घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या बसमध्ये एकूण होते 50 प्रवासी होते. उज्जैनहून चित्रकूटला जात असताना विदिशा-सागर रोडवरील एका अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस तीन वेळा उलटली. दरम्यान ती बस रस्त्याजवळच्या नाल्यात पडता-पडता थोडक्यात वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नाशिकमधील 50 भाविक 9 जून रोजी सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसने एक महिन्याच्या तीर्थ यात्रेसाठी निघाले होते. परंतु यात्रेच्या चौथ्याच दिवशी बसचा मोठा अपघात झाला.