CM Uddhav Thackeray LIVE : मराठा आरक्षणाबाबत जास्त वेळ न घालवता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, उद्या केंद्राला पत्र लिहिणार - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray :आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करत आहेत. आज झालेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर काय बोलणार? याकडे लक्ष लागून आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 May 2021 09:06 PM
तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही- मुख्यमंत्री

मराठा समाजाने जो संयम आणि शांतता आजवर दाखवली तीच पुढेही दाखवावी, सरकारवर विश्वास ठेवावा, ही लढाई सरकार जिंकून दाखवेल, तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही- मुख्यमंत्री

छत्रपती संभाजी राजे यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली- मुख्यमंत्री 

छत्रपती संभाजी राजे यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली- मुख्यमंत्री 

मराठा नेत्यांनी, समाजाने शांतपणे मराठा आरक्षणाचा निर्णय ऐकला, त्याबद्दल त्यांचे हात जोडुन धन्यवाद! - मुख्यमंत्री

मराठा नेत्यांनी, समाजाने शांतपणे मराठा आरक्षणाचा निर्णय ऐकला, त्याबद्दल त्यांचे हात जोडुन धन्यवाद! - मुख्यमंत्री

1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्यातच करणार. तिसर्‍या लाटेला तोंड देण्याची तयारी महाराष्ट्रात सुरु- मुख्यमंत्री

1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्यातच करणार. तिसर्‍या लाटेला तोंड देण्याची तयारी महाराष्ट्रात सुरु- मुख्यमंत्री

दुसरी लाट थोपवायची आहेच परंतु तिसर्‍या लाटेचा घातक परिणाम राज्यावर होऊ द्यायचा नाही, याचा चंग बांधुन राज्य काम करत आहे- मुख्यमंत्री

दुसरी लाट थोपवायची आहेच परंतु तिसर्‍या लाटेचा घातक परिणाम राज्यावर होऊ द्यायचा नाही, याचा चंग बांधुन राज्य काम करत आहे- मुख्यमंत्री

25 एप्रिलला राज्यात जवळपास सात लाखाला पोहचलो होतो आणि 4 मे म्हणजे काल 6,41000 इतकी आपण रुग्णवाढ थोपवली आहे. काही जिल्ह्यात मात्र रुग्णवाढ होत आहे, आपण लक्ष ठेवुन आहोत : मुख्यमंत्री

25 एप्रिलला राज्यात जवळपास सात लाखाला पोहचलो होतो आणि 4 मे म्हणजे काल 6,41000 इतकी आपण रुग्णवाढ थोपवली आहे. काही जिल्ह्यात मात्र रुग्णवाढ होत आहे, आपण लक्ष ठेवुन आहोत : मुख्यमंत्री

कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं सुप्रीम कोर्टाने कौतुक केलंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं सुप्रीम कोर्टाने कौतुक केलंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र अजुनही धोक्याच्या वळणावर! जे जे करण्याची गरज आहे ते ते करण्याचा प्रयत्न सुरु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र अजुनही धोक्याच्या वळणावर! जे जे करण्याची गरज आहे ते ते करण्याचा प्रयत्न सुरु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पार्श्वभूमी


मुंबई : आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. आज झालेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर काय बोलणार? याकडे लक्ष लागून आहे.  महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वतीनं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

 

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात फेटाळल्यानंतर राज्यात काही ठिकाणी आंदोलनं सुरु झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज रात्री मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याच्या विधीमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. गायकवाड समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासही सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली. महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे व सरकार हे लोकांचा आवाज आहे. महाराष्ट्रातील मोठ्या पिडीत वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारनेमराठा आरक्षण हा निर्णय घेतला होता. 



निवेदनात असंही म्हटलंय की, आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितलं गेलंय. हे एक प्रकारचं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालं. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्या आाधी शहाबानो प्रकरण, ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच 370 कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी.


छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही ? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मा. पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न विचारला असल्याचंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जारी केलेल्या या निवेदनात शेवटी म्हटलंय की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील.



महत्वाच्या बातम्या: 







 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.