत्यू 3)


वाशिम - 8


नागपूर - 3


नागपूर मनपा - 462 (मृत्यू 7)


वर्धा - 3 (मृत्यू 1)


भंडारा - 9


चंद्रपूर - 8


चंद्रपूर मनपा - 8


गोंदिया - 39


गडचिरोली - 13


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2345 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 16,414 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 65.91 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.


India Corona Update | देशात 24 तासात कोरोनाचे 6654 रुग्ण वाढले,आतापर्यंत 3720 कोरोनाबाधितांचा मृत्यू